Latest Post

महाराष्ट्र पोलीस मेगासिटी सहकारी गृहरचना संस्था (मर्यादित), लोहगाव पुणे ही सभासदांना किफायतशीर दरात, हक्काचे निवासस्थान मिळावे या हेतूने, पोलिसांनी पोलिसांकरिता स्थापन केलेली सहकारी गृहरचना संस्था असून लोहगाव येथे ११६ एकर जमीनीवर मोठे गृहसंकुल उभारले जात आहे. संस्थेच्या सभासदांची संख्या ७२१३ इतकी असून १२ वर्षात प्रथमच संस्थेची २०२२-२०२७ या कालावधीसाठी निवडणूक घेण्यात आली.

     दि.११/१२/२०२२ रोजी पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, नाशिक, नागपूर व अमरावती या १० शहरांमध्ये मतदान होऊन दि. १३/१२/२०२२ रोजी शिवाजी मराठा हायस्कूल शुक्रवार पेठ पुणे येथे मतमोजणी झाली.


     ही संपूर्ण प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती निलम पिंगळे, उपनिबंधक सहकारी संस्था पुणे (२) यांच्या अधिपत्याखाली शांततापूर्वक पार पडली. 

     यापूर्वी असलेल्या संचालक मंडळाच्या गलथान व मनमानी कारभारामुळे मेगासिटी प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नसून गेल्या १० महिन्यांपासून संस्थेचा कारभार प्रशासकाचे ताब्यात होता. या निवडणुकीत संस्थेच्या जागरूक व समविचारी सभासदांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या 'जागृती' पॅनेलचे सर्व १९ उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आले असून विरोधातील क्रांती व सावधान या दोन्ही पॅनलचा दारुण पराभव होऊन सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.अनामत गमावलेल्या पराभूत उमेदवारांमध्ये पुण्यातून नुकतेच बदलून गेलेले वाहतूक पोलिस उपायुक्त श्री राहुल श्रीरामे यांचाही समावेश आहे.

जागृती पॅनेलचे विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

१) श्री प्रदीप देशपांडे, विशेष पोलिस महानिरीक्षक (नि)

२) श्री अरविंद पाटील, सहायक पोलिस आयुक्त (नि)

३) श्री राजेन्द्र मोरे, पोलिस उपअधीक्षक (नि)

४) श्री भारतकुमार राणे, पोलिस उपअधीक्षक (नि)

५) श्री सुरेश भामरे, सहायक पोलिस आयुक्त (नि) नाशिक

६) श्री बरकत मुजावर, पोलिस उपअधीक्षक (नि) पुणे

७) श्री नारायण इंगळे, पोलिस उपअधीक्षक, (नि) नाशिक 

८) श्री किशोर जगताप, सहायक पोलिस आयुक्त (नि), मुंबई 

९ ) श्री सतीश टाक पोलिस निरिक्षक ( नि) औरंगाबाद 

१०) श्री अर्जुन गायकवाड पोलिस निरिक्षक (नि) नवी मुंबई ११ ) श्री दत्तात्रय दराडे पोलिस निरिक्षक (नि) मुंबई 

१२) श्री पोपटराव आव्हाड, पोलिस निरीक्षक, मुंबई 

१३) श्री धनंजय कंधारकर, पोलिस निरीक्षक, (नि) मुंबई

१४) श्री सुभाष भालसिंग, सहायक पोलिस उपनिरीक्षक, अहमदनगर 

१५) श्री गणेश ठाकरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक (नि) पुणे 

१६) श्री प्रल्हाद भोसले, पोलिस उपनिरीक्षक (नि) पुणे 

१७) श्री शेळके मनीष बाबुराव, पुणे 

१८) सौ.निलम बो-हाडे, पोलिस हवालदार, ठाणे

१९) सौ. वैशाली जगताप, वरिष्ठ लिपीक, पोलिस आयुक्तालय, पुणे.

निवडणूक प्रक्रिया चालू असताना या संस्थेच्या माजी सेक्रेटरी मोहंमद रफी खान यांनी प्रशासकाच्या अनुपस्थितीत संस्थेच्या कार्यालयात येऊन, कर्मचाऱ्यांना हाताशी धरून, एक पोते भरुन काही महत्त्वाचे कागदपत्रे व फायली चोरून नेल्यामुळे त्याचे विरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात नुकताच एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या कमिटीच्या सभासदांनी गठित केलेल्या संपूर्ण पॅनेलचा पराभव झाल्यामुळे व संवेदनशील प्रामाणिक सभासदांनी संस्थेच्या कारभारात लक्ष घातल्याने गैरकारभारास जबाबदार असलेल्या जुन्या संचालकांचे आता धाबे दणाणले आहे. प्रकल्पातील एकही इमारत अद्याप पूर्ण झाली नसून संस्थेच्या कारभा-यांनी बिल्डर कंपनीला २७१ कोटी रुपये दिले आहेत, तरी एकाही सदस्याला घर मिळालेले नाही याबद्दल जबाबदार असलेल्या सगळ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याची भावना विजयी पॅनेलचे प्रवक्ते श्री अरविंद पाटील यांनी व्यक्त केली.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -पैसे कमवायला फक्त ५ वी पर्यंत शिक्षण गरजेचे आहे हे एका उद्योजकाचे विधान आज प्रत्यक्षात पाहण्याची संधी परमवीर शहीद अब्दुलहमीद नगरपालिका डिजीटल उर्दू शाळा क्र.५ ने आयोजित आपना बाजार मध्ये प्राप्त झाली.एखाद्या खाद्य महोत्सवाला लाजवेल एवढे खाद्य पदार्थ या बाज़ारातील खाऊ गल्लीत पाहण्यास मिळाले.मुलांनी स्वछतेबाबत घेतलेली काळजी ही पंचतारांकित हॉटेलच्या शेफ प्रमाणे होती.प्रत्येक स्टॉलवर लेबलप्रमाणे ठेवलेले खाद्यपदार्थ व एका दिवसासाठी व्यासायिक झालेली ही लहान मुले, त्यांचा उत्साह व आनंद पाहण्यासारखा होता. त्यातून पालकांनी व शिक्षकांनी घेतलेले परिश्रम दिसून येत होते. खरं तर या संपूर्ण उपक्रमाचे श्रेय हे शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक सलिमखान पठाण सर यांना जाते. त्यांनी आपल्या काळात नगरपालिका शाळेचे रूपांतर एका कॉन्वेंट शाळेत केले असे म्हणण्यास हरकत नाही.आगामी काही दिवसात ते निवृत्त होणार असले तरी उर्दू शाळा क्रमांक पाचची निर्माण झालेली प्रतिमा येथील शिक्षक पुढे कायम ठेवतील याची मला खात्री आहे. विद्यार्थी हिताचे असेच उपक्रम या शाळेने राबवावेत.आगामी काळात विविध शैक्षणिक उपक्रमाकरीता उर्दू शाळा क्र ५ ला खुप साऱ्या शुभेच्छा मी आपल्या सर्वांच्या वतीने देतो असे प्रतिपादन गरीबनवाज फाउंडेशनचे संस्थापक,माजी नगरसेवक मुख्तारभाई शाह यांनी केले.
येथील नगरपालिकेच्या उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये मुलांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी आयोजित केलेल्या अपना बाजारच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अनोख्या अशा या अपना बाजारचे उद्घाटन नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांचे हस्ते करण्यात आले.त्याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मुख्तार शाह बोलत होते.
यावेळी माजी नगरसेविका जायदाबी कुरेशी,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तरन्नुम मुनीर शेख,उपाध्यक्ष अजीम शेख, युवक काँग्रेसचे जाफर शहा, सरवर अली मास्टर, मुक्तार मणियार,अहमद शाह, शरीफ मेमन,आदिल मखदुमी, फिरोज पोपटिया,असलम बिनसाद,फारुख तांबोळी,मुख्याध्यापिका परविन शेख,कांचन मुसळे,नाझिया शेख,नाहीद शेख आदींसह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांनी शाळा क्रमांक पाच मध्ये विद्यार्थ्यांच्या हिताचे वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबविले जातात. दैनंदिन जीवनामध्ये मुलांना व्यवहार न्याय मिळण्यासाठी आयोजित केलेला आजचा हा आपला बाजारचा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय आहे.यातून मुलांना जीवनासाठी आवश्यक व्यवहाराचे ज्ञान प्राप्त होईल.अशा उपक्रमांची आज गरज आहे.या कार्यक्रमासाठी सर्वपक्षी लोक राजकीय अधिनिवेश बाजूला ठेवून शैक्षणिक कार्याला प्रोत्साहन देऊन देण्यासाठी एकत्र आले ही अभिनंदनीय बाब आहे असे नमूद करून शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या कामाचे कौतुक केले.
प्रास्ताविक भाषणामध्ये मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांनी दरवर्षी शाळेमध्ये अशा प्रकारच्या बाजाराचे आयोजन केले जाते. मागील दोन वर्षांमध्ये कोरोना काळामुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे यावर्षी पालक आणि विद्यार्थी यांच्या आग्रहास्तव हा अपना बाजार भरविण्यात आला आहे. पालक व विद्यार्थी यांच्यात खूपच उत्साह आहे. त्यातूनच मोठ्या संख्येने स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत असे सांगितले.
या अपना बाजार मध्ये स्टेशनरी,भाजीपाला, खेळणी, कटलरी, किराणा आदी सामानाची दुकाने लावण्यात आली होती. सर्वात जास्त लक्ष वेधले ते खाऊ गल्ली विभागातील खाद्यपदार्थांच्या स्टॉलनी. विद्यार्थ्यांनी स्वतः वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करून आणले होते. पालक आणि परिसरातील नागरिकांनी या बाजारामध्ये मोठी गर्दी केल्याने चार तासांमध्ये अपेक्षित असणारा हा अपना बाजार दोन तासातच संपला. नगरपालिका शाळा क्रमांक चार,सहा, नऊ तसेच खासदार गोविंदराव आदिक उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थ्यांनी या बाजाराला भेट दिली.
बाजारामध्ये ३२ हजार रुपयांची उलाढाल झाली.हैदराबादी बिर्याणी या स्टॉलला तोटा सहन करावा लागला. इतर स्टॉल मात्र नफ्यात राहिले.
एक आगळावेगळा उपक्रम म्हणून या अपना बाजारची चर्चा शाळेचे विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिकांमध्ये होती. आलेल्या सर्व मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन पाहणी केली तसेच खरेदी सुद्धा केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसिफ मृत्यूचा यांनी केले तर आभार फारूक शाह यांनी मानले.
सदरचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे व शाळेचे मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री फारूक शाह, आसिफ मुर्तुजा,एजाज चौधरी,जुनेद काकर, वहिदा सय्यद, नसरीन इनामदार, शाहीन शेख, अस्मा पटेल,बशीरा पठाण, निलोफर शेख, मिनाज शेख, यास्मिन पठाण, रिजवाना कुरेशी, रेश्मा सय्यद,हिना पठाण आदींनी विशेष परिश्रम घेतले.

अहमदनगर प्रतिनिधी- जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारा विरोधात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेने,एकाच आठवड्यात दुसरी कारवाई करत.३ गावठी कट्टे, ३ जिवंत काडतुसांसह ५ सराईत आरोपींना गजाआड केले आहे. ज्यात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे,कोल्हार बुद्रुक येथील राजवाडा गौतमनगर परिसरात सापळा रचून. बेकायदेशीर रित्या विक्रीच्या उद्देशाने आणलेल्या, दुर्गेश बापु शिंदे वय वर्ष ३५,रा. सरस्वती कॉलनी, वॉर्ड नं.७, श्रीरामपूर, हारुण ऊर्फ राजु रशिद शेख, वय वर्ष ३१, रा.अहिल्यादेवी नगर, वॉर्ड नं.२, श्रीरामपूर, अश्पाक ऊर्फ मुन्ना रफिक पटेल, वय वर्ष २१, रा. बेलापुर रोड, शहानगर, कोल्हार ब्रुद्रुक, प्रसन्न विलास लोखंडे, वय वर्ष ३२, रा. गौतमनगर, राजवाडा, कोल्हार बुा, तालुका राहाता, सदानंद राजेंद्र मनतोडे, वय वर्ष २७, राहणार शिबलापुर, तालुका संगमनेर अशा ५ जणांना ताब्यात घेतले असून. आरोपीं विरोधात लोणी पोलीस ठाण्यात,आर्म ऍ़क्ट ३/२५, ७ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून. या प्रकारणाचा पुढील तपास लोणी पोलीस करत आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,  अप्पर पोलीस अधीक्षक,श्रीमती. स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिक्षक, संजय सातव, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली,सहाय्यक फौजदारी मनोहर शेजवळ, भाऊसाहेब काळे,पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक शंकर चौधरी, संदीप चव्हाण, लक्ष्मण खोकले, दिलीप शिंदे, राहुल सोळुंके, पोलीस कॉन्स्टेबल रणजीत जाधव,संभाजी कोतकर व भरत बुधवंत आदींच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

श्रीरामपूर : शहरात लग्नाचा बनाव करून. ३ वर्षांपासून अत्याचार होत असल्या संदर्भात, एका जिमच्या मालका विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने.शहरातील महिला वर्गात खळबळ उडाली आहे. ज्यात जिम मध्ये येणाऱ्या,एका विशिष्ट समाजाच्या, पीडित मुलीला. वेळोवेळी फेसबुक,मोबाईल मेसेज करून. एका मंदिरात हार घालून, व डोक्यात कुंकू भरून. आपले लग्न झाल्याचे सांगत. लवकरच रजिस्टर मॅरेज करून सोबत राहू असे म्हणत. श्रीरामपूर, पुणे अशा विविध ठिकाणी, पिडितेवर वेळोवेळी शारिरीक अत्याचार करत. पीडितेकडून आपला स्वार्थ निघाल्यानंतर, तिला लग्नास नकार देत, तिला मारहाण करून. आपल्या संबंधा संदर्भात कोणाला सांगितल्यास, तुझ्या घरच्यांची बदनामी करून. तुझ्या भावाला जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याने सतत होत असलेल्या अत्याचारास कंटाळून. पीडित मुलीने बेलापूर येथील नदीपात्रात, आपला जीव देत असतांना. तेथील काही नागरिकांनी तिचा जीव वाचवून, उपचाराकरिता साखर कामगार रुग्णालयात दाखल केल्यानंतर. घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून,जिम ट्रेनर मालक युवराज विजय शिंदे राहणार मेनरोड श्रीरामपूर, यांच्या विरोधात भादवी कलम ३७६, ३७६ (२), एन, ४२०, ३२३, ५०४,५०६ अन्वये,श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहे. पुन्हा एका जिम चालकाकडून,मुलींवर शारिरीक अत्याचाराची घटना, समोर आल्याने.महिला मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )- समिंद्रा फौंडेशन महाराष्ट्र राज्य याच्या वतीने गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य,सायकल गरजु लाभार्थ्यांना कपडे अन्नधान्य तसेच माऊली वृद्धाश्रमाच्या वतीने उबदार कपड्याचे मोफत वितरण माऊली वृद्धाश्रम येथे संपन्न झाले  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भालचंद्र कुलकर्णी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार देविदास देसाई राष्ट्रपती  पुरस्कार विजेते बबनराव तागड भाऊसाहेब वाघमारे रज्जाक पठाण रमाताई भालेराव अशोक दिवे उपस्थित होते या वेळी बोलताना समिंद्रा फौंडेशनचे अध्यक्ष  सदाशिव थोरात म्हणाले की गेल्या दहा वर्षापासून या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असुन गोरगरीबांना मोफत कपडे वाटप तसेच जिवनावश्यक वस्तुचे वाटप केले जाते कोरोना काळात अनेकांना या फौंडेशनच्या माध्यमातून  वेगवेगळ्या प्रकारे सहाय्य करण्यात आले होते महाराष्ट्रात अनेक शेतकरी कर्जामुळे आत्महत्या करत आहेत त्या शेतकऱ्यांना आमचे जाहीर अवाहन आहे अडचण आली तरी आत्महत्येचा विचार कधीच करु नका समिंद्रा फौंडेशन तुमच्या पाठीशी आहे तुम्ही केव्हाही हाक द्या परंतु आत्महत्येचा विचार मनात आणू नका समाजात निराधार मुली असतील तर त्यांचा विवाह करण्याची जबाबदारी संमिद्रा फौंडेशन घेईल सर्व सामान्य गोरगरीबांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत  समाज सेवेची प्रेरणा मला माझी आई लक्ष्मीबाई थोरात यांच्याकडून मिळाली असल्याचेही थोरात या वेळी म्हणाले या वेळी माऊली वृद्धाश्रमाचे सुभाष वाघुंडे म्हणाले कि अनेक दात्यांनी दाखविलेल्या दातृत्वामुळे कठीण असा हा अनाथ आश्रम चालविणे शक्य होत आहे आपण समाजाकडे सतत मगत असतो परंतु आपणही काही तरी दिले पाहीजे दान केले पाहीजे याच भावनेतुन आज समिंद्रा फौंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गरीब मुलांना शालोपयोगी साहीत्य तसेच गरम उबदार कपडे ब्लँकेट भेट देण्याचा निर्णय घेतलेला आहे .या वेळी भालचंद्र कुलकर्णी  जेष्ठ पत्रकार देविदास देसाई राष्ट्रपती पुरस्कार विजेते बबनराव तागड शंभुक वसतीगृहाचे अशोक दिवे सर रमाताई भालेराव रज्जाक पठाण भाऊसाहेब वाघमारे स्वाती बागुल आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी समिंद्रा फौंडेशनच्या वतीने तीन हजार कपडे २०० साड्या ९ सायकली ६० अन्नधान्य किट या साहीत्याचे मोफत वाटप करण्यात आले तर ५० विद्यार्थ्यांना वह्या ब्लँकेटचे वाटप करण्यात आले या वेळी बागुल सर श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमाचे ह भ प कृष्णानंद महाराज फौंडेशनचे अध्यक्ष सदाशिवा थोरात यांच्या आई लक्ष्मीबाई थोरात स्वाती बागुल परवीन शहा आदिसह नागरीक उपस्थित  होते कार्याक्रमाचे सूत्रसंचलन शकील बागवान यांनी केले तर सौ कल्पना सुभाष वाघुंडे यांनी आभार मानले

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - येथील एसटी स्टँड शेजारी,नेवासा रोड वरील मुख्य पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांच्या मनमानी व गलथान कारभारामुळे शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. पोस्टातील कर्मचारी आपल्या मर्जीने वागून काम करतात. नागरिकांच्या वेळेचे त्यांना भान देखील राहत नाही.त्यामुळे पोस्टाच्या या गैरकारभाराबद्दल शहरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून या ठिकाणी सक्षम पोस्ट मास्तरची नियुक्ती करून कर्मचाऱ्यांना व्यवस्थित काम करण्याचे प्रशिक्षण द्यावे अशी देखील मागणी करण्यात आली आहे.

 विशेषत:पोस्टाच्या मुख्य काउंटरच्या खिडकी क्रमांक दोन वरील सेवेबद्दल सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

काल गुरुवारी या खिडकीवर आपली कामे घेऊन आलेल्या नागरिकांना सुमारे तीन तास ताटकळावे लागले. साडेबारा वाजता लाईन मध्ये लागलेल्या लोकांना एक वाजता जेवणाची सुट्टी झाली म्हणून संबंधित कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सांगितले. बरेच वेळ उभे असलेल्या नागरिकांनी त्यांना विनंती केली तरी त्यांनी आता माझी जेवणाची सुट्टी झाली आहे,एक वाजून गेला आहे. तुम्ही दोन वाजता या असे सांगून काम बंद केले. शहराच्या इतर भागातून व लांबवरच्या भागातून आलेले नागरिक त्याच ठिकाणी थांबले.दोन वाजता तेथे मोठी रांग लागली.परंतु अडीच वाजेपर्यंत संबंधित कर्मचारी जागेवर आले नव्हते.याबाबत नागरिकांनी काउंटरचे फोटो सुद्धा काढले आहेत. काही नागरिकांनी शेजारील कर्मचाऱ्यांना याबाबत तक्रार कुठे करावी अशी विचारणा केली तेव्हा त्यांनी सुद्धा उत्तर देण्याचे टाळले. नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर आतून एक कर्मचारी त्या ठिकाणी आला व संबंधित कर्मचारी आजारी पडला आहे आता व्यवस्था करतो असे सांगितले. त्यानंतर नवीन कर्मचाऱ्याकडे या खिडकीचा चार्ज देण्यात आला. त्यांनी मागील चार्ज घेण्यामध्ये अर्धा तास घालवला.त्यानंतर काम सुरू झाले.

 दोन नंबरच्या खिडकीवर जनतेशी संबंधित सर्व कामांचे एकत्रीकरण करण्यात आल्याचे दिसून आले. रजिस्ट्रेशन पार्सल, मनीऑर्डर, तिकीट विक्री,पी एल आय या सर्वांशी संबंधित कामे या एकाच कर्मचाऱ्याकडे देण्यात आली आहेत. त्यामुळे या खिडकीवर मोठी गर्दी होत असते. अशावेळी दुसरी खिडकी चालू करणे आवश्यक आहे. परंतु एक नंबरची खिडकी सदैव बंद असते. लोकांनी मागणी करूनही त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली नाही. पोस्टाचे इतर खिडक्यांवरील कर्मचारी मात्र वेळेवर आपले कामकाज करताना दिसून आले.काही कर्मचारी टेबलावर कोणतेही काम नसताना मोबाईल पाण्यात दंग असल्याचे दिसले अशावेळी त्यांनी नागरिकांच्या सेवेसाठी आपले योगदान देणे अपेक्षित होते. सर्वसामान्य नागरिकांना सरकारी कामकाजासाठी, माहिती अधिकाराच्या पत्रव्यवहारासाठी किंवा वर्तमानपत्राच्या कामासाठी पोस्टानेच पत्र व्यवहार करणे भाग आहे.कुरिअर सेवा चांगली असली तरी कायदेशीर अडचणीमुळे काही पत्रव्यवहार हा  पोस्टानेच करावा लागतो.अशावेळी रजिस्टर पत्रे पाठवण्यासाठी या खिडकीवर मोठी गर्दी असते. तिकीट विक्रीची व्यवस्था सुद्धा याच ठिकाणी असल्याने एक रुपयाचे तिकीट घेण्यासाठी एक तास रांगेत उभे राहावे लागते असा अनुभव नेहमी येतो. त्यामुळे रजिस्टर पार्सल साठी स्वतंत्र खिडकी असावी तसेच तिकीट विक्री, मनीऑर्डर व इतर कामासाठी स्वतंत्र खिडकी असावी अशी नागरिकांची मागणी आहे. पोस्टाच्या अशा या जलतान कारभारामुळे लोकांनी पोस्टाच्या सेवेकडे पाठ फिरवली आहे.परंतु नाईलाजाने काही गोष्टींसाठी पोस्टातच जावे लागते. श्रीरामपूर पोस्ट ऑफिस ची एक वेगळी ओळख राज्यात नव्हे देशात आहे. परंतु सध्या येथील पोस्टमास्तरच्या गलथान कारभारामुळे पोस्टाची सेवा बदनाम झाली आहे. तेव्हा या ठिकाणी कार्यक्षम अशा पोस्टमास्तरची व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी )-गावातील सामाजिक राजकीय तसेच धार्मिक क्षेत्रात सतत अघाडीवर असणाऱ्या विलास मेहेत्रे यांनी उद्या होणाऱ्या  आपल्या मुलांच्या विवाह सामरंभास उपस्थित राहण्यासाठी एकच लग्नपत्रीका तयार करुन बेलापुर गाव व पंचक्रोशितील सर्वांनाच उपस्थित राहण्याचे अवाहन केले आहे.               पुर्वी लग्न म्हटले की लग्न पत्रीका छापुन घरोघर वाटण्याची प्रथा होती काल परत्वे मोबाईल आले मोबाईल वर निमंत्रण देण्याची प्रथा सुरु झाली मग व्हाटस्अप द्वारे निमंत्रण सुरु झाले पण आजही अनेकाकडे अँन्डाँइड मोबाईल नाही मग त्यांना निमंत्रण कसे जाईल गावातील सर्वच जण परिचीत आहे मग कसे निमंत्रण द्यावयाचे हा विचार चालु असतानाच इतर निवड वाढदिवस याचे फ्लेक्स लावतो मग आपण लग्न पत्रिकाचा फ्लेक्स करुन गाव व परिसरातील सर्वांनाच निमंत्रण देवु या उद्देशाने विलास मेहेत्रे यांनी लग्न पत्रीकेचा मोठा फ्लेक्स तयार करुन तो बेलापुरातील चौकात लावला बेलापुर गावात सावता फुल भांडारचे मालक व सर्वच क्षेत्रात कायम अघाडीवर असणारे विशेष करुन धार्मिक क्षेत्रात कायम अग्रभागी असणारे विलास मेहेत्रे याचा मुलगा विशाल याचा शुभविवाह भाऊसाहेब जेजुरकर यांची कन्या चि सौ का सीमा हीच्याशी  उद्या उत्सव मंगल कार्यालयात संपन्न होत आहे त्या निमित्त सारा गाव व परिसर सुपरिचित असल्यामुळे मेहेत्रे परीवाराने लग्न पत्रीकेचा फ्लेक्स तयार करुन तो मुख्य चौकात लावला व लग्न पत्रीकेचा फ्लेक्स लावुन जाहीर निमंत्रण देण्याचा पहीला मान मिळवीला

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget