- अंत्ययात्रा सप्तश्रृंगी निवास,बजरंगनगर,बेलापूर रोड,वार्ड नं-०७,श्रीरामपूर येथुन निघेल.
टाकळीभान ग्रामपंचायतीची १८ जानेवारी २०२१ ला मोठी चुरशीची निवडणुक झाली होती. जिल्हाभर या निवडणुकिची चर्चा रंगली होती. माजी सभापती नानासाहेब पवार यांची एकहाती सत्ता मतदारांनी उलथुन टाकत निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या तरुण उमेद्वारांच्या बाजुने कौल देत १७ पैकी १६ सदस्य विजयी करुन एकहाती सत्तेच्या चाव्या दिल्या होत्या. महाविकास आघाडीत माजी आ. भानुदास मुरकुटे गटाचे संख्याबळ जास्त असल्याने सरपंच व उपसरपंच निवडीत मुरकुटे गटाने बाजी मारली होती माञ मुरकुटे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना व स्थानिक गावपुढार्यांना हा आनंद फार काळ पचवता आला आला नाही. गेल्या काही दिवसापासून ग्रामपंचायत कारभारात अंतर्गत धुसफुस सुरु झाल्याने कलह वाढत गेला.
नुकत्याच निवडुन आलेल्या १० ग्रामपंचायत सदस्यांनी सरकारी जागेत अतिक्रमण करुन रहात असल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १४ ( १ )( ज - ३ ) व १६ प्रमाणे या सदस्यांची झालेली निवड बेकायदेशिर असल्याने त्यांचे सदस्यत्व कायद्याने अपाञ झाले आहे टाकळीभान ग्रामपंचायतीच्या दहा सदस्यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केले असुन त्याचे सदस्यपद रद्द करावे असा विवाद अर्ज २९ जुन २०२१ रोजी जेष्ठ शिवसेना नेते राधाकृष्ण वाघुले यांनी प्रभाग १ च्या सदस्या सविता पोपट बनकर, प्रभाग २ चे अशोक लालचंद कचे, सुनिल तुकाराम बोडखे व लता भाऊसाहेब पटारे, प्रभाग ३ चे संतोष अशोक खंडागळे व अर्चना शिवाजी पवार, प्रभाग ४ चे सरपंच अर्चना यशवंत रणनवरे व कल्पना जयकर मगर, प्रभाग ५ च्या कालिंदा बाबासाहेब गायकवाड व दिपाली सचिन खंडागळे यांच्या विरोधात विवाद अर्ज अहमदनगर येथील अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात दाखल केला होता.
या दाखल विवाद अर्जाची वेळोवेळी जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात घेण्यात आली. गटविकास आधिकारी श्रीरामपुर यांनी या प्रकरणी प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करुन जिल्हाधिकारी यांना आहवाल सादर केला होता. या सर्व पुराव्यांच्या कागदपञांची पडताळणी करुन जिल्हाधिकारी यांनी तक्रारदार राधाकृष्ण वाघुले यांचा विवाद आर्ज मंजुर करत वरील पैकि १० सदस्यांना सदस्यपदी रहाण्यास आपाञ ठरवत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचे लेखी आदेश दिले आहेत. तर विभागिय आयुक्तांकडे अपिलासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे.
या निर्णयामुळे सतरा सदस्य आसलेल्या या ग्रामपंचायतीत सरपंच व उपसरपंचासह १० सदस्य आपाञ ठरवले गेल्याने व त्यांचे सदस्यपद रद्द झाल्याने केवळ ७ सदस्य उरले आहेत. त्यामुळे या सदस्यांना धोरणात्मक निर्णय घेता येणार नसल्याने व आर्थिक व्यवहार ठप्प होणार आसल्याने ग्रामपंचायतीवर पुन्हा प्रशासकाची नियुक्ति होवुन प्रशासकिय राज सुरु होणार का ? याकडे ग्रामस्थांच्या नजरा लागल्या आहेत. जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आसल्याने सरकारी जागेत अतिक्रमण करुन रहाणार्या सदस्यांचे धाबे दणानले आहे. जिल्हाधिकारी यांच्या या निकालामुळे विरोधी गटात माञ खुशी निर्माण झाली आहे.
जिल्हाधिकारी यांनी केलेल्या या कारवाईमुळे ग्रामपंचायतीचा प्रभाग क्रमांक २ व ३ चे सर्व सदस्यांचे सदस्यपद रद्द झाल्याने हे दोन्ही प्रभाग पोरके झाले आहेत तर प्रभाग ४ मधील सरपंचासह दोन महीला, प्रभाग १ मधील एक महीला तर प्रभाग ४ मधील दोनमहीला आपाञ झाल्या आहेत. प्रभाग ६ माञ सुरक्षित राहीला आहे. या १० सदस्यांच्या अपाञञेत ७ महीला सदस्य अपाञ ठरल्या आहेत. सभासदत्व रद्द झालेल्या दहा सदस्यांनी निवडणुकित प्रतिज्ञा पञ सादर करताना चुकिची माहीती देवुन शासनाची फसवणुक केलेली असल्यामुळे हे सदस्य अपात्र करावेत अशी मागणी शिवसेनेचे राधाकृष्ण वाघुले यांनी केली होती
एका कॉलेज तरूण मुलीला मुस्लिम समाजाच्या एका तरूणाने पळवून नेलेले आहे परंतू, पोलीस ठाण्यात याबाबत फक्त मिसिंगचा गुन्हा दाखल झालेला आहे. सदर प्रकार हा लव जिहादचा असल्याने सदर तरूणाचा शोध घेवून कारवाई करण्यासाठी मुलीच्या कुटूंबीयांनी अनेकदा निवेदनं दिले परंतू मुलीचा तपास न लागल्याने आज या प्रकरणी शिवप्रहार प्रतिष्ठान आणि समस्त हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठया संख्येने तरूण सहभागी झाले होते. श्रीरामपूर शहरात लव जिहादचे प्रकार वाढत असून याला वेळीच आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. शहरात एका मुलीला पळवून नेले जाते, त्यांचे कुटूंबीय पोलीसांकडे निवेदन देवून मागणी करते. त्यांना न्याय मिळत नाही म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने मोर्चा काढतो तर आम्हालाच उलट नोटीसा दिल्या जातात. मग लोकशाही मार्गानेही न्याय मागायचा नाही का? अशाप्रकारे न्याय मागणार्यांना नोटीसा देवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास भविष्यात कोणी कोणाला न्याय मिळवून देण्यासाठी उभे राहणार नाही. हे लोकशाहीच्या आणि न्यायाच्या दृष्टीने चुकीचे आहे, असे सांगत सूरजभाई आगे म्हणाले, येत्या 4 दिवसात जर सदर प्रकरणाचा तपास न लागल्यास आणि आरोपीला अटक न झाल्यास शहरातील व्यापारी वर्गाशी विचारविनिमय करून श्रीरामपूर बंद बाबतचा निर्णय किंवा लोकशाही मार्गाने अन्य आंदोलनाबाबत निर्णय घेतला जाईल, असे यावेळी शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख माजी पोलीस अधिकारी सूरजभाई आगे यांनी सांगितले. यावेळी पोनि. हर्षवर्धन गवळी, सपोनि. बोर्से यांना मागणीचे रितसर निवेदन देण्यात आले.
प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे व श्री के ए काजी यांची सीनियर
उपाध्यक्ष पदी महाराष्ट्र प्रदेश निवड करण्यात आलेली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत गिरी यांनी नियुक्ती पत्र देवून
यांचे अभिनंदन केले. हे सगठन सामान्य माणसाला
न्याय मिळवून देण्यासाठी व अन्याय अत्याचार च्या
विरुद्ध काम करेल असे महाराष्ट्र अध्यक्ष एच. आय. शेख
सर यांनी सांगितले व लवकरच मानव अधिकार परीषद ची महाराष्ट्र कार्यकारणी
जाहीर करण्यात येईल असे शेख सर यांनी सांगितले.
एच. आय. शेख सर
श्री के ए काजी
फोटोग्राफर बंधूंच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी श्रीरामपूर तालुका फोटोग्राफर असोसिएशन ची स्थापना करण्यात आलेली असल्याने येत्या काळात संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक फोटोग्राफर साठी योग्य ते कार्य करण्याचा प्रयत्न राहीन असा आत्मविश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष अमितराज आहेर यांनी व्यक्त केला.तर गेल्या 2-3 वर्षात फोटोग्राफर तसेच संघटनेची जी हानी झालेली आहे ती भरून काढून नवीन काळात झालेले बदल फोटोग्राफर ला समजावे या साठी विविध कार्यशाळेचे आयोजन देखील मी या काळात घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देखील आहेर यांनी सांगितले. तर उपाध्यक्ष पदी नियुक्त झालेले सचिन पतंगे यांनी अध्यक्ष यांची खांद्याला खांदा लावून संघटना वाढीसाठी मी माझे पूर्ण योगदान देईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.झालेल्या बैठकीत संघटना श्रीरामपूर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे नियम, काम करण्याची पध्दत, संचालक मंडळ निवड या बाबत ची माहीत संघटनेचे सचिव अतिष देसर्डा यांनी नवीन फोटोग्राफर सदस्यांना दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण जमधडे यांनी केलेयावेळी या बैठकीचे अध्यक्ष जेष्ठ फोटोग्राफर राजू भावसार यांनी उपस्थित फोटोग्राफर मित्रांना मार्गदर्शन केले.प्रसंगी सुशील रांका,तिलक डुंगरवाल,काका गुलाटी,भानुदास बेरड ,गौरव शेटे अभिषेक पंडुरे , सतिष गायकवाड , सचिन गायकवाड ,वैभव पुंगे , अक्षय कुमावत,शाहरुख शेख ,विपुल तोरणे , गणेश यादव , संतोष लोखंडे , सुनील बोर गे,वीरेंद्र बागडे , सचिन परदेशी ,अतुल सोनमाळी, लक्ष्मण दाभाडे, हरी शिरसाट, भाऊसाहेब भोसले , प्रवीण जमधडे , ललित गवारे , सागर बावस्कर,आदी*