Latest Post


बेलापूरः(प्रतिनिधी  )-येथील कु-हे वस्ती भागामध्ये कमी दाबाने तसेच खंडीत वीज पुरवठा होत असल्याने नविन रोहिञ(डी.पी)बसवावेत अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी महावितरणचे सहाय्यक अभियंता मिलिंद दुधे यांचेकडे निवेदनाव्दारे केली. आहे                                  महावितरणला दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी पुढे म्हटले आहे की बेलापूर गावातील कु-हे वस्ती परिसरात असलेले रोहिञ ओव्हरलोड होते.यामुळे दाबनियमनात सातत्य राहात नाही.अनेकदा कमी दाबाने वीज पुरवठा होतो.यामुळे अनेकदा कृषीपंप जळतात.नियमीत दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने पीकांना विहिरीस पाणी असून पाणी देता येत नाही.यामुळे पिकांचे नुकसान होते ,तसेच  वीज  नसल्याने वस्त्यांवरील लोकांना अंधारात राहावे लागते.यामुळे या परिसरात राञीच्यावेळी भितीचे वातावरण असते याकडे लक्ष वेधण्यात आले.त्यामुळे ह्या परिसरासठी नविन रोहिञ बसविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.                                याप्रसंगी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणला निवेदन देण्यात आले होते या वेळी,गोरक्षनाथ कु-हे,केदारनाथ कु-हे ,मधुकर अनाप,तान्हाजी कु-हे ,कारभारी भगत,केशव कु-हे ,विशाल आंबेकर,अशोक कु-हे ,बापुसहेब कु-हे ,विजय कु-हे ,सुनिल जाधव,महेश कु-हे ,अमोल कु-हे ,महेश भगवान कु-हे ,प्रकाश साळुंके ,आदित्य बिगरे,सागर धनसिंग ,अक्षय पवार आदि उपस्थित होते.


श्रीरामपूर : दिनांक २४ जून २०२२ रोजी, राज्य उत्पादन शुल्क  विभागाच्या भरारी पथकाने, नेवासा तालुक्यातील मुळा साखर कारखाना, सोनई,खडका,घोडेगाव व चांदा परिसरात, सुरू असलेल्या अवैध हातभट्टी व्यवसायावर  छापे टाकून कारवाई केली आहे. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क भरारी पत्रक क्रमांक २ चे निरीक्षक, गोपाळ चांदेकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील, प्रभारी

उपअधीक्षक राज्य  उत्पादन शुल्क बी. बी. घोरतळ यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ज्यात मुळा कारखाना, सोनई परिसर, खडका शिवार, घोडेगाव शिवार चांदा शिवार येथे छापेमारी करून. अवैध हातभट्टी अड्डे उधास्त करून. ५५० लिटर हातभट्टी दारू तैयार करण्याचे तयार रसायन, नष्ट करण्यात आले असून. खडका शिवारात अवैध रित्या दारूची वाहतूक करणाऱ्या दुचाकीसह, देशी विदेशी दारूचा ८३ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला असून. बाप्पु कोंडीराम गि-र्हे व विजय वसंत चावरे यांच्या विरुद्ध , मुंबई दारूबंदी कायदा १९४९ गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती, राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक गोपाळ चांदेकर, दुय्यम निरीक्षक व्ही. एम. आभाळे, दुय्यम निरीक्षक जी. एन. जायकोडी ,सहाय्यक दुय्यम निरीक्षक, के. के. शेख, राज्य उत्पादन शुल्क विभागचे जवान प्रविण साळवे व महिला जवान सौ. स्वाती फटांगरे आदींनी यशस्वी रित्या पार पाडली.

अहमदनगर प्रतिनिधी - जानेवारी २०२० पासून तपासात बेवारस दुचाकी पोलीसांना मिळून आल्या. त्या १३ दुचाकी मूळ मालकांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या हस्ते देण्यात आल्या.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना तपासा दरम्यान मिळून आलेल्या बेवारस वाहनांचे मुळमालकांचा शोध घेऊन वाहने मूळ मालकांना परत करण्याबाबत आदेश दिले होते. या आदेशान्वये अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा पोनि अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या विशेष पथकाची नेमणूक करुन स्थानिक गुन्हे शाखे कडील ३८ बेवारस दुचाकी मुळ मालकांचा शोध घेऊन व दुचाकी चोरीबाबत दाखल गुन्ह्यांची माहिती संकलीत करण्याबाबत तपास पथकास सूचना दिल्या होत्या.सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथकातील पोसई सोपान गोरे, पोहेकॉ संदीप पवार, विश्वास बेरड, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना शंकर चौधरी, विजय ठोंबरे, सचिन आडबल आदिंच्या पथकाने बेवारस दुचाकी मूळ मालकांचा शोध घेत असतांना पोनि श्री. कटके यांना बेवारस वाहनांची माहिती संकलीत केली. मुळ मालकापर्यंत पोहचविण्यासाठी मदत करणारे विजय डिटेक्टीव्ह, (जि. कोल्हापुर) यांची माहिती मिळाल्याने पोनि श्री कटके यांनी त्यांच्याशी संपर्क करुन तपास पथकाने स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर येथे असलेल्या ३८ बेवारस दुचाकी मुळ मालकांपर्यंत पोहचण्यासाठी मदत घेतली.तपास पथकाने विशेष मेहनत घेऊन बेवारस दुचाकीचे अस्पष्ट झालेले चेसीज व इंजिन नंबर घेऊन कंपनीचे मुख्य कार्यालयाशी संपर्क करुन मूळ मालकांची नावे व पत्ते प्राप्त करुन त्यांच्याशी संपर्क केला. बेवारस दुचाकी मालक तेच आहेत, अशी खात्री झाल्यानंतर त्यांच्याकडे उपलब्ध कागदपत्रे स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर येथे सादर करुन दुचाकी घेऊन जाण्याबाबत कळविले. दि. २१ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील ३८ बेवारस दुचाकी मालकां पैकी १३ मुळ मालकांनी स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर येथे त्यांच्याकडील मुळ कागदपत्र हजर केले. विशेष पथकाने कागदपत्रांची शहनिशा व खात्री करुन एक दुचाकी आडगांव पोलीस ठाणे ( जि. नाशिक) येथील तपास अंमलदाराचे ताब्यात देऊन इतर १२ मुळ मालकांना स्थानिक गुन्हे शाखा पो.नि अनिल कटके यांच्या हस्ते बेवारस दुचाकी मुळमालकांचे ताब्यात देण्यात आल्या आहेत.


अहमदनगर प्रतिनिधी - अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत तायक्वांदो संघटना तायक्वांदो स्पोर्टस असोसिएशन यांच्या वतीने १९ जून २०२२ रोजी जिल्हास्तरीय सभा संपन्न झाली.या सभेसाठी अहमदनगर शहर व ग्रामीण तालुक्यातून मुख्य प्रशिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळेस जिल्हा संघटना पुनर्बांधणी तसेच आगामी सातारा येथे होणाऱ्या राष्ट्रीय पंच परीक्षेसाठी ची तयारी याचा आढावा घेण्यात आला.आगामी काळात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धा तसेच मिनी ओलंपिक स्पर्धा व राज्य राष्ट्रीय संघटनेच्या स्पर्धां बाबत चर्चा करण्यात आली. तायक्वांदो स्पोर्टस असोसिएशन ऑफ अहमदनगर चे जिल्हा सचिव तसेच ज्येष्ठ तायक्वांदो मार्गदर्शक श्री. घनश्याम सानप सर यांनी खेळात झालेल्या नवीन बदलांविषयी माहिती दिली. संघटनेत खजिनदार पदासाठी सर्वानुमते एन.आय.एस. कोच श्री. नारायण कराळे सर यांची निवड करण्यात आली. .यावेळी तायक्वांदो प्रशिक्षक गणेश वंजारी, अल्ताफ सर, सचिन कोतकर, राहुरीचे डॉ. नारायण माळी,श्रीरामपूर तालुक्याचे कलीम बिनसाद सर, राहता तालुक्याचे अशोक शिंदे सर,  नगर तालुक्याचे मच्छिंद्र साळुंखे , जाधव तुषार, तृप्ती चेमटे, मंदा खंदारे, धर्मनाथ घोरपडे, दीपक धनवटे, राष्ट्रीय खेळाडू योगेश बिचितकर , अजय पटेकर ,आदी हजर होते.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-संत निवृत्तीनाथ महाराजाच्या पालखीचे  श्रीरामपुर तालुक्यात आगमन होत असुन बेलापुर येथे मुक्कामी असणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होवू नये या करीता प्रथमच श्रीरामपुरचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार तहसीलदार प्रशांत पाटील गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस श्रीरामपुर नगरपालीकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी बेलापूरात येवुन प्रत्यक्ष पहाणी केली व समाधान व्यक्त केले               सर्व अधिकारी अचानक बेलापूरात दाखल झाले त्यांनी बाजार समितीच्या आवारात जावुन माहीती घेतली  दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी पाच हजार वारकऱ्यांच्या भोजनाची निवासाची तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे बाजार समितीचे पदाधिकारी व व्यापाऱ्यांनी सांगितले त्यांनंतर सर्व अधिकारी विठ्ठल मंदिरात गेले तेथे निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीचा मान बेलापूरकरांना असल्याचे ग्रामस्थांनी अभिमानाने सांगितले तसेच मा जि प सदस्य शरद नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी गावात सर्वत्र फवारणी करण्यात आली असुन पिण्याचे पाणी भोजन अंघोळ व राहण्याची करण्यात आलेली व्यवस्था पाहुन अधिकाऱ्यांनी समाधन व्यक्त केले या वेळी सर्व सोयी सुविधा बरोबरच आरोग्य तसेच शौचालयाची काय व्यवस्था आहे याचीही अधिकाऱ्यांनी माहीती घेतली जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीसा प्रमुख मनोज पाटील यांनी सोलापुर येथे पदाभार स्विकारलेला असल्यामुळे त्यांनी पालखीतील वारकऱ्यांची कुठलीही गैरसोय होवु नये अशा स्पष्ट सूचना दिलेल्या असल्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी बेलापूरात येवुन पहाणी केली या वेळी  साहेबराव वाबळे राजेंद्र लखोटीया नंदु लढ्ढा जितेंद्र संचेती माऊली आंबेकर अनिल पुंड शोभासेठ लखोटीया रत्नेश कटारीया किरण गंगवाल दत्तात्रय जाधव सुनिल कोळसे डाँक्टर अविनाश गायकवाड विशाल आंबेकर विजू सोनवाणे निलेश नाईक अमोल गाढे सोपान महाराज हिरवे मा जि प सदस्य  शरद नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे रणजीत श्रीगोड पत्रकार देविदास देसाई प्रफुल्ल डावरे ऋतुराज वाघ हितेश बोरुडे मुकुंद चिंतामणी प्रमोद पोपळघट कामगार तलाठी ज्ञानेश्वर हाडोळे मयुर भगत मिलींद दुधाळ अरुण अमोलीक उपेंद्य कुलकर्णी हवालदार अतुल लोटके गणेश भिंगारदे निखील तमनर हरिष पानसंबळ रामेश्वर ढोकणे आकाश शिवदे गोलु राकेचा मंगेश भगत गणेश कोळपकर उपस्थित होते विठ्ठल मंदिरात सर्व अधिकाऱ्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.


अहमदनगर : जिल्ह्यातील राहुरी तालुका, ५ वर्षीय निरागस बालिकेवर  झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे हदरला आहे. राहुरी तालुक्यातील आरडगांव परिसरात ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली असून. घरात खेळत असलेल्या ५ वर्षीय बालिकेस, संधीचा फायदा घेऊन. याचा परिसरत राहत असलेल्या. २५ वर्षीय किशोर ऊर्फ केश्या विजय पवार या नराधमाने, १८ जूनच्या दुपारी साडेबारा वाजे सुमारास, खुर्द यांचे शेताचे बांधा जवळ असलेल्या. नारळाच्या झाडाच्या येथे ५ वर्षीय निरागस बालिकेला विवस्त्र करून, अमानुषपणे अत्याचार केला. एवढेच नाही तर नाराधमाने केलेले काळ कृत्याचे बिंग फुटू नये याकरिता. आरोपीने कापडाच्या सहाय्याने, पीडित बालिकेचा गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु घरातून बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घेत असलेल्या, मुलीच्या आईने सदर घटना पाहिली. आणि त्या नराधमाला जागेवरच पकडून आरडा ओरड केली. हा आरडाओरड ऐकून पिडित बालिकेचे वडिल येत असल्याचे पाहून, त्या नराधमाने पिडित बालिकेच्या आईला धकलून घटनास्थळावरून पसार झाला. नशीब बलवत्तर होतं म्हणून,५ वर्षीय पीडीत बालीकेचा जिव वाचला. नाहीतर मोठा अनर्थ देखील घडला असता. सदरच्या घटनेनंतर पीडित बालीकेला अहमदनगर जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उप विभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके,  पोलीस फौज फाट्यासोबत घटनास्थळी दाखल झाले. व त्यांनी तात्काळ आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करून. अत्याचार करणाऱ्या नाराधमास गजाआड केले. माणुसकीला काळिमा फासणा-या घटने संदर्भात, पिडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून,आरोपी किशोर ऊर्फ केश्या विजय पवार अपहरण व अत्याचार प्रकरणी. राहुरी पोलिस ठाण्यात भदवी कलम ३०७,३७६ अ,३७६ अ, ब, ३६३, बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक  कायदा २०१२ चे कलम ८, ५ आय,एम, एन, पी, आर, ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सज्जन नाऱ्हेडा हे करीत आहेत.


अहमदनगर प्रतिनिधी:-जिल्हयात श्रीरामपुर मध्ये  तब्बल ८ गावठी कट्टे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून पकडले.८ गावठी कटयांबरोबर १० जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत.येत्या दोन-तीन महिन्या नगरपालिकेची निवडणुक होणार आहे.निवडणुकीच्या तोंडावर तब्बल ८ गावठी कट्टे सापडल्याने शहरातील नागरीकांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रस्तुत बातमीतील माहिती अशी की,श्रीरामपुरात काही जणांकडे गावठी कट्टे आल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके यांना मिळाली.सदर माहितीची खात्री करत जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील व पोनि.अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक श्रीरामपूर मध्ये गेले  असता पथकात सपोनि/सोमनाथ दिवटे यांच्यासह सफौ/राजेंद्र वाघ,संजय खंडागळे, बापू फौलाणे, देवेंद्र शेलार,भिमराज खरसे, पोना/शंकर चौधरी,सुरेश माळी,रवी सोनटक्के,मयुर गायकवाड,सागर ससाने, चंद्रकांत कुसळकर,आदींचे पथक श्रीरामपुरात आले असताना शहरातील एसटी स्टॅन्ड जवळ असणाऱ्या हॉटेल राधिकाच्या पार्कींगच्या परिसरात आरोपी असल्याची पक्की माहिती समजल्यानंतर याठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  सापळा लावला असता त्यानंतर आरोपी त्या ठिकाणी आल्यानंतर हेच ते आरोपी असल्याची खात्री पटल्यानंतर झडप घालून तिघा जणांना पोलिसांनी पकडले.त्यांच्याकडे झडती घेतली असता ८ गावठी कट्टे सापडून आले आणि त्याचबरोबर १० जिवंत काडतुसही मिळाले.या आरोपींना तातडीने पोलिसांनी गावठी कट्टयांसह ताब्यात घेतले.सदरची कारवाई श्री.मनोज पाटील पोलिस अधीक्षक अहमदनगर,श्रीमती.स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, श्री. संदीप मिटके उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर विभाग,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. याबाबत सफौ/ राजेंद्र वाघ नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून आर्म अॅक्ट कलम ३/२५,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील कार्यवाही श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget