Latest Post

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) - महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे अशा महामानवांनी समाजात समतेचा विचार रुजविण्याचा प्रयत्न केला. त्यानुसारच बौद्ध सेवा संघाचे कार्य देखील समाजासाठी दिशादर्शक आहे. आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये या कार्याची नितांत आवश्यकता आहे असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केले.येथील बौद्ध सेवा संघ या सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या अठरा वा वर्धापन दिन व त्यानिमित्ताने आयोजित समाजरत्न पुरस्कार वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर तांबे बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार लहू कानडे होते.

प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने, शिर्डी संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, मुख्याध्यापक संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भागचंद औताडे, जिल्हा बँकेचे माजी व्यवस्थापक नानासाहेब रेवाळे, एडवोकेट रावसाहेब मोहन यांची उपस्थिती होती.आमदार डॉक्टर तांबे पुढे म्हणाले कि आज समाजामध्ये दुही निर्माण करण्याचे प्रयत्न काही घटक करीत आहेत. परंतु पुरोगामी चळवळीतील चांगल्या विचारांची माणसं आजही कार्यरत आहे. बौद्ध सेवा संघाचे अध्यक्ष प्रताप देवरे व त्यांचे सहकारी हे देखील समाजपरिवर्तनाचे मोलाचे कार्य करीत आहेत असे सांगून त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.आमदार लहू कानडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितले कि हा देश एकसंघ रहावा याकरता घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात योग्य अशी तरतूद केलेली आहे. इंग्रजांनी अनेक वर्षे देशावर राज्य केले. पण ते गेल्यावर राज्यघटनेने सर्वांना न्याय देण्याचे काम केले. बौद्ध सेवा संघाच्या कार्याला आपले नेहमी सहकार्य राहील असे ही ते म्हणाले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, सत्कार मूर्ती यांच्या वतीने शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलीमखान पठाण, रयत बँकेचे माजी चेअरमन गोरक्षनाथ बनकर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.बौद्ध सेवा संघातर्फे याप्रसंगी समाजातील विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण कार्य करणारे मान्यवर सर्वश्री आप्पाजी मोहन, विश्वनाथ बोकफोडे, सलीमखान पठाण, गोरक्षनाथ बनकर, सुगंधराव इंगळे, सुरेश चौदंते,अंकुश कानडे,कार्लस साठे, डॉ. वसंत जमदाडे, बाळासाहेब वैद्य, डॉ. राजेंद्र लोंढे, प्रा.शिवाजी पंडित, शेख अहमद जहागिरदार, महेंद्र त्रिभुवन, सुभाष तोरणे, छगन बनकर, श्रावण भोसले, प्रकाश माने, अशोक दिवे, सरिता सावंत, वैशाली अहिरे, सुरेश देवकर, विजय शेलार, दीपक कदम, दिलीप सोनवणे, श्रीकांत मोरे, विनोद वाघमारे आदींना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बौद्ध सेवा संघाचे दिवंगत सरचिटणीस दादासाहेब साठे यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार त्यांच्या कुटुंबीयांना देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमास तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक, माऊली मुरकुटे, अशोक बागुल, संतोष मोकळ, उद्योगपती जितेंद्र तोरणे ,मिलिंदकुमार साळवे, सुभाष गोरे,के टी निंभोरे,ल बा कोल्हे, शब्बीर शेख, सुभाष गायकवाड, गौरव देवरे, मनिष पंकमुज, पास्टर अमोलिक, अविनाश काळे, बबन जोर्वेकर, सूर्यकांत अग्रवाल, माजी नगरसेविका मंगल तोरणे, प्रतिभा देवरे, विमल मोहन, विजय बोरडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रताप देवरे, सूत्रसंचालन प्रा शशिकांत बनकर तर आभार चंद्रकांत मगरे यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौद्ध सेवा संघाचे संस्थापक प्रताप देवरे, प्रकाश खैरे, चंद्रकांत मगरे, मच्छिंद्र धनसिंग, श्रीराम मोरे, भाऊसाहेब सोनवणे, छायाताई सोनवणे, देविदास पंडित, लक्ष्मण मोहन, सुगंधराव इंगळे, प्रकाश सावंत, दिलीप प्रधान, अशोक दिवे, वसंत साळवे, सुभाष तोरणे यांनी प्रयत्न केले.




श्रीरामपूर प्रतिनिधी-आज दि. 09/05/2022 रोजी  संदिप मिटके Dysp  श्रीरामपूर यांना राहुरी तालुक्यातील गुहा येथील एक महिला आरोपी पीडित महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत आहे असे खात्रीशिर बातमी मिळाली. त्याप्रमाणे Dysp संदिप मिटके  यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन गुहा येथे बनावट ग्राहक पाठवुन  पंचासमक्ष छापा टाकुन तीन पिडीत परप्रांतीय महिलांची सुटका केली असून एक महिला आरोपी विरुध्द राहुरी पोलीस स्टेशन गु.र.क्र. 388/2022 अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम कलम 3,4,5,7,8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील विशेष बाब म्हणजे सदर वेश्याव्यवसाय हा गुहा गावातील भर मध्यवस्तीत सुरू होता  व त्याची माहिती गावातील नागरिकांना नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. या कारवाईमुळे Dysp संदीप मिटके आणि pi दराडे यांच्या पथकाचे गावातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक  स्वाती भोर,  यांचे मार्गदर्शनाखाली  Dysp संदीप मिटके, PI दराडे, Psi बोकील, Asi  राजेंद्र  आरोळे, HC औटी, HC  जायभाये, लक्ष्मण बोडखे,  PN विकास साळवे, पो. कॉ. नितीन शिरसाठ,  पो. कॉ. आजिनाथ पाखरे, रविंद्र कांबळे, म.पो.कॉ. तृप्ती गुणवंत आदींनी केली.


अहमदनगर प्रतिनिधी-सोलापूर रोडवरील केदारी वस्ती परिसरातून अपहरण झालेल्या आठ वर्षीय मुलाचा 24 तासांत शोध घेऊन त्याला सुखरूप नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी केली. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. नागेश चंद्रभान भिंगारदिवे (वय 35 रा. दरेवाडी, ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. घरगुती वादातून हा प्रकार घडल्याचे तपासात समोर आले आहे.अहमदनगर- सोलापूर रोडवरील केदारे वस्ती येथून अश्विन या आठ वर्षीय मुलाचे रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी आश्विनच्या वडिलांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. अहमदनगर शहरातील स्टेट बँक चौकातून अपहरण करणारा संशयित नागेश चंद्रभान भिंगारदिवे याला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मुलाचे अपहरण केल्याची कबुली दिली.तसेच पोलीस कारवाईच्या भीतीने त्याने सदर मुलाला अहमदनगर रेल्वे स्टेशन वरून एका रेल्वेमध्ये बसवून दिल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली. पुणे रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही पुण्याला रवाना झाले. सोमवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे रेल्वे स्थानकावरून अपहरण झालेल्या मुलाला ताब्यात घेतले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या मुलाला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.घरगुती वादातून नातेवाईकानेच हा प्रकार केल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच गुन्ह्यात मदत करणार्‍या आरोपीच्या एका नातेवाईकालाही या गुन्ह्यात वर्ग करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, दिनेश मोरे, संदीप घोडके, देवेेंद्र शेलार, शंकर चौधरी, विशाल दळवी, दीपक शिंदे, रवी सोनटक्के, रोहित येमुल, चंद्रकांत कुसळकर आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.


श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर शहरातील लक्ष्मीनारायणनगर, वॉर्ड नं. 1 या ठिकाणी एका तरुणाने आपल्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापून साजरा केला. याबाबतची माहिती मिळताच वाढदिवस साजरा करणारा तरुण व ज्याची तलवार आहे तो तरुण अशा दोघांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे, पोलीस नाईक किरण पवार, पोलीस कॉन्स्टेबल नरोडे, पोलीस कॉन्स्टेबल दुर्गळे, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र पवार, पोलीस कॉन्स्टेबल रमीजराजा रफीक आत्तार हे शहरात गस्त घालत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बोरसे यांना माहिती मिळाली की, सोशल मीडिया व्हाट्सअप ग्रुपवर एकजण तलवारीने केक कापत असताना दिसत होता. याबाबतची माहिती घेतली असता शहरातील लक्ष्मीनारायणनगर, वॉर्ड नं. 1 येथील ऋषिकेश सुनील गडाख असे नाव असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार पोलीस ऋषीकेश गडाख याच्या घरी जावून या व्हीडिओबाबतची विचारपूस केली असता ही तलवार माझ्या वाढदिवसाला माझा मित्र प्रशांत शिवाजी भोसले (रा. शिरसगाव, ता. श्रीरामपूर) याने आणली होती. त्यानुसार पोलीस ऋषिकेश गडाख याला घेऊन शिरसगाव येथे प्रशांत भोसले याच्या घरी गेले. त्यास व्हीडिओमध्ये वापरलेल्या तलवारीबाबतची विचारपूस केली असता त्याने सदरची तलवार माझ्या घरातच आहे.असे सांगितले व सदरची तलवार घरातून काढून दिली. सदरची तलवार 1 हजार रुपये किंमतीची असून तिची लांबी मुठीसह 2 फूट 9 इंच लोखंडी मुठ, पुढील धारदार टोक अशा वर्णनाची ही तलवार मिळून आली. सदरची तलवार पोलिसांनी जप्त केली आहे.दि. 7 मे 2022 रोजी रात्री 8.15 वा. इंदिरानगर, शिरसगाव हद्द, अशोकनगर भागात प्रशांत शिवाजी भोसले याने विनापरवाना बेकायदेशीररित्या तलवार बाळगतांना आढळून आला व त्याचा मित्र ऋषिकेश सुनील गडाख याने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापला असून या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल रमीजराजा रफीक आत्तार यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. सेकंड 317/2022 प्रमाणे प्रशांत भोसले, ऋषिकेश गडाख यांचेविरुध्द आर्म अ‍ॅक्ट 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरण पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बोरसे हे करत आहेत.


संगमनेर प्रतिनिधी-अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने 10 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.संगमनेर परिसरातील एका अल्पवयीन मुलीला संतोष अशोक वाडेकर (रा. लक्ष्मीनगर, संगमनेर) याने फुस लावून पळवून नेले. याबाबत सदर मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. आर. पाळंदे यांनी केला. यामध्ये सदर आरोपीने मुलीला दमण येथे नेले होते. तिथे तो मानलेल्या बहिणेकडे राहिला. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणाहून दोघांना ताब्यात घेत संगमनेर येथे आणले.सदर पिडीत मुलीचा पोलिसांनी जबाब घेतला. त्यामध्ये आरोपी संतोष वाडेकर याने सदर मुलीला बळजबरीने पळवून नेले. प्रथम ते वणी येथे गेले. तेथे बनावट मंगळसुत्र घेवून पिडीतेच्या गळ्यात घातले. वणी येथून नाशिक येथे घेवून आला व नाशिकहून दमण येथे घेवून गेला. दमण येथे आरोपीने मानलेली बहिण हिचेकडे पिडीत मुलीला 3 ते 4 दिवस तिच्या खोलीत ठेवले. तेथेच आरोपीने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.या जबाबावरुन सदर आरोपीविरुद्ध वाढीव कलम 362, 366 (अ), 376 (2) (क) (एन) लावण्यात आले. तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम 5(8) 6, तसेच पिडीता अनुसूचित जाती-जमातीची असल्याने अनुसूचित जाती जमाती प्र. का. क 3(1), (12),3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पाळंदे यांनी केला. गुन्ह्याचे अंतिम दोषारोपपत्र राकेश ओला यांनी दाखल केले.सदर खटला अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. कदम यांच्या पुढे चालला. सदर खटल्यात एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. सर्व साक्षीदारांची साक्षी पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीस भारतीय दंड संहिता कलम 363 नुसार 5 वर्षे शिक्षा व 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 4 महिने साधी कैद, 376 (2) नुसार 10 वर्षे शिक्षा व 4 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद, 376 (2) (एन) नुसार 10 वर्ष शिक्षा व 4 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा कलमानुसार 10 वर्षे शिक्षा व चार हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 9 महिने कैद. या सर्व शिक्षा आरोपीने एकत्रित भोगावयाच्या आहेत, असा निकाल न्यायालयाने दिला.


शिर्डी प्रतिनिधी-शिर्डी शहरात अवैध गुटख्याची चोरून विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून शिर्डी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सुमारे 2 लाख 39 हजार 580 रुपयांच्या मुद्देमालासह एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी दिली.नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना शहरातील एका गोडाऊनमध्ये गुटख्याचा अवैध साठा असल्याची माहिती खबर्‍याकडून मिळाली. तसेच त्या गुटख्याबरोबरच मध्यप्रदेशातून हत्यारे पाठवली जातात आणि त्याची विक्री केली जाते, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक दातरे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी धडक दिली. पथकाला खोलीच्या झडतीत ठिकाणी गुटखा, सुगंधी तंबाखू, पानमसाला मिळून आले.याठिकाणी राहाणार्‍या आयुष सुनील कशीष (वय 19) रा.राजमोहला कॉलनी, इंदोर मध्यप्रदेश यास ताब्यात घेऊन अधिक झडती घेतली असता त्याच्या खोलीतून देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतुस मिळून आले आहे. पोलिसांनी हस्तगत केलेल्या मालात विविध कंपन्यांचे गुटखा व पानमसाल्यासह विना नंबरची पांढर्‍या रंगाची दुचाकी आणि देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुस असा एकूण 2 लाख 39 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी गु.र. नं.204/2022 प्रमाणे आयुष सुनिल कशीष, आशिष अशोकलाल खाबिया, (रा.साईसावली निवास, गोवर्धन नगर, शिर्डी), अभय रामेश्वर गुप्ता (रा.इंदोर) यांच्याविरोधात भादंवि कलम 188,272,273,328 सह अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 आणि त्याखाली नियम 2011 चे कलम 26 (2) (4) सह भारतीय हत्यार कायदा 3 (25) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अभय गुप्ता हा पसार झाला असून दोघांना अटक करण्यात आली. पुढील तपास सहा पोलीस निरिक्षक दातरे करत आहे.


श्रीरामपूर प्रतिनिधी - राज्यभरात  चालू असलेले भोंगा प्रकारा मुळे श्रद्धे पोटी देवदर्शना साठी येणाऱ्या भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.या करिता मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदनदेण्यात आले या निवेदनात श्रीक्षेत्र शिर्डी येथील ओराईबाबांची पहाटेची काकडआरती व शेजआरती, तसेच श्रीक्षेत्र पंढरपुर येथील श्रीविठ्ठल मंदिराची दैनंदिन आरती गेल्या दोन दिवसांपासून जनीक्षेपकांवरून करण्याचे बंद करण्यात आलेले आहे श्रीक्षेत्र शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या मोठी आहे. श्रीसाईबाबांवरील श्रद्धेपोटी दूर अंतरावरून पाया भाविकांची गैरसोय होतु नये, तसेच अवघ्या महाराष्ट्राटे आराध्य दैवत असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपुर येथील श्रीविठ्ठल चरणी नतमस्तक होणासाठी येणाऱ्या वारकरी व भाविकांचा ओघ लक्षात घेता या दोन्हीही तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी दैनंदिन आरतीचा भक्तजणांना लाभ व्हावा व गैरसोय दुर हावी म्हणून परंपरेनुसार ध्वनीक्षेपकाद्वारे करण्यात येणारी दैनंदिन आरती यापुढेही ध्वनीक्षेपकावरून चालु ठेवण्यारा यावी. हे दोन्हीही तिर्थक्षेत्र लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व प्रेरणास्त्रोत आहेत. तसेच श्रीसाईबाबा व श्रीविठ्ठल-रुमीगी है दोन्हीही दैवत राष्ट्रिय एकात्मतेची प्रतिक मानली जातात. परंपरेनुसार ध्वनीक्षेपकाद्वारे आरती सुरू असतांना असंख्य भाविक मनोमन भक्तीभावाने सहभागी होवून, आहे त्या ठिकाणावरून परनेश्वराप्रती आपली श्रद्धा व्यक्त करीत असतात. भाविक भक्तांचा तो अधिकार ध्वनीक्षेरकांमुळे संपुष्टात येवु नये, यासाठी दोन्हीही तिर्थक्षेत्राचे ठिकाणी परंपरेनुसार होणारी आरती यापुढेही छनी वोपळांवरुनच करण्यात यावी, याबाबत आमच्या भावना लक्षात घेवुन प्रशासनाने योग्य ती दखल घेवुन कार्यवाही करावी अशी मागणी  श्रीरामपूर मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली या वेळी अहमदभाई जहागीरदार,मुक्तारभाई शाह,महेबूबभाई कुरेशी ,कलीम भाई कुरेशी ,रियाजखान पठाण ,यासिनभाई सय्यद ,रमजानशाह हैदरशाह,अहेमद शाह  सिकंदर शाह ,रहिमभाई शेख ,फयाज जब्बार कुरेशी ,रज्जाकभाई पठाण ,ताराचंद रणदिवे ,राहुल काशिनाथ लिहिणार ,शेख बदर बनेसाहब ,शाह अकबर वजीर सह मुस्लिम जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. 


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget