Latest Post

घोटी प्रतिनिधी -इगतपुरी तालुक्यातील घोटी शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना घोटी पोलीस व दोनही मशिद ट्रस्टच्या वतीने मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आव्हानाला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देत समन्वयाने पहाटेची अजानाचा आवाज कमी करण्यात आला....उर्वरित अजान देतांना प्रार्थना स्थळाच्या आत भोंग्यांचा आवाज ठेवणार असल्याची घोषणा करण्यात आली. देशभरात अनेक जातीयवादी दंगे यापूर्वी झाले मात्र घोटी शहराने कायम हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे.मनसेनेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे यांच्या नेतृत्वाखाली यावेळी मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, जामा मजिदचे ट्रस्टी डॉ. युनूस रंगरेज, शाही मजिदचे ट्रस्टी मुस्ताक पानसरे यांसह मुस्लिम बांधव उपस्थित होते. तसेच मनसेचे प्रताप जखेरे, निलेश जोशी, मनोज गोवर्धने, राजेश राखेचा, अर्जुन कर्पे, ऋषी शिंगाडे, निलेश बुधवारे, शुभम भगत, अमोल क्षीरसागर, बापू काळे, सचिन छत्रे, पिंटू गतिर आदी यावेळी उपस्थित होते. दरम्यान पोलिसांनी दोन्ही समाजाचे ऐक्याचे दर्शन  पाहून अभिनंदन केले.


श्रीरामपूर प्रतिनिधी - मस्जिदवरील भोंगे त्वरित हटविण्यात यावे यासाठी मनसेच्यावतीने श्रीरामपूरमध्ये आंदोलन करण्यात आले.दि.04.05.2022 रोजी बाबा हुसेन शिंदे यांचे नेतृत्वाखाली 33 कार्यकर्ते यांनी घोषणाबाजी करीत राधिका हॉटेल समोरील महाराष्ट्र नव निर्माण सेना कार्यालय येथून मोटारसायकलवर निघून निलायम हॉटेल, डावखर चौक मार्गे श्रीराम मंदीर येथे आले त्यानंतर सदर कार्यकर्ते यांनी घोषणाबाजी करीत पदयात्रेने सोनारगल्ली मार्गे शिवाजीरोड वरील

स्वदेशी चहा दुकानासमोर येवुन दि. 04.05.2022 रोजी दुपारी १२ वाजता शिवाजी रोड वरील येणाऱ्या जाणाऱ्यांना रहदारीस अडथळा करुन घोषणाबाजी केली.या प्रसंगी मनसे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे ,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, विधानसभा अध्यक्ष संतोष डहाळे, शहराध्यक्ष निलेश लांबोळे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष गणेश दिवसे, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष विकी राऊत, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष विशाल लोंढे, डॉक्टर संजय नवथर, सागर बोंडगे,संतोष भालेराव, समर्थ सोनार, दीपक सोनवणे, निलेश सोनवणे,मच्छिंद्र हिंगमिरे, राहुल शिंदे, किशोर शिंदे,

रतन वर्मा,विकास शिंदे, मच्छिंद्र शिंदे,शुभम शिंदे मंगेश जाधव, अक्षय अभंग, रोहन गायकवाड, सागर गायकवाड, प्रवीण कारले, विक्रांत लोखंडे, लक्ष्मण शिंदे ,रोकडे आदी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बाबा शिंदे व इतर कार्यकर्ते यांना फौजदारी प्रक्रीया संहिता कलम 149 व महा.पो. का.क. 68 प्रमाणे सुचना पत्र दिलेले असतांना तसेच जिल्हा दंडाधिकारी, अहमदनगर यांचेकडील आदेश क्र. डी.सी/ कार्या/ 9ब1/ 986/2022 दि. 29.04.2022 अन्वये संपुर्ण अहमदनगर जिल्हा महसुल स्थळ सिमेच्या हददीत दि. 01.05.2022 ते दि. 05.05.2022 पावेतो कोणतीही परवानगी न घेता पदयात्रा काढून शिवाजी चौक येथे लाऊडस्पिकर लावुन लोकांची गर्दी जमवुन रहदारीस अडथळा निर्माण करुन मा. जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर यांचे आदेशाचा भंग केला. यावरून श्रीरामपुर शहर पोस्टे गुन्हा रजि नं  307/2022 भादवि कलम 341, 188, 34 सह महा.पो.अधिनियम 37 (1)(3) 135 प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे.


अहमदनगर प्रतिनिधी -कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांचे कडुन घडले माणुसकीचे दर्शन कोतवालीने केले डॉनला चकाचक कोतवाली पोलीस स्टेशनच्या गेट समोर सुमारे १०-१२ वर्षा पासुन एक वेडसर इसम हा फाटके कपडे घालून अनेक दिवसांपासून राहुन भिक्षा मागून जीवन जगत आहे. तसेच त्याचे नखे, केस, दाढी वाढलेल्या अवस्थेत कोतवाली पोलीस स्टेशन व आशा टॉकीज परिसरात फिरतो त्या वरून कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक . संपतराव शिंदे हे रोज सदर इसमाला पाहत असत. आज सकाळी सहज थांबून त्यांनी त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव अब्बास शेख उर्फ डॉन असे सांगीतले व माझे वडील व चुलते हे पोलीस खात्यात नोकरीला होते असे सांगीतले त्या मुळे सदरचा इसम हा मुस्लीम समाजाचा असल्याने पोलीस निरिक्षक संपतराव शिंदे यांनी तात्काळ पोलीस स्टेशनचा स्टाफ यांची व आशा टॉकीज चौकातील गुलाम शेख व लालाभाई कुरेशी जाकीर शेख ( बोस) अन्सार शेख यांच्या मदतीने सदर इसमाची कटींग दाढी करून हातापायाचे नये कापुन त्यास आंधोळ घालून त्यास इंद सणाच्या अनुषंगाने त्यास नवीन पठाणी कपडे घालुन समाजात वावरता येईल अशी त्याची वेषभुषा करून तयार केलेले आहे तसेच कोतवाली पोलीस स्टेशन हदीमध्ये अशा प्रकार रोजचे जोवन व निवारा न मिळणार लोकांचा शोध घेवून त्यांना समाजामध्ये यावरण्या योग्य बनविण्याचा निश्चय केला आहे तसेच पोलीस खात्यामार्फत दिनदुबळ्यांची वेळो वेळी सेवा केली जात असते याचे माणुसकीचे दर्शन पोलीस निरिक्षक संपतराव शिंदे यांनी घडविले आहे. 

अहमदनगर प्रतिनिधी-कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना  गुप्त बातमी दारा मार्फत माहीती मिळाली की , पंचम वाईन्स समोरील पंचम पान शॉपी केडगाव पंचम वाईन्स समोरील पंचम पान शॉपी केडगाव अ.नगर येथे एक इसम हा महाराष्ट्र राज्यात सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थ कब्जात बाळगणे तसेच विक्री करण्यास प्रतिबंध असतांनातयार मावा विक्री करत आहे आता गेल्यास मिळून येईल अशी माहिती त्यांना मिळाली होती  कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या आदेशाने पोना /योगेश भिंगारदिवे /पोकॉ सोमनाथ राउत/ पोकॉ अमोल गाडे पोकॉ/सुजय हिवाळे हे पथक केडगाव येथील पंचम पान शॉपी मधुन लोकाना पैसे घेवून त्याना पुडी देताना दिसला  २१/३० वा सुमारास छापा टाकुन त्यास पंचम पान शॉप पान टपरी मध्ये बसलेल्या इसमास जागीच पकडले त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सागर सहाधु कोतकर वय २७ वर्ष रा MSCB च्या पाठीमागे कोतकर मळा केडगाव अहमदनगर असे सांगीतले त्याच वेळी तेथे एका मोपेड गाडीवर काळे रंगाच्या मोपेड गाडीवर एक इसम पांढरे रंगाची मोठी पिशवी घेवून पंचम पान शॉप जवळ आला त्या वेळी तात्काळ सदर इसमास पकडुन त्याचे कडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव विशाल संतोष भगत वय २७ वर्ष रा आनंदनगर स्टेशन रोड अ नगर असे सांगीतले व  जवळील पिशवी मध्ये सुगंधीत तंबाखु व सुपारी असे एकत्र केलेली आहे ती मशीनवर मावा बनवणे कामी सागर सहाधु कोतकर यांचे जवळ आलो आहे असे सांगीतले त्या वरुन सागर सहाधु कोतकर व विशाल संतोष भगत यांचे कडे सुगंधीत तंबाखु व  माल  अक्षय बापु राहींज रा १५ ऑगस्ट कॉलनी भुषन नगर केडगाव ता जि अ नगर यांचे कडुन विकत घेतो असे सांगीतले त्यानंतर सागर सहाधु कोतकर व विशाल संतोष भगत यांनाझडतीचा उददेश समजावुन सांगुन त्याची व पंचम पान शॉप टपरीची व काळे रंगाच्या मोपेड गाडीची पंचासमक्ष झडती घेतली असता सदर ठिकाणी खालील वर्णनाचा मुददेमाल मिळुन आला तो १ ) २०,००० / - रु किंमतीचे एक मावा बनविण्याचे लोखंडी मशीन व २ एचपी ची मोटार असलेली जु.वा. कि . अं . ( पंचम पानटपरी मध्ये मिळुन आली ) २ ) १,५०० / - रु किंमतीची एका पांढरे रंगाच्या गोणी मध्ये ३ किलो सुट्टी सुगंधी तंबाखुप्रती ५०० रु किलो दरा प्रमाणे किं . अंदाजे ( पंचम पान टपरी मध्ये मिळुन आली ) ३ ) १२०० / - रु किं ची बारीक कापलेली कत्री ( तुकडा ) सुपारी २ किलो अंदाजे प्रती प्रती ६०० रुपये किलो प्रमाणे अंदाजे ( पंचम पान टपरी मध्ये मिळुन आली ) ४ ) ६०० / - रु किंमतीचा तयार केलेला सुगंधीत मावा त्याचे वजन अंदाजे १ किलो व प्रती ६०० रुपये किलो प्रमाणे अंदाजे ( पंचम पान टपरी मध्ये मिळुन आली ) ५ ) ७५० / - रु किं ची विमल पान मसाला केसर युक्त असे छापलेला हिरवे रंगाचा पाकीटात प्रती पाकीट छापील दर १ ९ ८ रु व विक्री किंमत २५० रुपये प्रमाणे ( पंचम पान टपरी मध्ये मिळुन आली ) 10५ ) ४०,००० / - रु किं ची एक काळ रंगाची सुझुकी एक्सेस मोपेड मोटार सायकल तीच्या पाठीमागील बाजुस MH १६ CN ४ ९ ४ ९ असा क्रं असलेली जुवाकिअं ( आरोपी नामे विशाल संतोष भगत याच्या कवज्यात मिळुन आली ) ६ ) ६,००० / - रु किंची सुगंधीत तंबाखु व सुपारी असे एकत्र केलेली अंदाजे १० किलो वजनाची प्रती किलो ६०० रु दरा प्रमाणे ( आरोपी नामे विशाल संतोष भगत याच्या कबज्यात मिळुन आली ) एकूण ६ ९ , ३०० / किमतीची सुगंधीत तंबाखु व मावा बनविण्याचे मशिन इसम नामे सागर सहाधु कोतकर वय २७ वर्ष रा MSCB च्या पाठीमागे कोतकर मळा केडगाव अहमदनगर याचे कब्जात मिळुन आल्यानेतसेच आरोपी नामे विशाल संतोष भगत याच्या ताब्यात वरिल मोपेड गाडी व एकत्र केलेली सुपारी सुगंधीत तंबाखु व सुपारी असे मिळुन आल्याने त्याचा पोलीस नाईक योगेश भिंगारदिवे यांनी सदरचा  मुद्देमाल व आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे . २१/३० वा सुमारास पचंम वाईन्स समोरील पंचम पान शॉपी केडगाव अ.नगरयेथे इसम नामे १ ) सागर सहाधु कोतकर वय २७ वर्ष रा MSCB च्या पाठीमागे कोतकर मळा केडगाव अहमदनगर २ ) विशाल संतोष भगत वय २७ वर्ष रा आनंदनगर स्टेशन रोड अ नगर ३ ) अक्षय बापु राहींज रा १५ ऑगस्ट कॉलनी भुषन नगर केडगाव ता जि अ नगर ( फरार ) यानी महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली व शरिरास अपायकारक होवुन दुखापतीची शक्यता आहे असा सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थ खाण्यासाठी अपायकारक आहे हे माहीत असतांनाही देखील त्यानी त्याची विक्री करण्याचे उददेशाने स्वताच्या कब्जात मावा बनविण्याचे मशिन व सुगंधीत तंबाखु , सुपारी , तयार मावा बाळगतांना मिळुन आला आहे . पोलीस कॉन्स्टेबल सुजय हिवाळे यांनी त्याचे विरुध्द भा.द.वि.कलम ३२८,१८८ , २७२,२७३ प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे . सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे,पोना /योगेश भिंगारदिवे /पोकॉ सोमनाथ राउत/ पोकॉ अमोल गाडे पोकॉ/सुजय हिवाळे या पथकाने ही कारवाई केली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पिंगळे हे करत आहेत.



श्रीरामपुर लेखक - डॉ.सलीम सिकंदर शेख -आगदी १५००ं वर्षांपूर्वी पारंपरिक  वादातून धर्माची सुटका करून लोकांना एक (ईश्वरा),अल्लाहाची शिकवण देवून फक्त एकच  अल्लाहा समस्त सृष्टीचा नायक  आहे,एकाच अल्लाहाची प्रार्थना करा.कोणीही व्यक्ती शुद्र-उच्च-नीच नाही,कोणीही काळा - गोरा नाही, सर्व मानव जात ही एकच अल्लाहाची लेकरे आहोत ती मग ती शुद्रही असेल ती सुध्दा इस्लामी ज्ञान,शिक्षण घेवू शकते, ठराविक जातीत जन्माला आला तरच तुम्ही  शिकण घेऊ शकता हा चुकीचा समज ईस्लामने नाकारला,

विद्वानांना जास्त महत्त्व दिले, उदा.विद्वान म्हणजे फक्त धार्मिक ज्ञान असणं हे ईस्लाम मानत नाही,उदा.अर्थ,रसायन, वैद्यकीय, क्रीडा,लष्कर इ.आशा विविध क्षेत्रातील ज्ञानाची बंद कवाडे प्रेषित मुहम्मद स्व. यांनी सर्व मानवजातीला कायमची खुली केली.चीन हा जगातील आजच्या प्रमाणेच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुर्वीही खुप प्रगत देश होता, तेथील अतिप्रगत ज्ञान मिळवण्यासाठी "तुम्ही चीनला जावुन ज्ञान घेवा लागलं तरी तुम्ही ज्ञान घेण्यासाठी चिनला जा असा पुरोगामी दुर-दृष्टीकोनाबददल सल्ला प्रेषित मुहम्मद स्व.नी दिला.

अल्लाह समोर  मानव एकसमान आहेत,आपल्या ज्ञानाच्या जोरावर कोणी-कितीही मोठा होवू शकतो राज कारभार सांभाळण्यासाठी फक्त राजाच्याच पोटी जन्माला यावं लागतं हा विचारच त्यांनी नाहीसा करून टाकला व आपल्या कृतीतून दाखवून दिले, समतेचा संदेश देणारा ईस्लाम व पहिले क्रांतिकारक प्रेषित मुहम्मद स्व.हेच.आपल्या २३ वर्षांच्या प्रेषित कालावधीत समतेवर आधारित समाजरचना निर्माण करून मानसाला मानसाप्रमाणे कसे वागवावे याची दिशा दाखवून दिली .

 त्याकाळी अरब देशात काळा - गोरा हा भेदभाव खुप मोठ्या प्रमाणात होता, काळया गुलामांची खरेदी- विक्री खुप प्रमाणात केली जात असे,ती गुलामगिरी नष्ट करून एका जैद नावाच्या काळया गुलामाशी आपल्या सख्ख्या आत्या बहीणाचा विवाह करून काळया -गोऱ्यांचा भेदभावच नष्ट केला.

हजरत बिलाल या आफ्रिकन निग्रो (त्याकाळी गुलाम,तुच्छ समजले जाणारे) गुलाम म्हणून विकले गेलेल्यांना गुलामगिरीतून मुक्त करून नंतर मक्का विजयी दिवशी पवित्र काबागृहावर चढून "अजान" देण्याचा आदेश देत  समस्त जगाला दाखवून दिले की, कोणीही अपवित्र नसते. इस्लामच्या मुलभूत सिद्धांतानुसार एकच अल्लाहा (इश्वर) ची  संतान आहेत. सर्व रंगाचे, वर्णाचे, वंशाचे,एकच आहेत, हा भेदभाव इस्लाम मुळापासून नष्ट करतो. सर्वांना समान न्याय,हक्क,संधी देतो,हा क्रांतिकारी समतेचा विचार प्रेषितांनी आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिला, 

तसेच स्त्रियांना, वारसाहक्कात, मालमत्तेत वाटा आहे,तो हक्क देणारा जगभरात पहिला विद्रोही क्रांतीकारक विचार प्रेषित मुहम्मद स्व.यांनीच दिला. विश्वातील पहिला घटस्फोटीत, विधवा,महिला पुनर्विवाहची संकल्पना मांडून जैद हारिसा नावाच्या एका गुलामाच्या घटस्फोटीत महिलेशी स्वतः विवाह करून तुच्छ समजल्या जाणाऱ्या घटस्फोटीत महिलेला प्रेषित मुहम्मद यांनी  स्वत:ची पत्नी बनवून बहुमान दिला.

 भारतात आजही घटस्फोटीत विधवा महिलांसाठी समाजातील विविध ठिकाणी स्थान नाही, आजही घटस्फोटी महीलांना वेगवेगळ्या भावनेने बघितले, वागविले जाते,इस्लामने १४०० वर्षांपासून घटस्फोटीत,विधवा, महिला विवाहाला चालना देऊन त्या महीलांना मान- सन्मान मिळवून दिला.आजही इस्लाममधे घटस्फोटीत विधवा महिलांसाठी पुनर्विवाह लावून त्यांचा मान सन्मान केला जातो. स्री भ्रुणहत्या हे पाप आहे हे सांगणारे प्रेषित मुहम्मद स्व. पहीले  क्रांतिकारी पुरुष,

अरब जगात १५०० वर्षांपूर्वी स्त्री भृणहत्या मोठ्या प्रमाणात होत होत्या,समाजमनाच्या नसानसात ही कुप्रथा भिनलेली होती, जन्मलेल्या मुलीला अशुभ मानले जात असे,जन्मलेल्या मुलीला जिवंत पुरण्याची क्रुर प्रथा होती,  स्थानिक पातळीवर ते प्रतिष्ठेचं समजलं जातं होते. परंतु प्रेषित मुहम्मद स्व.यांनी कन्यावधाला समुळ नष्टच करण्यासाठी अल्लाहाचे भय दाखवत पारलौकिक जीवनाचे नरक - स्वर्ग प्राप्ती बक्षीसांची सत्यता दाखवली,पवित्र कुराणात सांगितले की,जिवंत पुरलेल्या मुलीला जेव्हा (कयामतच्या दिवशी) विचारलं जाईल की कोणत्या अपराधाची शिक्षा तुला दिली गेली आहे ?" तर ती सांगेल की माझा काहीही दोष,गुन्हा नसताना विनाकारण माझी हत्या करण्यात आली आहे,हे या लोकांनी मोठे पातक केले आहे, दोषींना शिक्षा देऊन मला इन्साफ (न्याय) मिळावा.तेव्हा अल्लाहा च्या शिक्षेपासून तुम्ही वाचू शकणार नाही,हे ऐकल्यानंतर ज्या -ज्या व्यक्तींनी आपल्या कोमल मुलींना पुरलं होते,त्या व्यक्ती पश्चाताप करत धायमोकळून ढसढसा रडू लागल्या,हे आम्ही काय मोठे पातक केलेत म्हणून,

प्रेषित मुहम्मद स्व.सांगितले की," ज्यांना एक अथवा अधिक मुली असेल त्या पालकांनी,मनुष्याने प्रेमाने,आपुलकीने त्या मुलींचे व्यवस्थिरित्या पालनपोषण, शिक्षण,संगोपन करून नंतर उत्तम वर बघून त्यांचे विवाह (लग्न) लावून दिले,त्या प्रत्येक व्यक्तीला जन्नतुल फिरदौस मधे (स्वर्गात) महाल भेटेल व ज्या व्यक्तींना दोन,तीन पेक्षाही अधिक मुली असेल, त्यांनी न कंटाळता त्या मुलींचे शिक्षण संगोपन व्यवस्थित करून उत्तम वर बघुन त्यांचे विवाह (लग्न) लावून दिले तर जन्नतुल फिरदौसमधे (स्वर्गात) माझ्या शेजारी त्यांचं महाल असेल व त्याचा मोबदला त्यांना अत्यंत चांगलाच असेल,

अशाप्रकारे त्यांना सत्य आणि वास्तविकतेचे दर्शन घडवत,तथा अल्लाहा (इश्वर) कडे प्रियजन होण्यासाठी सत्कर्म अपेक्षित असल्याचे सांगितले.यामुळे ज्यांच्या घरात मुली होत्या त्यांच्या चेहऱ्यांवर हसु दिसून,त्यांचे चेहरे उजळून निघाले.

प्रेषित मुहम्मद स्व. यांनी लोकांकडून शपथेवर "माझ्या जवळ प्रतिज्ञा (शपथ) घ्या की, अल्लाहा शिवाय इतर कोणालाही पुंजणार नाही,चोरी,व्यभिचार करणार नाही,मुलींची,कन्यावध करणार नाही.( हादीस - सहीह - बुखारी ).या सर्वांचा परिणाम खुप जबरदस्त झाला .स्वतः ही घटस्फोटीत विधवा बरोबर विवाह करून चार मुलींचे पालनपोषण संगोपन करून त्यांचे विवाह (लग्न) लावून दिले. 

दहा मोहर्रमला सर्व जगात करबलाचा "यौमे शहीद" दिवसांच्या आठवणी जाग्या होतात आशा समस्त मानव कल्याणासाठी आपल्या परीवारासह एकूण ७२ लोकं शहीद झालेले हजरत हुसैन रजि.हे सर्वात लहान आवडती कन्या हजरत फातिमा रजि.यांचे मुलं, प्रेषित मुहम्मद स्व.यांचे (मुलीचा मुलगा) आवडते नातु होते.

स्त्रियांना  शिक्षणाचा अधिकार आहेत त्या शिकल्या पाहिजेत हे प्रेषितांनी दाखवून दिले आहे.

आपल्या वडिलांच्या संपत्तीतुन, पतीच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीतून मुलींचाही हिस्सा - वाटा आहे, हा क्रांतिकारी विचार प्रेषितांनी अंमलात ही आणला.

जगप्रसिद्ध अंतिम (पुढील वर्षी  महानिर्वाण झाले)  प्रवचनात (भाषणातून) महीलांच्या हक्काची काळजी घ्यावी असं तळमळीने सांगितले,बंधुंनो,पतीचे पत्नीवर हक्क आहे ,तसेच पत्नीचे आपल्या पतीवर हक्क आहे.  पत्नीला (बायकांना) प्रेमाने व सहानुभूतीने सांभाळा,कठोर निष्ठुर होवू नये,त्यांच्या प्रती दयाळु रहा,तुम्ही आपल्या अल्लाहाच्या  साक्षीने आपल्या पत्नीला स्विकारले आहे ,तर तीची काळजी घ्यावी,पत्नीचे जे काही आधिकर असतील ते सर्व तीला द्यावे, तीने तुमच्यावर विश्वास टाकला आहे ,तर तीच्या त्या विश्वासाचा विश्वासघात करू नका,तुम्हाला महाप्रलयाच्या (कयामतच्या) दिवशी अल्लाहा समोर आपल्या कर्माचा हिशोब द्यावाच लागेल,या दिवसाची कायम आठवण ठेवा,असे प्रेषितांनी आपल्या महानिर्वाणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत महीलांची तळमळ व्यक्त केली,काळजी घेतली.

थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या दुर्मिळ ग्रंथात ;"सार्वजनिक सत्य धर्म "मधे ,पैगंबरांवर पहिला पोवाडा लिहित स्तुती करत लिहीतात की, 

 अर्थ :- - " पैगंबरांनी श्रेष्ठ -कनिष्ठ हा भेद नाकारला,गुलामगिरी नाकारली,जातिभेद,जाती- पाती बुडासकट नष्ट केले,अधर्म आणि भेदाभेद मोडुन काढला,सर्वात्र अभेद ,समता, बंधुभाव कायम केला !! 

पैगंबरांनी प्रस्थापित केलेल्या समतेवर जगप्रसिद्ध साहित्यिक व शायर डॉ.इक्बाल लिहीतात की, "एक ही सफ मे खडें हो गऐ मेहमूद और अयाज !! ना कोई बंदा रहा,ना बंदा नवाज !!"

(अर्थात :- मस्जिदमधे नमाज अदा करताना एकाच रांगेत देशाचा बादशहा- राष्ट्रपतीच्या खांद्याला खांदा लावून एक गुलाम उभा राहु शकतो,यावेळी कोणं गुलाम नाहीत कोणं मालक नाही,अशी समता - समानता त्यांनी प्रस्थापीत केली),

प्रेषित  स्व .यांना ,लिहीता-वाचता येत नव्हते,तरी सुद्धा सर्व अरब प्रदेशात साक्षरतेचे महत्व पटवून संपूर्ण प्रदेश साक्षर केला.

"न भूतो न भविष्यते" घडवलेल्या क्रांतीचे श्रेय स्वतः न घेता सर्व श्रेय हे जगत निर्मात्यां अल्लाहा ला दिले "व कायम असे म्हणत की मी हे सर्व अल्लाहाचेच काम करत आहेत"लेखक- डॉ.सलीम सिकंदर शेखबैतुश्शिफा हॉस्पिटल,श्रीरामपूर ९२७१६४००१४

श्रीरामपुर लेखक - डॉ.सलीम सिकंदर शेख - आल्लाहाचे  प्रेषित मुहम्मद सल्ल.म्हणतात की" कामगारांची मजुरी त्याच्या घाम   सुकण्याआधी चुकती करा,अदा  (देऊन टाका) करावी (इब्ने - माझा हा.नं. २४४३),अबू -हुरैरा रजि. म्हणतात की, "हजरत मोहम्मद सल्ल.सांगतात की कायामतच्या दिवशी अल्लाहा  त्या माणूष्याशी नाराजी करेल ज्या मनुष्याने एखाद्या मजूर कामगारांकडून दिवसभर मजूरी - काम करुन घेतले आणि त्याने केलेल्या मजुरी कामाचा   मोबदला दिला नाही "''(सहीह बुखारी २२२७ ,ईबने माझा २२४७),१ मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिवस,महाराष्ट्रचा "महाराष्ट्र दिन" महाराष्ट्र एकीकरणाच्या वेळेस मुंबई ही महाराष्ट्रातच रहायला हवे यासाठी  १०५ (एकशे पाच) लोकांनी हौतात्म्य पत्कारत आपले बलिदान दिले,आपण या हुतात्म्यांना मानवंदना देऊन  महाराष्ट्रदिन पाळतो,१ मे हा जगभरातील कामगार चळवळीच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिन विशेष म्हणजे जगभरातील ८० अंशी पेक्षा अधिक देशांमध्ये एक मे या दिवशी राष्ट्रीय सुट्टी म्हणून पाळला जातो. प्राचीन युरोपातील वसंत दिनाच्या दिवशी हा  दिन येतो . खास म्हणजे हा दिवस शिकागोमध्ये ४  मे १८८६  मध्ये घडलेल्या हे Hey हे  मार्केट दुर्घटनेच्या स्मरणार्थ जगभरातील समाजवादी ,साम्यवादी विचारसरणीचे पक्ष साजरा करतात.१४४०  चौदाशे वर्षांपूर्वी  अरबस्तानात अमानवी  ,रानटी ,क्रुर अशा अनेक  अमानुष  प्रथा अशी पद्धतीने गुलामगिरीची पद्धत, शोषण पद्धती होती,  त्याकाळात मजुरांना दिवसभर राबून गुलामाला दिवसभर गुलामी करून रात्री छळ करीत व. रात्रंभर उपाशी ठेवत , उन्हातानात  वाळवंटाच्या वाळूवर भरउन्हात झोपून त्यांची खूप हाल करीत .  त्यांचा मोबदला त्यांना दोन वेळेस जेवण सुद्धा देत नव्हते .जगेल येवढं च अन्न देत फक्त,  कामगारांचा छळ करून त्यांचे अतोनात हाल करायचे.त्याच काळात  प्रेषित हजरत मुहम्मद  स्व.यांनी गुलामगिरी समुळ नष्टच केली,  गुलामांचे व मजुरांचे संपूर्ण हक्क प्रदान करून, गुलामगिरी प्रथा नष्ट करून गुलामाला कामगारांना मजुरांना .ऐक  माणूस म्हणून वागवण्याची  , वागणूक देण्याची प्रथा देउन मालकांना   तंबीच दिली.  #   अब्दुल्लाहा बिन उमर  रजि.प्रेषितांचे मित्र म्हणतात की , नबी करीम स्व.यांनी सांगितले की " तुमचे -नोकर -चाकर हे तुमचे बंधू आहेत ,तुम्ही जे -जे जेवण खाता ते त्यांना ही  जेवण  जेवायला घालवा ,'  तुम्ही जे कपडे परीधान करतात , त्यामधुन  त्यांना ही काही तरी  कपडे द्या , त्यांच्यावर आत्याचार करू नका , त्यांना जालीमांच्या हावाली  करू नयेत , जो मनुष्य संकटात आपल्या बांधवाची मदत करतात अल्लाहा करिम त्यांच्या संकटात मदत करतात "'(सहीह बुखारी शरीफ ६०७, २४४२,, ईबने माझा ३६१०, मुस्लिम शरीफ १६६१, ) प्रेषित मुहम्मद सल्ल.  यांच्या महापरिनिर्वाणानंतर इस्लामचे पहिले खलिफा हजरत अबूबकर सिद्दिक रजि.हे  प्रेषित मुहम्मद स्व.यांचे खास मित्र व  सर्वांत अगोदर ईस्लाम कबूल केले व  पहिले खलिफा झाले.त्यांच्या  खलिफा  नियुक्तीनंतर त्यांच्या कार्यकाळात त्यांना त्यांच्या एका मित्रांने विचारले की, #  "तुमची महिन्याची मानधन (पगाराचे ) काय असली  पाहिजे '..       #  त्यावर  खलिफा हजरत अबु -बकर रजी .म्हणतात की , " एका मजुराला दिवसभरात जी मजुरी असेल तेवढी , महिन्याचं मानधन असेल , त्यानंतर त्यांचे  सहकारी म्हणतात की ते मानधनावर तुमचं , उदरनिर्वाह  होईल ,त्यावर हजरत अबु-बकर रजि. म्हणतात की, "  मला जर  कमी पडलं तर मी सर्वप्रथम  दिवसभर मजूर काम करील व  त्यांचा पगार व मजुरी वाढविल त्यानंतर माझं मानधन वाढविल , "'          #   तसेच दुसरे खलिफा हजरत उमर रजि. हे त्यांच्या कार्य काळात , जवळजवळ निम्म्या जगावर राज्य करीत होते . आपल्या सिस्तप्रिय शासनाच्या  कार्यपद्धतीने फार प्रसिद्ध होते ,   त्यांच्या कार्यकाळात त्यांना ही असाच प्रकारे प्रश्न उपस्थित केला ,   त्यावर ते म्हणतात ,"    कि यदा कदाचित " दजला " नदी  आहे ,  त्या नदीच्या किनाऱ्यावर एक कुत्रा जरी उपाशी मरून पडला तर त्याची जबाबदारी माझीच ".           कुत्र्याची जबाबदारी त्यांची तर ,      ‌‌ते किती मोठे शासक  असतील  ,.  ते कसे शासन करीत असतील ,इस्लामची  मानव कल्याणकारी शिकवण किती मोठी .,, म्हणूनच  इतिहासकार म्हणतात की ,"  इस्लाम  आया ही है  गरीबों, बेबसों ,गुलामों , मजदूरों कों ,लाचारों कों इंसाफ दिलाने के लिए ,.....लेखक - डॉ.सलीम सिकंदर शेख बैतुशशिफा हॉस्पिटल,श्रीरामपुर ९२७१६४००१४


.

अहमदनगर प्रतिनिधी- मोपेड दुचाकीच्या डिक्कीचे लॉक तोडून त्यातील तीन लाख १५ हजार रुपये रक्कम चोरून नेणाऱ्या आरोपी रमेश रामु कोळी (वय ३२, रा. विजयवाडा रेल्वे स्टेशनजवळ, आंध्रप्रदेश ह. रा. हिनानगर, चिकलठाणा, जि. बुलढाणा) याला २४ तासात पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. दरम्यान त्याच्या सोबतचा अशोक राम गाजवार (रा. विजयवाडा रेल्वे स्टेशनजवळ, आंध्रप्रदेश) हा पसार झाला आहे.अहमदनगर शहरातील तारकपूर येथील सिटी केअर हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये सागर अनिल पवार (वय 30 रा. नेप्ती ता. नगर) यांनी शुक्रवारी दुपारी त्यांची मोपेड पार्क केली होती. यामध्ये तीन लाख 30 हजाराची रक्कम ठेवली होती. त्यांना ती रक्कम त्यांचे नातेवाईक सुनील कांडेकर यांच्या ऑपरेशनसाठी भरायची होती.दुपारी एक ते अडीच यावेळेत चोरट्यांनी दुचाकी डिक्कीचे लॉक तोडून रक्कम चोरून नेली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, व नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, पोउनि सोपान गोरे, पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, बबन मखरे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, संदीप घोडके, पोना शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, पोकॉ जालिंदर माने, योगेश सातपुते व चापोहेकॉ बबन बेरड आदींच्या पथकाने २४ तासात आरोपीला अटक केले आहे.आरोपी कोळी याच्याकडील तीन लाख १५ हजार रुपये, दुचाकी, मोबाईल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget