श्रीरामपुर लेखक - डॉ.सलीम सिकंदर शेख -आगदी १५००ं वर्षांपूर्वी पारंपरिक वादातून धर्माची सुटका करून लोकांना एक (ईश्वरा),अल्लाहाची शिकवण देवून फक्त एकच अल्लाहा समस्त सृष्टीचा नायक आहे,एकाच अल्लाहाची प्रार्थना करा.कोणीही व्यक्ती शुद्र-उच्च-नीच नाही,कोणीही काळा - गोरा नाही, सर्व मानव जात ही एकच अल्लाहाची लेकरे आहोत ती मग ती शुद्रही असेल ती सुध्दा इस्लामी ज्ञान,शिक्षण घेवू शकते, ठराविक जातीत जन्माला आला तरच तुम्ही शिकण घेऊ शकता हा चुकीचा समज ईस्लामने नाकारला,
विद्वानांना जास्त महत्त्व दिले, उदा.विद्वान म्हणजे फक्त धार्मिक ज्ञान असणं हे ईस्लाम मानत नाही,उदा.अर्थ,रसायन, वैद्यकीय, क्रीडा,लष्कर इ.आशा विविध क्षेत्रातील ज्ञानाची बंद कवाडे प्रेषित मुहम्मद स्व. यांनी सर्व मानवजातीला कायमची खुली केली.चीन हा जगातील आजच्या प्रमाणेच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुर्वीही खुप प्रगत देश होता, तेथील अतिप्रगत ज्ञान मिळवण्यासाठी "तुम्ही चीनला जावुन ज्ञान घेवा लागलं तरी तुम्ही ज्ञान घेण्यासाठी चिनला जा असा पुरोगामी दुर-दृष्टीकोनाबददल सल्ला प्रेषित मुहम्मद स्व.नी दिला.
अल्लाह समोर मानव एकसमान आहेत,आपल्या ज्ञानाच्या जोरावर कोणी-कितीही मोठा होवू शकतो राज कारभार सांभाळण्यासाठी फक्त राजाच्याच पोटी जन्माला यावं लागतं हा विचारच त्यांनी नाहीसा करून टाकला व आपल्या कृतीतून दाखवून दिले, समतेचा संदेश देणारा ईस्लाम व पहिले क्रांतिकारक प्रेषित मुहम्मद स्व.हेच.आपल्या २३ वर्षांच्या प्रेषित कालावधीत समतेवर आधारित समाजरचना निर्माण करून मानसाला मानसाप्रमाणे कसे वागवावे याची दिशा दाखवून दिली .
त्याकाळी अरब देशात काळा - गोरा हा भेदभाव खुप मोठ्या प्रमाणात होता, काळया गुलामांची खरेदी- विक्री खुप प्रमाणात केली जात असे,ती गुलामगिरी नष्ट करून एका जैद नावाच्या काळया गुलामाशी आपल्या सख्ख्या आत्या बहीणाचा विवाह करून काळया -गोऱ्यांचा भेदभावच नष्ट केला.
हजरत बिलाल या आफ्रिकन निग्रो (त्याकाळी गुलाम,तुच्छ समजले जाणारे) गुलाम म्हणून विकले गेलेल्यांना गुलामगिरीतून मुक्त करून नंतर मक्का विजयी दिवशी पवित्र काबागृहावर चढून "अजान" देण्याचा आदेश देत समस्त जगाला दाखवून दिले की, कोणीही अपवित्र नसते. इस्लामच्या मुलभूत सिद्धांतानुसार एकच अल्लाहा (इश्वर) ची संतान आहेत. सर्व रंगाचे, वर्णाचे, वंशाचे,एकच आहेत, हा भेदभाव इस्लाम मुळापासून नष्ट करतो. सर्वांना समान न्याय,हक्क,संधी देतो,हा क्रांतिकारी समतेचा विचार प्रेषितांनी आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिला,
तसेच स्त्रियांना, वारसाहक्कात, मालमत्तेत वाटा आहे,तो हक्क देणारा जगभरात पहिला विद्रोही क्रांतीकारक विचार प्रेषित मुहम्मद स्व.यांनीच दिला. विश्वातील पहिला घटस्फोटीत, विधवा,महिला पुनर्विवाहची संकल्पना मांडून जैद हारिसा नावाच्या एका गुलामाच्या घटस्फोटीत महिलेशी स्वतः विवाह करून तुच्छ समजल्या जाणाऱ्या घटस्फोटीत महिलेला प्रेषित मुहम्मद यांनी स्वत:ची पत्नी बनवून बहुमान दिला.
भारतात आजही घटस्फोटीत विधवा महिलांसाठी समाजातील विविध ठिकाणी स्थान नाही, आजही घटस्फोटी महीलांना वेगवेगळ्या भावनेने बघितले, वागविले जाते,इस्लामने १४०० वर्षांपासून घटस्फोटीत,विधवा, महिला विवाहाला चालना देऊन त्या महीलांना मान- सन्मान मिळवून दिला.आजही इस्लाममधे घटस्फोटीत विधवा महिलांसाठी पुनर्विवाह लावून त्यांचा मान सन्मान केला जातो. स्री भ्रुणहत्या हे पाप आहे हे सांगणारे प्रेषित मुहम्मद स्व. पहीले क्रांतिकारी पुरुष,
अरब जगात १५०० वर्षांपूर्वी स्त्री भृणहत्या मोठ्या प्रमाणात होत होत्या,समाजमनाच्या नसानसात ही कुप्रथा भिनलेली होती, जन्मलेल्या मुलीला अशुभ मानले जात असे,जन्मलेल्या मुलीला जिवंत पुरण्याची क्रुर प्रथा होती, स्थानिक पातळीवर ते प्रतिष्ठेचं समजलं जातं होते. परंतु प्रेषित मुहम्मद स्व.यांनी कन्यावधाला समुळ नष्टच करण्यासाठी अल्लाहाचे भय दाखवत पारलौकिक जीवनाचे नरक - स्वर्ग प्राप्ती बक्षीसांची सत्यता दाखवली,पवित्र कुराणात सांगितले की,जिवंत पुरलेल्या मुलीला जेव्हा (कयामतच्या दिवशी) विचारलं जाईल की कोणत्या अपराधाची शिक्षा तुला दिली गेली आहे ?" तर ती सांगेल की माझा काहीही दोष,गुन्हा नसताना विनाकारण माझी हत्या करण्यात आली आहे,हे या लोकांनी मोठे पातक केले आहे, दोषींना शिक्षा देऊन मला इन्साफ (न्याय) मिळावा.तेव्हा अल्लाहा च्या शिक्षेपासून तुम्ही वाचू शकणार नाही,हे ऐकल्यानंतर ज्या -ज्या व्यक्तींनी आपल्या कोमल मुलींना पुरलं होते,त्या व्यक्ती पश्चाताप करत धायमोकळून ढसढसा रडू लागल्या,हे आम्ही काय मोठे पातक केलेत म्हणून,
प्रेषित मुहम्मद स्व.सांगितले की," ज्यांना एक अथवा अधिक मुली असेल त्या पालकांनी,मनुष्याने प्रेमाने,आपुलकीने त्या मुलींचे व्यवस्थिरित्या पालनपोषण, शिक्षण,संगोपन करून नंतर उत्तम वर बघून त्यांचे विवाह (लग्न) लावून दिले,त्या प्रत्येक व्यक्तीला जन्नतुल फिरदौस मधे (स्वर्गात) महाल भेटेल व ज्या व्यक्तींना दोन,तीन पेक्षाही अधिक मुली असेल, त्यांनी न कंटाळता त्या मुलींचे शिक्षण संगोपन व्यवस्थित करून उत्तम वर बघुन त्यांचे विवाह (लग्न) लावून दिले तर जन्नतुल फिरदौसमधे (स्वर्गात) माझ्या शेजारी त्यांचं महाल असेल व त्याचा मोबदला त्यांना अत्यंत चांगलाच असेल,
अशाप्रकारे त्यांना सत्य आणि वास्तविकतेचे दर्शन घडवत,तथा अल्लाहा (इश्वर) कडे प्रियजन होण्यासाठी सत्कर्म अपेक्षित असल्याचे सांगितले.यामुळे ज्यांच्या घरात मुली होत्या त्यांच्या चेहऱ्यांवर हसु दिसून,त्यांचे चेहरे उजळून निघाले.
प्रेषित मुहम्मद स्व. यांनी लोकांकडून शपथेवर "माझ्या जवळ प्रतिज्ञा (शपथ) घ्या की, अल्लाहा शिवाय इतर कोणालाही पुंजणार नाही,चोरी,व्यभिचार करणार नाही,मुलींची,कन्यावध करणार नाही.( हादीस - सहीह - बुखारी ).या सर्वांचा परिणाम खुप जबरदस्त झाला .स्वतः ही घटस्फोटीत विधवा बरोबर विवाह करून चार मुलींचे पालनपोषण संगोपन करून त्यांचे विवाह (लग्न) लावून दिले.
दहा मोहर्रमला सर्व जगात करबलाचा "यौमे शहीद" दिवसांच्या आठवणी जाग्या होतात आशा समस्त मानव कल्याणासाठी आपल्या परीवारासह एकूण ७२ लोकं शहीद झालेले हजरत हुसैन रजि.हे सर्वात लहान आवडती कन्या हजरत फातिमा रजि.यांचे मुलं, प्रेषित मुहम्मद स्व.यांचे (मुलीचा मुलगा) आवडते नातु होते.
स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार आहेत त्या शिकल्या पाहिजेत हे प्रेषितांनी दाखवून दिले आहे.
आपल्या वडिलांच्या संपत्तीतुन, पतीच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीतून मुलींचाही हिस्सा - वाटा आहे, हा क्रांतिकारी विचार प्रेषितांनी अंमलात ही आणला.
जगप्रसिद्ध अंतिम (पुढील वर्षी महानिर्वाण झाले) प्रवचनात (भाषणातून) महीलांच्या हक्काची काळजी घ्यावी असं तळमळीने सांगितले,बंधुंनो,पतीचे पत्नीवर हक्क आहे ,तसेच पत्नीचे आपल्या पतीवर हक्क आहे. पत्नीला (बायकांना) प्रेमाने व सहानुभूतीने सांभाळा,कठोर निष्ठुर होवू नये,त्यांच्या प्रती दयाळु रहा,तुम्ही आपल्या अल्लाहाच्या साक्षीने आपल्या पत्नीला स्विकारले आहे ,तर तीची काळजी घ्यावी,पत्नीचे जे काही आधिकर असतील ते सर्व तीला द्यावे, तीने तुमच्यावर विश्वास टाकला आहे ,तर तीच्या त्या विश्वासाचा विश्वासघात करू नका,तुम्हाला महाप्रलयाच्या (कयामतच्या) दिवशी अल्लाहा समोर आपल्या कर्माचा हिशोब द्यावाच लागेल,या दिवसाची कायम आठवण ठेवा,असे प्रेषितांनी आपल्या महानिर्वाणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत महीलांची तळमळ व्यक्त केली,काळजी घेतली.
थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या दुर्मिळ ग्रंथात ;"सार्वजनिक सत्य धर्म "मधे ,पैगंबरांवर पहिला पोवाडा लिहित स्तुती करत लिहीतात की,
अर्थ :- - " पैगंबरांनी श्रेष्ठ -कनिष्ठ हा भेद नाकारला,गुलामगिरी नाकारली,जातिभेद,जाती- पाती बुडासकट नष्ट केले,अधर्म आणि भेदाभेद मोडुन काढला,सर्वात्र अभेद ,समता, बंधुभाव कायम केला !!
पैगंबरांनी प्रस्थापित केलेल्या समतेवर जगप्रसिद्ध साहित्यिक व शायर डॉ.इक्बाल लिहीतात की, "एक ही सफ मे खडें हो गऐ मेहमूद और अयाज !! ना कोई बंदा रहा,ना बंदा नवाज !!"
(अर्थात :- मस्जिदमधे नमाज अदा करताना एकाच रांगेत देशाचा बादशहा- राष्ट्रपतीच्या खांद्याला खांदा लावून एक गुलाम उभा राहु शकतो,यावेळी कोणं गुलाम नाहीत कोणं मालक नाही,अशी समता - समानता त्यांनी प्रस्थापीत केली),
प्रेषित स्व .यांना ,लिहीता-वाचता येत नव्हते,तरी सुद्धा सर्व अरब प्रदेशात साक्षरतेचे महत्व पटवून संपूर्ण प्रदेश साक्षर केला.
"न भूतो न भविष्यते" घडवलेल्या क्रांतीचे श्रेय स्वतः न घेता सर्व श्रेय हे जगत निर्मात्यां अल्लाहा ला दिले "व कायम असे म्हणत की मी हे सर्व अल्लाहाचेच काम करत आहेत"लेखक- डॉ.सलीम सिकंदर शेखबैतुश्शिफा हॉस्पिटल,श्रीरामपूर ९२७१६४००१४
Post a Comment