Latest Post

बेलापुर  (देविदास देसाई   )-तालुक्यात सर्वात मोठी सहकारी सोसायटी समजल्या जाणाऱ्या बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणूक ६ मार्च रोजी होत असुन १३ जागेकरीता तीन पँनल मधुन ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत                   बेलापुर सेवा संस्थेची १३ जागेकरीता  ६ मार्च रोजी निवडणूक होत असुन तीन पँनलमधुन एकुण ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत जि प सदस्य शरद नवले व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांचा गांवकरी मंडळ तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक ,बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले व जनता अघाडीचे रविंद्र खटोड यांचा शेतकरी जनता विकास अघाडी तसेच शिवसेना पुरस्कृत प्रकाश मेहेत्रे यांचा तिसरा पँनल निवडणूक लढवत असुन त्याच्या पँनलमध्ये केवळ आठच उमेदवार आहेत                                  गांवकरी मंडळाचे उमेदवार पुढील प्रमाणे नवले प्रकाश बाबुराव ,कुऱ्हे प्रभाकर गोवींद , कुताळ भाऊसाहेब हनुमंत ,कुऱ्हे गोरक्ष बाबुराव ,वाबळे रामदास किसन , कुऱ्हे मच्छिंद्र बंडेराव ,बोंबले सुरेश यशवंत , मेहेत्रे शाम रामभाऊ ,नवले शशिकांत कारभारी  ,अमोलीक रावसाहेब शंकर , राशिनकर सुभाष खंडेराव ,वाबळे कविता साहेबराव , खंडागळे भाग्यश्री भास्कर ,                   शेतकरी जनता विकास अघाडीचे उमेदवार पुढील प्रमाणे  नाईक अरुण गुलाबराव , मेहेत्रे विलास गंगाधर ,पवार शेषराव भानुदास ,नवले नंदकिशोर शंकरराव ,नवले सुधीर वेणूनाथ ,बोंबले पंडीतराव यशवंतराव कुऱ्हे अशोक भास्कर , सातभाई राजेंद्र कचरु , वाबळे शिवाजी रामनाथ ,अमोलीक अंतोन विठ्ठल ,गवते विश्वनाथ पाराजी ,मेहेत्रे सविता तुकाराम ,शेळके ईंदुमती जयराम                                       शिवसेना पुरस्कृत उमेदवार  मेहेत्रे प्रकाश चांगदेव ,खंडागळे  सारंगधर गंगाधर ,शेळके दादासाहेब रावसाहेब ,बंगाळ गणेश बाबुराव , दुधाळ संजय रामभाऊ ,गायकवाड चंद्रकांत हरीभाऊ , मेहेत्रे राणी प्रकाश ,अमोलीक शांतवन विठ्ठल  अशा प्रकारे उमेदवार निवडणूक रिंगणात असुन शिवसेना पुरस्कृत स्वतंत्र पँनल या निवडणूकीत उभा असून त्यांचे आठच उमेदवार आहेत हे आठ उमेदवार कुणाचा घाट घालतात किंवा कुणाचा घात करतात हे काळ अन वेळच ठरवेल . शेतकरी  जनता विकास अघाडीने विजयाचा दावा केला असुन मागील पाच वर्षात केलेल्या कामाची पावती घेवुन ते सभासदा समोर जाणार आहे आपल्या काळात योग्य कारभार केल्यामुळे आताही सत्ता आमच्या ताब्यात येईल असा दावा शेतकरी जनता विकास अघाडीच्या वतीने करण्यात आला आहे तर गांवकरी मंडळानेही विजयाचा दावा केलेला आहे मागील पाच वर्षात किती व कसे चुकीची कामे झाले याचे पुराव्यासह सभासदासमोर जाणार आहोत यांच्या मनमनी कारभाराला अनेक जण कंटाळले असुन मत पेटीतून सर्व चित्र स्पष्ट होणार आहे .थांबा आणी पहा असे गांवकरी मंडळाचे म्हणणे आहे तर कायम त्याच त्याच चेहऱ्यांना संधी दिल्याच्या रोषतून प्रकाश मेहेत्रे यांचा तिसरा पँनल उदयास आला असुन हा पँनल कुणाला तारक ठरतो अन कुणाला मारक हे ६ मार्चलाच समजणार आहे

श्रीरामपुर (गौरव डेंगळे)२३/२/२२ श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या महिला कर्मचारी श्रीमती मथुराबाई रामचंद्र देशमुख यांनी विद्यालयात ४५ वर्ष केलेल्या अविरत सेवेचा गुणगौरव म्हणून त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आनंदमय वातावरणात संपन्न झाला.यावेळी संस्थेचे सचिव श्री जन्मजय टेकावडे,श्री हेमंत सोलंकी,सौ अस्मिता परदेशी व श्री दिगंबर पिनाटे यांच्या हस्ते श्रीमती देशमुख यांचा मानचिन्ह,श्रीफळ,शाल व साडी देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री जन्मजय टेकावडे यांनी आपल्या मनोगत श्रीमती देशमुख मावशी यांचे कौतुक केलं व त्यांनी केलेली ४५ वर्षाची सेवा ही शाळेच्या दृष्टीने अतिशय मोलाची सेवा आहे.पुढे बोलताना ते म्हणाले की श्रीमती देशमुख मावशी यांनी आपले जीवन विद्यार्थ्यांसाठी समर्पित केले.माझे आजोबा कै मा आ ज य टेकावडे यांनी स्थापन केलेल्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेच्या उभारणीपासून त्या शाळेत कर्मचारी म्हणून आहेत ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे.त्यांचे पुढील जीवन आरोग्यदायी व आनंदी जावो हीच प्रार्थना मी करतो असे ते म्हणाले. यावेळी श्री हेमंत सोलंकी,सौ अस्मिता परदेशी,श्रीमती एस चव्हाण यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वृषाली जोंधळे यांनी केले.यावेळी श्री पंकज त्रिपाठी,श्री सतीश आजगे,श्री दौलत पवार,श्री नितीन गायधने,श्री सुभाष वडीतके,श्री प्रकाश नांदे,सौ रत्नप्रभा पाटील,सौ रीता जेठवा, सौ रीना ओबेराय,सौ सारिका भांड, कु प्रतिक्षा भांड,सौ नम्रता वर्मा,सौ पूजा डोमाले,सौ योगिता गवारे,सौ शुभदा पुंड तसेच बहुसंख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

नाशिक वार्ताहर-नाशिक महानगर पालिकेने मोठा गाजावाजा करीत सुरू केलेली पिंपळगाव बसवंत ते नाशिक शहर बस सेवा अवघ्या एका दिवसातच बंद केल्याने विद्यार्थी व प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे.परिवहन महामंडळाच्या बस कर्मचारी संपामुळे गेल्या चार महिन्यांपासून बससेवा बंद असल्याने नाशिक येथे ये-जा करण्यासाठी प्रवाशांना महामार्गावर तासन्तास उभे रहावे लागत होते. तर शाळा,महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देखील नानाविध समस्यांचा सामना करावा लागत होता. येथील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहर बससेवा सुरू करण्याबाबत नाशिक मनपा कडे पाठपुरावा केल्याने अखेरीस काल सोमवार दि.21 रोजी सकाळी 8 वाजता सी.एन.जी बससेवेचा प्रारंभ करण्यात आला.पहिल्या सी.एन.जी बसचे पूजन करून पिंपळगाव शहरातून या बसची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दर तासाला सी.एन.जी बस उपलब्ध होत असल्याने प्रवाशी व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र पी.एन.जी टोल वे चे घोडे मधेच अडले अन् ही बससेवा रात्री बंद झाल्याची घोषणा मनपाने केली. परिणामी प्रवाशांच्या आनंदावर विजरण पडले.त्याचे असे झाले मनपा सी.एन.जी बसला बससेवेचा 650 रु. टोल भरावा लागत असल्याने ‘भीक नको पण कुत्रं आवर’ याप्रमाणे ही बससेवा बंद करण्याचा निर्णय नाशिक मनपाने  घेतला. त्यामुळे मोठा गाजावाजा करून सुरू झालेली बससेवा त्याच दिवशी सायंकाळी बंद झाल्याने प्रवाशी, विद्यार्थी, चाकरमानी यांचेकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पिंपळगाव ही व्यापारी बाजारपेठ म्हणून अवघ्या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. साहजिकच येथे येणारे व्यापारी, ग्राहक, व्यवसायिक यांचा या बाजारपेठेत नित्याचा राबता असतो.शेतकरी देखील आपला शेतमाल येथे मोठ्या प्रमाणात आणतात. पिंपळगाव येथे परिवहन महामंडळाचे बस आगार असून बस कर्मचार्‍यांच्या संपामुळे बसगाड्यांची संख्या कमालीची घटली आहे. त्यामुळे यावर पर्याय म्हणून नाशिक शहर बससेवेचा पर्याय समोर आला होता. त्यादृष्टीने ही बससेवा कालपासून सुरू देखील झाली.दिवसभर या बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र पी.एन.जी टोल कंपनीच्या आडमुठे धोरणामुळे या बससेवेला मोठ्या प्रमाणात टोलची रक्कम द्यावी लागत असल्याने नाशिक मनपा ने इच्छा असूनही केवळ मनपा बससेवा तोट्यात जावू नये हा हेतू डोळ्यासमोर ठेवून नव्याने सुरू झालेली पिंपळगाव बसवंत-नाशिक ही शहर बससेवा बंद करण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी लागलीच सुरू केली आहे.

कर्जत प्रतिनिधी-स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाला 10 लाखांना गंडा घालणार्‍या सचिन आल्या पवार (वय 26 रा. राक्षसवाडी ता. कर्जत) यास कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.आरोपींच्या टोळीने बांधकाम व्यावसायिक संतोष रामचंद्र घुडे (वय 43 रा. आंबिवली ता. कर्जत जि. रायगड) व त्यांचा मित्र यांना स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखविले. टोळीतील एक साथीदार विठ्ठल जाधव (खरे नाव माहीत नाही) यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सोने घेण्याची तयारी दर्शविताच त्यांना 9 फेब्रुवारी 2022 रोजी नगर-सोलापूर रोडवर कोंभळी फाट्याजवळील शेतात पैसे घेऊन बोलाविले. तेथे 10 ते 12 जाणांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला केला. 10 लाख रुपये व तीन मोबाईल घेऊन आरोपी पळून गेले.घुडे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली होती. या गुन्ह्यातील आरोपी पवार याला पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, अमंलदार अंकुश ढवळे, सुनील चव्हाण, पांडुरंग भांडवलकर, शाम जाधव, सुनील खैरे, महादेव कोहक, गोवर्धन कदम यांनी अटक केली आहे.

अहमदनगर प्रतिनिधी-घरफोडी करून चोरून नेलेला मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करून तो फिर्यादीस मिळवून देण्याची कामगिरी कोतवाली पोलिसांनी केली आहे. चोरीला गेलेल्या साडेदहा तोळे सोन्याच्या दागिन्यांपैकी फिर्यादीला दोन लाख 73 हजार रुपये किमतीचे साडेसहा तोळे परत मिळाले आहे.याबाबत माहिती अशी की, गणेश रामदास लालबागे (वय 32 वर्षे रा. दर्शनकृपा, डी-1, रेल्वे स्टेशनरोड, आनंदनगर, अहमदनगर) यांच्या घरी घरफोडी करून चोरट्यांनी साडेदहा तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी लालबागे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज महाजन यांनी करून घरफोडी करणारे आरोपी किशोर तेजराव वायाळ (वय 45 रा. मेरा बुद्रुक, ता. चिखली, जि. बुलढाणा), गोरख रघुनाथ खळेकर (वय 34 रा. देवळाली चौक, सातारा परिसर, औरंगाबाद मूळ रा. शिरसवाडी ता. जि. जालना) यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली देताच पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेले साडेसहा तोळ्याचे सोन्याचे दागिने जप्त केले.न्यायालयाच्या परवानगीनंतर ते फिर्यादी लालबागे यांना देण्यात आले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. सदरची कामगिरी नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे, उपनिरीक्षक महाजन, पोलीस अंमलदार दीपक साबळे, बंडू भागवत, याकूब सय्यद, सुमित गवळी व दीपक कैतके यांनी केली आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- एस टी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार तरी केव्हा व नागरीकांची, प्रवाशांची  होणारी लुट थांबणार कधी ? असा सवाल सर्व सामान्य नागरीकाकडून विचारला जात आहे                                          आपल्या मागण्या बाबत एस टी महामंडळाचे कर्मचारी  ठाम आहे .शासन दखल घेत नाही कर्मचारी तुटेपर्यत ताणत आहेत त्याचा परिणाम सर्व सामान्यांच्या खिशावर होत आहे .एस टी कर्मचाऱ्यांंचा संप सुरु होवुन तीन महीन्याचा कालावधी उलटून गेला आहे.त्यांच्या मागण्यावर विचार करण्यास शासनास वेळ नाही काही बाबी न्यायालयाच्या कक्षेत गेलेल्या आहेत, तीन महीन्याच्या कालावधीत  एस टी महामंडळाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालेले आहे .त्यात महामंडळाचा तोटा तर झालाच शिवाय प्रवाशांना प्रवासासाठी दाम दुप्पट दर मोजावे लागले तसेच मागेल तितके पैसे देवुनही अनेक प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे तसेच गेल्या तीन महीन्यापासून हजारो बसेस डेपोत  उभ्या आहेत त्यांचाही मेंन्टेनन्स खर्च वाढणार आहे खाजगी वहातुकदारांना सोन्याचे दिवस आले आहेत प्रवाशांकडून मन मानेल तसे भाडे आकारले जात आहे .हे सर्व थांबणार कधी?  लाल परी रस्त्यावर धावणार कधी ? असा सवाल नागरीकाकडून विचारला जात आहे या सर्वापेक्षाही कर्मचाऱ्यांचीही अतिशय वाईट अवस्था आहे कुटुंबाचा दररोजचा खर्च कसा भागवायचा याची चिंता सर्वांनाच लागलेली आहे त्यातच संघटनांचे नेते गायब झालेले आहेत कर्मचाऱ्यांनीच आंदोलन हाती घेतलेले आहे .असे असले तरी हे आंदोलन कुठेतरी थांबले पाहीजे एस टी महामंडळ स्थापने पासुन सर्वात मोठा फटका महामंडळाला सध्या बसलेला आहे कोरोनामुळे ठप्प झालेले जनजिवन हळूहळू सुरळीत होत आहे आता लालपरी देखील रस्त्यावर धावणे गरजेचे आहे  .नाहीतर अनेक कुटुंबाची वाताहत होणार हे मात्र नक्कीच.

श्रीरामपूर प्रतिनिधी  - श्रीरामपूर शहर पोलिसांनी कारवाई करत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणी संचलित नांदुर ता. राहाता शाळा मधील संगणक चोरी करणारे गुन्हेगारांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी रोहन विजय बोधक (१९) आणि रोहित शांताराम जाधव (२२) या दोन आरोपींना अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार ५ किंवा ६ जानेवारी २०२२ रोजी रात्री ९.३० च्या सुमारास प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणी संचलित शाळा नांदुर ता राहता शाळेमधील डेल कंपनीचे ७ मॉनीटर, ७ सीपीयू व संगणक साहित्य हे शाळेच्या संगणक कक्षाची पाठीमागील खिडकीची जाळी तोडुन आत प्रवेश करुन शाळेचे मुलांना शिकवण्यासाठी लागणारे संगणक अज्ञात चोरट्याने चोरुन नेले होते. या प्रकरणात मधुकर सोपान वल्टे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास करत असताना गुप्त बातमीदार मार्फत हा गुन्हा रोहन बोधक आणि रोहित जाधव यांनी मिळून केल्याची माहिती पोनि संजय सानप यांना मिळाली. त्यावरुन श्रीरामपुर शहर पोलीस ठाणे तपास पथक यांनी नांदुर भागात सापळा रचुन रोहन बोधक याला शिताफिने पकडले. त्याचेकडे सदर गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले तसेच गुन्हयातील ७ डेल कंपनीचे मॉनिटर व ७ डेल कंपनीचे सीपीयु व संगणक साहित्य हे मिळून आले तसेच त्याचा साथीदार रोहित शांताराम जाधव यास आज दिनांक २२ फेब्रुवारी रोजी पाठलाग करुन पकडले असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.सदरची कामगिरी मनोज पाटील सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, संदीप मिटके सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि संजय सानप, सपोनिरी बोरसे, पोना/राशिनकर, पोना/रघुवीर कारखेले, पोना/पंकज गोसावी, पोकॉ/राहुल नरवडे, पोकॉ/गौतम लगड, पोकों/गौरव दुर्गुळे, पोकॉ/रमीजराजा आत्तार यांचे पथकाने केलेली आहे. पुढील तपास पोना रघुवीर कारखेले हे करीत आहे.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget