Latest Post

श्रीरामपूर प्रतिनिधी - श्रीरामपूर नगरपालिकेत वारसा हक्काने माझ्या मुलास नोकरी मिळावी, या मागणीसाठी तारा रमेश बागडे या महिलेने नगरपालिका कार्यालयासमोर सोमवार दि. 24 जानेवारी 2022 पासून अमरण उपोषण सुरु केले असून काल दुसर्‍या दिवशीही कडाक्याच्या थंडीत महिलेचे उपोषण सुरुच होते.नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना बागडे यांनी यापुर्वीच निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, वारसा हक्काने माझ्या मुलास सेवेत रुजू करुन घेणेकामी आपण नगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी अर्ज सादर केलेले आहेत. सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून तुमचा विचार करता येत नाही, असे नगरपालिका प्रशासन नेहमी व वारंवार एकच उत्तर देत आहे. सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आपण या अगोदर नगरपालिकेमध्ये अनेक लोक अवॉर्डमधील वारसाहक्काने घेतलेले आहेत. त्यांच्यासाठी वेगळा कायदा आहे का? त्यांच्यासाठी सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट नाही का? याचा खुलासा करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.उपोषणाचा कालचा दुसरा दिवस होता. काल सायंकाळपर्यंत प्रशासनातील कोणीच उपोषणस्थळी भेट न दिल्याने आपल्या न्याय्य हक्कासाठी सुरु केलेले उपोषण यापुढेही सुरुच ठेवणार असल्याचे तारा बागडे यांनी म्हटले आहे.

कोपरगाव प्रतिनिधी - प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रायलय दरवर्षी पोलिसांच्या शौर्यासाठी 'पोलीस पदक' जाहीर करते. यामध्ये यंदा जिल्ह्यातील तिघांना 'पोलीस पदक' जाहीर झाले आहेत.कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक भरत चितांमण नागरे यांना 'पोलीस शौर्य पदक' तर नागरी हक्क संरक्षण विभाग (पीसीआर), अहमदनगर येथे कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय एकनाथ तिजोरे व अल्ताफ मोहिउद्दीन शेख यांना 'पोलीस पदक' जाहीर झाले आहे.पोलीस पदकाची मंगळवारी घोषणा झाली. यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील ५१ पोलिसांना हे पदक जाहीर झाले आहे. जिल्ह्यातील तिघांचा यामध्ये समावेश आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक तिजोरे यांनी ३३ वर्षे सेवा केली आहे. राज्यभर गाजलेल्या कोठेवाडी (ता. पाथर्डी) दरोडा प्रकरणाविषयी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित झाला होता. याचे उत्तरे तिजोरे यांनी व्यवस्थीत पाठविली. त्यांनी लाचलुचपत विभागात काम करताना अनेक केसेस हाताळल्या. खर्डा (ता. जामखेड) हत्याकांड प्रकरणात वरिष्ठांना वेळेवर अहवाल सादर करण्याबरोबरच अहमदनगर शहरातील मोहरम, गणपती बंदोबस्ताच्या नियोजनात तिजोरे यांनी महत्वाची भूमिका बजावली.सहायक पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख यांनी प्रकाश कांडेकर खून प्रकरणी आरोपी पकडणे, तपासात मदत करणे, सराईत गुन्हेगार पाप्या शेख याच्यावरील मोक्का प्रस्ताव तयार करणे, पोलीस अधीक्षक कृष्णा प्रकाश यांच्या कार्यकाळात १२ टोळ्यातील ६२ गुन्हेगार हद्दपार करण्यास मदत करणे याशिवाय गावठी कट्टे, काडतुसे, आरोपी अटक, मुद्देमाल हस्तगत करणे आदी प्रकरणात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. पोलिस उपनिरीक्षक भरत नागरे हे पोलिस मदत केंद्र, कोटमे, ता. येतापल्ली, जि. गडचिरोली. येथे प्रभारी अधिकारी असताना वरीष्ठाची परवानगीने त्यांनी २५ मार्च २०१८ रोजी नक्षली अभियान राबविले. यावेळी नक्षलीसोबत चकमक झाली. नक्षल्यांनी जोरदार फारींग केली.ऑपरेशनदरम्यान नागरे यांच्या टिमने नक्षलवाद्यानी लावलेले पाच क्लेमर बॉम्ब डिसपॉज केले. एक महिला नक्षलवाद्याची डेडबॉडी हस्तगत केली. या अभियानादरम्यान ब्लास्टिंगचे साहित्य, जिवंत क्लेमर बॉम्ब, थ्री बाय थ्री वेपन आदीसह मोठा शस्त्र साठा जप्त करण्यात आला होता. विषेश म्हणजे या ऑपरेशनदरम्यान पोलिस पथकातील एकही कर्मचारी जखमी झाला नव्हता. या कामगिरीची दखल घेत पोलिस उपनिरीक्षक भारत नागरे यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. गडचिरोली येथे नक्षल्यासोबत झालेल्या चकमकीत नागरे यांनी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल त्यांना हे पदक जाहीर झाले असून त्यांचे अहमदनगर जिल्हा पोलिस दलाकडून अभिनंदन होत आहे.


श्रीरामपूर प्रतिनिधी :- श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना आज रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पोलीस अधीक्षक मनोज पाटील  यांचे हस्ते "सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार" प्रदान करण्यात आला आहे.Dysp संदीप मिटके यांनी तोफखाना पोलीस ठाणे अंतर्गत गु.र.न.456/2018 भा द वि कलम 376( अ),( ब),354,323,506,34,   पोक्सो अधिनियम.कलम 5( एम), 6, व 17 या गुन्ह्याचा सर्वोत्कृष्ट तपास केला होता या गुन्ह्याची महाराष्ट्र राज्यात जानेवारी 2021 महिन्यासाठी च्या सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती या कामगिरी करता त्यांना पोलीस महासंचालक यांचे प्रशस्तिपत्र व 25 हजार रुपये रोख अशा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अहमदनगर पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद बाब आहे.       

            तोफखाना पोलीस स्टेशन येथे  दाखल गुन्ह्याचा  प्राथमिक तपास PSI विशाल सनस यांच्याकडे होता, सदर गुन्ह्याचे  गांभीर्य व संवेदनशीलता ओळखून पुढील तपास Dy.s.p संदीप मिटके  यांचेकडे वर्ग करण्यात आला. त्यांनी सदर गुन्ह्याचा कायदेशीर तपास पूर्ण  करूनआरोपी विरुद्ध मा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सदर प्रकरणात मा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी  आरोपी क्र. 1 अफसर लतिफ सय्यद यास भादवि का कलम ३७६( ए) ( बी),३५४ बी,३२३ बालकांचे लैंगिक अत्याचाराचे  संरक्षण कायदा ( पॉक्सो)२०१२ चे कलम (एम),६,८ व१० प्रमाणे दोषी धरले आणि *20 वर्षे सक्तमजुरी व ५००००रु दंड* दंड न भरल्यास 1वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली सदर दंडाची रक्कम पीडित मुलीस नुकसान भरपाईपोटी देण्याचे आदेश पारित केले तसेच आरोपी क्रमांक 2) मुन्नी उर्फ शमीना सय्यद वय 52 वर्ष रा.भराड गल्ली मीरा वली बाबा दर्गाजवल तोफखाना जि.अहमदनगर बालकांचे लैंगिक अत्याचारापहोती. संरक्षण कायदा (पोस्को 2012 चे   17 व 21 प्रमाणे दोषी धरुन एक महिना  साधी कैद (प्रत्येकी) 500/-दंड व दंड न भरल्यास 10 दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. 

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज रोजी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते Dyspसंदीप मिटके ,API शिशिर देशमुख ( परभणी येथील तपासा बद्दल), ASI राजू भालसिंग, PC याकूब पठाण इत्यादींना सन्मानित करण्यात आले.


बेलापुर--(वार्ताहर) येथील जि.प. प्राथ. उर्दू शाळा मध्ये इ.१ ली ते ७ वी पर्यंतच्या सर्व मुली व दारिद्रय रेषखालील मुलांना सर्व शिक्षा अभियान योजने अंतर्गत गणवेश वाटप कार्यक्रम श्री. शरद नवले सदस्य जि. प. अहमदनगर यांचे अध्यक्षते खाली व महेंद्रजी साळवी सरपंच तसेच अभिषेक खंडागळे उपसरपंच यांचे उपस्थितीत पार पडले.या वेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात शरद नवले यांनी उर्दू शाळेला चार वर्ग खोल्या मंजूर झाल्याचे सांगीतले व भविष्यात शाळेची एक आदर्श इमारत करण्याचे आश्वासन दिले, तसेच ग्रामपंचायत तर्फे शाळेला सर्व काही मदत करण्याचे आश्वासन सरपंच व उपसरपंच यांनी दिले. तसेच आसिफभाई बागवान सदस्य शाव्य स यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी साठी शाळेला वाटर फिल्टर देण्याचे वचन दिले. तसेच अकबरभाई सय्यद अध्यक्ष शा.व्य.स. यांनी शाळेच्या अडी अडचणी मांडल्या , त्या वेळी शेख अकील, समीरशेख, आसिफ बागवान, शौकतकुरेशी, मुश्ताक अत्तार फिराज सय्यद, निसार शाह, अस्लम शेख, अस्लम अत्तार, मुनाफ पिंजारी आयशा बागवान, रूबीना बागवान सर्व सदस्य शा. व्य. स. उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेतील शिक्षक अनिस शेख यांनी केले तर प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापक जलील शेख यांनी केले तर अध्यक्ष निवड  श्रीम जबीन बागवान यांनी केले तर उपस्थितांचे श्रीम.  तरन्नुम खान यांनी आभार मानले कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी श्रीम. यास्मिन शेख, श्रीम. नसिबा बागवान, श्रीम महेरून्निसा खान, व अजरा शेख यांनी प्रयत्न केले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-मतदानाच्या रुपाने अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी लोकसेवा विकास अघाडीच्या सर्वच्या सर्व संचालकांना निवडून दिले व आमच्यावर विश्वास दाखविला त्या विश्वासाला कधीच तडा जावू दिला जाणार नाही असा विश्वास माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी बेलापुर येथील आभार सभेत व्यक्त केला . लोकसेवा विकास अघाडीच्या आभार दौऱ्यानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश पा. नाईक हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे सुभाष पटारे जि प सदस्य शरद नवले बाजार समितीचे संचालक सुधीर नवले द्वारकनाथ बडधे सुवालाल लुक्कड ,रविंद्र खटोड सेवा संस्थेचे चेअरमन अनिल पा .नाईक,जालींदर कुऱ्हे,भास्करराव खंडागळे,विलास मेहेत्रे,उपसरपंच अभिषेक खंडागळे,दत्ता कु-हे,भास्कर बंगाळ, भाऊसाहेब कुताळ,शेषराव पवार,प्रकाश नवले,प्रभाकर कु-हे,सुरेश कु-हे,गावकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे उपस्थित होते .या वेळी बोलताना माजी आमदार भानुदास मुरकुटे म्हणाले की आसपासच्या तालुक्यातील कारखान्याची काय अवस्था आहे हे सुज्ञ मतदारांना ज्ञात असल्यामुळे त्यांनी लोकसेवा मंडळाच्या पुर्ण २१संचालकांना भरघोस मतांनी निवडून दिले .अशोक कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेर मोठ्या प्रमाणावर ऊस असुन आपण आजपर्यंत सभासदाप्रमाणेच त्यांच्याही ऊसाला भाव दिलेला आहे .केंद्र शासनाचे इथेनाँल निर्मितीला प्रोत्साहन असल्यामुळेअशोकच्या इथेनाँल प्रकल्पाची क्षमता वाढविण्याचा विचार असुन अधुनिक तंत्रज्ञानासह पाच हजार टन क्षमतेचा नविन प्रकल्प उभारण्याचा मानस आहे .तसेच विजनिर्मितीतही वाढ करण्याचे नियोजन आहे कारखाना प्रदुषणमूक्त करण्याचा आपला मानस आहे बेलापूरच्या जनतेने मला भरभरुन प्रेम दिले आहे त्यामुळे या परिसरात अशोक बंधाऱ्याची मालीका उभारली .भविष्यात आपल्या परिसराचा पाणी प्रश्न जटील होणार आहै त्या करीता कारखान्याच्या माध्यमातून उपाय योजना कराव्या लागतील .असेही ते म्हणाले. यावेळी जालिंदर कु-हे,बाळासाहेब वाबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. या वेळी कलेश सातभाई, वसंतराव कुताळ,सुधाकर खंडागळे,विश्वनाथ गवते,शिवाजी वाबळे,आण्णा गारडे ,प्रकाश कुऱ्हे ,भरत सोमाणी,शरद देशपांडे ,प्रभाकर कुऱ्हे सुरेश कुऱ्हे,ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले,मुश्ताक शेख,राजेंद्र सातभाई,वृद्धेश्वर कु-हे,प्रभात कु-हे, सुभाष अमोलीक,शफीक बागवान,मोहसीन सय्यद,प्रसाद कु-हे,वैभव कु-हे,गोरक्षनाथ कु-हे, पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा,जिना शेख,रावसाहेब गाढे,सुरेश केशव कु-हे,राजेंद्र ओहोळ ,राजेंद्र कुताळ, गणेशबंगाळ,दादासाहेब कुताळ,सुधीर कोळसे,सुभाष खंडागळे, हेमंत कोळसे मोहसीन सय्यद,शफीक बागवान, विश्वनाथ गवते बाळकृष्ण खोसे,महेश कुऱ्हे,अजिज शेख जाकीर शेख,गोरख कुताळ, रावसाहेब अमोलिक, प्रभाकर ताके,उपस्थित  होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केले. सूत्रसंचलन महेश कु-हे  यांनी केले तर अनिल नाईक यांनी आभार मानले.

अहमदनगर प्रतिनिधी-पैशाच्या वादातून मजुराचा खून करणारा आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शेंडी (ता. नगर) शिवारात अटक केली. बबन श्रीधर वारूळे (रा. पिंप्री घुमरी ता. आष्टी, जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यास पुढील कार्यवाहीसाठी आष्टी पोलिसांच्या  ताब्यात देण्यात आले आहे.संजय पांडु पवार (वय 40) हे कुटुंबीयासह पिंप्री घुमरी (ता. आष्टी) येथे राहतात. त्यांचे वडील पांडू हे बाभळीची लाकडे तोडून त्यापासून कोळसा तयार करण्याचे काम करत होते. त्यांचे गावातील बबन वारूळे याचे बरोबर बाभळीची झाडे तोडण्याचे मजुरीवरून वाद झाला होता. त्यावेळेस संजय यांनी बबन वारूळे यांना आतापर्यंत झालेल्या कामाचे पैसे द्या. मी उद्या सकाळी राहिलेले काम करून देईल, असे म्हणून वाद मिटवला होता. परंतु, 21 जानेवारी 2022 रोजी पिंप्री ते घुमरी रस्त्याच्याकडेला सखाराम महादेव साबळे यांच्या घरापाठीमागे पांडू चंदर पवार (वय 60) हे जखमी अवस्थेत पडलेले आहेत, अशी माहिती मिळाली. संजय यांनी खात्री केली असता, पांडू पवार यांचा खून झालेला होता. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात आरोपी बबन श्रीधर वारूळे (रा. पिंप्री घुमरी) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तो गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता. आष्टी पोलिसांनी आरोपी बबन हा अहमदनगर जिल्ह्यात पळून आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी बबन यास शेंडी शिवारात सापळा लावून पकडले.सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस हवालदार संदीप पवार, मनोज गोसावी, रविकिरण सोनटक्के, देवेंद्र शेलार, लक्ष्मण खोकले, सागर ससाणे, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, कमलेश पाथरुट, उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीस पुढील कार्यवाहीसाठी आष्टी पोलिसांकडे सोपविण्यात आले.


शिर्डी ( प्रतिनिधी)शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानने लाडू प्रसादासाठी हरिद्वार येथील मे.हर्ष फ्रेश डेअरी कडून शुद्ध गाईचे तूप घेतले होते. त्यापैकी 214 क्विंटल शुद्ध गाईचे तूप एक्सपायर झाल्यानंतरही त्याचा ईलिलाव काढून साई संस्थानने  ते विक्री केले. मात्र अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 27 (तीन) अंतर्गत हा गुन्हा ठरतो. त्यामुळे साई संस्थांनच्या एक्सपायर तूप विक्री करणाऱ्या जबाबदार मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधितांवर गुन्हा दाखल व्हावा या संदर्भात आदेश द्यावेत .अशी  मागणी एका पत्राद्वारे दैनिक साईदर्शनचे संपादक जितेश लोकचंदाणी यांनी भारताचे‌ पंतप्रधान नरेंद्र मोदी व संबंधित सर्व मंत्री व विभागाकडे केले आहे.या पत्रकात पुढे म्हटले आहे की,‌शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या साई प्रसादालयात लाडू प्रसाद बनविण्यासाठी खरेदी करण्यात आलेले 214 क्विंटल गाईचे शुद्ध  तूप एक्सपायर झालेले असताना साईबाबा संस्थान ने इ लिलाव काढून ते विक्री करण्यात आले व यासंदर्भात साईसंस्थांनवर आरोप झाल्यानंतर अखाद्य म्हणून साई संस्थानने हे एक्सपायर तुप विक्री केल्याचे नंतर

जाहीर केले. मात्र  माहिती अधिकारात   अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाकडून या संदर्भात माहिती मागितली असता त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये असे एक्सपायर झालेले अन्न हे अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 27 (3) अंतर्गत विक्री केल्यास गुन्हा ठरतो .असे असताना साई संस्थांनने हे एक्सपायर तुप  इ लिलावाद्वारे विक्री कसे केले? असे एक्सपायर तूप विक्री  केल्यामुळे साई संस्थांनच्या संबंधित अधिकाऱ्यांनी एक प्रकारे हा गुन्हाच केला आहे. त्यामुळे साई संस्थानच्या जबाबदार असणाऱ्या या एक्सपायर‌ तुप विक्रीप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर संबंधितांवर अन्नसुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 27 (3)अंतर्गत  गुन्हा दाखल व्हावा. व त्यासाठी आपण या प्रकरणी विशेष लक्ष घालून संबंधित खात्याला तसे आदेश द्यावेत.अशी मागणी या पत्राद्वारे जितेश लोकचंदानी यांनी केली आहे.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget