Latest Post

 

श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरात सदावर्ते हॉस्पिटल रोड ला आता 10:15 ते 10:30 दरम्यान झाला बिबट्याचा हल्ला बिबट्याच्या हल्ल्यात एक महिला व पुरुष जखमी परिसरात लोक वस्तीत बिबट्या लापल्याची चर्चा नागरिकात भितिचे वातावरण.



दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन.

अहमदनगर-  जागतिक अपंग दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेने गुणवंत दिव्यांग कर्मचारी पुरस्कार सोहळा गुरुवारी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. राजश्रीताई घुले ,उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते सर ,अर्थ समितीचे सभापती सुनील गडाख ,कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे, महिला व बालकल्याण सभापती सौ.मीराताई शेटे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र क्षीरसागर आदी मान्यवर  उपस्थित होते*

 *यावेळी दिव्यांग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव अनाप यांनी दिव्यांगांना आदर्श शिक्षक पुरस्कार व सभागृह मिळण्याची विनंती पदाधिकाऱ्यांना केली होती. यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले यांनी संघटनेच्या मागणीवरून पद्मश्री पोपटराव पवार  यांचे उपस्थितीत दरवर्षी शिक्षक दिनाला एक आदर्श पुरस्कार दिव्यांग शिक्षकाला देण्याचा व जागतिक अपंग दिनी ३ डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराज सभागृह मोफत देण्याचा व राखून ठेवण्याचा शब्द दिला होता, तो काल जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पाळून दरवर्षी शिक्षक दिनाला एका दिव्यांग शिक्षकाला आदर्श पुरस्कार देणार व जिल्हा परिषदेचे सभागृह जागतिक अपंग दिनी मोफत व राखून ठेवण्याचा ठराव करून.. दोन मागण्या मंजूर केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद सर्व पदाधिकारी व अधिकारी यांचे  अभिनंदनाचा ठराव मंजूर केला ."बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले" या उक्ती प्रमाणे अध्यक्षा  राजश्रीताई  घुले यांनी जो शब्द सभागृहात दिला होता, तो तात्काळ दुसऱ्या दिवशी पाळून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव पारित केला,अशी माहिती कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव अनाप यांनी दिली.*

 *या मागण्या मंजूर झाल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे .यापूर्वीही सर्व पदाधिकाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी दिव्यांग कर्मचारी संघटनेला सहानुभूतीपूर्वक सहकार्य केले आहे.राज्यात प्रथमच 39 दिव्यांग कर्मचाऱ्यांना मुख्याध्यापकाचे प्रमोशन दिले, त्याप्रमाणे 180 प्राथमिक शिक्षकांचे वाहन भत्त्यांचे प्रस्ताव फरकास मंजूर केले, याबद्दलही संघटनेच्या बैठकीत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली*

*यावेळी संघटनेचे मार्गदर्शक दत्तात्रय जपे, राज्य सहकोषाध्यक्ष संतोष सरवदे, राजू आव्हाड, पोपट धामणे, राजेंद्र औटी ,रमेश शिंदे, उद्धव थोरात,बन्सी गुंड, साहेबराव मले, श्रीकांत दळवी, संजय बोरसे,गजानन मुंडलिक,अमोल चन्ने,महिंद्रा कोळी, दादासाहेब गव्हाणे, अजय लगड,चरणसिंग काकरवाल, भिमराज चव्हाण,राजेंद्र ठूबे, खंडू बाचकर,किरण माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.



बेलापुर  (प्रतिनिधी  )-जिल्हा परिषद. प्राथमिक शाळेचा इयत्ता पाचवी स्काँलरशिप परिक्षेचा निकाल ८०% लागला असुन रिध्दी काळे हीने प्रथम क्रमांक  मिळवीला आहे                बेलापुर जिल्हा परिषद मराठी शाळेचा इयत्ता पाचवी परिक्षेचा स्काँलरशिप परिक्षेचा निकाल चांगला लागला आहे असा उत्कृष्ट निकाल लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. रिद्धी रवींद्र काळे ह्या विद्यार्थीनीने ३००पैकी २१८ गुण संपादन करून शाळेत प्रथम क्रमांक मिळविला. त्याच प्रमाणे रोशनी दिलावर सय्यद, अक्षदा ज्ञानेश्वर गांगुर्डे आणि आरुषी अंबादास मोरे ह्या विद्यार्थीनी उत्तम गुणासह सदर परीक्षेत पात्र ठरल्या.पाचवी च्या वर्ग शिक्षिका श्रीमती सुरेखा दत्तात्रय सोनवणे यांनी लाँकडाऊनच्या  काळातही गृहभेट, वैयक्तिक मार्गदर्शन, गट अध्यापन, ऑनलाईन अध्यापन.. इ. सर्व प्रयत्न केले. विस्तार अधिकारी संजीवन दिवे , विस्तार अधिकारी मंदा दुर्गुडे  आणि मुख्याध्यापिका सुरेखा लोंढे  यांनी वेळोवेळी बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच शाळेच्या दहीवळ विजया, बनसोडे लता, गायकवाड शीतल आणि परदेशी लता यांचेही मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

श्रीरामपूर तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सामलेटी साईलता  केंद्रप्रमुख किशोर निळे  आणि केंद्रप्रमुख राजाबाई कांबळे जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी बेलापूर बुद्रुक मुली शाळेचे हार्दिक अभिनंदन केले.


अहमदनगर –  पोलिस दलातील पोलिस उपअधीक्षक पदाच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अहमदनगर शहर विभागाच्या पोलिस उपअधीक्षपदी अनिल अर्जुन कातकडे यांची बदली आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या उपअधीक्षकपदी कमलाकर जाधव यांची नियुक्‍ती झाली आहे.

आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अंबादास भुसारे यांची नाशिक शहराच्या सहाय्य आयुक्‍तपदी पदोन्नतीवर बदली झाली आहे. नारायण न्याहळदे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक अतिरिक्‍त पोलिस अधीक्षकपदी पदोन्नतीवर बदली झाली आहे. कातकडे हे नाशिक ग्रामीणवरून बदलून आले आहेत. जाधव हेही नाशिकवरून बदलून आले आहेत.



बेलापुर  (प्रतिनिधी  )-अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन द्राक्ष डाळींब फळबागासाठी हे वातावरण नुकसानदायक असुन कांदा लागवडीवर देखील मोठा परिणाम झाला आहे साखर काराखाने सुरु झालेअसुनया पावसामुळे ऊस तोड मजुराचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे                                             सध्या साखर कारखान्यांचा गळीत हांगाम सुरु आहे ऊस तोड करणारे मजुर गावोगावी ऊस तोडणीसाठी गेलेले आहेत त्या मजुरांनी ऊस फडाजवळच आपल्या राहुट्या उभ्या केल्या असुन अचानक आलेल्या पावसामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले त्यांना चूल पेटविणेही शक्य झाले नाही ही बाब अशोक कारखान्याचे सर्वेसर्वा लोकनेते भानुदास मुरकुटे यांच्या लक्षात आली त्यांनी तातडीने या मजुराच्या भोजनाची व्यवस्था करण्याचे आदेश शेतकी अधिकाऱ्यांना दिले बेलपिंपळगाव तसेच उक्कलगाव येथे मजुरांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली बेलपिंपळगाव येथे अशोक कारखान्याचे माजी चेअरमन दिगंबर शिंदे व माजी संचालक सखाराम कांगुणे तर उक्कलगाव येथे माजी चेअरमन रावसाहेब पा थोरात यांच्या अधिपत्याखाली श्री हरिहर केशव गोविंद महाराज मंदिर येथे भोजन बनविण्यात आले कारखान्याचे दाखविलेल्या या सहाकार्याबद्दल अनेक ऊस तोड मजुरांनी अन्नदात्यास धन्यवाद दिले आहे.

राहुरी प्रतिनिधी- राहुरी येथे नगर मनमाड राज्य महामार्गावर आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. मात्र पोलिस प्रशासनाने दंडूकेशाहीचा वापर करून आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करताच काही कार्यकर्त्यांनी धूम ठोकली. दिवसभर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू होती.

       प्रहारचे तालुकाध्यक्ष सुरेश लांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक २ डिसेंबर रोजी सकाळी नगर मनमाड राज्य महामार्गावर बाजार समिती समोर चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. शेती पंपाची वीज बील वसूली ताबडतोब बंद करून शेतकऱ्यांचे विजबिल माफ करावे. अशा मागण्या आंदोलन कर्त्यांनी केल्या होत्या. आंदोलन सुरू होऊन पंधरा मिनिटे झाली होती. पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे हे घटनास्थळी दाखल होताच पोलिस फौजफाट्याने धाक दडपशाहीने कार्यकर्त्याची धरपकड सुरू केली. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी धूम ठोकली. तर काही कार्यकर्त्यांची उचल बांगडी करून ताब्यात घेतले. यावेळी पोलिस प्रशासन व कार्यकर्त्यांची चांगलीच झटापट झाली. यामध्ये पोलिस वाहनाची खिडकीची काच फोडण्यात आली. पोलिस प्रशासना विरोधात जबरदस्त घोषनाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक तुषार धाकराव, मधुकर शिंदे तसेच इतर मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा उपस्थित होता. 


         त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिस प्रशासनाने हे आंदोलन दडपशाहीने धुळीस मिळवले. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची दिवसभर धरपकड सुरू होती. तर प्रहार संघटना, आरपीआय व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी झाली होती. 

        यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी, तालुकाध्यक्ष सुरेश लांबे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अनिल जाधव, शहराध्यक्ष पिंटू नाना साळवे, आरपीआयचे जिल्हा नेते बाळासाहेब जाधव, तालुकाध्यक्ष विलासनाना साळवे, लहानु तमनार, एकलव्य संघटनेचे नामदेव पवार आदि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. याबाबत दुपारी उशिरापर्यंत पोलिस प्रशासनाची कारवाई सुरू होती.



श्रीरामपूर (प्रतिनिधी) - शहरातील नागरिकांच्या आरोग्यप्रश्नी तथा घनकचरा व्यावस्थापन ढिसाळ कारभाराबाबतीत समाजवादी पार्टी तर्फे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार आणि कार्यकर्त्यांच्या वतीने नगर पालिका मुख्याध्याकाऱ्यांना निवेदन देण्यात आले,या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, शहरात स्वच्छता रहावी याकरीता श्रीरामपूर नगर पालिकेमार्फत पुणे येथील मे.दिशा एजन्सी यांना शहरातील घनकचरा व्यवस्थापचा ठेका देण्यात आलेला आहे,सदरील एजन्सीने शहरातील घनकचरा हा दैनंदिन तथा नियमितपणे साफ करावयाचा असून कामात कुठलीही कुचराई करावयाची नसून जर असे आढळून आल्यास सदरील एजन्सीवर दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार हा संबंधित नगर पालिका प्रशासनास आहे,मात्र इतके नियम असताना सदरील एजन्सीने कामात कुचराई केलेली आहे, यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने समाजवादी पार्टीतर्फे श्रीरामपूर नगर पालिका प्रशासन आणि घनकचरा व्यवस्थापनाविरुद्ध दिनांक ३० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२१ असे सलग ५ दिवस आमरण उपोषण करुन शहरातील अस्वच्छतेबाबत संबधितांचे लक्ष वेधले असता संबंधित एजंन्सीने कामात कुचराई केली म्हणून नगर पालिका प्रशासनाकडून संबंधित एजन्सीला माहे सप्टेंबर २०२१ या केवळ एक महिन्याच्या कालावधीत कामात केलेल्या कसूराबाबत रुपये ७५०००/- (अक्षरी रुपये पंचाहत्तर हजार मात्र) दंड ठोठावला आहे, ही बाब अभिनंदनीय आहे,मात्र शहरातील अस्वच्छतेच्या गंभीर प्रश्नांमुळे सदरील नगर पालिका प्रशासनास तोंडी सांगुन तथा वेळोवेळी शेकडो निवेदने देऊन काहीच उपयोग झालेला नसल्याने समाजवादी पार्टीस शेवटी उपोषणाचा मार्ग स्विकारावा लागला हे शहरवासियांचे दुर्दैवच म्हणावे लागेल,महत्वाचे म्हणजे सदरील एजन्सीला माहे सप्टेंबर २०२१ या केवळ एक महिना कामाच्या कुचराईबाबत दंड ठोठावण्यात आला आहे,हे जरी सत्य असले तरी संबंधित एजन्सीने शहरातील घनकचऱ्याचा ठेका घेतल्यापासूनच शहरातील स्वच्छतेकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे हे नाकारुन चालणार नाही,कारण शहरातील अस्वच्छतेबाबत शहरातील अनेक नागरीकांच्या तक्रारी होत्या व आहेत मग त्यांच्या तक्रारी नुसार संबंधित ठेकेदारास कोणत्याही प्रकारचा दंड आकारण्यात आल्याचे दिसून येत नाही,आणि जर यामागे दंड आकारण्यात आला असेलतर त्याचाही खुलासाही करण्यात आलेला नाही, दुसरे असे की, शहरातील अस्वच्छतेबाबत जेव्हा समाजवादी पार्टीतर्फे सलग ५ दिवस आमरण उपोषण करण्यात आले तेव्हा कुठे श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनाने मनावर घेत संबंधित एजंन्सीस ७५०००/- रुपयांचा दंड ठोठावला,मात्र संबंधित एजंन्सीस ठोठावण्यात आलेला दंड हा कोणत्या तक्रारीच्या आधारे ठोठावला गेला ?, सदरील कामाबाबत श्रीरामपूर नगर पालिका कर्मचारी, अधिकारी प्रत्येक्ष शहरात जागो जागी फिरुन प्रत्येक्षात कोणी शहानिशा केली आहे काय ? कोणता रिपोर्ट दिला आहे ?, काय निष्कर्ष काढले आहे ?, की कार्यालयात बसुनच केवळ तक्रारीच्या आधारावर सदरील दंड ठोठावण्यात आला आहे ? याचाही खुलासा करण्यात आलेला नाही,सोबतच जर शहरातील घनकचऱ्याचा ठेका घेतल्यापासूनच संबंधित एजंन्सीने आपल्या कामांबाबत उदासिनता दाखवून आपले कामे आणि कर्तव्यात कसुर केलेला आहे,कारण त्याबाबत पुरावा म्हणून श्रीरामपूर नगर पालिका कार्यालयात नागरीकांच्या याबाबत शेकडो तक्रारी पडून आहेतच तर मग संबंधित एजंन्सीस केवळ माहे सप्टेंबर २०२१ या केवळ एकाच महिन्याचा दंड का आकारण्यात आला,दरमहिन्याचा दंड आकारणे का नगर पालिका प्रशासनास सुचले नाही ?, यामुळे सदरील नगर पालिका प्रशासन हे ठेकेदारास पाठीशी तर घालत नाही ना ? असा संशय बळावत आहे,वास्तविक पहाता संबंधित एजंन्सीने जर ठेका घेतल्या पासूनच कामात कसूर केलेला आहे तर दंड केवळ एकाच महिन्याचा का ?, हे अयोग्य आणी संबंधित एजंन्सीला पाठीशी घातले जात असल्याचे जाणवत आहे, श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनाचा जर खरोखरच पारदर्शी कारभार आहे तर मग संबंधित एजंन्सीने ठेका घेतल्यापासून ते आजवर दर महिन्याला त्यांनी केलेल्या कामातील अनियमितता आणि कुचराईपोटी दंड आकारण्यात यायला हवा होता,मात्र असे निदर्शनास येत नाही असेही या निवेदनात म्हटले आहे,तसेच संबंधित एजंन्सीने सदरील ठेका घेतल्यापासून ते आजवर केलेल्या कामातील अनियमितपणा आणी कुचराई पोटी प्रत्येक महिना दंड आकारणी करण्यात यावी, शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा ज्वलंत प्रश्न असल्याने यापुढे शहरातील अस्वच्छतेप्रश्नी संबंधित एजंन्सीस दक्षता बाळगण्याची सुचना देण्यात यावी आणि येत्या आठ दिवसांत याबाबत काय निर्णय घेण्यात आला,याची आम्हास माहिती देण्यात यावी.अन्यथा याविरोधात श्रीरामपूर नगर पालिका कार्यालयासमोर आत्मकलेश आंदोलन आणि आमरण उपोषणाचा मार्ग स्विकारला जाईल असेही निवेदनात शेवटी नमुद करण्यात आले आहे.या निवेदनावर जोएफ जमादार,आसिफ तांबोळी, अय्यूब पठान, अब्दुल सैय्यद, मतीन शेख,बादल सिंग जूनी, ईमरान शेख, अरबाज़ कुरैशी, मुबसशीर पठान, ज़करिया सैय्यद, अल्तमश शेख,अमन ईनामदार, फैजान सैय्यद,परवेज़ शेख,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget