Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये या करीता जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी घालून दिलेले वेळेचे बंधन न पाळल्यामुळे बेलापूर गावातील पाच दुकाने सिल करण्यात आली आहे महसुलच्या या कारवाईमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. मा. जिल्हाधिकारी यांनी दुकान उघडे ठेवण्यासाठी दुपारी चारची वेळ दिलेली असतानाही अनेक दुकानदार दुकानाचा एक दरवाजा एक फळी उघडी ठेवुन व्यवसाय करत असल्याच्या तक्रारी आल्यामुळे व कोरोना रुग्णांची संख्या वाढु लागल्यामुळे जिल्हाधिकारी यानी कडक निर्बंध घालून दिले आहेत ठरवुन दिलेल्या वेळेनंतर दुकान उघडे असल्यास दुकाने सिल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत बेलापूर येथील चिकन शाँप हे दुपारी चार नंतरही सुरु असल्याचे व वारवार सांगुनहीचार नंतर दुकान सुरुच ठेवल्यामुळे लकी चिकन सेंटर गुडलक चिकन सेंटरडेली फ्रेश चिकन सेंटर ए नव चिकन शाँप सुपर चिकन शाँप ही दुकाने शासनाने ठरवुन दिलेल्या वेळे व्यतिरीक्त उघडी ठेवुन नियामाचा भंग केला जात असल्याचा आहवाल पोलीसांनी तहासील कार्यालय श्रीरामपुर येथे पाठविला होता तससीलदार प्रशांत पाटील यांनी ही दुकाने तातडीने सिल करण्याचे आदेश मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी यांना दिले त्या नंतर आज दुपारी मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी कामगार तलाठी कैलास खाडे यांनी बेलापुर पोलीसांना सोबत घेवुन हे पाचही दुकाने सिल केली आहे प्रशासनाच्या या कारवाईमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे कोरोना परिस्थितीत व्यापारी वर्ग हा मेटाकुटीस आलेला असताना आता प्रशासनाने ही कठोर कारवाई केल्यामुळे आता प्रपंच कसे चालवावे असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-गावातीलच एका २२ वर्षीय मुलाने आपल्या १४ वर्ष वयाच्या मुलीला फुस लावुन पळवुन नेले असुन या घटनेला चौदा दिवस उलटून गेलेले आहे अजुनही मुलीचा तपास लागलेला नाही माझ्या मुलीला शोधुन आणा हो साहेब अशी आर्त हाक मुलीच्या आईने पोलीस अधिकाऱ्यांना घातली. बेलापुर येथील एका अल्पवयीन मुलीस गावातीलच एका तरुणाने फुस लावुन पळवुन नेले अजुनही या घटनेचा तपास लागेना त्यामुळे परिवाराचा जिव टांगणीला लागला आहे जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी उपविभागीय पोलीस आधिकारी संदीप मिटके यांच्याशी मुलीच्या आईची भेट घडवुन आणली त्या वेळी मुलीच्या आईने माझी मुलगी अल्पवयीन असुन तिला लिहता वाचता काहीच येत नाही मोबाईलही लावता येत नाही तिच्या जिवाला धोका असुन माझ्या मुलीचा शोध लावा हो साहेब या गरीब मातेला न्याय मिळवून द्या साहेब अशी विनवणी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना केली त्या वेळी लवकरात लवकर तुमच्या मुलीला तुमच्या स्वाधीन करु अहमदनगर गुन्हा अन्वेषन विभागाचीही मदत घेवुन मुलीचा शोध लावु काळजी करु नका  असे अश्वासन मुलीचे नातेवाईक व ग्रामस्थांना दिले या वेळी तातडीने मुलीचा शोध लावावा नाही तर ग्रामस्थांना आंदोलनाचा पावित्रा घ्यावा लागेल असे जि प सदस्य शरद नवले यांनी सांगीतले या वेळी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ पत्रकार देविदास देसाई सुनिल मुथा दिलीप दायमा प्रफुल्ल डावरे सचिन वाघ विशाल आंबेकर रमेश अमोलीक राहुल माळवदे गणेश फुलबाठीया रोहीत शिंदे मुलीचे नातेवाईक पदमावती साळूंके ज्ञानेश्वर पवार रामा पवार नवनाथ पवार विलास पवार भगवान पवार अक्षय पवार विश्वास पवार लहानुबाई पवार जालींदर पवार बेलापुर पोलीस स्टेशनचा पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे पोपट भोईटे हरिष पानसंबळ उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी )- तहसील कार्यालयातील माझ्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय चांगले काम केले त्यांच्याच कमाच्या रुपाने मला उत्कृष्ट तहसीलदार हा बहुमान मिळाला असुन तो पुरस्कार माझ्यावर प्रेम करणाऱ्या तालुक्यातील जनतेचा पुरस्कार आहे अशा शब्दात तहसीलदार प्रशांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या                महसुल दिनानिमित्त श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांना उत्कृष्ट तहसीलदार हा बहुमान मिळाला त्याबद्दल बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच महेंद्र साळवी हे होते  या  वेळी बोलताना तहसीलदार पाटील पुढे म्हणाले की तालुक्याचा तहसीलदार म्हणून काम करत असताना शासकीय कामकाजा व्यतिरिक्त  जनतेची गऱ्हाणी अडचणी सोडविण्याचे काम मी केले अन त्या कामाची जेव्हा बातमी झाली मी कार्यालयात आलेल्या आजीची विचारपुस केली तिची किरकोळ समस्या होती ती सोडविली हे फार काही वेगळे काम केले असे मला वाटत नाही माझ्या परिवाराचे माझ्यावर संस्कारच असे झालेले आहेत की आपल्याकडे कुणीही समस्या घेवुन आला तर त्याचे समाधान करणे हे माझे पहीले कर्तव्य आहे अनेकांशी शासकीय कर्मचारी अधिकारी यांनी व्यवस्थित बोलले विचारपुस केली योग्य सल्ला दिला तरी समोरील व्यक्तीचे समाधान होत असते तहसीलदार ही एक संस्था आहे या संस्थेत शिपायापासून ते नायब तहसीलदार या सर्वांनी आपणास ठरवून दिलेले काम योग्य वेळेत पार पाडले म्हणून मला हा सन्मान मिळाला हा सन्मान सर्व महसुल कर्मचाऱ्यांचा आहे तालुक्यातील जनतेचा आहे ज्यांची सेवा करण्याची संधी मला मिळाली सकारात्मक विचार ठेवुन काम केले तर त्या कामाचा आनंद वेगळाच असतो माझ्या शिपायाने कर्मचाऱ्यांनी जेव्हा एखाद्या सर्वसामान्य नागरीकाचे काम केले ही जेव्हा बातमी होईल तेव्हाच मी तहसीलदार असल्याचा मला अभिमान वाटेल असेही पाटील म्हणाले या वेळी उत्कृष्ट मंडलाधिकारी म्हणून सन्मान मिळालेले बेलापुरचे मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी कोरोना योध्दा पुरस्कार मिळालेले प स सदस्य अरुण पा नाईक पदोन्नती मिळालेले कामगार तलाठी वायखिंडे यांचाही सन्मान करण्यात आला या वेळी जि प सदस्य शरद नवले रणजीत श्रीगोड अरुण पा नाईक सरपंच महेंद्र साळवी आदिंनी मनोगत व्यक्त केले.यावेळी शरद नवले,अरुण पाटील नाईक,रणजित श्रीगोड,महेंद्र साळवी,अभिषेक खंडागळे,अशोक प्रधान, पुरुषोत्तम भराटे,देविदास देसाई,सुहास शेलार,दिलीप दायमा,किशोर कदम,कामगार तलाठी कैलास खाडे,रमेश अमोलिक, मुस्ताक शेख,मोहसिन सय्यद, मिलिंद दुधाळ,शफीक बागवान,नितीन नवले,अजीज शेख,विशाल आंबेकर,दादासाहेब कुताळ,सतीश काळे,योगेश जाधव,अन्वर बागवान,रावसाहेब अमोलिक,महेश कु-हे,शांतवन अमोलिक,तस्वर बागवान,नाना तुवर,युनूस शेख आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन देविदास देसाई यांनी केले तर उपसरपंच अभिषेक  खंडागळे यांनी आभार मानले.

श्रीरामपुर (  प्रतिनिधी )- एकाच क्यू आर कोडच्या अधारे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील ऐ पी अँटोमोटीव्ह या स्पीड गव्हर्नरने वाहनधारका बरोबरच शासनाचीही फसवणूक केली असुन संबधीतावर कारवाई न केल्यास प्रादेशिक कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा जरीया फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आलेला आहे. जरीया फाऊंडेशनच्या वतीने उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की ए पी अँटोमोटीक यांना स्पीड गव्हर्नर म्हणून प्रमाणपत्र देण्याचे अधिकार दिलेले आहेत या अधिकाराचा दुरुपयोग करुन त्यांनी शासनाची फसवणूक तर केलीच शिवाय भरमसाठ पैसे घेवून वाहनधारकाची देखील फसवणूक केलेली आहे प्रमाणपत्र देताना एकाच क्यू आर कोडचा वापर करुन अनेकांना प्रमाणपत्र दिलेले आहेत त्यात शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक  नुकसान झालेले आहे अशा व्यक्तीवर कारवाई करणे गरजेचे असताना काही अधिकारी त्यास पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत गंभीर दोष आढळले असताना त्याचा परवाना निलंबीत केला होता परवाना निलंबीत असतानाही संबधीताने अनाधिकाराने दोन वाहनधारकांना प्रमाणपत्र दिले आहे या सर्व बाबींची चौकशी होवुन संबधीतावर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात यावी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरुन तो कारवाई केल्यास  धमक्या देत आहे अशा व्यक्तीवर तातडीने कारवाई करावी नाही तर आम्हाला उचित न्याय मागण्यासाठी आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसावे लागेल असेही निवेदनात म्हटले आहे या निवेदनाच्या प्रति परिवहन मंत्री प्रादेशिक परिवहन अधिकारी परिवहन आयुक्त यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.


अहमदनगर(प्रतिनिधी)- सोलापूर टोलनाक्यावरील दरोडा व मोक्का गुन्ह्यातील एका आरोपीला शिराळा (ता. पाथर्डी) शिवारात पोलिसांनी अटक केली आहे. बाळासाहेब ऊर्फ बाळा रमेश भिंगारदिवे (रा. आडगाव ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.सोलापूर टोलनाक्यावरील दरोडा प्रकरणी आठ आरोपीविरोधात मोक्का कलमान्वये कारवाई करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील पाच आरोपींना यापूर्वी अटक केली आहे. दोन दिवसापूर्वी या गुन्ह्यातील आरोपी विक्रम गायकवाड, बाबा आढाव यांना भिंगार पोलिसांनी नगर तालुक्यातील वाळूंज शिवारात अटक केली होती. यातील एकमात्र आरोपी बाळासाहेब भिंगारदिवे पसार होता. तो पाथर्डी तालुक्यातील शिराळा गावामध्ये आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश इंगळे, पोलीस कर्मचारी मनोहर शेजवळ, भाऊसाहेब कुरूंद, संदीप घोडके, सुरेश माळी, संतोष लोंढे, जालिंदर माने, चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने भिंगारदिवे याला अटक केली.


बेलापुर (प्रतिनिधी  )- बेलापूरकरांचा एक  हात मदतीचा या संकल्पने प्रमाणे  जि. प. सदस्य शरद नवले यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील युवकांनी विविध जिवनावश्यक वस्तू गोळा करुन पूरग्रस्त भागात स्वतः गरजुंना वाटप करुन बेलापूरकरांची मदत पुरग्रस्तापर्यंत पोहोचवली.कोल्हापूर सांगली येथे पुराने थैमान घातले अनेक कुटुंब उध्वस्त झाली प्रपंच उघड्यावर पडले दररोजच्या बातम्यांनी अनेकांची मने हेलावून टाकली बेलापूरकरातील माणूसकी जागी झाली पूरग्रस्तांना आपली छोटीसी का होईना मदत पोहोचली पाहीजे त्या करीता जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे  यांनी तरुण कार्यकर्त्यांना मदत गोळा करण्याचे अवाहन केले अन गावातील तरुण कार्यकर्ते साहेबराव वाबळे विशाल आंबेकर राजु काळे निलेश कर्पे आदित्य जाधव अविनाश अमोलीक मोहसीन सय्यद विक्रम नाईक शफीक बागवान आदिंनी गावातुन धान्य तांदुळ बिस्कीट पुडे किराणा सामान कपडे भांडे सर्व एका ठिकाणी जमा करुन त्याचे किट तयार केले त्यात पाणी पाऊच पाणी बोटल याचाही समावेश होता हे सर्व सामान दिनेश बैरागी यांच्या टेम्पोत भरुन दिनेश बैरागी हे विशाल आंबेकर रवि कडू सचिन वाघ युवराज रावताळे सुनिल साळूंके सुरज बडे धनेश ढोले लखन बडे महेश वैद्य गंगाराम झीटे यांना घेवुन रात्री बारा वाजता गावातुन निघाले सकाळी दहा वाजता सांगली जिल्ह्यातील वाळवा यां गावी पूरपरिस्थितीमुळे अनेक कुटूंब उघड्यावर पडली होती तेथील सरपंच शुभांगी माळी उपसरपंच पोपट अहीर विकास चव्हाण प्रदिप कोळेकर दिग्वीजय डवंग अमित सुर्यवंशी संग्राम तुपे वैभव शिंदे यांच्या उपस्थितीत मदत किटचे वाटप करण्यात आले त्या नंतर ही टिमकील्हापूर जिल्ह्यातील इंगळी या गावी पोहोचली तेथील  सरपंच शालन पाटील उपसरपंच विठ्ठल गाताडे कार्यकर्ते चेतन चौगुले संदीप गुदले मियालाल पटेल वैशाली मोरे अक्षय कुसान दादु मोरे उमेश शिंदे मनोज बुगटे सदाशिव सांगले यांच्या उपस्थितीत पूरग्रस्तांना मदतीचे साहीत्य देण्यात आले गावातील कार्यकर्त्यांनी खासदार राजु शेट्टी यांच्याशी संपर्क साधला इतक्या लांबुन माणुसकीचा झरा या गरजवंता पर्यत पोहोचविला त्या बद्दल बेलापूरकरांना खासदार शेट्टी यांनी धन्यवाद दिले पूर परिस्थीतीचा जास्त फटका ईंगळी या गावास पोहोचला होता अनेक कुटूंबाचे होत्याचे नव्हते झाले होते ही परिस्थितीत पहाताच मदत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यांच्याही डोळ्यात अश्रु उभे राहीले.

जळगाव (प्रतिनिधी )-जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैधंद्याला लगाम लावण्याचे काम पोलीस प्रशासनाचे असते. जिसके हात मे लाठी वही मालिक याम्हणीप्रमाणे सत्ता असलेल्या पुढार्‍यांवरही जिल्ह्यातील अवैधधंद्याचे गणित अवलंबून असते. गेल्या काही दिवसांपासून बंद असलेले अवैधधंदे जिल्हयात पुन्हा जोमाने सुुरू झाले. यात सत्ताधारी पक्षाच्या माजी नेत्याच्या जुगार अड्डयावर कारवाई झाली. कारवाई झाली मग काय..या कारवाईचे पडसाद मुंबईपर्यंत पोहचले. अन् जिल्हा पोलीस दलाच्या प्रमुख असलेेले पोलीस अधीक्षकांना बोलावणे आले. आता बोलवणे कशासाठी आले, ते मात्र सद्यस्थितीत कोडेच आहे. अवैधधंदे सुरु असले की डोक्याला ताप, आणि ते बंद केले तरी डोक्याला ताप अशाच मानसिकतेतून सध्या पोलीस दलातील अधिकार्‍यांना सामोरे जावे लागत असल्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरुय.पोलीस विभाग एकीकडे आणि अवैधधंदे दुसरीकडे. दोन वेगवेगळी टोके आहेत. अवैधधंदे सुरु आणि बंदचा निर्णय हा स्थानिक पातळीवर होत असल्याचा नागरिकांचा भ्रम असला तरी, याबाबत सर्व निर्णय हे वरिष्ठ पातळीवर (वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मर्जीवर ) होतात. आता यात तशी आर्थिक गणीतेही अवलंबून असतात यात शंका नाही. वरिष्ठ अधिकारी कसा, त्याच्या कारभारावर स्थानिक पातळीवरील कारभाराची दिशा ठरते. आता करप्टेड आणि नॉन करप्टेड ही विशेषणे त्यामुळे अधिकार्‍यांना लागतात,ही माझी खात्री झालीय.आता अधिकारी कितीही शिस्तीचा भोक्ता कडक असला, तरी त्याचा अवैधधंद्यावर फारसा परिणाम होत नाही. यात काही अधिकारी अपवाद आहे, हे मात्र नक्की. त्यांच्यासमोर ना पुढार्‍याची चालते ना..सत्ताधार्‍यांची, हे स्वतः नियम बनवितात, त्याची अंमलबजावणीही करतात. मात्र असे अधिकारी एका ठिकाणी फार काळ टिकत नाही. असाही माझा आजवरचा अनुभव आहे. दोनच गोष्टींमुळे अवैधधंदे वाढतात.एकतर राजकीय पुढार्‍याचे वजन अथवा पोलिसांचा अर्थपूर्ण आशिर्वाद. गत काळातील काही घटनावरुन ते समोर आलेच आहे. त्यामुळेच अवैधधंदे बंद केले, ते सुुरु करण्यासाठी दबाव, आणि सुरु झाल्यावर, कारवाई केली की, डोक्याला ताप..अशा दुहेरी मानसिकतेतून पोलीस दलाला सध्यस्थितीत जावे लागत असल्याचे चित्र आहे. आणि सर्वसामान्यांना अवैधंधंदे काय, आणि त्यावर पोलिसाीं नकली कारवाई काय, या सर्व गोष्टींची सवयच झालीय.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget