बेलापुर (प्रतिनिधी )- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये या करीता जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी घालून दिलेले वेळेचे बंधन न पाळल्यामुळे बेलापूर गावातील पाच दुकाने सिल करण्यात आली आहे महसुलच्या या कारवाईमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. मा. जिल्हाधिकारी यांनी दुकान उघडे ठेवण्यासाठी दुपारी चारची वेळ दिलेली असतानाही अनेक दुकानदार दुकानाचा एक दरवाजा एक फळी उघडी ठेवुन व्यवसाय करत असल्याच्या तक्रारी आल्यामुळे व कोरोना रुग्णांची संख्या वाढु लागल्यामुळे जिल्हाधिकारी यानी कडक निर्बंध घालून दिले आहेत ठरवुन दिलेल्या वेळेनंतर दुकान उघडे असल्यास दुकाने सिल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत बेलापूर येथील चिकन शाँप हे दुपारी चार नंतरही सुरु असल्याचे व वारवार सांगुनहीचार नंतर दुकान सुरुच ठेवल्यामुळे लकी चिकन सेंटर गुडलक चिकन सेंटरडेली फ्रेश चिकन सेंटर ए नव चिकन शाँप सुपर चिकन शाँप ही दुकाने शासनाने ठरवुन दिलेल्या वेळे व्यतिरीक्त उघडी ठेवुन नियामाचा भंग केला जात असल्याचा आहवाल पोलीसांनी तहासील कार्यालय श्रीरामपुर येथे पाठविला होता तससीलदार प्रशांत पाटील यांनी ही दुकाने तातडीने सिल करण्याचे आदेश मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी यांना दिले त्या नंतर आज दुपारी मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी कामगार तलाठी कैलास खाडे यांनी बेलापुर पोलीसांना सोबत घेवुन हे पाचही दुकाने सिल केली आहे प्रशासनाच्या या कारवाईमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे कोरोना परिस्थितीत व्यापारी वर्ग हा मेटाकुटीस आलेला असताना आता प्रशासनाने ही कठोर कारवाई केल्यामुळे आता प्रपंच कसे चालवावे असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे.
Post a Comment