Latest Post

श्रीरामपुर (  प्रतिनिधी )- एकाच क्यू आर कोडच्या अधारे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील ऐ पी अँटोमोटीव्ह या स्पीड गव्हर्नरने वाहनधारका बरोबरच शासनाचीही फसवणूक केली असुन संबधीतावर कारवाई न केल्यास प्रादेशिक कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा जरीया फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आलेला आहे. जरीया फाऊंडेशनच्या वतीने उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की ए पी अँटोमोटीक यांना स्पीड गव्हर्नर म्हणून प्रमाणपत्र देण्याचे अधिकार दिलेले आहेत या अधिकाराचा दुरुपयोग करुन त्यांनी शासनाची फसवणूक तर केलीच शिवाय भरमसाठ पैसे घेवून वाहनधारकाची देखील फसवणूक केलेली आहे प्रमाणपत्र देताना एकाच क्यू आर कोडचा वापर करुन अनेकांना प्रमाणपत्र दिलेले आहेत त्यात शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक  नुकसान झालेले आहे अशा व्यक्तीवर कारवाई करणे गरजेचे असताना काही अधिकारी त्यास पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत गंभीर दोष आढळले असताना त्याचा परवाना निलंबीत केला होता परवाना निलंबीत असतानाही संबधीताने अनाधिकाराने दोन वाहनधारकांना प्रमाणपत्र दिले आहे या सर्व बाबींची चौकशी होवुन संबधीतावर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात यावी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरुन तो कारवाई केल्यास  धमक्या देत आहे अशा व्यक्तीवर तातडीने कारवाई करावी नाही तर आम्हाला उचित न्याय मागण्यासाठी आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसावे लागेल असेही निवेदनात म्हटले आहे या निवेदनाच्या प्रति परिवहन मंत्री प्रादेशिक परिवहन अधिकारी परिवहन आयुक्त यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.


अहमदनगर(प्रतिनिधी)- सोलापूर टोलनाक्यावरील दरोडा व मोक्का गुन्ह्यातील एका आरोपीला शिराळा (ता. पाथर्डी) शिवारात पोलिसांनी अटक केली आहे. बाळासाहेब ऊर्फ बाळा रमेश भिंगारदिवे (रा. आडगाव ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.सोलापूर टोलनाक्यावरील दरोडा प्रकरणी आठ आरोपीविरोधात मोक्का कलमान्वये कारवाई करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील पाच आरोपींना यापूर्वी अटक केली आहे. दोन दिवसापूर्वी या गुन्ह्यातील आरोपी विक्रम गायकवाड, बाबा आढाव यांना भिंगार पोलिसांनी नगर तालुक्यातील वाळूंज शिवारात अटक केली होती. यातील एकमात्र आरोपी बाळासाहेब भिंगारदिवे पसार होता. तो पाथर्डी तालुक्यातील शिराळा गावामध्ये आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश इंगळे, पोलीस कर्मचारी मनोहर शेजवळ, भाऊसाहेब कुरूंद, संदीप घोडके, सुरेश माळी, संतोष लोंढे, जालिंदर माने, चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने भिंगारदिवे याला अटक केली.


बेलापुर (प्रतिनिधी  )- बेलापूरकरांचा एक  हात मदतीचा या संकल्पने प्रमाणे  जि. प. सदस्य शरद नवले यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील युवकांनी विविध जिवनावश्यक वस्तू गोळा करुन पूरग्रस्त भागात स्वतः गरजुंना वाटप करुन बेलापूरकरांची मदत पुरग्रस्तापर्यंत पोहोचवली.कोल्हापूर सांगली येथे पुराने थैमान घातले अनेक कुटुंब उध्वस्त झाली प्रपंच उघड्यावर पडले दररोजच्या बातम्यांनी अनेकांची मने हेलावून टाकली बेलापूरकरातील माणूसकी जागी झाली पूरग्रस्तांना आपली छोटीसी का होईना मदत पोहोचली पाहीजे त्या करीता जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे  यांनी तरुण कार्यकर्त्यांना मदत गोळा करण्याचे अवाहन केले अन गावातील तरुण कार्यकर्ते साहेबराव वाबळे विशाल आंबेकर राजु काळे निलेश कर्पे आदित्य जाधव अविनाश अमोलीक मोहसीन सय्यद विक्रम नाईक शफीक बागवान आदिंनी गावातुन धान्य तांदुळ बिस्कीट पुडे किराणा सामान कपडे भांडे सर्व एका ठिकाणी जमा करुन त्याचे किट तयार केले त्यात पाणी पाऊच पाणी बोटल याचाही समावेश होता हे सर्व सामान दिनेश बैरागी यांच्या टेम्पोत भरुन दिनेश बैरागी हे विशाल आंबेकर रवि कडू सचिन वाघ युवराज रावताळे सुनिल साळूंके सुरज बडे धनेश ढोले लखन बडे महेश वैद्य गंगाराम झीटे यांना घेवुन रात्री बारा वाजता गावातुन निघाले सकाळी दहा वाजता सांगली जिल्ह्यातील वाळवा यां गावी पूरपरिस्थितीमुळे अनेक कुटूंब उघड्यावर पडली होती तेथील सरपंच शुभांगी माळी उपसरपंच पोपट अहीर विकास चव्हाण प्रदिप कोळेकर दिग्वीजय डवंग अमित सुर्यवंशी संग्राम तुपे वैभव शिंदे यांच्या उपस्थितीत मदत किटचे वाटप करण्यात आले त्या नंतर ही टिमकील्हापूर जिल्ह्यातील इंगळी या गावी पोहोचली तेथील  सरपंच शालन पाटील उपसरपंच विठ्ठल गाताडे कार्यकर्ते चेतन चौगुले संदीप गुदले मियालाल पटेल वैशाली मोरे अक्षय कुसान दादु मोरे उमेश शिंदे मनोज बुगटे सदाशिव सांगले यांच्या उपस्थितीत पूरग्रस्तांना मदतीचे साहीत्य देण्यात आले गावातील कार्यकर्त्यांनी खासदार राजु शेट्टी यांच्याशी संपर्क साधला इतक्या लांबुन माणुसकीचा झरा या गरजवंता पर्यत पोहोचविला त्या बद्दल बेलापूरकरांना खासदार शेट्टी यांनी धन्यवाद दिले पूर परिस्थीतीचा जास्त फटका ईंगळी या गावास पोहोचला होता अनेक कुटूंबाचे होत्याचे नव्हते झाले होते ही परिस्थितीत पहाताच मदत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यांच्याही डोळ्यात अश्रु उभे राहीले.

जळगाव (प्रतिनिधी )-जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैधंद्याला लगाम लावण्याचे काम पोलीस प्रशासनाचे असते. जिसके हात मे लाठी वही मालिक याम्हणीप्रमाणे सत्ता असलेल्या पुढार्‍यांवरही जिल्ह्यातील अवैधधंद्याचे गणित अवलंबून असते. गेल्या काही दिवसांपासून बंद असलेले अवैधधंदे जिल्हयात पुन्हा जोमाने सुुरू झाले. यात सत्ताधारी पक्षाच्या माजी नेत्याच्या जुगार अड्डयावर कारवाई झाली. कारवाई झाली मग काय..या कारवाईचे पडसाद मुंबईपर्यंत पोहचले. अन् जिल्हा पोलीस दलाच्या प्रमुख असलेेले पोलीस अधीक्षकांना बोलावणे आले. आता बोलवणे कशासाठी आले, ते मात्र सद्यस्थितीत कोडेच आहे. अवैधधंदे सुरु असले की डोक्याला ताप, आणि ते बंद केले तरी डोक्याला ताप अशाच मानसिकतेतून सध्या पोलीस दलातील अधिकार्‍यांना सामोरे जावे लागत असल्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरुय.पोलीस विभाग एकीकडे आणि अवैधधंदे दुसरीकडे. दोन वेगवेगळी टोके आहेत. अवैधधंदे सुरु आणि बंदचा निर्णय हा स्थानिक पातळीवर होत असल्याचा नागरिकांचा भ्रम असला तरी, याबाबत सर्व निर्णय हे वरिष्ठ पातळीवर (वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मर्जीवर ) होतात. आता यात तशी आर्थिक गणीतेही अवलंबून असतात यात शंका नाही. वरिष्ठ अधिकारी कसा, त्याच्या कारभारावर स्थानिक पातळीवरील कारभाराची दिशा ठरते. आता करप्टेड आणि नॉन करप्टेड ही विशेषणे त्यामुळे अधिकार्‍यांना लागतात,ही माझी खात्री झालीय.आता अधिकारी कितीही शिस्तीचा भोक्ता कडक असला, तरी त्याचा अवैधधंद्यावर फारसा परिणाम होत नाही. यात काही अधिकारी अपवाद आहे, हे मात्र नक्की. त्यांच्यासमोर ना पुढार्‍याची चालते ना..सत्ताधार्‍यांची, हे स्वतः नियम बनवितात, त्याची अंमलबजावणीही करतात. मात्र असे अधिकारी एका ठिकाणी फार काळ टिकत नाही. असाही माझा आजवरचा अनुभव आहे. दोनच गोष्टींमुळे अवैधधंदे वाढतात.एकतर राजकीय पुढार्‍याचे वजन अथवा पोलिसांचा अर्थपूर्ण आशिर्वाद. गत काळातील काही घटनावरुन ते समोर आलेच आहे. त्यामुळेच अवैधधंदे बंद केले, ते सुुरु करण्यासाठी दबाव, आणि सुरु झाल्यावर, कारवाई केली की, डोक्याला ताप..अशा दुहेरी मानसिकतेतून पोलीस दलाला सध्यस्थितीत जावे लागत असल्याचे चित्र आहे. आणि सर्वसामान्यांना अवैधंधंदे काय, आणि त्यावर पोलिसाीं नकली कारवाई काय, या सर्व गोष्टींची सवयच झालीय.

बेलापुर (प्रतिनिधी  )-अहमदनगर जिला जमियत उलेमा ए हिंन्द शाखा बेलापुर यांच्या वतीने पुरग्रस्त निधीसाठी गावात मदत फेरी काढण्यात आली होती. सकाळी बेलापुरातील झेंडा चौक मैदानापासुन मदत फेरीस सुरुवात करण्यात आली लाँकडाऊन काळ, कोरोना परिस्थिती, कोलमडलेला व्यवसाय या ही परिस्थितीत गावातील व्यापारी नागरीकांनी माणूसकीचे दर्शन घडवत सढळ हाताने मदत केली मौलाना मुफ्ती ईर्शादुल्लाह कासमी यांच्या मार्गदर्शनाखाली  बेलापुरचे अध्यक्ष अकबर सय्यद टिन मेकरवाले हाजी ईस्माईल शेख हाजी शकील कुरेशी ईस्माईल आतार शफीक बागवान हाजी चाँद बाबुलाल पठाण शहानवाज सय्यद शोएब शेख कय्युम मोहसीन आदि मदत फेरीत सहभागी झाले होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- शासनाच्या खावटी योजनेंतर्गत आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजुर यांच्या वतीने बेलापुर बु!!बेलापुर खुर्द वळदगाव उंबरगाव ऐनतपुर या गावातील लाभार्थ्यांना जि प सदस्य शरद नवले व प .स सदस्य अरुण पा नाईक यांच्या उपस्थितीत ९५ आदिवासी बांधवांना खावटी अनुदान वाटप करण्यात आले            कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता शासनाने आदिवासी बांधवाकरीता या वर्षी खावाटी अनुदान योजना सुरु केली आहे या योजनेंतर्गत प्रत्येक आदिवासी कुटुंबाच्या खात्यावर रोख दोन हजार रुपये तसेचएक किलो मटकी दोन किलो चवळी तिन कोलो हरबरा एक किलो वटाणा दोन किलो तूरदाळ एक किलो उडीद दाळ तीन किलो मिठ अर्धा किलो गरम मसाला एक लिटर शेंगदाणा तेल एक किलो मिरची अर्धा किलो चहा पावडर तीन किलो साखर असे अठरा किलो वस्तू व एक तेल पिशवी असे मोफत देण्यात आले तसेच लाभार्थ्याच्या खात्यावर रोख दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहे  या वेळी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे सदस्य मुस्ताक शेख रमेश अमोलीक शफीक बागवान भगवान मोरे जिना शेख दादासाहेब कुताळ मोहसीन सय्यद बाबुराव पवार दत्तू निकम सोपान निकम अनवर बागवान आदिवासी प्रकल्प विभाग राजुर येथील सुरेश कुराकुटे सुनिल गायकवाड अनिल मेढे वाल्मिक जाधव प्रशांत आचारी उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी )-गावातून एका अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळवुन नेण्याच्या घटनेला आज दहा दिवस उलटून गेले असुन अजुनही त्या मुलीचा शोध न लागल्यामुळे पालकांचा जिव टांगणीला लागला आहे                येथील मोल मजुरी करणाऱ्या कुटुंबातील एक अल्पवयीन मुलगी २३   जुलै रोजी दुपारी घरातुन निघुन गेली होती या बाबत मुलीच्या आईने मुलीला कुणीतरी अज्ञात इसमाने फुस लावुन पळवुन नेल्याची फिर्याद बेलापुर पोलीस स्टेशनला दिलेली आहे   मुलीच्या आईच्या तक्रारी  वरुन पोलीसांनी अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा राजि . नंबर I ४९३/२०२१ भा द वि कायदा कलम ३६३प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे ज्या दिवशी ही मुलगी घरातून गेली त्याच दिवशी गावातील एक तरुणही घरातून पैसे घेवुन गायब झालेला आहे पोलीस या दोघांचाही शोध घेत आहे परंतु त्यांचा कोठेही ठावठिकाणा लागलेला नाही मुलीचे नातेवाईकही सर्वत्र मुलीचा शोध घेत आहे तसेच पोलीसही आरोपीच्या मागावर आहेत लवकरच मुलीला पालकाच्या ताब्यात देवू असा विश्वास पोलीसांना आहे या बाबत पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील हे पुढील तपास करत आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget