Latest Post

राहुरी-(प्रतिनिधी मिनाष पटेकर)-दिनांक २४ जून रोजी मौजे वळण येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयोजित कृषी संजीवनी मोहीमेंतर्गत बोलताना तज्ञ कृषी पर्यवेक्षक श्री शिवाजी कोरडे म्हणाले की कापूस लागवड करताना एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. यावेळी शेतकऱ्यांना शेतीशाळा, शेतीचे नियोजन व खर्चात बचत याबाबत खेळाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. कृषी सहाय्यक चंद्रकांत म्हसे यांनी खताची बचत, सोयाबीन पिक व्यवस्थापन व शासनाच्या विविध योजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे, कृषी पर्यवेक्षक राणू आंबेकर, सहाय्यक कृषी अधिकारी भिमराज गडधे,मंगेश बनकर, आकाश गोरे, सरपंच सुरेश मकासरे, उपसरपंच एकनाथ खुळे,सदस्य अशोकराव खुळे,अशोकराव कुलट,माजी सरपंच बाबासाहेब खुळे,दत्तात्रय खुळे,ज्ञानेश्वर खुळे, युनुस शेख,सारंगधर खुळे,अर्जुन आढाव,बाळासाहेब खुळे, बाबासाहेब मकासरे, अशोक काळे, षकीरचंद फुणगे,गोविंद फुणगे उपस्थित होते. हरिभाऊ डमाळे यांनी आभार प्रदर्शन केले. किसान कृषी सेवा केंद्र यांचे विशेष सहकार्य लाभले.


राहुरी-(प्रतिनिधी मिनाष पटेकर)-दिनांक २३ जून रोजी मौजे मानोरी येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे ,कृषी पर्यवेक्षक राणू आंबेकर ,तुळशीराम पवार ,कृषी सहाय्यक चंद्रकांत म्हसे,भिमराज गडदे ,श्रीमती दुर्गा सहाने उपस्थित होते .सदर कार्यक्रमात श्री तुळशीराम पवार कृषी पर्यवेक्षक यांनी एकात्मिक पद्धतीने खत व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच भिमराज गडधे यांनी कापूस पीक लागवड तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले .तसेच चंद्रकांत म्हसे कृषी विभागाच्या विविध योजना व मका पिकावर अमेरिकन लष्करी आळी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमास बापूसाहेब चोथे, शिवाजी पोटे, गणेश चोथे ,दत्तात्रय आढाव ,सचिन साबळे, नानासाहेब आढाव ,बन्सी शेख, पंढरीनाथ चौथे ,अशोक वाघ, बापूसाहेब वाघ,अभिषेक आढाव, नितीन चोथे ,विकास वाघ, बाळासाहेब राठोड ,दत्तात्रय आढाव ,सचिन साबळे ,शिवाजी पोटे व पंचक्रोशीतील शेतकरी बांधव उपस्थित होते.


श्रीरामपूर भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने डाॅ,  शामा प्रसाद मुखर्जी यांना अभिवादन करण्यात आले 

यावेळी बोलताना भाजपा शहरअध्यक्ष मारूतीभाऊ बिंगले म्हणाले एक देशमे   दो निशान दो प्रधान दो संविधान नही चलेगे.असा त्यांचा मुल मंत्र होता. 

तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणेश  राठी यांनी सांगितले की 1951 साली भारतीय जनसंघाची स्थापना केली आज काश्मिर जो आपल्या भारतात आहे याचे सर्व श्रेय डाॅ, शामा प्रसाद मुखर्जी यांना जाते, घटनेच्या 370 या कलमास त्यांचा सक्त विरोध होता आज देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाई मोदी यांच्या कालखंडात कलम 370 रद्द करण्यात आला आहे..

यावेळी मिलींदकुमार साळवे यांनी डाॅ,  शामा प्रसाद मुखर्जी यांच्या विषयी माहिती विशद केली. 

यावेळी शहरअध्यक्ष श्रीरामपूर मारूती बिंगले जिल्हा उपाध्यक्ष गणेश  राठी, सतिश सौदागर, जिल्हा अध्यक्ष सांस्कृतिक सेल बंडुकूमार शिंदे, युवा मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस विशाल यादव उपाध्यक्ष रूपेश हरकल सचिव अक्षय नगारे, राहुल आठवल,अक्षय वर्पे, राजेंद्र कांबळे, अजित बाबेल, मिलींदकुमार साळवे, रवी पंडित, गणेश अभंग, डाॅ ललित सावज, बाळु आहिरे, विजय आखाडे, विशाल अंभोरे, संदिप रणनवरे,दत्तु देवकाते, पंकज करमासे, ललित गाडेकर, विशाल साबळे ,रोहित मिसाळ,गणेश कुर्हे, गजानन आढाव, व भारतीय जनता पार्टी च कार्यकर्ते अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.


.

बेलापूर (प्रतिनिधी  )-: जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी याची पुण्यतिथी बेलापूरात मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली  . याप्रसंगी श्यामाप्रसाद मुखर्जी च्या प्रतिमेला गावातील भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री.शरद देशपांडे व श्री.रमेश कुलथे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण केला व अभिवादन करण्यात आले. दिवंगत श्यामाप्रसाद यांनी त्यांच्या कार्यकाळात कायम काश्मीरच्या विषेश राज्याच्या संकल्पनेला व कलम ३७० ला वेळोवेळी विरोध केला याच आंदोलनात अटक झालेली असताना तुरुंगातच त्यांना वीरमरण आले ,असे शेवटपर्यंत कलम ३७० ला विरोध करणार्या या व्यक्तीमत्वाने कॉंग्रेस विरूध्द संपूर्ण विरोधी पक्षाला एकत्र आणण्याची जबाबदारी उचलून "जनसंघा"ची स्थापना करून जनसंघाचे सरकार प्रस्थापित केले. अशा धुरंधर नेत्याला म्हणावी तशी प्रसिद्धी त्या काळी मिळाली नाही. कारण श्यामाप्रसादजी हे प्रसिद्धी पासून फार दूर राहीले .मोदी सरकारने मात्र ३७० कलम रद्द करुन खर्या अर्थाने श्यामाप्रसाद मुखर्जीच्या विचारांचा मानसन्मान वृद्धिंगत केला.बेलापूर मधील या कार्यक्रमास भाजपाचे तालुका उपाध्यक्ष पुरूषोत्तम भराटे, राकेश कुंभकर्ण, सागर ढवळे,राजेंद्र राशीनकर,किशोर खरोटे,गजानन डावरे,विशाल मेहेत्रे, भुषण चंगेडे,राजेंद्र गाडेकर,प्रशांत ढवळे,सागर हुडे,योगेश सोनवणे, दादा कुताळ,सुभाष मोहिते आदि उपस्थित होते

.

श्रीरामपुर (वीशेष प्रतिनिधी  )-राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहीतीच्या अधारे छापा टाकून बनावट दारु बनविणार्या रँकेटचा पर्दाफाश केला असुन यात साडे सहा लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन  दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे                                    राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना गुप्त खबर मिळाली की  श्रीरामपुर येथील संजयनगर ईदगाह मैदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात

बनावट देशी विदेशी दारु तयार केली जात असल्याची माहीती मिळाली राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप संचालक  अंमलबजावणी व दक्षता महाराष्ट्र राज्य श्रीमती उषा वर्मा विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे गणेश पाटील अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक एस बी शेंडे एस एम सराफ उपआधिक्षक अ विभाग ऐ बी बनकर निरीक्षक ब विभाग एस के कोल्हे निरीक्षक कोपरगाव बी बी हुलगे निरीक्षक श्रीरामपुर  ऐ व्ही पाटील निरीक्षक  पी व्ही अहीरराव एम डी कोडे व्ही एम बारवकर एम एस धोका एस बी भगत जगताप के यु छत्रे कुमारी घोडे नम्रता वाघ आदिंनी आपल्या सहकार्या समवेत ईदगाह मैदान संजयनगर येथे छापा टाकला असता त्या ठिकाणी बनावट देशी व विदेशी दारु तयार केली जात असल्याचे आढळून आले या ठिकाणी बनावट दारु तयार करण्याकरीता लागणारे स्पिरीट २०० लिटर  बनावट दारु तयार करण्यासाठी लागणारे ३०लिटर विदेशी मद्य १८०मिली क्षमतेच्या ४४० बनावट ब्रँण्डच्या बाटल्या बनावट देशी मद्याच्या १८०मिलीच्या ३८४बाटल्या तसेच देशी भिंगरी व संत्रा  लेबलच्या बाटल्या बनावट देशी व विदेशी दारुची बुच नामांकिता कंपनी इम्पेरियल ब्लू व मेक्डाल न. १ विस्की राँयल स्टग कंपनीचे व भिंगरी संत्रा दारूच्या बाटल्या कृत्रीम स्वाद पदार्थ  इसेन्स व फ्लेवर बँरल ड्रम एम एच ०६ बी जी ०८५२ क्रमांकाची पिकअप वाहन असा सहा लाख एकुण पन्नास हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला असुन मोहन यशवंत काळे रा दत्तनगर राकेशकुमार केवलप्रसाद दहीया उर्फ मुन्ना राहणार ईटामा कोठार तालुका अमरपाटण जिल्हा सतना मध्य प्रदेश ह मु संगमनेर चंद्रकांत शाम पवार यांचे विरुध्द दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पवार हा फरार झालेला आहे या वेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने नागरीकांना अवाहन करण्यात आले आहै की अशा प्रकारे अवैध बनावट देशी विदेशी दारु निर्मीती खरेदी विक्री वहातुक करत असेल तर अशी माहीती राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवावी आपले नाव गुप्त ठेवले जाईल असे अवाहन करण्यात आले आहे.

राहुरी (प्रतिनिधी) २१ जून रोजी कृषी संजीवनी सप्ताहास सुरुवात झाली. यानिमित्त पिंपळाचा मळा येथे श्री दिनेश तनपुरे यांचे कापूस पिकाच्या शेतात उपस्थित शेतकऱ्यांना 10% टक्के रासायनिक खत बचतीच्या मोहिमेअंतर्गत करावयाचे उपाययोजना यामध्ये जमीन आरोग्य पत्रिका नुसार रासायनिक खतांच्या शिफारशी ,सूक्ष्म मूलद्रव्यांचा कार्यक्षम वापर ,दोन टक्के युरियाची फवारणी, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन इत्यादी विषयी मार्गदर्शन करण्यात आले .यावेळी मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे व कृषी पर्यवेक्षक राणू आंबेकर,सहाय्यक कृषी अधिकारी चंद्रकांत म्हसे,शरदराव लांबे., शेतकरी अजित तनपुरे, सुरेंद्र तनपुरे ,शुभम तनपुरे ,अशोक तनपुरे ,कृणाल तनपुरे, अविनाश ढवळे ,दिनेश तनपुरें, संकेत तनपुरे व शरद तनपुरे उपस्थित होते.सदर कृषी संजीवनी सप्ताह मंडळातील सर्व गावात २१ जून ते १ जुलै पर्यंत राबविण्यात येणार असल्याचे मंडळ  कृषी अधिकारी प्रशांत डहाळे यांनी सांगितले.

श्रीरामपूर-पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्व वाढवले आहे. त्यांचे अनुकरण करीत सर्व जगभर आज योगदीन पाळला जातो. सर्वांनी तानवमुक्त जीवनासाठी योगाचे महत्व ओळखावे. योग वाद्येचा प्रसार व्हावा आणि योगाचे महत्व सर्वसामान्य जनते पर्यंत पोहोचवावे अशी अपेक्षा भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष मारूती बिंगले यांनी व्यक्त केली.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतुन 21 जुन जागतिक योग दिवसाचे औचित्य साधून श्रीरामपूर भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील  संत गाडगे बाबा उद्यानात योग शिबीर उत्साहात पार पडले. यावेळी बिंगले बोलत होते. प्रसिद्ध योग प्रशिक्षक अनिल कुलकर्णी, उदय वाणी व महिला प्रशिक्षक सौ. कुलकर्णी व सौ. सरोदे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. योगाभ्यास हे शरीर आणि मन तंदुरुस्त  ठेवण्यासाठी प्रभावी साधन सिद्ध झाले आहे भारतीय संस्कृतीची ही महान परंपरा आता जगभरातील जवळपास 200 देशांनी स्विकारली असल्याचे अनिल कुलकर्णी म्हणाले.योग प्रशिक्षक वाणी म्हणाले, सूर्यनमस्कार व वेगवेगळ्या योगाचे महत्व पटवून सांगितले. रोगप्रतीकार शक्ती वाढवणे व मनाचे सामर्थ वाढवणे यासाठी योगसाधना उपयुक्त समजली जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय योगदिनाचे निमित्ताने कोरोना काळामधे अधिकाधिक लोकांनी योग साधना करणे आवश्यक आहे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अनिल कुलकर्णी, वाणी सर,सौ कुलकर्णी, सौ सरोदे यांचा सत्कार करण्यात आला. शिबिरास शहर अध्यक्ष श्रीरामपूर मारूती बिंगले, जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, औ. आघाडी जिल्हा अध्यक्ष सुनील चंदन, युवा मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस विशाल यादव, सांस्कृतिक सेल भाजपा जिल्हा अध्यक्ष बंडुकूमार शिंदे, उपाध्यक्ष विनोद वाघमारे, उद्धव गिरमे् अनिल ओबेरॉय, रवि पंडित, सलीम जहागीरदार, दिपक जाधव, अभिजीत कांबळे, शुभम बिंगले, यशराज शिंदे, अमोल जावरे, सचिन मरसाळे, कृष्णा आढागळे, राज गायकवाड, पटेल, आकाश बिंगले, सौ.रेखा निर्मळ, गायकवाड, पटेल, ओबेरॉय, शिंदे, नायर, देशपांडे आदी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी आंतरराष्ट्रीय योगदिन संयोजक बंडुकूमार शिंदे, सह संयोजक सुनील चंदन व विनोद वाघमारे सर यांनी परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार बिंगले यांनी मानले.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget