Latest Post

श्रीरामपुर (वीशेष प्रतिनिधी  )-राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहीतीच्या अधारे छापा टाकून बनावट दारु बनविणार्या रँकेटचा पर्दाफाश केला असुन यात साडे सहा लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन  दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे                                    राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना गुप्त खबर मिळाली की  श्रीरामपुर येथील संजयनगर ईदगाह मैदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात

बनावट देशी विदेशी दारु तयार केली जात असल्याची माहीती मिळाली राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप संचालक  अंमलबजावणी व दक्षता महाराष्ट्र राज्य श्रीमती उषा वर्मा विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे गणेश पाटील अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक एस बी शेंडे एस एम सराफ उपआधिक्षक अ विभाग ऐ बी बनकर निरीक्षक ब विभाग एस के कोल्हे निरीक्षक कोपरगाव बी बी हुलगे निरीक्षक श्रीरामपुर  ऐ व्ही पाटील निरीक्षक  पी व्ही अहीरराव एम डी कोडे व्ही एम बारवकर एम एस धोका एस बी भगत जगताप के यु छत्रे कुमारी घोडे नम्रता वाघ आदिंनी आपल्या सहकार्या समवेत ईदगाह मैदान संजयनगर येथे छापा टाकला असता त्या ठिकाणी बनावट देशी व विदेशी दारु तयार केली जात असल्याचे आढळून आले या ठिकाणी बनावट दारु तयार करण्याकरीता लागणारे स्पिरीट २०० लिटर  बनावट दारु तयार करण्यासाठी लागणारे ३०लिटर विदेशी मद्य १८०मिली क्षमतेच्या ४४० बनावट ब्रँण्डच्या बाटल्या बनावट देशी मद्याच्या १८०मिलीच्या ३८४बाटल्या तसेच देशी भिंगरी व संत्रा  लेबलच्या बाटल्या बनावट देशी व विदेशी दारुची बुच नामांकिता कंपनी इम्पेरियल ब्लू व मेक्डाल न. १ विस्की राँयल स्टग कंपनीचे व भिंगरी संत्रा दारूच्या बाटल्या कृत्रीम स्वाद पदार्थ  इसेन्स व फ्लेवर बँरल ड्रम एम एच ०६ बी जी ०८५२ क्रमांकाची पिकअप वाहन असा सहा लाख एकुण पन्नास हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला असुन मोहन यशवंत काळे रा दत्तनगर राकेशकुमार केवलप्रसाद दहीया उर्फ मुन्ना राहणार ईटामा कोठार तालुका अमरपाटण जिल्हा सतना मध्य प्रदेश ह मु संगमनेर चंद्रकांत शाम पवार यांचे विरुध्द दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पवार हा फरार झालेला आहे या वेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने नागरीकांना अवाहन करण्यात आले आहै की अशा प्रकारे अवैध बनावट देशी विदेशी दारु निर्मीती खरेदी विक्री वहातुक करत असेल तर अशी माहीती राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवावी आपले नाव गुप्त ठेवले जाईल असे अवाहन करण्यात आले आहे.

राहुरी (प्रतिनिधी) २१ जून रोजी कृषी संजीवनी सप्ताहास सुरुवात झाली. यानिमित्त पिंपळाचा मळा येथे श्री दिनेश तनपुरे यांचे कापूस पिकाच्या शेतात उपस्थित शेतकऱ्यांना 10% टक्के रासायनिक खत बचतीच्या मोहिमेअंतर्गत करावयाचे उपाययोजना यामध्ये जमीन आरोग्य पत्रिका नुसार रासायनिक खतांच्या शिफारशी ,सूक्ष्म मूलद्रव्यांचा कार्यक्षम वापर ,दोन टक्के युरियाची फवारणी, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन इत्यादी विषयी मार्गदर्शन करण्यात आले .यावेळी मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे व कृषी पर्यवेक्षक राणू आंबेकर,सहाय्यक कृषी अधिकारी चंद्रकांत म्हसे,शरदराव लांबे., शेतकरी अजित तनपुरे, सुरेंद्र तनपुरे ,शुभम तनपुरे ,अशोक तनपुरे ,कृणाल तनपुरे, अविनाश ढवळे ,दिनेश तनपुरें, संकेत तनपुरे व शरद तनपुरे उपस्थित होते.सदर कृषी संजीवनी सप्ताह मंडळातील सर्व गावात २१ जून ते १ जुलै पर्यंत राबविण्यात येणार असल्याचे मंडळ  कृषी अधिकारी प्रशांत डहाळे यांनी सांगितले.

श्रीरामपूर-पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्व वाढवले आहे. त्यांचे अनुकरण करीत सर्व जगभर आज योगदीन पाळला जातो. सर्वांनी तानवमुक्त जीवनासाठी योगाचे महत्व ओळखावे. योग वाद्येचा प्रसार व्हावा आणि योगाचे महत्व सर्वसामान्य जनते पर्यंत पोहोचवावे अशी अपेक्षा भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष मारूती बिंगले यांनी व्यक्त केली.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतुन 21 जुन जागतिक योग दिवसाचे औचित्य साधून श्रीरामपूर भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील  संत गाडगे बाबा उद्यानात योग शिबीर उत्साहात पार पडले. यावेळी बिंगले बोलत होते. प्रसिद्ध योग प्रशिक्षक अनिल कुलकर्णी, उदय वाणी व महिला प्रशिक्षक सौ. कुलकर्णी व सौ. सरोदे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. योगाभ्यास हे शरीर आणि मन तंदुरुस्त  ठेवण्यासाठी प्रभावी साधन सिद्ध झाले आहे भारतीय संस्कृतीची ही महान परंपरा आता जगभरातील जवळपास 200 देशांनी स्विकारली असल्याचे अनिल कुलकर्णी म्हणाले.योग प्रशिक्षक वाणी म्हणाले, सूर्यनमस्कार व वेगवेगळ्या योगाचे महत्व पटवून सांगितले. रोगप्रतीकार शक्ती वाढवणे व मनाचे सामर्थ वाढवणे यासाठी योगसाधना उपयुक्त समजली जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय योगदिनाचे निमित्ताने कोरोना काळामधे अधिकाधिक लोकांनी योग साधना करणे आवश्यक आहे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अनिल कुलकर्णी, वाणी सर,सौ कुलकर्णी, सौ सरोदे यांचा सत्कार करण्यात आला. शिबिरास शहर अध्यक्ष श्रीरामपूर मारूती बिंगले, जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, औ. आघाडी जिल्हा अध्यक्ष सुनील चंदन, युवा मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस विशाल यादव, सांस्कृतिक सेल भाजपा जिल्हा अध्यक्ष बंडुकूमार शिंदे, उपाध्यक्ष विनोद वाघमारे, उद्धव गिरमे् अनिल ओबेरॉय, रवि पंडित, सलीम जहागीरदार, दिपक जाधव, अभिजीत कांबळे, शुभम बिंगले, यशराज शिंदे, अमोल जावरे, सचिन मरसाळे, कृष्णा आढागळे, राज गायकवाड, पटेल, आकाश बिंगले, सौ.रेखा निर्मळ, गायकवाड, पटेल, ओबेरॉय, शिंदे, नायर, देशपांडे आदी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी आंतरराष्ट्रीय योगदिन संयोजक बंडुकूमार शिंदे, सह संयोजक सुनील चंदन व विनोद वाघमारे सर यांनी परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार बिंगले यांनी मानले.


श्रीरामपुर  (प्रतिनिधी )- पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी अवैध धंद्याबाबत तालुका व शहर पोलीस स्टेशनला कडक सुचना दिल्या असल्या तरी श्रीरामपुर  शहर व तालुक्यात अवैध धंद्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असुन वरीष्ठांचे आदेशच धाब्यावर बसविण्याचाच हा प्रकार तर नव्हे ना अशी शंका नागरीकांना येत आहे जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी लक्षात घेता या गुन्हेगारीचे मुळ हे अवैध धंदे असल्यामुळे ते बंद करण्याच्या सूचना सर्व पोलीस निरीक्षक यांना तीन ते चार दिवसांपासून प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून किंवा सूचनांच्या आधारे देण्यात आलेल्या असल्या तरी श्रीरामपुर  शहर व तालुक्यात या आदेशाचे तिन तेरा वाजलेले पहावयास मिळत आहे गुटखा अन त्या जोडीला मटका हे खूलेआम सुरु आहेत समोर एक छोटासा पडदा लावून त्या पडद्या आड सारे काही तर खुलेआम मोकळ्या रोडवर भरचौकात जोरात चालू असुन सायंकाळ झाली की वाळू तस्कर जोरात असतात वाळू भरण्यावरुन कित्येक वेळा दोन गटात हाणामार्या झालेल्या आहेत परंतु त्या आपसात मिटलेल्या आहे ती भांडणे कुणाच्या मध्यस्थीने मिटली हा संशोधनाचा विषय आहे किरकोळ भांडणाचा विषय मारामरी नंतर खूनाच्या धमकी पर्यत या तस्करांची मजल जात आहे काही व्हाईट काँलर पुढारीही आता वाळू धंद्यात उतरले आहेत त्यामुळे सर्व सामान्य नागरीकांनी तक्रार करावयाची तर कुणाकडे असा प्रश्न निर्माण होत आहे आता गुंडापेक्षा सर्व सामान्य नागरीकांनाच कायद्याची भिती वाटत आहे काही ठलरेल्या ठिकाणी तर गावठी दारुचा सतत घमघमाट दरवळत  असतो रस्त्याने जाणारांना पूर्वी नाक बंद करुन जावे लागायचे आता मास्क असल्यामुळे त्या परिसरातुन जाताना नाक बंद करावे लागत नसले तरी तरुण पिढी या दारुच्या अहारी जात आहे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी अवैध धद्याना लागाम घालण्याची वेळ आलेली आहे शहरातील व तालुक्यातील गुटखा मटका दारु गुत्ते वाळू तस्करीस पायबंद घालावा अशी मागणी नागरीकाकडून केली जात आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) राज्यतील सर्वच जिल्हा आणि तालुकास्तरावरुन मुस्लिम सामाजातील उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी महाराष्ट्रियन मुस्लिमांचे सामाजिक, राजकीय सशक्तिकारण करणे, शिक्षा आणि रोज़गारात भागीदारी मिळविणे, तसेच न्याय व अधिकार प्राप्तीकरीता संवेधानिक मार्गाने संघर्ष करणे यासाठी महाराष्ट्रीयन मुस्लिम विकास परिषद राज्यभर सक्रिय आहे, ही अराजकीय एक सामाजिक संघटना असून मुस्लिम समुदायातील उपेक्षित घटकांत जनजागृतीची मोहिम आणि चळवळीत गत १८ वर्षांपासून राज्यभर कार्यरत आहे, यामध्ये डॉक्टर, वकील, इंजिनिअर, पत्रकार, साहित्यकार विचारवंत, कर्तुत्ववान गुणवंत, सामाजिक, राजकीय, अशा विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यरत आहेत,

सामाजिक कार्यांबरोबरच या संघटनेचे रोज़गार, व्यापार, औद्योगिक क्षेत्रात देखील मोठे योगदान देण्याचे प्रयत्न आहे, औद्योगिक क्षेत्रासोबतच ट्रेडिंग, मार्केटींग, मॅन्युफेक्चरिंग आणि सेवापर्दान क्षेत्रातही ही कार्य करुन सन्मानजनक रोज़गार निर्माण करुन स्वावलंबी, स्वाभिमानी, आर्थिक सक्षम, समाज निर्माण करुन राज्यासहित देशाच्या आर्थिक प्रगतीत प्रत्यक्ष सामिल होऊन उल्लेखनीय योगदान देणे यावर संघटनेचा अधिक भर आहे,

महाराष्ट्राची राजकीय राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईत स्थापन झालेली ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे,आता भव्य,दिव्य, सक्रिय प्रभावी संगठन व्हावे याकरीता कुटुंब एॅपच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातुन एक लाख सदस्य संघटनेत सामिल करण्याचे अभियान सुरु आहे, संघटन बांधणी यासोबतच समाजाचे आर्थिक विकासाकरीता उद्योग, व्यावसाय,तथा ब्रांडेड प्रोडक्ट उत्पादित करणे आणि ऑनलाईन मार्केटींगमध्ये देखील मुस्लिम समाजाचा सहभाग असावा याकरीता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मराठाखान हे सध्या राज्यभर दौऱ्यावर आहेत,

 श्रीरामपूर (अहमदनगर) दौऱ्यानिमित्त आले असता त्यांनी समता कॉप्यूटर इन्स्टिट्यूटला भेट दिली याप्रसंगी समता फाऊंडेशनचे अध्यक्ष शौकतभाई शेख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला,यावेळी समता कॉप्यूटर इन्स्टिट्यूटचे संचालक इंजि.मोहसिन शेख,अकबर शेख,समता आरटीओ अॉनलाईन सर्व्हिसेसचे संचालक सरताज शेख,लोणी येथील सुप्रसिध्द बांधकाम व्यावसायिक फारुकभाई पठाण,तिरंगा न्यूजचे संपादक असलम बिनसाद, पत्रकार राज चौधरी,मेमन होजिअरीचे अफजल मेमन इम्रान शेख,मतीन शेख आदी.उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री.मराठाखान म्हणाले की आज सर्वच व्यावसायीकांची स्थिती फार बिकट झालेली आहे,त्याच मुस्लिम सामाज हा मोठ्या संख्येने हातावरची मोलमजुरी करणारा समाज आहे, रोजचे कमावणे आणि रोजचे खाने मात्र कोवीड संकटाच्या लॉकडाऊनमुळे उत्पन्नच  खुंटल्याने त्यांच्या व्यावसाय आणि आर्थिक बाबींची मोठी वाताहत झाली आहे,कोवीड बरोबरच व्यावसायिक आणि आर्थिक अशा तिहेरी संकटात सापडलेल्या मुस्लिम सामाजास पुनः उभारी मिळावी आणि आर्थिक धडी बसावी,रोजगारांची संधी उपलब्ध व्हावी,याकरीता

महाराष्ट्रीयन  मुस्लिम विकास परिषदेने प्रयत्नशिल असल्याचे ते म्हणाले, यावेळी छोटेखानी सत्काराच्या कार्यक्रमात पत्रकार शौकतभाई शेख यांची संघटनेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी निवड करण्यात आली,

पुढे बोलताना श्री.खान म्हणाले की,राज्यातील दुय्यम संख्येने असलेला मुस्लिम समाज हा एकजुट नसुन विखुरलेला आहे,या सामाजातील छोटे-मोठे अशा सर्वांना लघु व्यावसायाच्या माध्यमातून सर्वाना एकत्र आनणे, प्रत्येक जिल्हा,तालुका स्तरावर एखादे लघु उघोगाची निर्मिती करणे, यापासून मोठ्यांना नफा तर छोट्यांना रोजगार उपलब्ध करुन देणे असे संघटनेचे धोरण आहे,

यासोबतच सर्व जाती-धर्मांमध्ये जातिय सलोखा निर्माण व्हावा, सर्वांनी एकत्र मिळुन सामाजोन्नतीचे कार्य करावे,प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांनी एकमेकांच्या खांद्याला खादा लाऊन कामे केल्यास सर्वांचीच प्रगती होते शेवटी असेही ते म्हणाले.या छोटेखानी कार्यक्रमाचे सुत्र संचालन इंजि. मोहसिन शेख यांनी केले,तर शौकतभाई शेख यांनी आभार मानले.

बेलापुर  (प्रतिनिधी )-येथील एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबध ठेवुन वेळोवेळी बलात्कार केला तसेच मोबाईल मध्ये त्याचे चित्रीकरण केले व ते प्रसारीत करण्याची धमकी देवुन वेळोवेळी शारिरीक संबध ठेवण्यास भाग पाडले या वरुन एका जणा विरुध्द बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे                                        बेलापुर येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस रोहीत शाम भिंगारदीवे रा राजवाडा बेलापुर  याने राहत्या घरी बोलावुन प्रेम संबधाचे नाटक करुन शरीर संबध ठेवण्यास भाग पाडले तसेच त्याचे मोबाईल मध्ये चित्रीकरण करुन ते व्हायरल करण्याची धमकी देवुन डिसेंबर २०२० पासुन आजतागायत आरोपीचे राहते घरी तसेच इतर ठिकाणी वेळोवेळी अत्याचार केले या बाबतची फिर्यादीवरुन पोलीसांनी रोहीत भिंगारदीवे याचा विरुध्द भादवि कलम ३७६ ३५४ पोक्सो बाल लैंगिक अत्याचार कायदा या प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली  पी एस आय कृष्णा धायवट हे करत आहे.

श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) - जिल्ह्यात चोर्‍या, दरोडे, हत्या, गावठी दारू, मावा, गुटखा विक्री ,चंदन तस्करी, अवैध वाळू उत्खनन इत्यादी अनैतिक व्यवसायात वाढ झाल्याची दखल जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी घेतली असून अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा अन्यथा ठाण्याच्या प्रभारींना जबाबदार धरले जाईल असा  इशारा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी खूलेआम अवैध व्यवसाय सुरुच आहेत अवैध व्यवसाय बंद करण्या बाबत नागरीकांच्या तक्रारी येवून देखील काहीच ठोस कारवाई झाली नाही पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी अवैध धंदे बंद करण्या बाबत सर्व पोलीस निरीक्षक यांना सुचित केले होते तरी देखील  जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरुच राहीले काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वसुली सुरु झाली जिल्ह्यात वाळू माफीयांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे पोलीसांच्या आशिर्वादामुळे वाळू तस्कर महसुलच्या पथकांना देखील  दादा देइनासे झाले नागरीकांनी आंदोलन करुन देखील वाळू उपसा सुरुच आहे या अवैध धंद्यातूनच गुंडगीरी फोफावत चालली आहे अवैध धंद्याच्या वादातूनच मारामार्या खून होत आहेत हे वेळीच रोखणे गरजेचे आहे पारनेर मधील पॅरोलवरील आरोपीची हत्या, नेवासा तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यावर गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून हल्ला, मध्यप्रदेशातील दरोडेखोरांची कार्यरत टोळी अशा अनेक घटनांमधून पोलीस प्रशासनाबद्दलची भीती संपल्याचे संकेत मिळत आहेत. त्याची दखल जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घेतली असल्याचे दिसून येत आहे. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करा, अन्यथा मी पाठविलेल्या पथकाकडून कारवाई झाल्यास संबंधीत ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांना जबाबदार धरण्यात येईल, अशा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांना दिला आहे.अधीक्षक पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांची बैठक घेतली. यावेळी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे सर्व व्यवहार ठप्प होते. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात सर्व उद्योग-धंदे सुरू झाले आहेत. लॉकडाऊन काळात कमी अधिक प्रमाणात सुरू असलेल्या अवैध धंद्यांनी उचल खाल्ली आहे. नदीपात्रातून सर्रास वाळू उपसा सुरू आहे. याला महसूलसह पोलिसांचे पाठबळ मिळत आहे, असे आरोप होत आहे. वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी पोलिसांनी हप्ते मागितले आहे. या हप्तेखोरीतून अनेक पोलीस कर्मचार्यांवर लाचलुचपत विभागाकडून कारवाई झाली आहे. यामुळे पोलीस दलाची बदनामी होत आहे. अवैध दारू विक्री, मावा, गुटखा विक्री, चंदनतस्करी जिल्ह्यात सुरू झाली आहे. गावठी कट्ट्यांचा वापर करून गुन्हेगारीत वाढ होत आहे. या सर्व घटनांचा आढावा घेत अधीक्षक पाटील यांनी अवैध धंद्यांचा बिमोड करण्याचा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. छापेमारी करून अवैध धंद्यावर कारवाई कराव्यात, अन्यथा माझे पथकाने एखाद्या पोलीस ठाणे हद्दीत कारवाई केली आणि त्यात अवैध धंदे उघडकीस आल्यास संबंधीत प्रभारी अधिकार्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.पोलीस अधिक्षक यांनी कडक कारवाईचा पावित्रा घेतल्याशिवाय अवैध धद्यांना चाप बसणार नाही.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget