Latest Post

श्रीरामपुर/प्रतिनिधी :-  हिंदू जननायक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 53 वा वाढदिवस  सालाबाद प्रमाणे याही वर्षी 

मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपुर येथील मनसे कार्यालय येथे केक कापून व १५३ वृक्ष वाटप करून मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा करण्यात आला. 

राज ठाकरे यांचा वाढदिवस श्रीरामपूर येथील मनसे कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे मनाले की पक्षाच्या स्थापनेपासून दर वर्षी आम्ही राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष वाटपाचे कार्यक्रम करत असतो यावर्षी ५३वा वाढदिवस असल्याकारणाने १५३ झाडे वाटण्यात आले एवढी  झाडे 

वाढण्याचे कारण की कोरोना आजारामुळे अनेकांना ऑक्सिजनची कमतरता जाणवले आहे हे दिलेले झाडे आपल्या घरासमोर व आपल्या भागात काळजीपूर्वक सर्व कार्यकर्त्यांनी लावावेत जेणेकरून आपल्या या उपक्रमाची दखल घेऊन इतर नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे लावतील व झाडे झाडांचे मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यास कोणालाही ऑक्सिजनची गरज भासणार नाही हो तसेच प्रदूषण देखील कमी होईल तसेच सदैव नागरिक निरोगी राहतील झाडांमुळे मनुष्याला अनेक फायदे आहे हे आपल्या आज वाजतील नागरिकांना सर्व कार्यकर्त्यांनी समजून सांगावे व मोठ्या प्रमाणात वृक्ष रोपण करण्यास पुढाकार घ्यावी याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व  पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी फटाकड्या ची आतिषबाजी करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला त्याप्रसंगी 

जिल्हा सचिव तुषार बोबडे. उपजिल्हाध्यक्ष सुरेश जगताप. तालुकाध्यक्ष गणेश दिवसे. शहराध्यक्ष सचिन पाळंदे. विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष राहुल दातीर.विद्यार्थी सेना शहराध्यक्ष विशाल शिरसाठ. प्रसिद्धीप्रमुख स्वप्नील सोनार कामगार सेना सुपर चिटणीस नंदू गंगावणे कामगार सेना तालुकाध्यक्ष भास्कर सरोदे शेतकरी सेना तालुकाध्यक्ष गोरक्षनाथ येळे वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष करण कापसे तालुका चिटणीस विष्णू अमोलिक शहर संघटक निलेश सोनवणे शहर सचिव अमोल साबणे. तालुका उपाध्यक्ष नवनाथ बोर्डे. शिवनाथ फोपसे. शहर उपाध्यक्ष राजू शिंदे. लखन कडवे. गणेश राऊत. प्रसाद शिंदे. 

विद्यार्थी सेना तालुका सचिव विकी राऊत. विद्यार्थी सेना शहर सचिव अक्षय सूर्यवंशी. सचिन धोत्रे. रतन वर्मा. अभिमन्यू    धर्म जिज्ञासू. अतुल तारडे

प्रवीण कारली. संकेत शेलार. आकाश कापसे. प्रमोद शिंदे. नितीन पवार. चंदू गांगुर्डे. सागर इंगळे.चंद्र शिंदे. रमेश शिंदे. दशरथ शिंदे. अशोक शिंदे. बजरंग शिंदे. गौतम शिंदे. राहुल शिंदे. मारुती शिंदे. सुरेश शिंदे. आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथे विजेच्या पोलवर काम करत असताना विजेचा शाँक लागुन एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे त्यास तातडीने साखर कामगार रुग्णालयात अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे                                    या बाबत समजलेली माहीती अशी की बेलापुर येथील विजेच्या खांबावरील मेंन्टेनन्सचे काम खाजगी ठेकेदारा मार्फत करण्यात येत होते त्यांच्या मार्फत गणेश भाऊसाहेब साळुंके हा पोलवर चढुन देखभाल दुरुस्तीचे काम करत होता ज्या पोलवर काम करायचे होते त्या पोलवरील विज प्रवाह बंद करण्यात आला होता त्या पोल शेजारीच आणखी एक विजेचा सप्लाय सुरू होता बंद विज प्रवाह असलेल्या पोलवरील काम आटोपुन साळुंके हा विज प्रवाह सुरु असलेल्या शेजारच्या पोलवर चढला विजेच्या तारांना स्पर्श होताच त्यास  जोरदार शाँक बसला व तो खाली फेकला गेला   त्याच्या ओरडण्यामुळेमुळे आसपासचे नागरीक जमा झाले हवालादार अतुल लोटके उपसरपंच अभिषेक खंडागळे  महावितरणचे चेतन जाधव मधुकर औचिते यशवंत नाईक गौरव सिकची विशाल आंबेकर संतोष शेलार गणेश टाकसाळ किरण बारहाते आदिंनी जखमी अवस्थेत असलेल्या साळुंके यास तातडीने साखर कामगार हाँस्पीटल येथे दाखल केले असुन त्यास अति दक्षता विभागात ठेवण्यात आले असुन त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

(प्रतिनिधी राहुरी मिनाष पटेकर) राहुरी  कृषी मंडळात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान सन २०२१-२२ अंतर्गत पाथरे येथे शेतकऱ्यांना बांधावर बियाणे, कामगंध सापळे यांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. या अभियानात पाथरे खुर्द,टाकळीमियाँ, मोरवाडी,राहुरी, शेणवडगाव,मालुंजे खुर्द, खुडसरगाव, केंदळ बु,मांजरी, कोंढवड, वळण, मुसळवाडी गावातील ३८ लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना बांधावर बियाणे कामगंध सापळे वाटप,उगवण क्षमता चाचणी, रूंद सरीवरंबा पेरणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच खुडसरगाव येथे एक गाव एक वाण अंतर्गत युएस ७०६७ या कपाशीच्या वाणाची लागवड करण्यासाठी आवाहन करण्यात आले. यामुळे एकात्मिक कीड व रोग नियंत्रण होत असल्याचे मंडळ  कृषी अधिकारी प्रशांत डहाळे म्हणाले. यावेळी तालुका  पर्यवेक्षक तुळशीराम पवार, राणू आंबेकर,सहाय्यक कृषी अधिकारी आकाश गोरे,बिरु केसकर,चंद्रकांत म्हसे, शिवप्रसाद कोहोकडे, बाळासाहेब सूळ तसेच शेतकरी हरिभाऊ जाधव,दिपक जाधव, संभाजी टेकाळे,रामकृष्ण टेकाळे, विजय जाधव,शंकर जाधव,चित्तू पवार, चांगदेव टेकाळे, ज्ञानेश्वर अकोलकर, सुरेंद्र जाधव व अविनाश सोळुंके उपस्थित होते.



बेलापुर(वार्ताहर) समाजात सामाजिक काम करणाऱ्या सर्वांनाच अनुदानाचा लाभ दिला जातो मग  चौथा स्तंभ म्हणून  ओळखल्या जाणा-या पत्रकारांना मानधन का नको ? असा सवाल  महाराष्ट्र संपादक व पत्रकार सेवा संघाचे नूतन जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार मनोज कुमार  आगे यांनी केला आहे .      

पत्रकार मनोज आगे यांची संपादक पत्रकार सेवा संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी  म्हणून निवड झाल्याबद्दल बेलापुर व परिसरातील पत्रकारांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ  पत्रकार अशोक गाडेकर  होते. तर प्रमुख आतिथी म्हणून नरेंद्र लचके,जेष्ठ पत्रकार मारुती राशिनकर  तसेच बाजार समिती संचालक सुधीर नवले उपस्थित  होते.


 सत्काराला उत्तर देताना आगे पुढे म्हणाले की,खासदार -आमदार लोकांसाठी काम करतात पोलीस अधिकारी विविध खात्यातील सरकारी कर्मचारी जनतेसाठी काम करतात त्यांना पगार मिळतो, मानधन मिळते मग पत्रकारही सतत जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळेची,आपल्या जिवाची पर्वा न करता लढत असतात. यंत्रणेतील दोष जनतेसमोर आणण्याची ताकद फक्त पत्रकारातच आहे.  हे त्रिवार सत्य असतानाही सर्वांना सेवानिवृत्ती वेतन मिळते विविध क्षेत्रातील लोकांना अनुदान मिळते मग जनतेसाठी काम करणाऱ्या पत्रकार अनुदान मिळण्यापासून वंचित का ?असा सवाल करुन आपल्याला मिळालेल्या पदाचा उपयोग पत्रकारांच्या हितासाठी करणार असल्याची ग्वाही त्यांनी  दिली.  जिल्ह्यातील ज्येष्ठ व ज्या पत्रकारांनी सतत पंधरा वर्षे पत्रकारिता केली अशा पत्रकारांना संघटनेच्या माध्यमातून सरकारी पातळीवर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. अधिस्विकृती   कार्ड मिळविण्यासाठी अनेक पत्रकारांनी प्रयत्न केले मात्र  किचकट नियमांमुळे  शासनाचे पत्रकारितेचे कार्ड काही ठराविक पत्रकार वगळता कुणालाही मिळाले मिळू शकले नाही  ग्रामीण भागातील पत्रकारांनाही यासाठी संघटनेच्या माध्यमातून राज्याध्यक्ष किसनभाऊ  हासे याच्या नेतृत्वाखाली न्याय मिळवून देवू असेही आगे म्हणाले .

यावेळी बेलापूर पंचक्रोशीतील पत्रकार व बाजार समिती , व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने  आगे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी  देविदास देसाई, प्रा. ज्ञानेश गवले ,नरेद्र लचके ,नवनाथ कुताळ बाजारा समितीचे संचालक सुधीर नवले  ,दिपक क्षत्रिय, आदिंनी मनोगत व्यक्त केले.

 अध्यक्षीय भाषणात बोलताना अशोक गाडेकर यांनी सत्कारमूर्ती मनोज आगे यांच्या पत्रकारितेतील वाटचालीची माहिती दिली. तसेच ग्रामीण भागांतून त्यांना संधी मिळाली याबद्दल कौतुक केले.त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील समस्यांची जाणीव असल्याने त्या सोडविण्यासाठी ते  प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षाही व्यक्त केली.  यावेळी सुनील नवले, दिलीप दायमा ,सुहास शेलार , बाबा शेख, किशोर कदम, दीपक क्षत्रीय, गोविंद साळुंके, अशोक शेलार, शरद थोरात ,अभिजित रांका, अतिश देसर्डा  उपस्थित होते.


श्रीरामपूर प्रतिनिधी- शर्टच्या वरच्या खिशात डावीकडे मोबाईल ठेवल्याने तो ह्रदयाजवळ असतो तथा ह्रदयाचे ठोके देखील वाढवतो, म्हणून वरच्या खिशात मोबाईल ठेऊ नये असे सांगितले जाते आणि ते सत्यही आहे, आणि पॅंटच्या खिशात मोबाईल ठेवल्यास पडून जाने अथवा फुटतुट होत आडचणीचे ठरते मग इतरत्र कोठे मोबाईल ठेवणार ?

यावर जालिम उपाय शोधला आहे तो श्रीरामपूर येथील सुप्रसिध्द अब्बु बॅग प्रोडक्शनचे


संचालक कलिमभाई बिनसाद यांनी,आपल्या दंडावर मोबाईल ठेवण्याची त्यांनी अनोखी शक्कल लढविली आहे आणि ती खुपच फायदेदायी देखील आहे, सध्या पावसाळ्याचे दिवस जवळ आले आहेत आणि मोबाईल अत्यावश्यक सेवा म्हणून आपण वापरत असाल तर या पावसात आपल्या मोबाईलचा रक्षण देखील होणार आहे याकरिता अबू बॅग प्रोडक्शन मध्ये वार्ड नंबर 3 सैलानी बाबा दर्गा शेजारी उपलब्ध होतील मोबाईल नंबर 9579499909 आता त्यांचा हा अनोखा उपक्रम बघुन चित्रपटात देखील अशाच प्रकारचे दंडावर मोबाईल ठेवण्याचे उपक्रम बघावयास मिळाल्यास नवल वाटनार नाही.

श्रीरामपुर प्रतिनिधी: राज्यभर गाजलेल्या गौतम हिरण हत्याकांड प्रकरणातील पाच आरोपींविरुद्ध सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा Dy.s.p  संदीप मिटके यांनी आज रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

      संपूर्ण राज्याचे लक्ष लागून  असलेल्या तसेच पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरलेल्या गौतम हिरण हत्याकांड प्रकरण प्रथमतः श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला.अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनांक 07/03/2021 रोजी गौतम हिरण यांचा मृतदेह सापडल्यामुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केल्यामुळे सदर गुन्ह्याचा तपास हा लक्षवेधी ठरणार होता. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक तसेच नगर  जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री मनोज पाटील सो  यांनी घटनास्थळाला भेट दिली तसेच घटनेचे गांभीर्य ओळखून पुढील तपास श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांचेकडे वर्ग करण्यात आला होता त्यानंतर यातील पाच मुख्य आरोपींना अटक करून आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी व गुन्हा केल्यानंतर त्यांच्या विविध ठिकाणच्या हालचालींचे सीसीटीव्ही फुटेज तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली ओमिनि कार , पल्सर मोटरसायकल, हत्यार तपास कामी जप्त करण्यात आले. तपासादरम्यान एकूण 25 साक्षीदार तपासण्यात आले व एकूण 505 पानाचे सबळ पुराव्यासह आरोपी

 1) अजय राजू चव्हाण वय 26 वर्ष

2) नवनाथ धोंडू निकम वय 23 वर्ष 3)आकाश प्रकाश खाडे वय 22 वर्ष 4)संदीप मुरलीधर  हiडे वय 26 वर्ष 5) जुनेद/जावेद बाबू शेख वय 25 वर्ष यांचे विरुद्ध  Dy.s.p. संदीप मिटके यांनी आज न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

*असा रचला कट*

दि.27/02/2021 रोजी ढग्याचा डोंगर ता सिन्नर येथे सदर गुन्ह्यातील  आरोपींनी एकत्र येऊन मयत गौतम झुंबरलाल  हिरण यांचे अपहरण करून त्यांना जिवे ठार मारून त्यांचे जवळील रोख रक्कम जबरीने चोरून घेऊन त्यांचे प्रेताची विल्हेवाट लावणेबाबत फौजदारी पात्र गुन्ह्याचा कट रचला होता.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- शेळीला उचलुन नेताना शेळीसह विहीरीत पडलेल्या बिबट्याला वन अधिकाऱ्यांनी रात्री दिड वाजता विहीरीतुन सुखरुप बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले.बेलापुर खूर्द येथील शेतकरी रमेश निवृत्ती भगत यांच्या घरासमोर बांधलेल्या शेळीवर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने झडप घालुन शेळीला उचलून नेण्याच्या नादात विहीरीचा अंदाज न आल्याने शेळीसह बिबट्या विहीरीत पडला ही बाब भगत व त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी आरडा ओरड केली आसपासचे लोक जमा झाले रात्रीच्या अंधारात विहीरीत बाज सोडून शेळीला बाहेर काढण्यात आले त्या नंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले कोपरगावचे वनपाल भाऊसाहेब गाढे विकास पवार गोरख सुरासे सुर्यकांत लांडे हे रात्रीच घटनास्थळी पोहोचले सकाळी बिबट्याला बाहेर काढताना गर्दी जमा होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांनी रात्रीच बिबट्याला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला रात्री एक वाजता त्यांनी विहीरीत बाज सोडली त्या बाजेवर बिबट्या बसला नंतर काही वेळाने पिंजरा सोडून बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करुन अज्ञात स्थळी हलविले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget