Latest Post

मुंबई : राज्यामध्ये सोमवार (दि.७) पासून अनलॉक प्रक्रियेस प्रारंभ होणार आहे. कोरोना पॉझिटिव्हीटी रेटनुसार पाच टप्प्यांमध्ये अनलॉक प्रक्रिया होणार आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.अनलॉक करत असताना 5 स्तर तयार करण्यात आले आहेत. पहिल्या स्तरात 18 जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या स्तरात 5 जिल्ह्यांचा समावेश आहे. तिसऱ्या स्तरात 18 जिल्ह्यांचा समावेश आहे तर चौथ्या स्तरांमध्ये फक्त दोन जिल्ह्याचा समावेश आहे. सध्या पाचव्या स्तरात एक ही जिल्हा नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढली तर पाचव्या स्तरात त्या जिल्ह्याचा समावेश केला जाईल. 

टप्पा - 1

औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्याचा समावेश असेल. या 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात आलेला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये सर्व सेवा सुरळीत राहणार आहेत.

👉टप्पा - 2

अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई शहर आणि उपनगर, नंदुरबार, या जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या स्तरामध्ये मुंबईचा समावेश होतोय. त्यामुळे मुंबईसह इतर पाच जिल्ह्यात खालील नियम लागू राहतीलमुंबईसह या पाच जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता लोकल सेवा बंद राहील.

📥 50 टक्के क्षमतेने रेस्टॉरंट सुरू राहतील.

📥 मॉल्स आणि सिनेमगृह 50 टक्के सुरू राहतील.

📥 सार्वजनिक जागा , मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्ण सुरू राहतील.

📥 बांधकाम क्षेत्रातील पूर्ण कामे सुरू राहतील.

📥 कृषी क्षेत्रातील कामे पूर्ण सुरू राहतील.

📥 ई सेवा पूर्ण सुरू राहील.

📥 जिम, सलून, स्पा,वेलनेस सेंटर 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.

📥 बसेस बैठक क्षमता पूर्ण क्षमतेने सुरू राहतील.

📥 जिल्हयाच्या बाहेर खाजगी वाहन , बसेस, इतर राज्यात जाणारी लोकल सेवा, टॅक्सी यांना परवानगी आहे. मात्र पाचव्या स्तरातील जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची आवश्यकता असेल.

👉टप्पा - 3

अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, या जिल्ह्यांचा समावेश आहे.

📥 अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहतील अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार बंद राहतील. 

📥 मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद राहतील. 

📥 हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत खुली रहातील. दुपारी 2 नंतर पार्सल सेवा सुरू राहिल. शनिवार आणि रविवार बंद राहतील.

📥 सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 यावेळेत सुरू रहातील. 

📥 खाजगी आणि सरकारी कार्यालयात 50 टक्के क्षमतेने उपस्थिती राहील.

📥 इंडोर खेळले जाणारे स्पोर्ट्स बंद राहतील.

📥 सिनेमा चित्रीकरणाला स्टुडीओ मध्ये परवानगी असेल.

📥 सामाजित, सांस्कृती, मनोरंजनात्म कार्यक्रमाला 50 टक्के क्षमतेने दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील (सोमवार ते शुक्रवार).

📥लग्न सोहळे 50 जणांची उपस्थिती, अंत्यसंस्कार 20 जणांची उपस्थिती, इतर बैठका 50 टक्के उपस्थित राहील.

📥 कृषी क्षेत्रातील कामांना आणि ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील.

📥 दुपारी 2 वाजल्यानंतर जमावबंदी कायम राहिल.

👉टप्पा - 4

पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्याचा समावेश आहे.

📥अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) उघडी राहतील.

📥अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं पुर्ण वेळ बंद रहातील.

📥 सिनेमागृह, मॉल पूर्णपणे बंद राहतील.

📥 हॉटेलमधील फक्त पार्सल सेवा सुरू राहील.

📥 सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 सुरू रहातील (सोमवार ते शुक्रवार).

📥अत्यावश्यक सेवेतील खाजगी कार्यालयात फक्त 25 टक्के उपस्थिती राहील.

📥 शासकीय कार्यालयात 25 टक्के उपस्थिती.

📥 स्पोर्टसमध्ये आईटडोर सकाळी 5 ते 9 (सोमवार ते शुक्रवार) सुरु राहतील.

📥 कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमालाल परवानगी नाही .

📥 लग्न सोहळ्यासाठी 25 लोकांची उपस्थिती, अंत्यसंस्कारसाठी फक्त 20 लोकांची उपस्थिती बंधनकारक.

📥 राजकीय किंवा इतर बैठका 50 टक्के क्षमता राहील.

📥 ज्या ठिकाणी कामगारांच्या रहाण्याची सोय आहे अश्याच ठिकानाची बांधकामं सुरू रहातील.

📥 कृषी कामे दुपारी 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) सुरू राहतील.

📥 ई कॉर्मस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील.

📥सलून आणि जीम 50 टक्के क्षमता सुरू राहील पण एसीचा वापर करता येणार नाही.

📥 बसेस 50 टक्के क्षमतेने सुरु राहील. उभे प्रवासी नाही.

📥संचारबंदीचे नियम लागू राहतील.

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.संजय सानप यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम औदयोगिक वसाहत परीसरात हातात धारधार तलवार घेवुन फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने पोलीस सदर इसमाचा शोध घेण्यासाठी औदयोगिक वसाहत परीसरात गेले असता सदर ठिकाणी एक इसम समोरुन हातात तलवार घेवुन येतांना दिसला त्यावेळी त्याला थांबण्याचा इशारा केला असता तो पळुन जावु लागला त्यावेळी पोलीसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला शिताफिने पकडले. व त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव दिपक बबन जाधव रा. सुभाष कॉलनी वार्ड नं.६ श्रीरामपूर असे सांगीतले.पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता त्याचे कब्जात एक धारधार तलवार मिळुन आली त्यावरुन श्रीरामपूर शहर पोस्टेला पोकॉ/२२१० पंकज विजय गोसावी यांचे फिर्यादीवरुन गुन्हा रजि नं. ॥ ३४४/२०२१ भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदरचा आरोपी हा सराईत असुन त्याचेवर खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

१) श्रीरामपूर शहर पोस्टे गु.रजि.नं. १ ६३/२०१५ भादवि कलम ३७९,४११,३४ प्रमाणे.२) श्रीरामपूर शहर पोस्टे गु.रजि.नं. १ २७६/२०१३ भादवि कलम ४६१,३८० प्रमाणे.३) राहुरी पोस्टे गु.रजि.नं. १ २८२/२०१९ भादवि कलम ३९९,४०२ प्रमाणे,४) श्रीरामपूर शहर पोस्टे गु.रजि.नं. १ २११६/२०२० भादवि कलम ३९२,३४ प्रमाणे.५) श्रीरामपूर शहर पोस्टे गु.रजि.नं. ॥ ५९/२०१७ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ प्रमाणे.६) श्रीरामपूर शहर पोस्टे गु.रजि.नं. ॥ ८०/२०१७ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ प्रमाणे.७) श्रीरामपूर शहर पोस्टे गु.रजि.नं. ॥ ३२६/२०१८ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ प्रमाणे.८) श्रीरामपूर शहर पोस्टे गु.रजि.नं. ॥ ८२/२०१९ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ प्रमाणे.सदरची कारवाई श्री.मनोज पाटील सो.पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्रीमती दिपाली काळे मॅडम अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, श्री. संदीप मिटके सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर,श्री. पोनि संजय सानप पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोस्टे, यांचे मार्गदर्शनाखाली पोहकॉ/साळवी, पोना/ कोरडे, पोना/करमल, पोकॉ/पंकज गोसावी, पोकॉ/महेंद्र पवार, पोकॉ/ सुनिल दिघे, पोकॉ/किशोर जाधव, पोकॉ/राहुल नरवडे, तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोना/फुरकान शेख यांचे पथकाने केली.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- येथील मराठी शाळेत सुरु असलेल्या कोवीड केअर सेंटरमुळे रुग्णांना फार मोठा दिलासा मिळाला असल्याचे मत उपविभागीय पोलीस अधिकारी सांदीप मिटके यांनी व्यक्त केले आहे                              बेलापुर येथील कोवीड सेंटरला उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी भेट दिली त्या वेळी जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे डाँक्टर देविदास चोखर यांनी गावात सुरु असलेल्या मोफत कोवीड सेंटरची सविस्तर माहीती दिली या कोवीड सेंटरमधुन सर्व रुग्ण ठणठणीत बरे होवुन घरी गेले असल्याची माहीती शरद नवले यांनी दिली तसेच गावातील अनेक दानशुर व्यक्तींनी या कोवीड सेंटरला सढळ हाताने मदत केल्यामुळेच हे मोफत कोवीड सेंटर चालवीणे शक्य झाले असल्याचे सरपंच महेंद्र साळवी यांनी सांगितले तर अजय डाकले अकबर टिन मेकरवाले  गागरे यांनी रुग्णासाठी जेवाण सकस आहार अंडी हळदीचे दुध दिले असल्याचे उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सांगितले या वेळी रुग्णांना देण्यात येणारी औषधे व ईतर सुविधांची माहीती डाँक्टर देविदास चोखर यांनी दिली या वेळी रणजीत श्रीगोड  अजय डाकले मुस्ताक शेख  हाजी ईस्माईल पोलीस नाईक गणेश भिंगारदे  साहेबराव वाबळे पोलीस पाटील अशोक प्रधान महेश ओहोळ आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर ते पुणे ही बससेवा उद्या दिनांक ४ जुन पासुन सुरु होत असुन या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे अवाहन प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड यांनी केले आहे. कोरोनाचा प्रसार होवु नये म्हणून शासनाने लाँकडाऊन घोषीत केला अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कामकाजावर बंदी आणली या जिल्ह्यातील प्रवासी त्या जिल्ह्यात जावून कोरोनाचा प्रसार करु नये म्हणून प्रवासी  बस वहातुक बंद केली त्यामुळे नोकरी निमित्त दुसऱ्या जिल्ह्यात जाणारांची मोठी गैरसोय झाली याचा फायदा खाजगी वहातुक करणाऱ्या वाहन धारकांनी घेतला अन प्रवाशांची लुटच सुरु झाली श्रीरामपुर ते पुणे हे भाडे आडीचशे रुपये असताना वाहन धारक अडवणूक करुन तिप्पट आकाराणी करु लागले ज्यांना जाणे गरजेचे होते त्यांनी ते ही सहन केले अखेर श्रीरामपुर बस डेपोने उद्यापासुन  श्रीरामपुर पुणे बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहीतीआगार प्रमुख राकेश शिवदे यांनी दिली असुन या निर्णयाचे प्रवासी संघटनेने स्वागत केले असुन सकाळी सात वाजता श्रीरामपुर  पुणे ही बसा सुरु होणार असुन प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन
श्रीगोड यांनी केले आहे

बेलापूर (प्रतिनिधी )- जिल्हा परिषद सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या पाठपुराव्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने बंद करण्यात आलेला रस्ता पूर्ववत सुरु करण्यास परवानगी दिली असुन मान्यवरांच्या उपस्थितीत ही भिंत तोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे          काही दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने नाव घाटाकडे जाणारा रस्ता बंद करुन त्या ठिकाणी भिंत घातली होती त्या वेळी तत्कालीन  पदाधिकार्यांनी विरोध करणे गरजेचे होते तसे न झाल्यामुळे शेकडो वर्षाची परंपरा असणारा वहीवाटीचा रस्ता बांधकाम विभागाच्या आडमुठेपणामुळे बंद करण्यात आला होता हा रस्ता बंद झाल्यामुळे बेलापुर गावातील बाजारपेठ ओस पडली होती त्यामुळे नुकत्याच झालेल्या निवडणूकीत गावकरी मंडळाने ही भिंत पाडून रस्ता पूर्ववत सुरु करण्याचे अश्वासन व्यापारी वर्गाला दिले होते . त्या अश्वासनाच्या पूर्तीसाठी जि प सदस्य शरद नवले यांनी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या कडे पाठपुरावा केला ग्रामस्थांची मागणी योग्य असल्यामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला या प्रकरणी योग्य तो मार्ग काढण्याची सुचना केली त्यानुसार बांधकाम विभागाने त्या ठिकाणी गेट बसविण्याच्या अटीवर रस्ता खुला करण्यास परवानगी दिली.त्यामुळे हा रस्ता खुला होणार असल्यामुळे व्यापारी बंधूंनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच गावकरी मंडळाने निवडणूकित गावकऱ्यांना दिलेल्या अश्वासनाची वचनपूर्ती केली असल्याने नागरिकांनीगावकरी मंडळाला धन्यवाद दिले आहेत. यावेळी गावकरी मंडळाचे नेते सुनील मुथा,जि प सदस्य  शरद नवले,प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड,सरपंच महेंद्र साळवी,उपसरपंच अभिषेक खंडागळे,अजय डाकले, भास्कर बंगाळ,अशोक गवते,भाजपाचे प्रफुल्ल डावरे, पुरुषोत्तम भराटे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लड्डा,किराणा मर्चंडचे अध्यक्ष शांतीलाल हिरण,यादव काळे,सचिन कोठारी  प्रवीण लुक्कड,मुस्ताक शेख, रमेश अमोलिक,प्रभात कु-हे,गणेश बंगाळ,

मोहसीन सय्यद, रमेश काळे, अकबर सय्यद, शफिक आतार,  दिपक क्षत्रिय,अनिल गाढे, रफिक शेख,सुमित बोरुडे, मनीष मुथा, सचिन अमोलिक, नितीन शर्मा,अक्षय दहिवाळ,विशाल आंबेकर,महेश कु-हे,दिलीप अमोलिक,सोमनाथ जावरे, जाकिर हसन शेख, शैलेश राठी, विलास कु-हे, शाहरुख आतार आदी उपस्थित होते.

अहमदनगर : दरोड्याच्या गुन्ह्यातील सहा वर्षापासून फरार असणा-या आरोपीसह वांबोरी घाटात वाहन चालकांना अडवून लुटमार करणारे आरोपी  पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्थानिक गुन्हे शाखेकडून सांगितले जात आहे. सुरेश रणजित निकम, सतिष अरुण बर्डे, सागर शिवाजी जाधव या तिघांना पकडण्यात आले आहे.यापूर्वीच विकास बाळू हनवत, करण नवनाथ शेलार व एक अल्पवयीन साथीदार यांना ताब्यात घेण्यात आले आहेत.याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. २३ एप्रिल रोजी मित्रासह गोरक्षानाथ गड, मांजरसुंबा येथे त्यांची ( एमएच१६ सीबी ३३२८) या दुचाकीवरुन वांबोरीफाटा मार्गे जात असतांना गोरक्षनाथ गडाच्या चढावर दुचाकीचा वेग कमी झाला. त्यावेळी घजालानी यांच्या समोरुन दोन व पाठीमागुन दोन असे एकूण ४ अज्ञात इसम दोन दुचाकीवरुन त्यांच्याजवळ येऊन त्याच्या मित्रास मारहाण करुन घजालानी  व त्याचा मित्राजवळील ३ मोबाईल व सोने चांदीचे दागिणे असा एकूण १ कोटी १६ लाख ५ हजार रु. किमतीचा ऐवज बळजबरीने चोरुन नेला होता. या घटनेबाबत  एमआयडीसी पोलीस ठाण्यात रितीक प्रेमचंद छजलानी (वय २० वर्ष रा. पंचशीलनगर, भिंगार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं. २५४/२०२१ भादवि कलम ३९४, ३४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यापूर्वी आरोपी  विकास हनवत, करण शेलार व एक अल्पवयीन साथीदार यांना ताब्यात घेवून एमआयडीसी पो.स्टे. ला हजर केलेले आहे.सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुरेश निकम हा फरार झालेला होता. या फरार आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके यांच्या पथकाच्या मदतीने शोध घेत असताना श्री कटके यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली, आरोपी सुरेश निकम हा कात्रड येथे त्याचे घरी आला आहे. त्यानुसार श्री कटके यांनी त्यांच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला सूचना दिल्या. पथकाने आरोपी रहात असलेल्या परिसरात सापळा लावला असता सदर आरोपीस पोलीस आल्याची चाहूल लागल्याने तो पळून जावू लागला. त्यावेळी पथकातील पोलीसानी आरोपीचा पाठलाग करुन आरोपी  सुरेश रणजित निकम यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन सदरच्या गुन्ह्याबाबत विचारपूस केली. यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यास अधिक विश्वसात घेऊन कसून व सखोल चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा यापूर्वी अटक करण्यात आलेले साथीदार तसेच सतिष बर्डे व सागर जाधव अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिली. त्यावरुन पथकाने आरोपींचा शोध घेऊन आरोपी   सतिष अरुण बर्डे, सागर शिवाजी जाधव यांना ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर केले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई  गणेश इंगळे, पोहेकाॅ  दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, पोना  सुनिल चव्हाण, शंकर चौधरी, संदीप पवार, दिनेश मोरे, दिपक शिंदे, पोकॉ मच्छिन्द्र बर्डे, रविन्द्र घुंगासे, संदीप दरंदले, योगेश सातपूते, जालिंदर माने आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्याचे विरुध्द यापुर्वी दरोडा, जबरी चोरी या सारखे खालील प्रमाणे गुन्हे दाखल असून सदर गुन्ह्यात अद्याप पावेतो फरार आहे.आरोपी सुरेश रणजित निकम याचे विरुध्द गुन्हे दाखल  असून एमआयडीसी पो.स्टे. गुरनं. २१०/२०१५ भादवि कलम ३४१, ३९४, ३९५, ३९७ (फरार) २१५/२०१५ भादवि कलम ३९४, ३९५, ३९७ (फरार),एमआयडीसी पो.स्टे.  एमआयडीसी पो.स्टे.  सोनई पो.स्टे. गुरनं. येथे दाखल आहे.आरोपी सतिष अरुण बर्डे याचे विरुध्द एमआयडीसी पो.स्टे..,राहूरी पो.स्टे. येथे विविध प्रकारचे गुन्हा दखल आहे.आरोपी सागर शिवाजी जाधव याचे विरुध्द दाखल गुन्हे एमआयडीसी पो.स्टे. ,एमआयडीसी पो.स्टे. गुरनं.,पारनेर पो.स्टे. गुरनं.  राहूरी पो.स्टे. गुन्हा दाखल केले आहे.

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )- शासकीय पातळीवरुन १ तारखेपर्यत लाँकडाऊनची घोषणा केल्यामुळे १ जुनला नागरीकांनी खुलेआम फिरण्यास सुरुवात केली असुन आपल्याकडे पाँजिटीव्ह रुग्णांची संख्या पहाता लाँकडाऊन सुरुच असुन नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडू नका असे अवाहन पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी केले आहे.एक जुन उजाडताच व्यापार्यांनी लाँकडाऊन शिथील झाला या अविर्भावात व्यवहार सुरु केले तसेच नागरीकही विनाकारण बाहेर पडू लागले आहेत मात्र

आपल्या जिल्ह्यात असलेली पाँजिटीव्ह रुग्णांची संख्या पहाता आपल्या जिल्ह्यात तालुक्यात लाँकडाऊनच्या नियमात शिथीलता आलेली नाही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून आपल्या सर्वांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे विनाकारण घराबाहेर पडू नका मास्क व सँनिटायझरचा वापर करा असे अवाहन पोलीस निरीक्षक सांजय सानप यांनी केले असुन नियमाचे पालन न करणारावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा ईशाराही सानप यांनी दिला आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget