Latest Post


बेलापुर  (देविदास देसाई  )-गौतम हिरण यांच्या अपहरण व खुन या गुन्ह्यात दोन आरोपी निष्पन्न झाले असुन सायंकाळ पर्यत त्यांना अटक करण्यात येईल असे ठोस अश्वासन जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी दिल्यानंतर हिरण परिवाराने मृतदेह ताब्यात घेवुन त्याचेवर बेलापुर येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

बेलापुर येथील व्यापारी गौतम हिरण यांचा मृतदेह मिळाल्यानंतर व्यापारी वर्गात एक भितीचे वातावरण तयार झाले होते गौतम हिरण याचे अपहरण होवुन आठ दिवस झाले तरी पोलीसांना आरोपी सापडत नव्हते गौतम याच मृतदेह सापडल्या नंतर पोलीस सक्रिय झाले माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील  दोनदा विधानसभेत प्रश्न उपस्थित केला बेलापुर ग्रामस्थांचा वाढता दबाव व विधान सभेत तारांकीत प्रश्न उपस्थित केल्यामुळे पोलीस सक्रिय झाले संशयातुन पोलीसांनी काही आरोपींना ताब्यात घेतले या दरम्यान औरंगाबाद येथुन शवाविच्छेदन करुन आल्यानंतर मृतदेह हिरण यांच्या श्रीरामपुर येथील निवासस्थानी आणण्यात आला तेथे हिरण परिवार व ग्रामस्थ यांनी तो ताब्यात घेण्यास नकार दिला खरे गुन्हेगार शोधुन त्यांना अटक करा आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका सर्वांनी घेतली होती या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी दोन आरोपी तपासात निष्पन्न झाले असल्याचे सांगितले ग्रामस्थ व हिरण परिवाराने आगोदर गुन्हा दाखल करा अशी भूमिका घेतली अखेर सुनिल मुथा यांचेशी पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी चर्चा केली या वेळी  दोन आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी हिरण कुटुंबीय व नातेवाईक बेलापुर ग्रामस्थ यांना सांगितले हिरण परिवार व बेलापुर ग्रामस्थ यांनी अखेर मृतदेह ताब्यात न घेण्याचे आंदोलन मागे घेतले व गौतम हिरण यांच्या मृतदेहावर बेलापुर येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले या वेळी मोठा जनसमुदाय जमला होता.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापूर खुर्द येथील संजय लोखंडे यांचेवर प्नराणघातक हल्ला करणार्या  बिबटयास जेरबंद करण्यात वान विभागाला  अखेर यश आले असुन या परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे              

   गेल्या 2, 3 महिन्यापासून  बिबटयाने परिसरात असणारे 

निरज प्रमोद पुजारी,आशिष पुजारी , शांताबाई जाधव,  यांच्यावर जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले होते. दोनच दिवासापूर्वी संजय लोखंडे हे मोटार सायकल वरुन घरी जात असताना याच बिबट्याने त्यांचेवर झेप घेवुन त्यांचे डोके जाबड्यात धरुन त्यांना खाली पाडले होते व शेजारील शेतात ओढत नेले सुदैवाने त्याची पकड सुटली बिबट्याने पुन्हा झेप घेतली असता संजय यांच्या हातात दगड आला तोच दगड त्यांनी झेप घेतलेल्या बिबट्याच्या जबड्यावर सारी ताकद एकवटुन मारला त्यामुळे बिबट्या गुरगुरत जागेवरच बसला संजय लोखंडे हळूहळू उभे राहत मागे सरकर सरकत गाडी जवळ आले त्या वेळी बिबट्याने पुन्हा दुसर्यांदा हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्या वेळी हातातील  दगड त्याने बिबट्याच्या दिशेने भिरकावला व आरडा ओरड सुरु केली त्यामुळे बिबट्या मागे सरकला तोच लोखंडे यांनी जिवाच्या आकांताने पळ काढला एक किलोमिटर पळत ते एका वस्तीवर पोहोचले दैव बलवत्तर म्हणून ते वाचले या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी  

    वन विभागाला  या भागात पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली होती  शिरसगाव येथून पिंजरा  आणण्यासाठी  बालू पुजारी ,धनंजय पुजारी,सूर्यकांत लांडे साहेब, गोररक्षनाथ सुराशे साहेब यांच्या सहकार्याने  अजितराव देशमुख यांच्या  गट नं २५८ मधील शेतात पिंजरा लावण्यात आला होता. आज पहाटे बिबटया अलगत पिंजऱ्यात अडकला व त्याने डरकाळ्या फोडण्यास सुरवात केली. या आवाजाने परिसरात लोकांनी पिंजऱ्या कडे धाव घेऊन बघितले असता त्यात बिबट्या जेरबंद झाल्याचे दिसतात बघ्यांची एकच गर्दी उसळली होती 

याकामी बेलापूर खुर्द चे उपसरपंच ऍड. दीपकराव  बाराहाते, ग्रामपंचायत सदस्यां प्रणालीताई भगत, राहुल भगत, ग्रा. स.दिलीप भगत , विनय भगत, प्रल्हाद पुजारी,निरज पुजारी,सत्यजीत देशमुख, धनंजय पुजारी, बालू पुजारी,अमोल पुजारी, मनोज पुजारी,बाळू पुजारी, रामेश पुजारी, सुरेश भगत, सुरेश पुजारी, मनोज पुजारी, मा. उपसरपंच शरद पुजारी, शशीकांत पुजारी, गणेश पुजारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


बेलापुर  (देविदास देसाई )-  येथील व्यापारी गौतम हिरण यांची हत्या करण्यात आली असुन त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत वाकडी शिवारात रुळाच्या कडेला आढळून आल्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे     

बेलापुर येथील व्यापारी गौतम हिरण याचे सोमवार १ मार्च रोजी सायंकाळी अपहरण करण्यात आले होते त्या नंतर बेलापुर ग्रामस्थांनी बैठक घेवुन गाव बंद ठेवुन गौतम हिरण यांची माहीती देणारास एक लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते त्याच बरोबर घटनेच्या निषेधार्थ शनिवारी गाव बंद ठेवुन सोमवार पासुन बेमुदत गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता याचा दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात पोलीसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उठविले होते त्यामुळे गौतम हिरण यांचा युध्द पातळीवर शोधा सुरु झाला होता  अखेर आज रविवार दिनांक  ७ मार्च रोजी सकाळी गौतम हिरण यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत रेल्वे रुळाच्या कडेला आढळून आला ही माहीती समजताच अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके हे आपल्या फौजफाट्यासह दाखल झाले ही वार्ता गावात वार्यासारखी पसरली गावातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली गौतम हिरण यांची हंत्या करुन चार ते पाच दिवस झाले असावेत त्यांनंतर प्रेताची दुर्गंधी सुटल्यामुळे मारेकर्यांनी रात्रीच्या वेळेस ते प्रेत निर्जन स्थळी टाकलेले प्रथम दर्शनी जाणवते  गौताम हिरण यांच्या मारेकर्याचा तातडीने तपास करावा अशी मागणी बेलापुर ग्रामस्थांनी केलेली आहे.


बेलापुर (प्रतिनिधी  )-  गौतम हिरण यांच्या अपहरणा बाबतचा तपास सुरु असुन ग्रामस्था इतकी आम्हालाही काळजी आहे तपासासाठी वेगवेगळी पथके तयार केली असुन पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे जिल्हा पोलीस  प्रमुख मनोज पाटील यांनी ग्रामस्थांना सांगीतले                   बेलापुर येथील व्यापारी गौतम हिरण बेपत्ता होवुन आज पाच दिवस झाले तरीही पोलीसांना त्यांचा ठावठिकाणा लागेना त्याच धर्तीवर शनिवार दिनांक ६ मार्च रोजी गाव बंदची हाक दिली आहे तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत हा मुद्दा उपस्थित केला त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील हे सायंकाळी आपल्या फौज फाट्यासह बेलापुर गावात दाखल झाले त्या नंतर त्यांनी हिरण यांचे गोडावुनला भेट दिली तसेच परिसरातील सि सि टी व्ही  फुटेजाची देखील पहाणी केली या घटनेत असणार्या साक्षीदारांशी देखील त्यांनी चर्चा केली त्या वेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे माजी सरपंच भरत साळुंके पत्रकार देविदास देसाई राम पौळ प्रशांत लढ्ढा प्रशांत शहाणे पंकज हिरण साहेबराव वाबळे योगेश नाईक राहुल लखोटीया प्रसाद खरात सचिन वाघ विशाल आंबेकरा अमोल गाढे संजय नागले  आदिंनी तपासा बाबत जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्याशी संवाद साधला त्या वेळी या घटनेचा लवाकरात लवकर तपास लावावा जस जसा तपासास उशीर होत आहे तशी आम्हा ग्रामस्थ व हिरण कुटुंबीयांची चिंता वाढत आहे त्यामुळे आपण जातीने लक्ष घालुन गौतम हिरण याचा शोध घ्यावा व आरोपीना तातडीने जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली या वेळी अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके पोलीस निरीक्षक संजय सानप उपस्थितीत होते.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- गौतम हिरण या व्यापाऱ्याच्या अपहरणा संदर्भात अचुक माहीती देणारास  बेलापुरातील व्यापारी व ग्रामस्थ यांच्या वतीने एक लाख रुपयांचे बक्षिस देण्याचे जाहीर करण्यात आले असुन घटनेच्या निषेधार्थ शनिवार दिनांक ६ मार्च रोजी गाव बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे.   बेलापुरातील व्यापारी गौतम हिरण हे तीन दिवसापासून बेपत्ता आहेत पोलीसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असला तरी गुन्हा घडून बराच कालावधी लोटल्यामुळे गौतम हिरण यांच्या विषयी व्यापारी  व ग्रामस्थांची चिंता वाढली आहे त्यामुळे पुढील आंदोलनांची दिशा ठरविण्यासाठी बेलापुर ग्रामस्थांची बैठक ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सर्वानुमते असे ठरविण्यात आले की या घटनेबाबत अचुक माहिती देणारास योग्य ते बक्षिस ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला या वेळी हिरण परिवार व्यापारी व ग्रामस्थ यांच्या वतीने अचुक माहीती देणारास एक लाख रुपयाचे बक्षिस देण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच शनिवार दिनांक ६ मार्च रोजी या घटनेच्या निषेधार्थ गाव कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला सोमवार पर्यंत गौतम हिरण यांचा शोध लागला नाही तर बेमुदत गाव बंद ठेवण्याचा निर्यणही एकमताने घेण्यात आला या वेळी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे जिप सदस्य शरद नवले बाजार समितीचे संचालक सुधीर नवले पत्रकार देविदास देसाई ज्ञानेश गवले  भरत साळुंके जनता अघाडीचे अध्यक्ष  रविंद्र खटोड टँक्सी असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल मुथा पंचायत समिती सदस्य अरुण पा नाईक रणजित श्रीगोड श्रीवल्लभ मुंदडा यांनी मनोगत व्यक्त केले या वेळी बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्करराव खंडागळे नवनाथ कुताळ रमेश अमोलीक  जितेंद्र छाजेड जितेंद्र गदीया दिलीप दायमा सुधाकर खंडागळे  मोहसीन सय्यद अनिल डाकले बाळू सांचेती संजय बाठीया भूषण चेंगेडीया अमोला गाढे लहानु नागले प्रफुल्ल डावरे प्रकाश कुर्हे जालींदर कुर्हे भास्कर  बगाळ अनिल मुंडलीक प्रशांत मुडलीक सुहास शेलार सतीश चायल प्रशांत बिहाणी राम पोळ बाळू दायमा दिपक क्षत्रीय सागर ढवळे अजिज शेख शिवसेनेचे अशोक पवार गणेश मुंडलीक सचिन वाघ लहानु नागले विशाल आंबेकर हरिप्रसाद मंत्री   आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-संजय भानुदास  लोखंडे राहणार बेलापुर खूर्द  वय ४७  हे सायंकाळी आठ वाजेच्या दरम्यान मोटार सायकलवर घरी जात असताना रस्त्याच्या कडेला दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला या हल्ल्यामुळे ते मोटारसायकल वरुन खाली पडले बिबट्याने पुन्हा त्याचेवर झडप घालुन त्याना बाजुच्या शेतात नेण्याचा प्रयत्न केला या वेळी प्रसंगावधान राखुन संजयने आरडा ओरड केली संजयच्या आवाजाने आसपासचे नागरीक गोळा झाले त्यामुळे बिबट्याने तेथुन पळ काढला ग्रामस्थांनी त्यांना तातडीने बेलापुर येथे दवाखान्यात दाखल केले तेथुन त्यांना श्रीरामपुर येथील दवाखान्यात हलविण्यात आले त्याच्या डोक्यावर गळ्याला अंगावर बर्याच जखमा झालेल्या आहे त्यांना ताताडीने अहमदनगर येथील दवाखान्यात हलविण्यात आले आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- रा.स्व. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे  प्रांत संघचालक म्हणून बेलापुर येथील सुरेश तथा नानासाहेब जाधव यांची पुढील तीन वर्षांसाठी निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निर्णय अधिकारी  म्हणून पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रमुख दिलीप क्षीरसागर यांनी ही निवड घोषित केली. दर तीन वर्षांनी संघाच्या  जिल्ह्यापासून वरील सर्व स्तरावरील संघ चालक पद व अखिल भारतीय सरकार्यवाह यांच्या निवडणूका होत असतात. त्याशिवाय अखिल भारतीय प्रतिनिधींची देखील निवड होत असते.कोरोना संकटाने ऑनलाईन  घेण्यात आलेल्या बैठकीत नाशिक, नगर, पुणे,सातारा,सांगली,सोलापूर व कोल्हापूर या जिल्ह्यातील निर्वाचित संघ शाखा प्रतिनिधींनी हि निवड केली.नानासाहेब जाधव हे मूळ बेलापूर ( तालुका श्रीरामपूर) येथील रहिवासी असून सध्या नगर येथे स्थायिक आहेत.त्यांनी कृषी अभियांत्रिकी मधील एम.टेक.पदवी प्राप्त केलेली असून माती आणि पाणी संवर्धनासाठी त्यांचा विशेष अभ्यास आहे. राहुरी  येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात ते १९८३ ते २०१२ या काळात प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते.त्यांनी पदवी परीक्षा प्राप्त केल्यावर संघाचे पूर्णवेळ प्रचारक  म्हणून मावळ,शिरूर तालुका तसेच जळगाव जिल्हा स्तरावर सहा वर्ष काम केले आहे.यापूर्वी रा स्व संघाच्या जिल्हा,विभाग व प्रांत स्तरावर त्यांनी  विविध जबाबदाऱ्या सांभाळलेल्या असून   २०१३ पासून प्रांत संघचालक पदावर ते कार्यरत आहेत.त्यांच्या निवडीनंतर प्रांत कार्यवाह डॉ प्रवीण दबडघाव यांनी त्यांचे अभिनंदन करतांना प्रांतातील संघकामासाठी  त्यांच्या मार्गदर्शनाचा पुढील काळात पुनश्च लाभ मिळणार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.या बैठकीत प्रांतातील सर्व   जिल्हा,विभाग व प्रांत स्तरावरील  प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget