Latest Post

श्रीरामपूर - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा पुणे शहर यांनी राज्यातील शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ बनवा स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातून पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल बेलापूर उर्दू शाळेतील उपक्रमशील शिक्षिका, श्रीरामपूर तालुका महिला आघाडीच्या संघटक, तालुका संघाचे अध्यक्ष शकील बागवान यांच्या सौभाग्यवती सौ.महेजबीन शकील बागवान यांचा तसेच डाएट मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत श्री शकील बागवान सर यांचा पाचवा क्रमांक आल्याबद्दल श्रीरामपूर तालुका व शहर शिक्षक संघ, श्रीरामपूर तालुका व शहर गुरुमाऊली मंडळ, श्रीरामपूर तालुका व शहर गुरुमाऊली महिला आघाडी तसेच अहमदनगर जिल्हा उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने छोटेखानी दिमाखदार सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गुरुमाऊली मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब सरोदे, शिक्षक बँकेचे संचालक सलीमखान पठाण, उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष सरदार पटेल, ज्येष्ठ सल्लागार अर्जुन बडोगे, शहर संघाचे अध्यक्ष राजू गायकवाड, फारुक पटेल,  शाम पटारे, सिताराम भांगरे, वाघोजी पटारे,बाबासाहेब डोखळे,जलील शेख, अनिस शेख, परविन बाजी, शाहीन बाजी, हुसेनाबानो पटेल, यास्मिन शेख, मेहरुन्निसा बाजी,नाझिया शेख, नसीबा बागवान आदि उपस्थित होते .

 प्रमुख भाषणात सलीमखान पठाण यांनी शकील बागवान व सौ बागवान  या शिक्षक जोडीने शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची माहिती दिली. शैक्षणिक आणि सामाजिक कार्यामध्ये हे पती-पत्नी सदैव सक्रिय असून आपल्या विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन देण्याची त्यांची धडपड सतत सुरू असते असे गौरवोद्गार त्यांनी काढले .बाळासाहेब सरोदे, सरदार पटेल, अर्जुन बडोगे यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या. शेवटी सौ महेजबीन बागवान यांनी सर्वांचे आभार मानले .

राहुरी - दि. २१ फेब्रुवारी २०२१- आरोग्य मंत्र्यांना समक्ष भेटून देवळाली प्रवरा च्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावू असे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महाराष्ट्र राज्य तुकडेबंदी संघर्ष समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले. 

     देवळाली प्रवरा येथे खास बाब म्हणून ग्रामीण रुग्णालयास मान्यता मिळणे कामी तुकडेबंदी  समितीचे अध्यक्ष तथा  आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, उपाध्यक्ष तथा डॉ केमिस्ट चे चेअरमन डॉ. विलास पाटील, कोशाध्यक्ष्य तथा राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे, सचिव तथा योग प्रशिक्षक किशोर थोरात, सदस्य तथा देवळाली प्रवरा शहर कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब खांदे, सदस्य तथा देवळाली प्रवरा शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष केदारनाथ चव्हाण, सदस्य तथा देवळाली प्रवरा शहर शिवसेना पक्षाचे अध्यक्ष सुनीलभाऊ कराळे आदींची स्वाक्षरी असलेले निवेदन तुकडेबंदी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना राहुरी येथे भेट घेऊन निवेदन दिले असता मंत्री तनपुरे बोलत होते. 

      समितीने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,  देवळाली प्रवरा ता. राहुरी, जि. अहमदनगर हे गाव क वर्ग नगरपालिका क्षेत्र असून सण २०११ च्या जनगणने नुसार या गावची लोकसंख्या ३०९९७ इतकी आहे. तसेच या गावाच्या महसूल मंडलास लगतची ४२ गावे जोडली गेली आहेत. व या सर्व गावांचा देवळाली प्रवरा गावासी विविध कारणास्तव सततचा संपर्क येतो. 

     देवळाली प्रवरा व त्याच्या महसूल मंडलातील गावांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत  आहे. असे असताना देवळाली प्रवरा गावच्या जवळपास २० कि.मी.  परिघामध्ये अतिदक्षता विभागासारखी अद्यावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही. 

      सध्या देवळाली प्रवरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. परंतु त्यामध्ये असलेला अपुरा कर्मचारी वर्ग व अपुऱ्या वैद्यकीय सुविधेमुळे येथील नागरिकांना वैद्यकीय सुविधेसाठी सर्वस्वी शेजारच्या शहरांवर अवलंबून राहावे लागते. व ते येथील सर्वसामान्य जनतेला परवडत नाही. म्हणून या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय होणे अत्यंत गरजेचे आहे.

       तरी आपणास विनंती की, मौजे देवळाली प्रवरा ता. राहुरी, जि. अहमदनगर येथे खास बाब म्हणून अद्यावत सुविधांनी युक्त असे ग्रामीण रुग्णालय मंजूर होणे कामी आरोग्य मंत्रालयास योग्य ती शिफारस देऊन सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.  

       या निवेदनावर बोलताना मंत्री तनपुरे पुढे म्हणाले की, राहुरी येथील रुग्णालयाच्या जागेचा व देवळाली प्रवरा येथील ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब यांची समक्ष भेट घेऊ व खास बाब म्हणून देवळाली प्रवरा येथे ग्रामीण रुग्णालयास मान्यता मिळवून देऊ.


भोकर- शेतकर्‍यांची विज बंद करू नका, थकित बिल भरण्यास दोन महिन्याची मुदत द्या, शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावू नका,व्यावसायीक व घरगुती विज ग्राहकांना इतर आकार बंद करून ग्राहकांची लुट थांबवा, रोहित्रांची दुरुस्ती करा आदी मागण्यांसाठी काल भोकर येथे क्षत्रीय बेलदार सभेचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश छल्लारे व भोकरचे पसरपंच महेश पटारे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे एकतास शेतकरी व विज ग्राहकांनी रास्ता रोको आंदोलन केले. सध्या अनेक ठिकाणी रब्बीची पिक शेवटच्या पाण्यावर आहेत, अशा परीस्थीतीत शेतकर्‍यांचा विज पुरवठा खंडीत केल्यास शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे. याच शेतकर्‍यांना थकित विज बिल भरण्यास मुदत दिल्यास शेतकर्‍यांचे नुकसान टळून आपली वसुली होईल.शेतात अनेक ठिकाणी विजवाहक तारा हाताच्या अंतरावर आल्या आहेत, त्यामुळे शेतकर्‍यांच्या जीवितास धोका होवू शकतो, त्यामुळे त्वरीत अशा धोकादायक विजवाहक ओढून घ्या व अनेक रोहित्रांवरील लग्झ व फ्युज खराब आहेत, त्यांची तातडीने दुरुस्ती करा.घरगुती, व्यापारी व व्यावसायिक विज ग्राहकांच्या मासिक बिलात इंधन आकार, स्थीर आकार आदी प्रकारचे आकाराची आकारणी करून या ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लुट सुरु आहे, ती थांबवा अन्यथा यापेक्षा तिव्र अंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी अंदोलकांनी दिला. यावेळी क्षत्रीय बेलदार समाज सभेचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश छल्लारे, भोकरचे उपसरपंच महेश पटारे, युवा कार्यकर्ते दिपक पटारे व प्रताप पटारे यांची भाषणे झाली.सुमारे तासभर चाललेल्या या रस्ता रोको आंदोलकांच्या विविध मागण्याचे निवेदन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अमित कांबळे यांनी स्विकारत आपल्या सर्व मागण्या रास्त आहेत. वरिष्ठांशी चर्चा करून सर्व मागण्या पुर्ण करू, सध्या कुठलेच रोहित्र बंद केले जाणार नाही. सध्या बंद असलेले रोहित्र सुरु करून देत आहोत.परंतू विज बिल वसुली शिवाय पर्याय नसल्याने विज बील वसुलीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करत उर्वरीत मागण्यांबाबत तातडीने कारवाई करून चांगली सेवा देवू, असे आश्वासन यावेळी श्री. कांबळे यांनी आंदोलकांना दिले. त्यांचे समवेत महावितरणचे कनिष्ठ अभियंता प्रल्हाद टाक, लाईनमन कैलास घोळवे, गजेंद्र कासार आदिंसह कर्मचारी उपस्थीत होते. या रास्ता रोको दरम्यान श्रीरामपूर-नेवासा राज्य मार्गावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहतुक खोळंबली होती.यावेळी अशोकचे संचालक पुंजाहरी शिंदे, सोसायटीचे अध्यक्ष सागर शिंदे, राहुल अभंग, सतिष शेळके, रामदास शिंदे, भागवतराव पटारे, राजेंद्र चौधरी, राजेंद्र विधाटे, ज्ञानदेव चव्हाण, सुनिल विधाटे, नानासाहेब जगदाळे, भानुदास बेरड, रविंद्र मते, रमेश साठे, लहानु मते, आप्पासाहेब लोखंडे, रविंद्र आबुज, बजरंग पटारे, मुसा पठाण व राजेंद्र म्हसे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी व विज ग्राहक उपस्थीत होते.श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पो. नि. मसुद खान, पो. उप निरीक्षक अतुल बोरसे, पो. ना. आबा गोरे, पो. हे. कॉ. सतिष गोरे, रविंद्र पवार, आयुब शेख, पो. काँ. योगेश राऊत आदिंसह मोठा फौजफाटा उपस्थीत होता.


श्रीरामपूर - करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता श्रीरामपुरात करोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने कालपासून दंडात्मक कारवाई सुरू केली.मास्कचे महत्त्व पटवून सांगत प्रबोधनासाठी प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, डीवायएसपी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप, पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्यासह पोलीस प्रशासनाचे कर्मचारी रस्त्यावर उतरले होते.संपूर्ण महाराष्ट्रातच आता करोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्हाभर मास्क न वापरणार्‍यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला होता. त्यानुसार काल प्रांताधिकारी, तहसीलदार आणि पोलीस, पालिका प्रशासन यांनी श्रीरामपुरात नेवासा रोड, मेनरोड, शिवाजी रोड, संगमनेर रोडवर रस्त्याने फिरून लोकांना मास्क वापरण्याबाबत जनजागृती केली.सर्व अधिकारी रस्त्याने पायी चालत जात होते. एस. टी. बसस्थानकावर जाऊन एसटीतील प्रवाशांना मास्क वापरण्याबाबत यावेळी त्यांनी आग्रह केला. याशिवाय एस. टी. कंट्रोलर यांना तशाप्रकारे प्रवाशांना आवाहन करण्यास सांगितले. तसेच विनामास्कच्या कोणत्याही प्रवाशास एसटी बसमध्ये बसू देऊ नये, अशा सूचना त्यांनी वाहक व चालकांना दिल्या. याशिवाय रस्त्याने विनामास्क जाणार्‍या वाहन चालकांवरही यावेळी दंडात्मक कारवाई करण्यात आली.शहरातील जे दुकानदार मास्क न लावता दुकानात बसलेले दिसले त्यांनाही 100 रुपयेप्रमाणे दंड आकारण्यात येऊन पुन्हा विनामास्कचे आढळल्यास यापेक्षाही मोठी दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या या कारवाईमुळे व्यापारी तसेच मास्क न लावणार्‍या वाहन चालकांची धांदल उडाली. करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये म्हणून प्रत्येकाने मास्क वापरावे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, डिवायएसपी संदीप मिटके, पो.नि सानप, मुख्याधिकारी गणेश शिंदे आदींनी केले.

नाशिक - शहरात आठवडाभरात झालेले 5 खून तसेच रोज होणार्‍या घटनांमुळे कायदा सुव्यवस्था मोडीत निघाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवजयंती उरकताच पोलीस आयुक्त दीपक पाण्डे्य यांच्या आदेशानुसार पोलीस पथकांनी शहरातील गुन्हेगारांची धरपकड सुरू केली असून त्यांच्या घराची झाडाझडती घेत घातक शस्त्र बाळगणार्‍या 6 संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घातक शस्त्रसाठा जप्त केला असून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.अकबर उर्फ भुर्‍या शेख (रा. खडकाळी, जुने नाशिक), किशोर बाबुराव वाकोडे, निखिल उर्फ निक्कु बेग (दोन्ही रा. कथडा), प्रवीण रामदास कुमावत (रा. पोटिंदे चाळ, मखमलाबाद रोड), मदन मारुती पवार (रा.नवनाथनगर, पेठरोड), ऋषिकेश अशोक निकम (रा. आंबेडकरनगर, मालधक्का रोड) अशी पकडण्यात आलेल्या संशयितांची नावे असून या संशयितांना विनापरवाना शस्त्रे बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल केले.शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी गुरूवारी पोलीस अधिकार्‍यांसोबत बैठक घेत कारवाईचे आदेश दिले होते.शहरातील 13 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार, तडीपार गुन्हेगारांसह विविध गुन्ह्यांत फरार असलेल्या गुन्हेगारांचे ठावठिकाणे तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले.पंचवटी, भद्रकाली, उपनगर, नाशिकरोड या पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांनी गोपनीय माहिती घेत पंधरा ठिकाणी छापेमारीचे सत्र राबविण्यात आले. बेकायदेशीरपणे स्वत:जवळ शस्त्रे बाळगणार्‍या संशयितांची माहिती संकलित केली.ही माहिती मिळताच पोलीस आयुक्त पाण्डे्य यांनी त्या संशयितांच्या घरांची झाडाझडती घेण्याचे वॉरंट देत जादा मनुष्यबळही पुरविले. त्यानुसार सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरिक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांनी घरझडती घेत एकाचवेळी पंधरा ठिकाणी छापे टाकले.यावेळी सहा संशशितांना जेरबंद करून पैकी पाच संशयितांकडून 1 गावठी कट्टा, 2 जीवंत काडतुसे, 4 कोयते, 2 तलवारी, 1 चाकू, चॉपरसारखे हत्यारे पोलिसांनी जप्त केली. संशयितांविरुध्द शस्त्रबंदी कायदा, विना परवाना शस्त्रे बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या धडक कारवाईमध्ये 17 पोलीस निरिक्षक, 38 उपनिरिक्षक, 206 अंमलदार आणि 35 महिला पोलीस सहभागी झाले होते.

राहुरी( प्रतिनिधी मिनाष पटेकर )-नासिक विभागाचे पोलिस महानिरिक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांनी राहुरी पोलिस ठाणेच्या कामकाजाचा आढावा घेत तालुक्यातील गुन्हेगारी व पोलिसांच्या अडीअडचणी व कायदा व सुवेवस्थे बाबत माहिती घेतली व सुचना केल्या.

यावेळी राहुरी पोलिस ठाणेत पोलिस महानिरिक्षक डाॅ.प्रताप दिघावकर येताच त्यांचे अप्पर पोलिस अधिक्षक दिपाली काळे व पोलिस निरिक्षक हनुमंत गाडे यांनी गुलाब पुष्प देवुन स्वागत करत मानवंदना देण्यात आली.

यावेळी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांचा पोलिस उपधिक्षक संदिप मिटके यांनी सन्मान केला.

पोलिस महानिरिक्षक दर्ज्याचे अधिकारी राहुरी पोलिस ठाणेत भेट देण्याची हि पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.

त्यांनी राहुरी पोलिस वसाहातीत जावुन पडझड झालेल्या घराची पाहणी करत सुचना केल्या तसेच गुन्हात जप्त असलेली व बेवारस पडुन असलेल्या वाहानांची विल्लेवाट लावण्याच्या सुचना केल्या अप्पर पोलिस अधिक्षक दिपाली काळे,पोलिस निरिक्षक हनुमंत गाडे यांना सुचना केल्या तसेच पोलिस ठाणे बाहेर विजय सप्तपदी अभियनाच्या लावलेल्या फलकाचे पाहणी केली व कौतुक करत महसुला प्रशासनास सहकार्य करण्याच्या पोलिस विमागास सुचना दिल्या. तसेच देवळाली प्रवरा येथिल नविन पोलिस ठाणे बाबत अंतराष्ट्रिय खेळाडु आप्पासाहेब ढुस व राष्ट्रिय जल पुरस्कार प्राप्त असलेले शिवाजी घाडगे यांनी डाॅ दिघावरकर,पोलिस अधिक्षक यांच्याशी चर्चा केली.



 

शिर्डी प्रतिनिधी-शिर्डी हे जागतिक तिर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी जगभरातून येणार्‍या भाविकांना जवळपासच्या पर्यटनस्थळाची माहिती 

तसेच मार्गदर्शन मिळावे या मूळ हेतूने अद्ययावत वातानुकूलित साईतिर्थ पर्यटन पोलीस मदत केंद्र उभारणी करण्यात आली असल्याची माहिती शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी दिली असून यामुळे साईमंदिर परिसरात आता पॉलिसी, साईयंत्र विक्रेत्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

मंगळवार दि. 16 रोजी दुपारी साईमंदिर प्रवेशद्वार क्रमांक चारसमोर शिर्डी नगरपंचायतच्या जागेत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून साईतिर्थ पर्यटन पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली. या कक्षाचे उद्घाटन डिजिटल पद्धतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी कोपरगाव विधानसभेचे आ. आशुतोष काळे, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष रमेश गोंदकर, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, नगरसेवक सुजित गोंदकर, मंगेश त्रिभुवन, राष्ट्रवादी काँग्रेसचे राकेश कोते, शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे, शिर्डी वाहतूक कक्षाचे पोलीस निरीक्षक श्री. न्याहाळदे, साईमंदीर सुरक्षा यंत्रणेचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस उपनिरीक्षक श्री. दातरे आदी मान्यवरांसह मोठ्या प्रमाणावर साईभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान शिर्डी शहरात वर्षाकाठी सुमारे दोन कोटींपेक्षा भाविक साईदरबारी नतमस्तक होण्यासाठी येत असतात. एखादी घटना घडल्यानंतर भाविकांना तात्काळ पोलिसांची मदत उपलब्ध होईल या मूळ उद्देशाने या पोलीस मदत कक्षाची निर्मिती केली आहे. यासाठी सुमारे दहा लाख रुपये खर्च आला असल्याचे समजते.

याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सातव यांनी सांगितले की, साईमंदिर परिसरात भाविकांना पॉलिसी करणारे तसेच साईयंत्र विक्रेते मोठ्या प्रमाणात त्रास देत असल्याने त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यासाठी सदरची पोलीस कक्षाची मदत मिळणार आहे. या पोलीस मदत केंद्रात प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे.

बहुभाषिक भाविकांबरोबर संवाद साधण्यासाठी बहुभाषिक पोलीस मित्रांची मदत घेतली जाणार आहे. एकंदरितच या अद्ययावत पोलीस कक्षामुळे भाविकांना सुरक्षा मिळणार असून लुटमार करणार्‍यांंवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget