Latest Post

 


बुलडाणा - 23 ऑक्टोबर

गुंडाचे कर्दनकाळ म्हणून ओळख असलेल्या अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकीशोर मीना यांनी आज 23 ऑक्टोंबरला बुलडाण्यात प्रथमच भेट देताच ,गुन्हेगारी प्रवृत्तीचे धाबे दणाणले. मीना यांनी येथे दाखल होत प्रलंबित गुन्ह्यां विषयी आढावा बैठक घेऊन  जिल्ह्यातील 33 पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना कर्तव्य भावनेतून पारदर्शीपणे कामकाज करण्याच्या सुचना दिल्या.पोलिस उपमहानिरीक्षक चंद्रकीशोर मीना हे बुलडाणा शहरात येत असल्याने विशेष उपाययोजना करीत शहरातील 2 नंबरचे धंदे म्हणजे ठिकठिकाणी थाठलेले वरली मटक्याचे दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

    अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकीशोर मीना यांनी आज 23 ऑक्टोंबरला बुलडाण्यात दाखल होत जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आढावा घेतला. विशेषतः खून, बलात्कार, महिला अत्याचार, चोरी, घरफोडी आदी घटनांसंदर्भात त्यांनी माहीती जाणून घेत जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली.

     आगामी नवरात्रोत्सव,ईदए मिलाद या सण उत्सवाच्या काळात सामाजिक सलोखा, व शांतता अबाधित राहावी या दृष्टीने त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संबधित अधिकाऱ्यांना पारदर्शीपणे काम काज करावे असे आवाहन केले. दरम्यान नवनिर्माणाधिन पोलीस कर्मचाऱ्यांच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी देखील केली. तत्पूर्वी उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आले असता, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सलामी देण्यात आली. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया,अप्पर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे,हेमराज राजपूत,रमेश बरकते, प्रिया ढाकणे, नलावडे, कोळी, विलास यामावर आदी डीवायएसपी, प्रभारी गृह पोलिस उपअधिक्षक बळीराम गिते, बुलडाणा शहर ठाणेदार प्रदीप साळुंखे, ग्रामीण ठाणेदार सारंग नवलकर यांच्यासह जिल्ह्यातील 33 पोलिस स्टेशनचे सर्व पोलिस अधिकारी उपस्थित होते. 


बलडाणा - 23 ऑक्टोबर

नियम मोडत आपला निर्धारित मार्ग बदलून व मोठ्या वाहनातून इतर दोन लहान वाहनात दारूचे बॉक्स क्रॉसिंग करताना बुलडाणा एलसीबीच्या पथकाने 16 सप्टेंबर रोजी बुलडाणा तालुक्यातील भादोला गावाजवळ तीन वाहने पकडले होते.या तीन्ही वाहनांना बुलडाणा ग्रामीण ठाण्यात लावुन त्याची चौकशी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे देण्यात आली होती.ही तिन्ही वाहन बुलडाणा न्यायालयच्या आदेशाने काल रात्री सोडण्यात आले आहे.

     य्या बाबत अधिक अशे की,एका आयशर वाहन देशी दारू संत्राचे 800 बॉक्स घेऊन नागपूरहुन औरंगाबादकडे निघाला होता. सदर वाहनाचा निर्धारित रुट नागपुर-अमरावती-अकोला-खामगाव-चिखली-जालना व औरंगाबाद असा होता मात्र खामगाव नंतर चिखली कडे ना जाता सदर वाहन बुलडाणाच्या दिशेने निघाला व बुलडाणा ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील ग्राम भादोला जवळ सदर मोठे आयशर वाहनातून दोन मिनी मालवाहू वाहनात दारुचे बॉक्स क्रॉसिंग केले जात असताना त्या ठीकाणी बुलडाणा एलसीबीच्या पथकाने धडक देऊन वाहनाची बिल्टी चेक केली असता त्यांच्या लक्षात आले की वाहन चालकाने आपला निर्धारित मार्ग बदललेला आहे व अनाधिकृतपणे दारुचे बॉक्स क्रॉसिंग केले जात आहे.त्यामुळे सदर तिन्ही वाहन ताब्यात घेऊन त्यांना बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात लावण्यात आले होते.हे प्रकरण राजयउत्पादन शुल्क विभाग बुलडाणा यांना देण्यात आले मात्र बिल्टी औरंगाबादची असल्याने प्रकरण औरंगाबाद राज्य उत्पादन शुल्क विभागाला वर्ग करण्यात आले.या प्रकारणाची चौकशी आयुक्त मुंबई यांच्या कड़े सुरु असून तिन्ही वाहन व दारू आपल्या ताब्यात द्यावी अशी दाद मे निर्मल ट्रेडर्स,सांवगी, औरंगाबाद यांच्या कडून बुलडाणा न्यायालयात मागण्यात आली असता सदर दारुचे तिन्ही वाहन सुपर्दनाम्यावर सोडण्याचे निर्देश कोर्टाने दिल्याने 22 ओक्टोबरच्या रात्री तिन्ही वाहन बुलडाणा ग्रामीण ठण्यातून तब्बल 36 दिवसानंतर सोडण्यात आले आहे.


बुलडाणा - 22 ओक्टोबर

बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील ग्राम भादोला येथील नारायण भाऊराव जोशी यांची शेती गावातीलच शालिकराम तोताराम उबरहंडे यांनी बटाईने केली होती.या शेतात त्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. काही दिवसांपूर्वी सोयाबीन सोंगुन त्याची सोडी लावण्यात आली होते. 21 ऑक्टोबरच्या सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सदर सोयाबीन सुडीला आग लावून दिली यात शेतकऱ्याचे 90 क्विंटल सोयाबीन किंमत अंदाजे 4 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे. याप्रकरणी शालिकराम तोताराम उबरहंडे यांच्या तक्रारीवर बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार जनार्दन इंगळे करीत आहे.

बुलडाणा - ऑक्टोबर 

शहरातील रामनगर भागातील रहिवासी 36 वर्षीय व्यक्तिने आपल्या राहत्या घरच्या वरील मजल्यावर एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घड़ली. मृतकाचे नाव आशिष सुरेश शेळके असे आहे.घटनेची माहिती मिळताच बुलडाणा शहर ठाण्याचे पीएसआई विनीत घाटोळ आपल्या पथका सह घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करुण मृतदेहला जिल्हा सामान्य रुग्णालयात शव विच्छेदनसाठी पाठवला आहे.शहर ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद घेण्यात आली आहे.आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पुढील पोलिस करत आहे.

बुलडाणा - 22 ऑक्टोबर

बुलडाणा जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव झालेला नसल्याने मोठ्या प्रमाणात नंदुरबार तसेच मध्यप्रदेश होऊन वाळू बुलडाणा जिल्ह्यात येत आहे. 22 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास बुलढाणा तहसील कार्यालयच्या पथकाने मलकापूर मार्गावरील चौधरी पेट्रोल पंपाजवळ एका वजन काट्यावर  उभा असलेला मोठा ट्रक क्र MH 28 AB 9282 याची तपासणी केली असता त्यात मध्यप्रदेशच्या होशंगाबाद येथील नर्मदा नदीतील  वाळू दिसून आली.ट्रक चालकाकडून रॉयल्टीची तपासणी केली असता रॉयल्टीची मुदत संपल्याचे निदर्शनास आल्याने सदर ट्रक बुलडाणा तहसील कार्यालयात लावण्यात आलेला आहे. पुढील तपास बुलडाणा तहसिलदार रुपेश खंडारे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार अमरसिंह पवार करीत आहे.

मा. श्री. डॉ.प्रतापराव दिघावकर सो विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी परीक्षेत्रातील अवैध धंदे यांचे समुळ उच्चटन करण्यासाठी पथकाची नेमणुक केलेल्या पथकाने आज दिनांक २२/१०/२०२० रोजी दुपारी १६.०० वाजेचे सुमारास श्रीरामपुर गावात बेलापुर ते पुणे रोडाचे बाजुला अनारसे हॉस्पीटल चे समोर दुर्गा सोलर अॅण्ड आर.ओ हाऊस दुकानाचे शेजारी एका पत्र्याचे दुकानात अंकसंटा जुगाराच्या अड्यावर छापा टाकला असता तेथे एकुन ०६ आरोपी हे कल्याण नावाचा अंकसट्टा खेळतांना व खेळवितांना मिळुन आले असुन त्यांचे कडुन सुमारे ११७८०/- रुपये रोख व जुगाराची साधने मिळुन आले असुन सदर छाप्याची कारवाई करुन आरोपीतांना पोलीस ठाणे येथे घेवुन जात असतांना पथकातील अधिकारी व कर्मचारी अशांनी पुन्हा श्रीरामपुर गावात शिवाजी चौकात चंद्रकांत भेळ वाल्याशेजारी असलेल्या पत्र्याचे टपरीचे आडोश्याला सार्व जागी १७.०० वाजता सदर ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी देखिल एकुन ०५ आरोपी हे कल्याण नावाचा अंकसट्टा खेळतांना व खेळवितांना मिळून आले त्यांचे कडुन ७११०/ रुपये रोख व जुगाराची साधने मिळून आले. वरील केलेल्या कारवाई बाबत श्रीरामपुर पोलीस ठाणे येथे भाग ६ गु.र नं २१०६/२०२० महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४/५ प्रमाणे तसेच श्रीरामपुर पोलीस ठाणे येथे भाग ६ गुर नं २१०७/२०२० महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर कारवाई हो मा विशेष पोलीस महानिरीक्षक मा. श्री. डॉ.प्रतापराव दिघावकर सो नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पथकातील सपोनि/सचिन जाधव, पोसई/संदिप पाटील, असई/राजेंद्र सोनवणे, पोना/१०५१ नितीन चंद्रकुमार सपकाळे, पोकॉ/१०६० विश्वेश हजारे, पोको १५६५ दिपक ठाकुर, पोकाँ/उमाकांत खापरे, पोकॉ/१९२१ नारायण कचरु लोहरे यांनी केली आहे.


श्रीरामपूर : श्री. किशोर गाढे यांजकडून भारतीय मिडीया फौडेशनचे महाराष्ट्र कमेटीचे चेअरमन श्री. राजेंद्र वाघ यांनी मालेगांव शहरातील लॉकडाऊनच्या काळातील झालेल्या रेशन घोटाळा प्रकरणी चौकशी करावी या मागणीकरीता मा. अप्पर जिल्हाधिकारी साहेब कार्यालय, मालेगांव या ठिकाणी दिनांक 0७/१०/२०२० व दिनांक ०८/१०/२०२० रोजी सलग दोन दिवस भारतीय मिडीया फौडेशनच्या वतीने उपोषण केले. त्या उपोषणाची दखल घेता नायब तहसिलदार श्री. वाणीसाहेब, लिपिक सावणे व पुरवठा अधिकारी यांनी दिनांक १०/१०/२०२० रोजी या चौकशीस मौजे डाबली, पोस्ट काटी, ता. मालेगांव या गावात श्री. राजेंद्र वाघ यांना चौकशी कामी समक्ष हजर राहणेबाबत कळविण्यात आले होते. याबाबतची दवंडी देवून ग्रामस्थांना हजर राहणेबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार दिनांक १०/१०/२०२० रोजी सदरील अधिकारी व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यावेळी उपस्थित होते. यांच्यासमक्ष गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी या चौकशीत अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशाने श्री. राजेंद्र वाघ व त्यांच्या पत्नी सौ. भारती राजेंद्र वाघ व आई निर्मला एकनाथ वाघ यांना मारहाण केली. तसेच श्रीमती निर्मला वाघ यांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यांच्या या क्रुर कृत्याचा निषेध भारतीय मिडीया फौडेशन व महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला असून या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबाबत भा.दं.वि. कलम ३५३ अन्वये कार्यवाही करावी, तसेच श्री. राजेंद्र वाघ व त्यांच्या कुटूंबियांतील लोकांना मारहाण केल्याबद्दल तसेच श्रीमती एकनाथ वाघ यांचेबरोबर लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याबद्दल पत्रकार संरक्षण कायद्यान्वये या गुंडांवर कार्यवाही करण्यात यावी. याचबरोबर श्री. राजेंद्र वाघ व त्यांच्या कुटूंबियांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातून त्यांना कलम १६९ अन्वये आरोप मुक्त करण्यात यावे या मागणीचे निवेदन भारतीय मिडीया फौंडेशन व महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने श्रीरामपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयात दिनांक २०/१०/२०२० रोजी देण्यात आले. सदरील दोन्ही निवेदन शिरस्तेदार श्री. डी. डी. गोवर्धने यांनी स्विकारले असून तुमच्या मागण्या वरिष्ठांना कळविण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले. निवेदनावर श्री. शेख बरकतअली, किशोर गाढे, अमीरभाई जहागिरदार, अस्लम बिनसाद, शेख फकीर महंमद, रमेश शिरसाठ, शब्बीरभाई कुरेशी, गुलाबभाई वायरमन, सचिन केदारी, गणेश ताकपिरे, अक्रम कुरेशी, अयाजअली शाह बाबा आदि पत्रकारांच्या सह्या आहेत.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget