बुलडाणा - 5 ऑक्टोबर
दोन गटात तुंबळ हाणामारी होउन त्यामध्ये 5 जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम लोणी (लव्हाळा) येथे रविवारी रात्री घडली आहे . गावातील काही घरांची व दुचाकींची जाळपोळ करण्यात करण्यात आल्याचे समजते. पोलीसाने 10 आरोपींना अटक केले आहे.
या बाबत मिळालेली माहिती अशी की,लोणी (लव्हाळा) येथील एका समाजात (पारधी) वाद सुरू होता म्हणून महादू शिवाजी देशमूख व राजू देशमुख यांनी एकच समाजातील दोन्हीकडील लोकांना समजावून सांगत असतांनाच राजेंद्र बाळाजी भोसले, कपूर भोसले, सखाराम भोसले व दहिमल भोसले यांनी तलवार,कुऱ्हाडी व लाकडी दांड्यांनी मारहाण करून गंभीर जख्मी केले.या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजू देशमुख व महादू देशमुख या दोघांना औरंगाबाद येथे उपचारासाठी पाठविण्यात आले असुन विठ्ठल देशमुख , श्रीमंत देशमुख यांना बुलडाणा येथे भरती करण्यात आले आहे .याविषयी फिर्यादी महादु शिवाजी देशमुख तर्फे पीएसआय दिपक राणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी राजेंद्र बाळाजी भोसले , कपुर बाळाजी भोसले , सखाराम बाळाजी भोसले , चुमा भोसले , जितेंद्र बाळाजी भोसलेसह पाच महिलांवर विविध कलमान्वय गुन्हे दाखल केले आहेत .तर

जाळपोळ प्रकरणी शारदा दहिमल भोसले हिने दिलेल्या फियार्दीत नमूद केले आहे की , माझी मुलगी किराणा दुकानावर सामान आणण्यासाठी गेली असता अतूल देशमुख याने शिवीगाळ केली त्यावरुन वाद झाल्यानंतर आमच्या घरांची नासधूस करुन जाळपोळ करून लाठ्या काठ्यांनी मारहाण केली . त्यात माझ्या हाताला मार लागला. यावरुन ठाणेदार संग्राम पाटील यांनी राजू दत्तात्रय देशमुख, महादू शिवाजी देशमुख , विठ्ठल शिवाजी देशमुख, अतुल देशमुख व इतर सात ते आठ लोकांवर विविध कलमाखाली गुन्हे दाखल केले असून घटना स्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया , अप्पर पोलिस अधीक्षक संदीप पंखाले , उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यमावर , ठाणेदार संग्राम पाटील , पोउपनि दीपक राणे यांनी भेट दिली असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.
भुकेने व्याकुळ झाले पोलीस कर्मचारी
कधी आणि कुठे धावून जावे लागेल हे पोलिसांसाठी काही निश्चित नसते, अनेक वेळी आपले कर्तव्य पार पाळत असतांना पोलिस बांधवांना उपाशी ही राहावे लागतात.काही अशीच परिस्तिथि आज दिसून आली. आमच्या प्रतिनिधीने लोणी गावात जावून घटनास्थळी भेट दिली असता तेथे काल रात्री पासून कर्तव्यवर तैनात काही पोलीस कर्मचारी दिसले व सर्वांचे चेहेरे उतरले होते ते सर्व भुकेने व्याकुळ झालेले दिसून आले.
जर पोलीस वेळेवर पहोचले नसते तर ......
लोणी येथे काल रविवारी रात्री घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा येथील पोलीस कर्मचारी ताबडतोब घटना स्थळी पहोचले व परिस्तिथी नियंत्रणात आणली. जर पोलीस लवकर घटनास्थळी पोहोचले नसते तर मोठा अनर्थ झाला असता असे काही नागरिकांनी माहिती देताना सांगितले.