Latest Post


 बेलापूर (प्रतिनिधी  )-  टी बस आता माल वहातुक सेवेतही दाखल झाली असुन एफ सी आय गोदामातुन शासकीय धान्याची पोती भरुन आता लाल परी जिल्ह्यातील शासकीय गोदामात धान्य घेवुन जाणार आहे         लाँक डाऊन काळात प्रवासी वहातुक बंद असल्यामुळे एस टी महामंडळ तोट्यात आले बस स्थानक ओस पडले  मग एस टी महामंडळाने वहातुक सेवा एस टी  महामंडळा मार्फत सुरु करण्याचा निर्णय घेतला अहमदनगर जिल्ह्यातही एस टी बसने माल वहातुक सुरु करण्यात आली आता शासकीय गोदामातही लालपरी धावणार आहे बसचा वरील टप कापुन त्यावर ताडपत्री टाकण्यात आली असुन आतील भाग बाकडे काढुन मोकळा करण्यात आला आहे आता एफ सी आय गोदामात लाल परीत शासकीय गहु तांदूळ भरला जात आहे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील गोदामात आता बसमधुन वहातुक केली जाणार आहे बसमधुन शासकीय  मालाची वहातुक सुरु झाल्यामुळे होणाऱ्या गैरप्रकाराला निश्चितच आळा बसेल यात शंकाच नाही.


मधुकर वक्ते कोपरगाव प्रतिनिधी.  कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावचे भुमिपुत्र तसेच जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कुल,डाऊच खर्द या स्कुल चे संस्थापक सचिव मा श्री सुनिल भास्करराव होन यांचा आज वाढदिवस, त्या निमित्ताने हा त्यांचा कार्याचा घेतलेला आढावा.ग्रामदैवत भैरवनाथ जोगेश्वरी माते मुळे पावन झालेल्या चांदेकसारे गावात एका सधन शेतकरी कुटुंबात सुनिल होन यांचा जन्म दि १८ सप्टेंबर रोजी झाला,प्राथमिक शिक्षण शिर्डी व पुढील शिक्षण चांदेकसारे व कोपरगाव येथुन पुर्ण केले.कुटुंबात समाजसेवेचा वारसा त्यांचे चुलते कै किसनराव नबाजी पा होन यांच्या कडुन मिळाला.शेतकर्याची व मोलमजुरी करणाऱ्या ची मुल शाळा,कॉलेज दुर असल्याने शिक्षणापासुन वंचित राहत होते . हिच गरज आेळखुन सुनिल भाऊ व त्यांच्या सहकार्यानी मिळुन २०१६ साली एक शैक्षणिक संस्था सुरु केली.आज या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातुन जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कुल , डाऊच खुर्द या ठिकाणी सुरु आहे.कोपरगाव चे आमदार श्री अशुतोष दादा काळे साहेब यांचे अत्यंत विश्वासु व निष्टावान  सहकारी आहेत.स्कुल च्या माध्यमातुन चांदेकसारे गावात आई तुळजा भवानी माता मंदिर येथे भाविकांना बसण्यासाठी बाकडे,तसेच भैरवनाथ जोगेश्वरी माता मंदिर येथे सी सी टिव्ही कॅमेरे तसेच ख्वाजापिर दर्गाचे तार कंपाउंड,इ कामे स्वखर्चाने केलेले आहे.सुनिल भाऊंच्या मार्गदर्शना खाली जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कुल च्या सर्व मुलांचा न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातुन मोफत विमा उतरविला आहे.असा विमा उतरवनारी जोगेश्वरी राज्यात पहिलीच स्कुल आहे.प्रत्येक राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक कार्यक्रमात सुनिल भाऊ चा प्रमुख सहभाग असतो.गरीब घरातील जर कोणी मयत झाले तर दशक्रिया विधी साठी ५० किलो साखर मोफत दिली जाते.कोरोना च्या पार्श्वभूमीवर सुनिल भाऊ च्या माध्यमातुन चांदेकसारे गावातील सर्व वैद्यकिय सेवा देणारे डॉक्टर,नर्स,अंगनवाडी सेविका यांना पी.पी.ई किट चे वाटप करण्यात आले.भैरवनाथ जोगेश्वरी उत्सव,उरुस,व सर्व जाती धर्माच्या कार्यक्रमाला सुनिल भाऊंचा सहभाग असतो.सगळयांना जोडुन ठेवायच्या स्वभावामुळे आज सुनिल होन यांच्या बरोबर असंख्य तरुण सहकारी जोडले गेलेले आहे.एका शेतकरी कुटुंबातुन येवुन जनमानसात आपली वेगळी ओळख खुपच कमी लोकांना बनवता येते.सुनिल होन यांनी आपले स्थान व दर्जा मागील बर्याच वर्षांच्या कामातुन अधोरेखित केले आहे.अशा या तरुन,तडफदार,युवा सेवकाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.



श्रीरामपूर - (प्रतिनिधी  )-केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय त्वरीत रद्द करुन शेतकर्‍यांच्या हिताचा निर्णय घेणे गरजेचे आहे. अन्यथा कांदा निर्यातबंदी झाल्यास शेतकर्‍यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे. सध्या कोरोना महामारीमुळे शेतकरी वर्ग संकटात असतांना कांदा पिकातून मिळणारी थोडीशी आर्थिक ताकदही या निर्यातबंदीमुळे कमी होणार आहे. त्यामुळे कांदा निर्यातबंदीचा निर्णय रद्द करुन शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.केंद्र शासनाने कांदा निर्यात सुरु ठेवावी, अशा मागणीचे निवेदन श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने प्रांताधिकारी अनिल पवार यांना देण्यात आले. यावेळी अ‍ॅड्.उमेश लटमाळे, अशोक बँकेचे संचालक नाना पाटील, पक्षाचे प्रतोद अभिषेक खंडागळे, ‘अशोक’ चे संचालक आदिनाथ झुराळे, व्यापारी असोसिएशनचे संचालक अमोल कोलते, प्रमोद करंडे आदी उपस्थित होते.केंद्र शासनाने घेतलेला कांदा निर्यात बंदीचा निर्णय शेतकर्‍यांच्या हिताचा नसून शेतकरी वर्ग आर्थिक संकटात असतांना त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आगोदरच कोरोना महामारीमुळे शेतकरी वर्ग संकटात सापडलेला आहे. शेत मालालाभाव नसल्यामुळे  शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.कांदा पिक हे शेतकऱ्यांना दिलासा देणारे पिक आहे अनेक शेतकऱ्यांनी कांदा खराब होवु लागल्यामुळे आगोदरच विकलेला आहे थोड्या फार शेतकऱ्याकडे कांदा शिल्लक आहे भविष्यात भाव मिळेल या आशेने त्यांनी खराब कांदा काढुन पुन्हा चांगला कांदा चाळीत भरला आहे  कांदा निर्यातीमुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांना चांगल्या प्रकारे भाव मिळेल या आशेवर शेतकरी वर्ग असतांना केंद्र शासनाने अचानक कांदा निर्यातबंदी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाने तात्काळ कांदा निर्यातबंदीचा निर्णय रद्द करावा, असे निवेदनात म्हटले आहे.

🔹दोघांनी केली होती रानडुकराची शिकार
बुलडाणा - 16 सेप्टेंबर
बुलडाणा वनपरिक्षेत्रात रानडुकराची शिकार करणाऱ्या 2 तसेच शिकार करण्याच्या उद्देशाने जंगलात फिरणाऱ्या 2 असे 4 आरोपींना आज वन विभागाने अटक त्यांना कोर्टासमोर हजर केले असता त्यांची जामीन मंजूर केली आहे.
    लॉकडाउन च्या काळात बुलडाणा वन विभागाला माहिती मिळाली की बुलडाणा तालुक्यातील कोलवड गावात अवैधरित्या रानडुकराची शिकार करून त्याचा मांस विक्री केला जात आहे.26 मेला बुलडाणा वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश टेकाळे यांच्या नेतृत्वात वनपाल राहुल चौहान,दिपक घोरपडे, सुरेश भालेराव,विष्णु काकड,शिला खरात, विलास मेरत, संदीप मडावी,प्रवीण सोनुने,दिपक गायकवाड यांनी कोलवड गावात एका घरात छापा टाकून शिकार केलेल्या रानडुकराचा अंदाजे 60 किलो मांस व इतर साहित्य सह आरोपी अनिल उर्फ नारायण शिंदे रा.शिरपुर व राजेश शिंदे रा.नान्द्रकोळी यांना ताब्यात घेतले होते.तर दूसरी कार्रवाई गिरडा - 1 बिट मध्ये 3 अप्रैल रोजी करण्यात आली होती.या ठीकाणी जंगलात वन्य प्राणयांचा शिकार करण्याच्या उद्देशाने फिरणारे 2 जन 3 जाळे सह मिळून आले होते.आरोपी सुपडा चौहान व प्रभाकर सोनोने दोघे रा.हनवतखेड ता. मोताळा यांना वनरक्षक कैलाश तराळ व प्रशांत नारखेडे यांनी ताब्यात घेतले होते.दोन्ही प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले होते मात्र लॉकडाउन असल्यामुळे आरोपींना समज पत्र देण्यात आले होते.आज दोन्ही प्रकारणातील चार ही आरोपींना अटक करून कोर्टा समक्ष उभे केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.पुढील तपास आरएफओ गणेश टेकाळे यांच्या मार्गदर्शनात वनपाल राहुल चौहान करीत आहे.

🔹2 छोटे वाहनात क्रोसिंग केले जात होते दारुचे बॉक्स
🔸बुलडाणा व मोताळा येथील ते दारू दुकानदार कोण?
बुलडाणा - (कासिम शेख)16 सेप्टेंबर)
नियम मोडत आपला निर्धारित मार्ग बदलून इतर दोन वाहनात दारूचे बॉक्स पलटी मारताना बुलडाणा एलसीबीच्या पथकाने आज 16 सप्टेंबर रोजी भादोला गावाजवळ तीन वाहने पकडले असून तीन्ही वाहन बुलडाणा ग्रामीण ठाण्यात लावण्यात आले आहे.ज्या दोन छोटे वाहनात दारूचे बॉक्स टाकले जात होते ते दारू विक्रेते कोण?बिल्टी औरंगाबाद च्या नावाने होती तर भादोला जवळ ही क्रोसिंग का केली जात होती,असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
        पोलिसांनी दिलेली माहिती अशी की देशी दारू संत्राचे 800 बॉक्स घेऊन आयशर वाहन नागपूर हुन औरंगाबाद कडे निघाला होता.सदर दारु मे.निर्मल ट्रेडर्स,सर्वे नं.211,शॉप नं.5,हरसुल सांवगी, औरंगाबाद यांच्या नावाने होता. सदर वाहनाचा निर्धारित रुट नागपुर अमरावती अकोला खामगाव चिखली जालना व औरंगाबाद असा होता मात्र खामगाव नंतर चिखली कडे ना जाता सदर वाहन बुलढाण्याच्या दिशेने निघाला व बुलढाणा ग्रामीण ठाणे हद्दीतील ग्राम भादोला जवळ सदर मोठ्या वाहनातून दोन मिनी मालवाहू वाहनात माळ पलटी मारल्या जात असताना त्या ठीकाणी बुलढाणा एलसीबीचे पीएसआय मुकुंद देशमुख, अनिल भुसारी, भरत जंगले, विजय दराडे व श्रीकांत चिंचोले पोहोचले व त्यांनी वाहनाची बिल्टी चेक केली असता त्यांच्या लक्षात आले की वाहनचालकाने आपला निर्धारित मार्ग बदललेला आहे.त्यामुळे सदर तिन्ही वाहन ताब्यात घेऊन त्यांना बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहे.पलटी मारलेली दारू बुलडाणा येथील 2 व मोताळा येथील एक देशी दारू दुकानावार जात असल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेचा पंचनामा करून आता पुढील कारवाईसाठी अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती बुलडाणा एलसीबीचे पीआय महेंद्र देशमुख यांनी दिली आहे.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- शासनाने ग्राहकांच्या हिताचा विचार करुन वन नेशन वन रेशन सुरु केलेल्या योजनेचे ग्राहक पंचायतीच्या वतीने स्वागत करण्यात आले असुन या उपक्रमामुळे ग्राहकांची गैरसोय दुर होणार असल्याचे मत नाशिक विभाग ग्राहक पंचायतीचे  उपाध्यक्ष रणजीत श्रीगोड यांनी व्यक्त केले  आहे . ग्राहक पंचायतीच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात श्रीगोड यांनी पुढे म्हटले आहे की आज पर्यत कार्डधारकाला ज्या स्वस्त धान्य दुकानाचे रेशन कार्ड असेल त्याच दुकानातून धान्य घेण्याची मूभा होता रोजगाराच्या शोधार्थ अनेक कुटुंब दुसर्या जिल्ह्यात दुसऱ्या राज्यात जात असतात त्या ठिकाणी मोल मजुरी करत असताना त्यांना रेशनकार्ड असुन देखील जादा भावाने धान्य खरेदी करावे लागत होते तीच अवस्था ऊस तोडणी कामगारांची होती ऊस तोडणी करीता हे लोक आपल गाव सोडून दुसर्या जिल्ह्यात चार पाच महीने जातात त्या वेळी त्यांना आपले हाक्काचे राशन खरेदी करता येत नव्हते  या बाबीचा शासनाने गांभिर्याने विचार करुन वन नेशन वन रेशन ही योजना सुरु केली शासनाच्या या उपक्रमामुळे आता ग्राहाकाला आपल्या पध्दतीने कुठल्याही दुकानातुन आपले हक्काचे राशन घेता येणार आहे केवळ राशन घेण्याकरीता ग्राहकाला आपल्या गावी जाण्याची गरजच भासणार नाही ग्राहकाचे हित लक्षात घेवुन शासनाने घेतलेल्या निर्णयाचे ग्राहक पंचायतीचे नाशिक विभागीय उपाध्यक्ष रणजीत श्रीगोड श्रीरामपूर तालुकाध्यक्ष गोरख बारहाते संदिप अग्रवाल रमेश चंदन अनिता आहेर सुजाता मालपाठक आदिनी स्वागत केले आहे.

बेलापूर : (प्रतिनिधी  )-बेलापूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संग्राम चांडे  यांनी आपल्या कर्तव्याचे पालन न केल्याने  कामात हलगर्जीपणा केल्याच्या गंभीर कारणावरुन निलंबित करण्यात आल्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी काढले असुन या प्रकरणी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी ग्रामपंचायतीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तक्रार करुन कारवाई साठी पाठपुरावा केला होता                                        गटविकास अधिकारी  पंचायत समिती श्रीरामपूर  यांनी  ग्रामविकास अधिकारी संग्राम चांडे यांना दिनांक २७ जुलै १४ आँगस्ट  व २ सप्टेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती संग्राम चांडे ग्रामसेवक ग्रामपंचायत बेलापूर बु!! तालुका श्रीरामपूर 
यांनी केलेल्या आर्थिक अनियमितता व हलगर्जीपणा बाबत त्यांना सेवा निलंबित का कराणेत येवु नये या बाबतचा खूलासा मागविलेला होता संदर्भ  क्रमांक २ चे पत्रासोबत चांडे यांना सदरची नोटीस दिनांक  ७आँगस्ट रोजी बजावलेली पोहोच सादर केलेली आहे संदर्भ क्रमांक ३ चे पत्रान्वये चांडे यांनी अद्याप खूलासा सादर केला नसल्याचे या कार्यालयास कळविले असुन अपण जिल्हा परिषद कर्मचारी असुन सदैव निस्पृह सचोटीने वागणे व कर्तव्य परायण असणे आवश्यक आहे तथापी आपण कर्तव्याचे पालन न केल्याने आपण महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक ) नियम १९६७ चा नियम ३ चा भंग केलेला आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील )नियम १९६४ मधील नियम ३(१) अ मध्ये दिलेल्या तरतुदीस अधीन राहुन मला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन या आदेशाद्वारे चांडे यांना आदेश बजावल्याच्या दिनांकापासुन जि प सेवेतुन निलंबीत करण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे  बेलापूर येथील एका व्यक्तीच्या नावे एक लाख ८७ हजार रुपयाचा बेअरर चेक काढण्यात आला  ग्रामपंचायतीत असे अनेक व्यवहार हे रोखीने केल्याचे उघड झाले ईलेक्ट्रीक सामान खरेदी देखभाल दुरुस्ती या करीता तीन लाख २५ हजार रुपये खर्च दाखविण्यात आला  पाणी पुरवठा सामान खरेदी देखभाल दुरुस्ती या करीता पाच लाख ७५ हजार रुपये खर्च दाखविण्यात आला हा सर्व व्यवहार चेक स्वरुपात होणे आवश्यक होते परंतु रकमा रोख स्वरुपात काढण्यात आल्या तसेच खरेदी केलेल्या वस्तूची ग्रामपंचायतीच्या साठा रजिस्टरमध्ये कुठल्याही प्रकारची   नोंद आढळली नाही
 निधी वाटप करताना अपंगांचे प्रमाणपत्र नसताना धनादेश काढले, मागासवर्गीयांचे वैैयक्तिक लाभाचे धनादेश मयत व्यक्तीच्या नावे देणे, ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेरे खरेदीचे बील एकाच खरेदीवर दोनवेळा काढण्यात आले  कॅमेर्यांची खरेदी ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असताना वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली नाही, पथ दिव्यांच्या खर्चामध्ये आर्थिक अनियमितता केली, , अंगणवाडीची तीन लाख रुपयांची खेळणी ई खरेदी ऐवजी केवळ कोटेशनवर केली, इलेक्ट्रिकल साहित्याची खरेदी व पाणीपुरवठ्यातील पाईपलाईनच्या खरेदी आदींबाबत जि प सदस्य शरद नवले यांनी तक्रारी केल्या होत्या. तसेच चुकीचे काम करणार्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जी प सदस्य नवले यांनी केली होती
या तक्रारींची दखल घेत तत्कालीन सीईओ शिवराज पाटील यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांना नियुक्त करण्यात आले. आभाळे यांनी  विस्तार अधिकारी व्ही एन चर्हाटे आर डी अभंग तसेच कृषी अधिकार्यांच्या देखरेखीखाली दप्तर तपासणी केली. कामांची बिले व अदा केलेले धनादेश यांचीही माहिती घेतली. चौकशीत नियमांची पायमल्ली केल्याचे व आर्थिक अनियमितता केल्याचे नमूद करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी या अहवालाच्या आधारे  कर्तव्यात कसुर करुन हलगर्जीपणा केल्याचा गंभीर ठपका ग्रामसेवक संग्राम चांडे यांचेवर ठेवुन त्यांना निलंबन केले.  या सर्व अनियमितता व चुकीच्या खरेदी प्रकरणी चांडे यांना जि प सदस्य शरद नवले यांनी   वेळोवेळी सावध केले होते  राजकीयदृष्ट्या तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीतील  कारवाईकडे तालुक्याचे लक्ष होते.या कारवाई नंतर आता आणखी कुणावर कारवाई  होते याची चर्चा गावात सुरु असुन काँग्रेस सोबत जनता अघाडी यांच्या ताब्यात ग्रामपंचायतीचा कारभार आसताना  ईतका सावळा गोंधळ चालू असताना जनता अघाडीचे नेते गप्प का होते असाही सवाल विचारला जात आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget