Latest Post

श्रीरामपूर ( प्रतिनिधी  )-अहमदनगर गुन्हा अन्वेषन विभागाने लोणी पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या जुगार अड्डयावर छापा टाकुन 
रोख रक्कम , मोबाईल , दुचाकी व चार चाकी वाहनासह एकूण ४४,लाख  -रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असुन या कारवाई मुळे जुगारअड्डा चालकाचे धाबे दणाणले आहे 
राहता तालुक्यातील विविध गावांमध्ये जुगार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे अहमदनगरच्या गुन्हे अन्वेषण विभागाला समजल्यानंतर राहता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथे लोणी ते कोल्हार रोड लगत असणाऱ्या एका इमारतीच्या टेरेस वर चालू असलेल्या जुगार अड्ड्यांवर नगरच्या गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच धाड टाकून पोलिसांनी 44 लाख 17 हजार 790 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ,तसेच कोल्हार येथील या जुगार अड्ड्यावर सुमारे 41 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, यामध्ये मोठे प्रतिष्ठित व्यक्ती असल्याचे बोलले जात आहे,  पोलिसांच्या या  धाडीमुळे जिल्ह्यातील जुगार अड्ड्यावाल्यांना मोठी जरब बसली आहे,
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, अहमदनगरच्या गुन्हे अन्वेषण विभागाला, या विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना रविवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली होती की, कोल्हार परिसरात मुदस्सर शकील शेख रा,कोल्हार बुद्रुक हा कयूम करीम शेख याच्या इमारतीच्या टेरेसवर पंचवीस ते तीस लोकांना घेऊन तिरट नावाचा जुगार खेळत आहे, त्यानंतर पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी एक टीम तयार करून संबंधित इमारतीला घेतले तर काही कर्मचाऱ्यांनी येथे टेरेस गाठले ,त्यावेळी तेथे एक दोन नव्हे तर चार डाव सुरू होते, त्यामुळे हा एक टाईमपास गेम नव्हे तर हा जुगार असल्याचे पोलिसांना समजून आले, पोलिसांनी या ठिकाणी त्वरित छापा टाकून संबंधित जुगार खेळणारे आरोपींना ताब्यात घेतले, काही पळून जाण्यात यशस्वी झाले, मात्र या ठिकाणाहून पोलिसांनी एकूण 44 लाख सतरा हजार 790 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ,तसेच 41 व्यक्तींवर या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, या जुगार अड्यावरून दुचाकी, मोबाईल, जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, अन्य मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे, यातील बहुतांशी लोकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत , जुगार खेळणाऱ्या मध्ये शिर्डी, रुई, राहता, लोणी ,अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, श्रीगोंदा ,मनमाड, येवला,येथील जुगार्यांचा सामावेश आहे   विविध तालुक्यातून हे जुगार खेळणारे जुगारी प्रतिष्ठित असणारे लोक येथे येत होते, कोल्हार येथील जुगार अड्ड्यांवर झालेल्या कारवाईत चेतन विजय वाघमारे,( पिंपळस). मुद्दत शकील शेख.(कोल्हार बुद्रुक. )सागर बेदाडे, व अशपाक जमीर शेख (,मनमाड) ,दिलावर मन्सूर शेख ,(कोल्हार बुद्रुक,)
आरबाज राजू पठाण (,राहता) माहिद कयूम शेख, (कोल्हार बुद्रुक) बुबेरखान निसारखान पठाण संगमनेर ,आसिफ तसलीम शेख (कोल्हार बुद्रुक,) अरशद रशीद मोमीन( येवला), वसंतलक्ष्मणबडे( येवला ,)अमित गाडेकर (राहता ,)लालू मारुती चौधरी (अकोले), कयूम गुलाब पठाण( विसापूर, तालुका श्रीगोंदा,) नवाब हुसेन शेख लोणी, जाहीद दिलावर सय्यद (कोल्हार, )सय्यद अली मोहम्मद, जयहिंद गोविंद माळी( राहुरी,) विलास दत्तात्रय चोथे (वांबोरी ,)सागर मदनलाल वर्मा, (बेलापूर ,तालुका श्रीरामपूर,) गणेश विठ्ठल जेजुरकर( ,शिर्डी,) इम्राण याकुब मोमिन( मनमाड,) शकील सलीम शेख (कोल्हार,) नजीर अजीज शेख (राहुरी).
संतोष बाबुराव चौधरी (अकोले ,)शकील जबर शेख (कोल्हार बुद्रुक),
संजय कांतीलाल पटेल ,(कोल्हार,) नुमान सत्तार शेख (कोल्हार, )भाऊसाहेब रामराव चौधरी (रुई,तालुका राहता )
सचिन बाळाराम पवार (,कोल्हार ),अमोल भास्करराव वाघमारे. (विसापूर तालुका श्रीगोंदा,) गणेश रंगनाथ सोमासे .(येवला ),महेश अण्णा बरकल (,मनमाड.)आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास अहमदनगरचे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत. या मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकल्यामुळे जिल्ह्यातील इतर जुगार अड्डे ही व त्यांच्या मालकांवर आणि जुगार खेळणाऱ्यांवर मोठी जरब,भिती निर्माण झाली आहे,

श्रीरामपूर  (प्रतिनिधी  )-केंद्र शासनाने सुरु केलेल्या "एक देश एक रेशनकार्ड " या योजनेचा प्रचार व प्रसार व्हावा या करीता  श्रीरामपूर तहसील कार्यालय तसेच स्वस्त धान्य दुकान या ठिकाणी विशेष मोहीम राबविण्यात आली.शासनाच्या "वन नेशन वन रेशन " या योजनेंतर्गत आता रेशन कार्डधारकाला सोयी नुसार कुठल्याही धान्य दुकानात आपल्या हक्काचे धान्य खरेदी करता येणार आहे .या पूर्वी ज्या स्वस्त धान्य दुकानात संबंधित कार्डधारकाचे रेशनकार्ड होते त्याच स्वस्त धान्य दुकानातुन माल खरेदी करावा लागत होता. काही कारणास्तव कार्डधारक बाहेरगावी गेला तर पाँज मशिनवर अंगठा न देता आल्यामुळे संबधीत कार्डधारकाला अन्न धान्यापासुन वंचित रहावे लागत होते . अनेक नागरीक रोजगाराच्या शोधार्थ एका राज्यातून दुसर्या राज्यात एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात जात असत . त्या ठिकाणी रोंजदारीची कामे करत असताना त्या कुटुंबाचे रेशनकार्ड असुन देखील त्यांना चढ्या भावाने धान्य खरेदी करावे लागत होते . या बाबीचा शासनाने गांभीर्याने विचार करुन संपूर्ण भारत देशात "एक देश एक रेशनकार्ड "ही योजना सुरु करण्याची  संकल्पना सुरु केली . सुरुवातीला काही राज्यात प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरु केली . या योजनेला मिळालेला प्रतिसाद पहाता आता सर्वत्र ही योजना सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला . त्या करीता जिल्हा व तालुका पातळीवर या योजनेचा प्रचार व प्रसार करण्याच्या सुचना जिल्हा पुरवठा अधिकारी यांना देण्यात आल्या . अहमदनगरच्या जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी तातडीने सर्व उपविभागीय अधिकारी ,तहसीलदार यांना या योजनेची नागरीकांना माहीती देण्याच्या सूचना केल्या . त्यांच्या सुचनेनुसार श्रीरामपूर तहसील कार्यालय , तालुक्यातील धान्य दुकाने यां ठिकाणी फलकाव्दारे जनजागृती करण्यात आली उपविभागीय आधिकारी अनिल पवार, तहसीदार प्रशांत पाटील यांच्या सूचनेनुसार पुरवठा अव्वल कारकून चारुशिला मगरे , गोदामपाल शिवाजी वायदंडे , पुरवठा निरीक्षक अतुल भांगे , पुरवठा विभागाचे  शिवशंकर श्रीनाथ , धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई , लाला गदिया , नरेंद्र खरात  , माणिक जाधव, किशोर छतवाणी , दक्षता समितीचे संदीप वाघमारे यांच्या उपस्थितीत फलकाद्वारे या योजनेची माहीती लाभधारकांना देण्यात आली.

मुस्लिम समाजाला 10% आरक्षण संपूर्ण महाराष्ट्रात लागू करावे या मागणीसाठी श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथे
श्रीरामपूर शहर व तालूका मुस्लिम आरक्षण अधिकार कृती समिती यांनी आज ७ सप्टेंबर रोजी तहसीलदार श्रीरामपूर यांच्याद्वारे  मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, अल्पसंख्याक मंत्री महाराष्ट्र राज्य,सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री अहमदनगर याना निवेदन देण्यात आले.
श्रीरामपूर शहर व तालूका मुस्लिम आरक्षण अधिकार कृती समिती संस्थापक सदस्य,फहीम शेख,फय्याज इनामदार,नाजीम शेख,आसीफ शेख,मार्गदर्शक व मा,संचालक महाराष्ट्र राज्य ऊर्दु महामंडळ हाजीआरीफभाई बागवान,माजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक इब्राहीमभाई शेख,अर्शद.                     इनामदार,आबुजर खान,इकबाल शेख,अफजल मन्सुरी,राजु मलंग,जफर शेख,साजीद मिझा,अन्वर पठाण,अकील शेख,सादीक शेख,अकबर पठाण,जुल्फेकार बागवान,आसिफ बागवान व  श्रीरामपूर शहर व तालूका मुस्लिम आरक्षण अधिकार कृती समिती सदस्य हजर व त्यांच्या सह्या होत्या.

पुणे सुप्रसिद्ध अंध कवयित्री व अंध जनांसाठी भरीव असे सामाजिक कार्य करणाऱ्या डॉ. प्रतिभा मोरेश्वर भोळे यांचे 1 सप्टेंबर रोजी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे अल्पशा आजाराने निधन झाले. कोरोना  कालावधीमध्ये त्यांची अंत्यसंस्कार करणेदेखील दुरापास्त झाले होते. अशा वेळेला माणुसकीच्या दृष्टिकोनातून कोरोना कालावधी मध्ये काम करणाऱ्या मूलनिवासी मुस्लिम मंच या संस्थेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारून हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे डॉ. प्रतिभा भोळे यांचा अंत्यसंस्कार पुणे वैकुंठ स्मशानभूमी येथे करून जाती-धर्माच्या भिंतींना पुण्यामध्ये थारा राहणार नाही असे उदाहरण दाखवून दिले.मराठी सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत मानाचे स्थान असणाऱ्या ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांच्या नात असणाऱ्या प्रतिभा हे अंध असल्यामुळे साहित्य क्षेत्रात मोठा संघर्ष करावा लागला होता तरी देखील आपल्या प्रतिभा आणि सातत्याच्या जोरावर त्यांनीही कवयित्री म्हणून तसेच अंध व अपंग जनांसाठी काम करणारी  स्वयंसेविका म्हणून मोठे नाव कमावले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत शासकीय व खाजगी संस्थांमार्फत विविध स्वरुपाचे पुरस्कार मिळालेले आहेत.अत्यंत मोठा मित्र परिवार व नातेसंबंधातील गोतावळा असतानाही अखेरच्या क्षणी मात्र त्यांच्या पतीशिवाय कोणी सोबत राहिले नाही. पत्नी मेल्याचे दुःख असताना अंतिम संस्कार करण्यासाठी जवळचे मित्र व नातेवाईक कोणीही उपलब्ध नसल्यामुळे भोळे यांचे पती सुनील परमार यांनी मूलनिवासी मुस्लिम मंचाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधाला यावेळी मूलनिवासी मुस्लिम मंचाने देखील  अवघ्या 20 मिनिटांमध्ये डॉक्टर भोळे यांच्या मदतीला पोहोचले सर्व आवश्यक ते सोपस्कार पूर्ण करून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथून डेड बॉडी घेऊन पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले. मूलनिवासी मुस्लिम मंचं यांनी आतापर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या चारशे पेक्षा अधिक लोकांचे अंतिम संस्कार केलेले आहेत. यात मुस्लिम समाजा सोबतच हिंदू, ख्रिश्चन,लिंगायत,बौद्ध आदी सर्व धर्मीय लोकांचे अंतिम संस्कार केलेले आहे.जात-पात न पाहता मदत करणे हेच पुणेकरांचे वैशिष्ट्य असून सर्व मानवतावादी महापुरुषांची परंपरा पुढे चालवत आम्हीदेखील जात-धर्म विरहित काम करण्याचा कसोशीने प्रयत्न करत असल्याने आम्हाला सर्व लोकांचे सहकार्य मिळत आहे.सुप्रसिद्ध कवयित्री डॉक्टर प्रतिभा भोळे यांचा अंत्यसंस्कार आमच्या हातून होणे हे आमच्यासाठी भाग्याचे लक्षण आहे.असे आम्ही मानतो अशी भूमिका मनोगत मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार व त्यांचे सहकारी साबीर शेख तोपखाना, झमीर मोमिन, मोलाना शकिल शेख,साबीर सय्यद,दानिश खान,अमजद शेख व्यक्त केली.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- श्रीरामपूर तालुक्यातील दोन पुढार्यांचे मुद्द्यावरुन गुद्यापर्यत पोहोचलेले वाद पोलीस अधिकार्यांच्या साक्षीने मिटविण्यात टँक्सी असोसिएशनचे अध्यक्ष व बेलापूर पत्रकार संघाचे खजिनदार सुनिल मुथा यांना मिटविण्यात यश आले. जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व त्यांचा पुतण्या बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांच्यातील वाद तालुक्याला नव्हे तर जिल्ह्याला माहीती आहे दोनही नवले एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्यात अघाडीवर असत ग्रामपंचायत कार्यालया पासुन ते जिल्हा परिषदे पर्यंत वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने एकमेका विरोधात करण्यात आली होती दोघांचेही वाद अतिशय विकोपाला गेले होते कित्येक वेळा हमरा तुमरीचे प्रकार झाले होते काल तर या सर्वाचा कळस झाला ग्रामपंचायत कार्यालयात झालेली बाचाबाची लाठ्या काठ्या पर्यत पोहोचली दोघांच्याही नातेवाईकात भर चौकात हाणामारी झाली त्या नंतर तक्रार देण्याकरीता पोलीस स्टेशनला गेल्यावरही दोघांचेही नातेवाईक पुन्हा आपापसात भिडले त्याच वेळी बेलापूर पत्रकार सांघाचे खजिनदार सुनिल मुथा तेथे पोहोचले दोन्ही गटात चाललेल्या मारामार्या पोलीस उपनिरीक्षक उजे  बेलापूरचे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे साईनाथ राशिनकर निखील तमनर पोपट भोईटे हरिष पानसंबळ व सुनिल  मुथा यांनी बळाचा वापर करुन सोडविल्या त्या वेळी फार मोठा जमाव जमला होता आता दोघावरही गुन्हे दाखल होणार किती जणांना अटक होणार याची चर्चा रंगत असतानाच सुनिल मुथा यांनी शरद नवले व सुधीर नवले यांना घटनेच्या गांभीर्याची जाणीव करुन दिली तुमच्या दोघात असलेल्या वादाचे परिणाम   दोन पिढ्यांना भोगावे लागतील फालतु भांडणात तुमचे कुटूंब उध्वस्त होतील त्यामुळे दुरचा विचार करुन हे वाद सोडून द्या असे उपविभागीय अधिकारी राहुल मदने व सुनिल मुथा यांनी सुचविले अन उपविभागीय  पोलीस अधिकारी राहुल मदने पोलीस  निरीक्षक श्रीहरी बहीरट यांच्या समक्ष दोघांनीही आपापली चुक कबुल करत माघार घेतली सुनिल मुथा यांनी केलेल्या मध्यस्थीला यश आले अन दोन्ही नवले मधील कटूता कमी होवुन आपसात तडजोड झाली त्याबद्दल अनेकांनी मुथा यांना धन्यवाद दिले आहे.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- बेलापूर ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे त्यामुळे  महत्वाची कागदपत्रे गायब होण्याची दाट शक्यता असुन ग्रामपंचायतीची कागदपत्रे बाहेर गेलीच कशी ?महत्त्वाची कागदपत्रे  नेणार्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी केली आहे          ग्रामपंचायत कार्यालयाचे दप्तर व इतर कागदपत्रे जुळवा जुळव करण्यासाठी खाजगी ठिकाणी नेण्यात आली होती आम्ही त्या ठिकाणी पोहोचताच  संबधीत इसमांनी पळ काढला असे शरद नवले यांनी सांगितले आहे  ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यामुळे ग्रामपंचायतीवर एस एस गडधे यांची प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच ग्रामविकास आधिकारी संग्राम चांडे यांचीही बदली झाली असुन त्यांच्या जागी नविन ग्रामविकास अधिकारी तगरे हे हजर झाले आहेत बेलापूर ग्रामपंचायतीचा पदभार सोपविण्याकरीता टाळाटाळ केली जात असुन बोगस केलेल्या कामाची  कागदपत्रे ग्रामविकास अधिकारी व एक इसम जुळवा जुळव करण्यासाठी खाजगी ठिकाणी बसले असल्याची माहीती जिं प सदस्य शरद नवले यांना मिळताच अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे भाजपाचे शहराध्यक्ष प्रफुल्ल डावरे यांना घेवुन नवले संबधीत ठिकाणी गेले असता ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतीचा कर्मचारी व आणखी दोन इसम त्या ठिकाणी कागदपत्राची जुळवा जुळव करत असल्याचे नवले यांच्या लक्षात आले आम्हांला पहाताच त्या दोन इसमानी एका दरवाजाने व ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी दुसर्या दरवाज्याने पळून गेल्याचे नवले व खंडागळे यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले त्या नंतर आपल्या सहकार्यासह नवले ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचले  प्रशासक गडधे व नविन आलेले ग्रामविकास अधिकारी तगरे यांना ग्रामपंचायत कार्यालयातील दप्तर व महत्वाची कागदपत्रे बाहेर गेलीच कशी कुणाच्या परवानगीने ही कागदपत्रे कार्यालयाच्या बाहेर गेली असा सवाल जि प सदस्य नवले यांनी केला असुन आडीच वर्षाच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार करण्यात आला आहे अधिकार्यांना हाताशी धरुन बोगस कामाची बिले काढण्यात आलेली आहे त्या बाबत तक्रारी दाखल झाल्या असुन संबधीत ग्रामसेवक व इतरावर कारवाई होणारच आहे त्यामुळे बोगस कामाच्या कागदपत्राची जुळवा जुळव करण्यासाठीच महत्वाची कागदपत्रे बाहेर नेली असुन संबधीतावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जि प सदस्य शरद नवले यांनी केली आहे.

दिनांक ०१/०९/२०२० रोजी श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक,श्रीरामपुर शहर पोस्टे यांना गुप्त
बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन हदीत संजयनगर वार्ड नं २
श्रीरामपुर परिसरात एक इसम गांजा घेवुन येणार आहे अशी माहिती मिळालेने सदर ठिकाणी पोलीस पथकाने
सापळा लावुन इसम नामे कमलेश उत्तम पवार वय २३ वर्षे रा.अहिल्यानगर,वॉर्ड नं.२,श्रीरामपुर यास ताब्यात घेतले
असुन त्याचेकडुन ६७,०००/- रुपये किंमतीचा उग्र व वर्ष वासाचा गुंगीकारक गांजा मिळुन आला असुन त्याचेविरुद्ध
श्रीनामपुर शहर पोस्टेला गु.र.नं. ।। १६६४ /२०२० एन.डी.पी.एस.अॅक्ट १९८५ चे कलम ८क), २०(य)(२)(ब) प्रमाणे
गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदरचा गांजा कोठून आणला असुन तो कोणास विक्री करणार आहे याबाबत
अधिक माहीती घेत असून पुढील तपास करत आहोत.
सदरची कारवाई मा.श्री.अखिलेश कुमार सिंह साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. डॉ.दिपाली काळे,
अपर पोलीस अधिक्षक,श्रीरामपुर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली मा.श्री.राहुल मदने, उपविभागीय पोलीस
अधिकारी, श्रीरामपुर विभाग , श्रीरामपुर शहर पोस्टेचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांचेसह सपोनि' समाधान
पाटील, तपास पथकाचे पोसई। संतोष बहाकर,पोहेकॉ। जे.के. लोटे, पोका/ सुनिल दिघे, पोकॉ। गणेश गावदे, पोकों।
महेंद्र पवार, पोकॉ/ अर्जुन पोकळे, पोकॉ. पंकज गोसावी, पोकॉ/ किशोर जाधव, मपोको/ अर्चना वई यांनी केली आहे.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget