Latest Post

नेवासा : नेवासा -नेवासा फाटा रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयासमोर राहत असलेले माजी प्राचार्ज रघुनाथ आगळे यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून चोरट्यांनी सात तोळे सोन्याचा ऐवज लुटल्याची घटना शनिवारी (दि.२२) रोजी मध्यरात्री घडली. यावेळी एक महिला जखमी झाली आहे.संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातून रघुनाथ आगळे हे २००३ साली सेवानिवृत्त झाले आहेत. शनिवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास रात्री झोपेत असताना अचानक दरवाजा वाजल्याच्या आवाज आला. यावेळी  आगळे यांच्या पत्नीने हॉलमध्ये येऊन पती रघुनाथ आगळे यांना उठविले. याचवेळी  घराचे दार तोडून चार अनोळखी व्यक्तींनी घरात प्रवेश केला. त्यापैकी एकाच्या हातात लाकडी दांडके तर दुसºयाच्या हातात काहीतरी धारदार हत्यार होते. त्यातील एकाने श्री व सौ. आगळे  यांना गप्प बसा अन्यथा तुम्हाला जीवे ठार मारू अशी धमकी दिली. सौ. आगळे यांच्या गळ्यातील गंठण तोडून घेतले. तर दुसºयाने हातातील सोन्याची बांगडी ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र बांगडी निघाली नाही. त्यामुळे त्याने हातात असलेल्या धारदार शस्त्राने ती बांगडी कापली. त्यावेळी सौ.आगळे यांच्या हाताला जखम झाली. त्यावेळी आगळे यांनी आरडाओरडा केल्याने बाहेर उभा असलेल्या चोरट्यांच्या साथीदाराने लवकर आवरा कोणीतरी येत आहे असे सांगितले. त्यावेळी हातातील कापलेली बांगडी खाली पडली. ती तशीच सोडून चारही चोरटे घराबाहेर पळून गेले. आरडाओरडा करीत आगळे हे त्यांच्या मागे पळाले असता घराच्या मागील बाजूच्या कंपाऊंडवरून उड्या मारून पाच जण पळून जातांना त्यांना दिसले. चोरट्यांनी १ लाख ४० हजार किंमतीचे सात तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी लांबविले आहे. याबाबत आगळे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याबाबत दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

बुलडाणा - 22 ऑगस्ट
हातनी ते दूधा या राष्ट्रीय माहामार्गा वरील घाटनांद्रा गावा जवळ बायपाससाठी शेत जमीनीचे भूसंपादन करु नये, अशी आग्रही मागणी करीत घाटनांद्रा येथील 7 शेतकऱ्यांनी सामूहिक उपोषण किंवा आत्महत्या करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
     बुलडाणा तालुक्यातील घाटनांद्रा  येथील शेतकऱ्यांनी याबाबत 21 ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,राष्ट्रीय महामार्ग क्र.753 चिखली ते भोकरदन म्हणजे हातनी ते दूधा या रस्त्यासाठी घाटनांद्रा गावाजवळ संबंधित विभाग बायपास करणार आहे.परंतु या बायपाससाठी आमच्या शेत जमीन अधिग्रहित केली जाणार,या ठीकाणी 3 पक्क्या विहीरी व 1 बोअरवेल आहे. या रस्त्यात पुर्वी सुध्दा आमची जमीनी गेल्याने आम्ही आगोदरच अल्पभूधारक झालो. पुर्वीचा रस्ता असतांना शासन नाहक बायपास रस्ता काढण्याबाबत नोटीस देत आहे. 14 जुलैला हरकत तक्रार अर्जाच्या अनुषंगाने उपअधिक्षक भूमि अभिलेख बुलडाणा कार्यालयातून कोणत्याच प्रकारची विचारपूस झाली नाही,असे निवेदनात म्हटले आहे.पुर्वीचा रस्ता कायम ठेवून विकसीत करण्यात यावा,नवीन बायपास करण्यात येवू नये,अन्यथा आम्ही परिवारासह उपोषण किंवा आत्महत्या करू, असा इशारा शेतकरी दत्तू विठ्ठल पुरी, सुभाष भुसारी, गजानन भुसारी, भावराव भुसारी,भाऊसिंग सोळंके, मधुकर भुसारी, शेषराव भुसारी यांनी दिला आहे.

बुलडाणा - 19 ऑगस्ट
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या सभांमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षात असताना काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस यांनी खांद्यावर घोंगडी व डोक्यात पिवळे फेटे बांधून विधानसभेत धनगर आरक्षण मागत होते.आता हेच सत्तेत बसून एक वर्ष होऊन गेले पण धनगर आरक्षणाबद्दल तोंडात शब्द काढत नाही.ही राज्यातील दीड कोटी धनगर समाजाची अवहेलना आहे.या विरोधात जय मल्हार सेनेने 13 ऑगस्ट पासुन राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतलेला आहे.त्यामध्ये राज्यभरातून धनगर समाजाच्या वतीने 11 लाख पोस्टकार्ड मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे.आता पर्यंत 4 लाख पोस्टकार्ड पाठविले असून बुलडाणा जिल्ह्यातून 21 हजार कार्ड पाठवणार आहे. या माध्यमाने सत्तेतील नेत्यांना धनगर आरक्षणाची आठवण करून देणार आहेत.या संदर्भात आज 19 ऑगस्ट रोजी बुलडाणा येथील विश्राम भावनात जय मल्हार सेनेच्या वतीने पत्रकार परिषदचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी सरसेना पती लहु शेवाळे,श्रीमती रंजनाताई बोरसे,नामदेव बाजोडे,संतोष वरखेड़े,धोंडीराम गोयकर व इतर समाज बांधव हजर होते.

🔹नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी
बुलडाणा - 19 ऑगस्ट
मागील दीड ते दोन वर्षापासून बुलडाणा जिल्ह्यातील हातनी ते दुधा या राष्ट्रीय महामार्गाचे निर्माणकार्य संथ गतीने सुरू आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचा फटका मागच्या वर्षी अनेक शेतकऱ्यांना बसला होता तर यावर्षीही नियोजनशून्य कामामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे.
      मागील दोन-तीन दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे.अशात 17 ऑगस्ट रोजी बुलडाणा तालुक्यातील रायपूर परिसरात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. हातनी ते दूधा या रायपूरहुन जाणाऱ्या मार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्याच्या बाजूला व्यवस्थित नाल्या केल्या नाही,त्यामुळे पावसाचे पाणी अनेक शेतात शिरल्याने उभे पीक व शेतजमीन वाहून गेली आहे. रायपूर येथील शेतकरी तजम्मुल हक जियाउल हक यांच्या 3 एकर शेतात गोबी,कोथिंबीर व इतर भाजी पाल्याची लागवड त्यांनी उसनवारीने पैशे घेऊन केली मात्र त्यांच्या शेतात पाणी घुसले व पूर्ण पिक पाण्यात बुडाल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले असून ठेकेदाराने त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी तजम्मुल हक यांनी केली आहे.

बुलडाणा - 17 ऑगस्ट
बुलडाणा तालुक्यातील सैलानी परिसरात रात्रीपासून जोरदार पाऊस पडत असल्याने इतिहासात पहिल्यांदा येथील नदी-नाले पाट सोडून वाहत होते. अनेक घरात सैलानी येथे हे पाणी शिरले होते तर दुपारी चार वाजेच्या सुमारास सैलानी येथील बाग जाली परिसरात एक वेडसर इसम शाहनवाज कुरेशी वय 35 वर्ष राहणार बीड हा नाल्यातील पुराच्या पाण्यात वाहून गेला त्याला एका ठिकाणी पुलावर काही लोकांनी पकडण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने त्याला वाचण्यास अपयश आले. जवळपास पाचशे मीटर पुढे शेख अफसर मुजावर यांच्या म्युझियम जवळ एका एंगलला पकडन्यास त्याला यश आले. ही गोष्ट काही लोकांच्या लक्षात आली परिसरात भरपूर पाणी होता चार ते पाच फुटापर्यंत पाणी असल्याने त्याला वाचवँयाची हिम्मत शेख शोएब शेख अफसर मुजावर, शेख अरबाज शेख अफसर मुजावर, शेख हारून शेख सुल्तान ,कैलाश चव्हाण व सुदामा गवारे या पाच लोकांनी दाखवली व रस्सी बांधून ते पाण्यात पोहोचले व पाण्यात पडलेल्या या इसमाला वाचवून बाहेर आणले. अशा प्रकारे या युवकांनी एका वेडसर इसमाला वाहत जात असताना वाचवले आहे. या धाडसी युवकांचे पंचायत समिती सदस्य शेख चांद मुजावर सह ग्रामस्थाननी कौतुक केले आहे.

बुलडाणा - 16 ऑगस्ट
कोरोना संसर्गाच्या संकटकाळात जिल्हा यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक बातमी जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याऱ्या पत्रकारांना स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी येथील जमीअत उलमा -ए- हिन्द बुलडाणा जिल्हा शाखाच्या वतीने आरोग्यवर्धक मालेगावच्या प्रसिद्ध मंसूरा काढाचे वाटप पत्रकार भवन येथे करण्यात आले आहे.
    बुलडाणा शहर व जिल्ह्यात कोरोना विषाणुने कहर केला आहे. दोन हजारावर पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या पोहचली.या कोरोना माहामारीच्या काळात मात्र कोरोना योद्धयाची भूमिका पार पाडत रस्त्यावर उतरलेला पत्रकार आपली नैतिक जबाबदारी म्हणून जनतेपर्यंत प्रत्येक घटनेची बातमी पोहोचवत आहे. या कोरोना योद्धांची प्रतिकार शक्ति वाढ़ावी या उद्देशाने बुलडाणा शहरातील सर्व पत्रकार बांधवांना जमीअत उलेमा-ए-हिंद,शाखा बुलडाणा जिल्हाच्या वतीने मालेगांवचा मंसूरा काढा वाटप करण्यात आला आहे.हा काढा महेफिल-ए-यारां ग्रुप मालेगांवच्या वतीने जमीअतला देण्यात आला होता.पत्रकार भवन येथे काढा वाटप करतांना जमीअत उलेमा बुलडाणा जिलाध्यक्ष हाफिज़ शेख खलीलउल्लाह,उपाध्यक्ष मौलाना ज़िया,हाफिज़ इरफान,अंसारी मो मतीन,हाफिज़ अफरोज़ व इतर सदस्य हजर होते.

बुलडाणा - 16 ऑगस्ट
तालुक्यातील डोंगरखंडाळा येथे एका 27 वर्षीय युवकाने घरासमोरील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल रात्री समोर आली आहे.
       बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम डोंगरखंडाळा येथील राहणारे 27 वर्षीय संदीप गोविंदा पवार यांनी काल 15 ऑगस्टच्या रात्री 8 वाजेच्या सुमारास आपल्या घरासमोरील शेवग्याचा झाडावर दुपट्टा बांधून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट काही लोकांच्या लक्षात येताच त्यांनी संदीपला फासावर लटकलेला अवस्थेतून खाली काढले व तात्काळ वरवंड येथील प्रा.आरोग्य केंद्रात नेले तेव्हां तो श्वास घेत होता मात्र अधिक उपचारची गरज होती म्हणून बुलडाण्यात जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरने त्याला मृत घोषित केले. याबाबत बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. घरगुती वादातून संदीपने ही  टोकाची भुमिका घेतल्याचे बोलले जात आहे. पुढील तपास ठाणेदार सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार रमेश बंसोड व जनार्धन इंगळे करीत आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget