Latest Post

       
अहमदनगर दि.२०- भारतीय सैन्य दलातून बडतर्फ असतानाही सैन्य दलाचा युनिफॉर्म, बनावट ओळखपत्र व चिन्ह वापरून फसवणूक करणाऱ्यास पोलिसांनी पकडण्यात आले. प्रशांत भाऊराव पाटील (वय३२, रा.रवळनाथरोड, कुकतागिरी, खानापूर, बेळगाव राज्य कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही महत्त्वपूर्ण कारवाई मिलेट्री इंटेलिजन्स व एलसीबीची संयुक्त पथकाने केली. 

बुलडाणा - 21 जून
गुम्मी वन वर्तुळ मधुन एका प्रकरणात जप्त करण्यात आलेले लाकुड विनापरवानगी घेऊन जाणाऱ्या ट्रकला बुलडाणा वन विभागाने पकडले असून 3 आरोपी अटक करण्यात आले असून एवढा धाडस करणारा मुख्य लाकुड तस्कराला पकडने वनविभागासाठी चैलेंज ठरणार असल्याची चर्चा रंगत आहे.
    प्राप्त माहितीनुसार बुलडाणा वन परिक्षेत्र अंतर्गतच्या गुम्मी वर्तुळ मधील ग्राम तराडखेड
 शिवारात एका शेतातील मोहा झाडांची 10 मे 2020 रोजी विनापरवानगी अवैधरित्य कटाई केल्याची माहिती वनविभागाला मिळाल्याने सदर ठीकाणी अंदाजे 5 टन लाकुड जप्त करुण धाड येथील शेख शाकिब शेख मोबीन व इतर 4 अशे 5 आरोपींवर वन गुन्हा दाखल करून आरोपी शाकिबला अटक करण्यात आले होते.या कार्रवाईतील जप्त लाकुडला जप्ती हैमर मारून वनविभागाने तब्यत घेतले व सदर लाकुड त्याच ठीकाणी ठेवलेले होते.काल 20 जूनच्या रात्री सदर जप्त लाकुड एका ट्रक मध्ये भरले जात आहे,अशी माहिती वन विभागाला मिळताच बुलडाणा डीएफओ संजय माळी,एसीएफ रणजीत गायकवाड व आरएफओ गणेश टेकाळे यांच्या मार्गदर्शनात वनपाल के.बी.शेख,वनरक्षक समाधान मान्टे, संदीप मडावी हे रात्री तराडखेड शिवारात पोहोचले असता त्यांना ट्रक क्र.एमएच-19-झेड-5635 मध्ये आगोदरच जप्त केलेले लाकुड भरलेले दिसून आले.मोका स्थळावरुन उडनगांव ता. सिल्लोड जि.औरंगाबाद यांना ताब्यात घेऊन लाकुडसह सदर ट्रक जप्त करुण बुलडाणा येथील शासकीय लाकुड आगारात जमा करण्यात आले असून सद्या 3 आरोपी विरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरचे आगोदरच जप्त असलेले लाकुड अवैधरित्य कोणी विकला आहे का? आता हे समोर येणे महत्वाचे ठरणार आहे.

बुलडाणा - 21 जून
शिव प्रतिष्ठाणचे धारकरी विजय लहाने वय ७३ वर्ष यांनी १९ जून रोजी सायंकाळी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. तर २० जून रोजी ४० वर्षीय राकेश नारडीया यांनी आपल्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली आहे. शहरात दोन दिवसात दोन जणांनी आत्महत्या केल्याच्या या वृत्ताने बुलडाणा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
        बुलडाणा शहरातील जुनागांव परिसरातील ३७ वर्षीय विजय लहाने हे शिव प्रतिष्ठानचे धारकारी होते. त्यांनी १९ जून रोजी सायंकाही जुनगावातील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी बुलडाणा शहर ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तर दूसरी घटना ही येथीलच जुनागांव लगत असलेल्या मलकापुर रोड वरील ४० वर्षीय राकेश नारडिया यांनी २० जून रोजी आपल्या घरात गळफास घेवून आपली जीवन यात्रा संपविली. रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना समोर आल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. शहर  पोलिस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. या दोन्ही घटनांचा अधिक तपास बुलडाणा शहर पोलिस करीत आहे.

हळगाव : जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे बारावीच्या विद्यार्थीनीचा मुतदेह एका विहीरीत आढळुन आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.मुक्ता संभाजी वारे असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. सदर घटना ऑनर किलींगचा प्रकार आहे की खुनाचा यादृष्टीने जामखेड पोलिस अधिक वेगाने तपास करत आहेत. या प्रकरणात एका संशयिताला चौकशीसाठी जामखेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील डोणगाव येथील मुक्ता संभाजी वारे ही विद्यार्थीनी गुरूवारी दुपारी बेपत्ता झाली होती. शुक्रवारी ती बेपत्ता असल्याची तक्रार मयत मुलीचे आजोबा शहाजी कोंडिबा यादव यांनी पोलिसात दाखल केली होती. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास बेपत्ता तरूणीचा मृतदेह डोणगाव शिवारातील अशोक यादव या शेतकर्याच्या शेतातील विहीरीत आढळून आला.जामखेड पोलिस स्टेशनला मुलीचे वडील संभाजी वारे यांनी खबर दिली होती.मयत मुक्ता वारे ही विद्यार्थीनी लहाणपणापासुन डोणगाव या
आपल्या आजोळी राहण्यास होती. तीने यावर्षी बारावीची परिक्षा दिली होती. तीचे मुळगाव जामखेड तालुक्यातील रत्नापुर आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, हेड काँस्टेबल शिवाजी भोस , काँस्टेबल विष्णू चव्हाण, बाजीराव सानप, अजय साठे, शशिकांत म्हस्के, पोलिस मित्र अमोल यादव, शुभम यादव, पोलिस पाटील बिभीषण यादव यांनी भेट देत विहीरीतून मृत विद्यार्थीनीचा मृतदेह बाजेच्या सहाय्याने बाहेर काढला. मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी जामखेडच्या ग्रामीण आरोग्य रूग्णालयात पाठवण्यात आला आहे.सदर विद्यार्थीनीच्या मृत्यूप्रकरणाचा तपास अधिक वेगाने जामखेड पोलिस करत आहेत.या प्रकरणात डोणगाव - अरणगाव परिसरातून एका संशयित तरूणास पोलिसांनी ताब्यात घेतले असुन त्याच्याकडून कसून चौकशी केली जात आहे.

श्रीगोंदा दि.२०- तालुक्यातील येळपणे येथील खंडोबा मंदिरात चोरी करणारे सराईत चोरटे मुद्देमालासह पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. हर्षद उर्फ हर्षा हबऱ्या  काळे(वय२९,रा.देवळगावसिद्धी,ता.जि.अहमदनगर), संतोष उर्फ सक्तेश रकड्या भोसले (वय २९, रा.देलवाडी, ता.दौंड, जि.पुणे), श्रीखंड्या जिवालाल चव्हाण (वय ३५, रा.रेणुकामाता मंदिरमागे,केडगाव,अहमदनगर),भिवसेन रखमाजी पडोळकर (रा.देऊळगावसिद्धी, वाघमोडेवस्ती,ता.जि.अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे असून, याच्यात अजून एक अल्पवयीन आरोपी आहे.याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.१३ जूनच्या रात्री येळपणे (ता.श्रीगोंदा) गावाजवळील बंद खंडोबा मंदिराच्या दरवाज्याचा अज्ञात चोरट्यांनी कडीकांयेडा तोडून आतील लोंखडी तिजोरीतील १ लाख ७० हजार रु.किंमतीचे चांदीचे व पिताळी पंचधातूचे खंडोबा देवाचे मुखवटे, चांदीचे लहान घोडे, सोन्याचा बदम, दोन मनीमंगळसूत्रासह अन्य मुद्देमाल चोरीप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता,जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेकुमार सिंह यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पो.नि.दिलीप पवार यांचा तपास सुरु होता. या दरम्यान, पो.नि. पवार यांना तांत्रिक व गोपनीय माहितीनुसार हा गुन्हा हर्षा काळे (देवळगावसिद्धी) याने व त्याच्या साथीदाराने केल्याची माहिती मिळाली. ठिकाणी जाऊन पोलिसांनी आरोपींच्या वास्तव्याबाबत माहिती काढली, यात देवळगावसिद्धी येथील डोंगरात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथके तयार करून सापळा लावून आरोपी हर्षा काळे याला पाठलाग करून पकडले. गुन्ह्याबाबत आरोपी काळे याला विचारल्या प्रथम उडावाउडवीची उत्तरे दिली. तद्नंतर पोलीस खाक्या दाखविताच, गुन्हा हा साथीदार संतोष उर्फ सक्तेश रकड्या भोसले (वय २९, रा.देलवाडी, ता.दौंड, जि.पुणे), श्रीखंड्या जिवालाल चव्हाण (वय ३५, रा.रेणुकामाता मंदिर मागे, केडगाव, अहमदनगर) आणि एक (अल्पवयीन) असे मिळून केल्याचे सांगितले. या सर्वांना पोलीसांनी ताब्यात घेतले.आरोपी हर्षद काळे व श्रीखंड्या जिवालाल चव्हाण याने ३ हजार रु.किंमतीचा ५ किलो २६६ ग्रँम वजनाचा पितळी पंचधातूचे मुखवट, पितळी प्लेट काढून दिल्याने रितसर पंचनामा करून जप्त करण्यात आले.उर्वरित चोरीचा माल भिवसेन रखमाजी पडोळकर (रा.देऊळगावसिद्धी, वाघमोडे वस्ती ता.जि.अहमदनगर) याला विक्री केल्याचे सांगितले. त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून ६७ ग्रँम वजनाचे २ हजार ६८० रु.चे सहा चांदीचे घोडे पंचनामा करून ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरण्यात आलेली ४० हजार रु.कि.ची शाईन दुचाकी आरोपी हर्षा काळे याच्या कडून जप्त केली, असा एकूण ४५ हजार ६८० रु.चा मुद्देमाल आरोपींकडून जप्त केला. पकडण्यात आलेले सर्वच आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. यात हर्षा काळे याचावर पारनेर, बेलवंडी व नगर तालुका पोलीस ठाण्यात तर श्रीखंड्या चव्हाण याचा वर कोतवाली, श्रीगोंदा, नगर तालुका पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेकुमार सिंह, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव मार्गदर्शनाखाली कर्जत विभागाचे पोहेकाँ अंकुश ढवळे, स्था.गु.शा.चे संदीप पवार यांना माहिती मिळाली. यानंतर पो.नि.दिलीप पवार यांच्या पथकातील सपोनि संदीप पाटील, पोहवा दत्तात्रय हिंगडे, विजयकुमार वेठेकर, पोना संदिप कचरु पवार, संदिप पोपट पवार, भागिनाथ पंचमुख, रविंद्र कर्डीले, पोकाँ विनोद मासाळकर, योगेश सातपुते, सुरज वाबळे, मेघराज कोल्हे, पोना दीपक शिंदे, रविकिरण सोनटक्के, चापोहवा बाळासाहेब भोपळे आदिच्या पथकाने ही कारवाई केली.

श्रीरामपूर  (प्रतिनिधी  )- गरीब कल्याण योजनेंतर्गत धान्य दुकानदारा मार्फत वाटप करण्यात आलेल्या धान्याचे प्रति क्विंटल १५० रुपये या प्रमाणे कमिशन दुकानदारांना दिले जाणार असुन अन्न पुरवठा विभागाने तसे आदेश दिले असल्याची माहीती जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी दिली आहे      केंद्र शासनाच्या गरीब कल्याण योजनेंतर्गत माहे एप्रिल मे व जुन महीन्यासाठी कार्डधारकांना प्रति व्यक्ती  पाच किलो तांदूळ मोफत वितरीत करण्यात आला होता या मोफत वितरीत केलेल्या धान्याचे कमिशन दुकानदारांना तात्काळ देण्यात यावे तसेच कोरोना संकटात काम करणार्या धान्य दुकानदारांना विमा सुरक्षा कवच देण्यात यावे अशी मागणी आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँपकिपर्स फेडरेशनने केली होती या मागणीसाठी संघटना १जुन पासुन संपावर गेलेली होती मात्र वित्त मंत्री नामदार अजित दादा पवार यांनी संघटनेचे  पदाधिकारी गणपतराव डोळसे निवृत्ती कापसे  यांच्या बरोबर चर्चा करुन मागण्या मान्य करण्याचे अश्वासन दिले होते फेडरेशनने मागणी केल्याप्रमाणे अन्न व नागरी पुरवठा विभागाने धान्य दुकानदारांना गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत वाटप  केलेल्या धान्याचे प्रति क्विंटल १५० रुपये या प्रमाणे कमिशन देण्याचे आदेश दिले असुन स्वस्त धान्य दुकानदारांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात येणार आहे गरीब कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यातील जवळपास साडे सहा लाख कुटुंबाना १८८३ धान्य दुकानदारांच्या माध्यमातून मोफत धान्याचे वितरण करण्यात आले आहे धान्य दुकानदारांना कमिशन मिळवुन दिल्याबद्दल फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर सचिव बाबुराव ममाणे खजिनदार विजय गुप्ता निवेत्ती कापसे गणपतराव डोळसे  नितीन पेंटर मुबारक मौलवी आदिंचे अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात येत असल्याचेही देसाई  यांनी म्हटले आहे.

श्रीरामपूर -  आपल्या शेजारील राष्ट्र चीनने लद्दाखच्या गलवान वॅली मधे कब्जा करण्याच्या उद्देशाने भारतीय जवानांवर केलेल्या भ्याड हल्यात  20 जवान शहीद झाले या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजा कडुन शुक्रवारच्या नमाज नंतर मौलाना आझाद चौक  येथे निषेध सभा झाली. 
 मोदी सरकारच्या काही नितींचा विरोध असला तरी देशाच्या संरक्षण आणि आत्मसन्माना साठी सगळा मुस्लिम समाज आणि सर्व भारतीय हे सरकारच्या पाठीशी उभे आहे. शहीद जवानांचा सरकारने बदला घ्यावा, चीन सोबत असलेले सगळे आर्थिक संबंध  तोडण्यात यावे  यासाठी गरज पडल्यास संपूर्ण समाज तन मन धनाने देशासोबत आहे असे संविधान समितीचे संयोजक अहमदभाई जहागिरदार यांनी सांगितले.
यावेळी शहर काझी मौलाना अकबर अली, एम आय एम चे साजिद मिर्झा, आरिफ बागवान, डॉ. सलीम शेख, समाजवादीचेजोएफ जमादार यांची भाषणे झाली
प्रास्ताविक फिरोज दस्तगिर यांनी केले. 
मुन्नाभाई पठाण, नागेश भाई सावंत, पत्रकार असलम बिनसाद, फिरोज पठाण, भाजपचे फहीम शेख,एम आय एम चे नाझीम शेख, जावेद तांबोळी,आदिल मखदुमी,इफ्तेखार शेख, शाहीद कुरेशी, सलिम झुल्ला, मुस्तकीमबागवान,नाजिश शहा, इकबाल रमजान, अबु पेंटर नदिम तांबोळी असे बरेच बांधव उपस्थित होते. 
शेवटी दोन मिनिटे मौन पाळून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget