Latest Post

अहमदनगर : जिल्ह्यात आणखी चार कोरोनाचे रुग्ण आढळून आले. सकाळी तीन आणि सायंकाळी आणखी चार रुग्ण आढळून आले. त्यापैकी दोन जण हे एस. टी. महामंडळात चालक आहेत. दिवसभरात आज सात रुग्ण आढळून आले आहेत. पुण्याहून निमगाव पागा (संगमनेर) येथे आलेल्या ३८ वर्षीय व्यक्तीला कोरोनची बाधा झाली आहे. कोल्हेवाडी (संगमनेर) येथील१८ वर्षीय युवती बाधित आढळून आली आहे.  माणिकदौंडी (ता. पाथर्डी) येथील ३३ वर्षीय व्यक्तीला कोरोनची लागण झाली आहे. कुर्ला नेहरूनगर, मुंबई येथे चालक म्हणून काम करत होता. नगर तालुक्यातील भोयरे पठार येथील ३३ वर्षीय व्यक्तिलाही कोरोणाची लागण झाली आहे. ही व्यक्तीही मुंबई येथे चालक म्हणून काम करीत होती.आज सकाळी ०३ बाधित व्यक्ती आढळल्या. पुण्याहून कर्जत तालुक्यातील राशीन येथे आलेल्या 60 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. कांदिवली (मुंबई) येथून प्रवास करून पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आलेल्या 68 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित झाली. संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील 34 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह. आजाराची लक्षणे जाणवू लागल्याने उपचारासाठी झाला होता दाखल. याशिवाय, संगमनेर येथील दोघा जणांचा अहवाल खाजगी प्रयोगशाळेत १४ जून रोजी पॉझिटिव्ह आला होता. तसेच नवनागापूर अहमदनगर येथील एका व्यक्तीचा अहवाल नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पॉझिटिव्ह आला आहे. या तीन रुग्णांची आयसीएमआर पोर्टल वर जिल्ह्याच्या संख्येत नोंद झाली आहे. त्यामुळे या तीन रुग्णांची भर जिल्ह्याच्या एकूण  रुग्ण संख्येत पडली आहे.

बेलापूर  ( प्रतिनीधी )ट्रँक्टरचा भिंतीला धक्का लागुन भित पडून त्या भिंतीखाली दबुन दोन लहान मुलींचा दुर्दैवी मृत्यू झिल्याची हृदयद्रावक घटना गायकवाड वस्ती येथील बोंबले वस्तीवर घडली                      या बाबत सविस्तर वृत्त असे की बेलापूर बु! येथील बोंबले वस्ती या ठिकाणी कसबे यांच्या नविन घराचे बांधकाम चालु होते घराच्या भिंतीचे दहा फुट बांधकाम पुर्ण झाले होते त्या शेजारीच गांगुर्डे यांचा प्लाँट आहे या ठिकाणी  ट्रँक्टरच्या सहाय्याने विटा टाकण्याचे काम चालु होते ट्रँक्टर सरकल्यामुळे तो नविन बांधकाम केलेल्या भिंतीवर आदळला त्यामुळे ती भिंत कोसळली त्या भिंती लगतच ऋतुजा बाळासाहेब गांगुर्डे वय ४ वर्ष वा शृतीका बाळासाहेब गायकवाड वय ६ वर्ष या मुली खेळत होत्या ट्रँक्टरच्या धडकेने विटाचे बांधकाम असलेली भिंत या दोन लहान चिमुरड्यांच्या अंगावर कोसळली त्यात दोघीही जागेवरच गतप्राण झाल्या घटनेची माहीती समजताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आमदार लहु कानडे सचिन गुजर करण ससाणे यांनी गायकवाड  व गांगुर्डे यांच्या घरी जावुन सांत्वन केले या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावर राहणारे अरुण नवनाथ धनवटे वय वर्ष २९ याने राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या केली  आत्महत्येचे निश्चित कारण समजु शकले नाही नवनाथ ढोल पार्टी नावाचे त्यांचे ढोल पथक आहे बर्याच दिवसापासून त्यांच्या हाताला कामच नव्हते त्यामुळे त्याची पत्नीही पुण्याला माहेरी रहात होती सकाळी जेवण करुन अरुण नेहमी प्रमाणे खोलीत गेला घरच्यांना वाटले तो झोपला असेल परंतु एक वाजण्याच्या सुमारास खोलीत डोकावले असता त्याने गळफास घेतल्याचे लक्षात आले या घटने बाबत तातडीने बेलापूर पोलीसांना  खबर देण्यात आली बेलापूर पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर ही घटना घडली बेलापूर पोलीस स्टेशनचे राशीनकर रामेश्वर ढोकणे निखील तमनर पोपट भोईटे आदिंनी तातडीने पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला बेलापूर येथील स्मशानभुमीत त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात पत्नी आई वडील भाऊ भावजयी असा परिवार आहे.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- दमदार पावसामुळे बेलापूर  बु!!ते वळदगाव या रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली आसुन आमदार निधीतुन हा रस्ता दुरुस्त केला जावा अशी मागणीआर पी आयच्या कार्यकर्त्यानी केली आहे  आर पी आयच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की जोरदार झालेल्या पावसामुळे या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली असुन शेतकऱ्यांना शेतीवर जाण्यासाठी याच रास्त्याने जावे लागते पावसामुळे या रस्त्याने पायी चालणेही अवघड झाले असुन आमदार लहु कानडे यांनी या रस्त्यास निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी रमेश अमोलीक विश्वासराव अमोलीक राजेश अमोलीक दिपक अमोलिक यांनु केली आहे.

बेलापूर  ( प्रतिनिधी )- डाळींब उत्पादकांना शासनाने फळबाग विमा योजनेंतर्गत तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी डाळींब उत्पादक शेतकरी रविंद्र खटोड यांनी केली आहे                 प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात खटोड यांनी म्हटले आहे की शासनाने डाळींब उत्पादकांना दिलासा देण्यासाठी फळबाग पिक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई दिलेली आहे परंतु राहुरी तालुक्यातील   देवळाली प्रवरा मंडल मधील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळालेली नाही केवळ देवळाली प्रवरा मंडल मधील शेतकरी या लाभापासुन वंचित राहीलेले आहे                  तरी या मंडल मधील डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना पिक विमा आंतर्गत नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी खटोड यांनी केली आहे

बुलडाणा - 19 जून -स्थानीम गुन्हे शाखा बुलडाणाच्या एका पथकाने धामणगांव धाड येथील एका गोदामावर धाड टाकून अंदाजे 180 क्विंटल धान्य पकडला असुन त्यात तांदूळ,मका,गहु व हरभरा आहे तर तांदूळ व गहु सार्वजनिक वितरण प्रणाली अर्थात रेशनचा असु शकते,याची शहनिशा बुलडाणा तहिसलचे पुरवठा विभाग करीत आहे.
      बुलडाणा तालुक्यातील ताराडखेड येथील नदीम बेग यांनी धामणगाव धाड येथील  प्रकाश श्रीराम सपकाळ यांच्या मालकीचे धान्य गोदाम भाडेतत्वावर घेतले आहे. दरम्यान 16 जून रोजी सायंकाळच्या सुमारास बुलडाणा एलसीबीचे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांचे मार्गदर्शना खाली एलसीबी पथकातील सहायक पोलिस निरीक्षक विजय मोरे,पोलिस उपनिरीक्षक इमरान इनामदार व इतर कर्मचारी वाहनाने गस्तीवर असतांना या गोदामात २ इसम संशयास्पद स्थितीत धान्याची पोती रचतांना दिसून आली. गोदामाची पाहणी केली असता गोदामात अंदाजे तांदूळ 200 कट्टे, मका 150 कट्टे, गहू 12 कट्टे, हरभरा 10 कट्टे असे अंदाजे 180 क्विंटल धान्य दिसून आले. याबाबत चौकशी केली असता सदर धान्य शासकीय वितरण प्रणालीतील विना परवाना साठवून ठेवल्याचा संशय आल्याने एलसीबीच्या पथकाने वरिष्ठांशी संपर्क साधून या बाबत बुलडाणा तहसीलदार यांना पत्र दिल्याने घटनास्थळी बुलडाणा पूरवठा निरीक्षक जूमडे व नायब तहसिलदार अमरसिंह पवार हे पोहचले. सदर धान्यसाठा हा शासकीय वितरण प्रणालीतील आहे किंवा नाही हे रात्र झाल्यामुळे समजले नाही.सदर गोदाम 16 जूनला रात्री सील करून पुन्हा आज 17 जून रोजी उघडण्यात आले व सदर धान्याची मोजमाप करून सदर धान्यसाठा बुलडाणा येथील शासकीय धान्य गोदामात जमा करण्यात आल्याची माहिती आहे. पकडलेला धान्यातील तांदूळ व गहु हे रेशन चा आहे किंवा नाही यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नसले तरी,या प्रकरणी काय कार्यवाही होते? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

श्रीरामपुर /प्रतिनिधी :लोकडाऊन मध्ये आख्खा देश त्रस्त असताना गोदी मिडियाचे काही दलाल पत्रकार व ॲकर  आपल्या चॅनलचे टी.आर.पी वाढवण्यासाठी एखाद्या धर्माची बदनामी व्हावी म्हणून काहीही बडबड करतात यासाठी आपले चॅनल न्युज 18 इंडियाचे टी.आर.पी वाढवण्यासाठी व मुस्लिम द्वेश पसरवण्यासाठी अमिश देवगण नामक दलाल  पत्रकाराने मुस्लिमांसाठी द्वैववत असणारे ख्वाजा मोइनुद्दिन चिश्ती यांच्या बद्दल अपशब्द वापरुन आम्हा मुस्लिम बांधकांच्या भावना दुखावल्या आहे.अमिश देवगण हा ॲकर वेळोवेळी आपल्या शो मध्ये कोणालाही बोलवून फालतु डिबेट करत असतो .यात कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील याच सुद्धा भान ठेवत नाही .त्यामुळे समाजामध्ये दुही निर्माण करणारा अमिश देवगणवर गुंन्हा दाखल करावे नी न्युज 18 चॅनेलवर बंदी घालावी असे निवेदन प्रांताधिकारी अनिल पवार यांना समाजवादी पार्टीच्या वतीने देण्यात आले .निवेदनावर समाजवादी पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएब जमादार , तालुकाध्यक्ष फय्याज कुरेशी , शहराध्यक्ष इमरान इरानी ,अरबाज कुरेशी ,दानिश पठाण ,आसिफ तांबुळी , जकरिया सय्यद , जाहिद कुरेशी , तनवीर शेख यांच्या सह्या आहेत .

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget