Latest Post

शिर्डी (जय शर्मा )राज्य सरकार कोरोणाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात रोखण्यासाठी कमी पडले असून त्यासाठी अयशस्वी ठरलेल्या राज्य सरकारचा निषेध करत राज्य सरकारने राज्यातील जनतेला कोरोणामुळे उद्भवलेल्या संकटकाळात विविध क्षेत्रात, विविध प्रकाराने मदत करण्याची मागणी करत राहता तालुक्यातील विविध गावात भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यकर्त्यांनी मेरा अंगण, मेरा रणांगण महाराष्ट्र बचाओ आंदोलन आज केले,
राज्यात कोरोणामुळे जनता मोठ्या संकटात सापडली आहे आर्थिक टंचाई भासू लागली आहे, राज्य सरकार या काळात अयशस्वी ठरले आहे, याचा निषेध करण्यासाठी राज्यभर आज भा,ज,प च्या वतीने महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले, भाजपच्यावतीने गावागावात मेरा अंगण, मेरा रणांगण ,महाराष्ट्र बचाओ आंदोलन केले गेले, याच धर्तीवर राहता तालुक्यातही असे आंदोलन झाले, राहता तालुक्यातील शिर्डी व परिसरातही ही गावागावात भाजपतर्फे असे आंदोलन करण्यात आले, निमगाव निघोज येथील भाजपाचे स्थानिक नेते बाळासाहेब गाडेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत गावात राज्य सरकारचा निषेध करत मेरा अंगण मेरा रणांगण महाराष्ट्र बचाव आंदोलन केले,व विविध मागण्यांचे निवेदन घेवुन त्यांनी हे आंदोलन केले ,तोंडाला मास्क लावून व सोशल डिस्टंन्स पाळत महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले, यावेळी   शासनाने विद्यार्थ्यांची शालेय फी माफ करण्यात यावी, शेतमजूर, कामगार ,बारा बलुतेदार आदी रोजीरोटी वर जगणाऱ्या गोरगरिबांना आर्थिक अनुदान द्यावे ,राज्यातील सर्व भाडेकरूंचे तीन महिन्यांचे घर भाडे माफ करावे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी ,शिधापत्रिका नसलेल्यानाही  रेशन मधून धान्य मिळावे, आदी विविध मागण्या करत हे महाराष्ट्र बचाव आंदोलन येथे करण्यात आले, त्याच प्रमाणे तालुक्यातील गावातही असेच वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन झाले.

शिर्डी (राजेंद्र गडकरी )-राज्यात महसूल खात्याला गाव पातळीवर सर्वाधिक मदत करणारा कोतवाल असताना कोतवालांना ढोबळमानाने साडेसात हजार रुपये ते पंधरा हजार रुपये पगार दिला जातो. आजच्या महागाईच्या युगात हा तुटपुंजा पगार कोतवालांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अपुरा पडत आहे त्यामुळे कोतवालांची मोठी अडचण निर्माण होत आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमी वर लॉक डाऊन करण्यात आला होता, या लॉकं डाउन काळात प्रत्येक गावातील कामगार तलाठ्यांना मोठी मदत करण्याचे काम कोतवालांनी अहोरात्र केले होते, आपला जीव धोक्यात घालून ग्राउंड लेव्हल ला कोतवाल काम करत आहेत, त्यांचा शासनाने सध्या तरी विचार करणे गरजेचे आहे,
राज्यात, जिल्ह्यात व गावागावात महसूल खात्याकडून कामगार तलाठी यांच्यामार्फत सर्व आदेशांची अंमलबजावणी, नोटिसा देणे, गावातील व्यक्तींना बोलावून आणणे, दुर्घटना अथवा पिकांचा पंचनामा करताना मदत करणे इत्यादी अनेक प्रकारची कामे कोतवालांना करावी  लागतात.सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोतवालांना ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर इत्यादीं सोबत कार्य करावे लागत आहे. गाव पातळीवर स्थापन केलेल्या कोरोना ग्राम सुरक्षा समितीमध्ये तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच इत्यादींच्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी कोतवाल ही व्यक्ती उपयुक्त ठरते. कोरोनाच्या सर्व धोक्याविरुद्ध कोतवाल सध्या गाव पातळीवर प्रामाणिकपणे लढत आहे. कोतवाल सुद्धा इतरांप्रमाणेच कोरन वॉरियर्स आहेत, ते जनतेला कोरोना पासून वाचविण्यासाठी पराकाष्ठेचे परिश्रम निमुटपणे घेत आहे. मात्र कोतवालांना कोरोना विरुद्ध लढताना विम्याचे  संरक्षण  देण्यात आलेले नाही, त्याच प्रमाणे गाव पातळीवरील इतर कर्मचार्‍यांप्रमाणे कोतवालांना प्रोत्साहनपर भत्ता सुद्धा देण्यात आलेला नाही. ही बाब अन्यायकारक आहे. तसेच कोतवालांचे मनोधैर्य खच्ची करण्यासारखी आहे.
यासाठी कोतवालांना सुद्धा इतर कर्मचार्‍यांप्रमाणे विम्याचे संरक्षण देऊन प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, लॉकडाउनकाळातील त्यांच्या या  कामगिरीचाही शासनाने कुठेतरी विचार करावा, अशी मागणी ज्येष्ठ विधिज्ञ कारभारी गवळी, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे राज्य सचिव अशोक सब्बन, भारतीय जनसंसदचे जिल्हा सरचिटणीस कैलास पठारे, युवा आघाडी प्रमुख अशोक ढगे, विर बहादुर प्रजापती, डॉ.प्रशांत शिंदे, भगवान जगताप, बबलू खोसला, इक्बाल भाई, अशोक बापू कोकाटे, कैलास खांदवे, गणेश इंगळे व भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांच्याकडे केली आहे.

शिर्डी( जय शर्मा)- कोरोणा पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यातअटी  व शर्ती ठेवून नॉन रेड झोन जिल्ह्यामध्ये एसटी महामंडळाच्या बसेस काही ठिकाणाहून आजपासून धावणार होत्या ,मात्र शिर्डी या आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या बसस्थानकात मात्र आज शुकशुकाट दिसत होता, येथून आज एकही बस बाहेर गेल्याचे व आल्याचे दुपार पर्यंत दिसत नव्हते, येथे फक्त एसटी महामंडळाचे कामगार व पोलीस दिसत होते, एवढ्या मोठ्या बसस्थानकात  प्रवासी मात्र एकही दिसत नव्हता , जिल्ह्यात आज बस सुरू झाल्या , शिर्डी सारख्या बसस्थानकातून ठराविक मार्गावर बसेस सोडणार होते, मात्र  या बस स्थानकात प्रवासी फिरकले नाही ,शिर्डी बस स्थानक हे नेहमी साई भक्तांनी गजबजलेले असते, मात्र श्री साईबाबांचे मंदिर बंद असल्यामुळे साईभक्त येणे ,जाणे बंद आहे प्रवासी  व साई भक्तच नाही तर बस सोडून करणार काय । प्रवासी नसल्यामुळे हे बस स्थानक शांत शांत दिसूनयेत होते, ,आज बसेस सोडण्यासाठी जिल्ह्यात काही ठिकाणी  संपूर्ण तयारी करण्यात आली होती ,कोपरगाव, संगमनेर श्रीरामपूर आगारातून बसेस सोडण्यात आल्या, शिर्डीतून ही बसेस सोडण्यासाठी तयारी झाली होती मात्र दुपारपर्यंत येथे प्रवासी फिरकले नसल्यामुळे येथून एकही बस येथून दुसरीकडे धावली नाही, राहता तालुका कोरोणा मुक्त आहे, राहता तालुक्यातील शिर्डी हे श्री साईबाबा मुळे अांतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे, लॉकडाउनच्या पूर्वी एसटी महामंडळाला, कोपरगाव आगाराला सर्वात जास्त उत्पन्न शिर्डी बसस्थानकातील प्रवाशांमुळे मिळते, कारण शिर्डीहून अनेक ठिकाणी,अनेक बसेस जातात, येतात,लॉकडाउनकाळातही शिर्डीतून परप्रांतीयांना जाण्यासाठी काही बसेस सोडण्यात आल्या होत्या, शिर्डीचे  आंतरराष्ट्रीय बस स्थानक यापूर्वी सनेंटायझर करण्यात आले आहे,  सर्व सुविधा व सुसज्ज असेहे बसस्थानक आहे ,असे असतानाही आज हे बस स्थानक सामसूम दिसत होते, नेहमी गजबजलेले हे बस स्थानक लॉकडाउन काळात शांत।तर होतेच मात्र आज बस सुरू झाल्या पण श्रीसाई मंदिर बंद असल्यामुळे व प्रवासी नसल्यामुळे आजही हे बस स्थानक नेहमीप्रमाणे गजबजले  दिसत नव्हते, शांत शांत वाटत होते, जोपर्यंत श्री साईबाबांचे मंदिर सुरू होत नाही व साईभक्त येथे येणे सुरू होत नाही तोपर्यंत शिर्डीचे बसस्थानक असेच शांत शांत दिसणार आहे ,येथे प्रवासी किरकोळ प्रवास करू शकतात मात्र नेहमीसारखे साईभक्तांनी गर्दीने गजबजलेले हे बसस्थानक सध्यातरी श्री साईं चे मंदिर उघडेपर्यंत तसे गजबजलेले दिसणार नसल्याचे शिर्डीकर बोलत आहेत.

कोपरगाव प्रतिनिधी- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन सुरू असून शिर्डीत श्री साईबाबा मंदिर साई संस्थान ने  दर्शनासाठी बंद केले आहे, तसेच काही कामगारांना सुट्ट्या देण्यात आले आहेत, या लॉकडाउनच्या दोन महिन्याच्या कालावधीत, मार्च महिन्यापासून कामगारांना पगार नव्हते .गेल्या काही दिवसातच कायम कामगारांना पगार देण्यात आले मात्र आऊटसोर्सिंग कामगारांना पगार नाहीत .असे असताना श्री साईबाबा संस्थानने मोठी रक्कम देऊन शिर्डी जवळील रुई शिवारात जमीन खरेदी केली आहे ,जर लॉकडाउनच्या दरम्यान साईबाबा संस्थानला देणगी रूपात येणारे उत्पन्न कमी झाले आहे व कामगारांचा पगार एफडी मोडून करावा लागत आहे तर मग या लॉक डाऊन च्या काळात साईबाबा संस्थानने मोठी रक्कम देऊन जमीन खरेदीचा आटापिटा का केला। असा सवाल कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केला आहे.
 संजय काळे यांनी म्हटले आहे की  श्री साईबाबा संस्थाननै 17 मार्च दुपारी तीन वाजेपासून साईभक्तांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवले आहे, त्यामुळे येथे साईभक्त येणे व रोख देणगीचे प्रमाणही ही पूर्ण बंद झाल्या असून ऑनलाईन देणगी थोड्याफार प्रमाणात मिळत आहे, याचे कारण दाखवून साई संस्थानने आपली एफडी मोडून गेल्या दोन महिन्यात चा पगार गेल्या काही दिवसात कायम कामगारांना दिला आहे, अजून आऊटसोर्सिंग कामगार बाकी आहेत ,असे असताना ,देणगी कमी असताना साई संस्थानने रुई शिवारातील दर्यानानी यांची जमीन यापूर्वी देऊ केलेली असतानाही त्यांनी खरेदी केली नाही, त्यांनी काही जमीन देणगीदाखल दिली असून काही जमीन खरेदी करण्यासाठी संस्थांनला शासनाने परवानगी दिली होती, मात्रसन 2018 पासून ही जमीन संस्थांनी खरेदी केली नाही ,मात्र लॉकडाउनच्या दरम्यान ही जमीन खरेदी करण्यात आली, जमीन खरेदी करताना किंवा कोणताही व्यवहार करताना उच्च न्यायालयाची  संस्थांनला परवानगी।घ्यावी लागते, साई संस्थानने संस्थांनच्या कामगारांचा 40% पगार कपात करण्याचे निर्णय घेतला आहे ,तसेच तिरुपतीच्या धर्तीवर कामगार कपात करण्याचे धोरण अवलंबले आहे, मात्र उच्च न्यायालयाची त्यासाठी परवानगी नाही ,उच्च न्यायालय म्हणते पगार द्या आणि संस्थान उलट पगार कपात करीत आहे ,हा उच्च न्यायालयाचा अपमान आहे, उच्च न्यायालयात त्यासंबंधी कोणताही अर्ज दाखल झालेला नाही, त्यामुळे संस्थान उच्च न्यायालयाचा अपमान करीत असल्याचे स्पष्ट होत आहे, जर या खरेदी केलेल्या जमिनीपासून एक हजार फुटावर असणाऱ्या तुरकणे यांची जमीन लोकडाउन अगोदर सहा महिने पूर्वी आता संस्थांननी घेतलेल्या खरेदी भावाच्या निम्म्या पटीने विकली जाती , मात्र संस्थानलॉकडाउन काळात गरज नसताना डबल पैसे देऊन सुमारे १४ कोटी ला ही जमीन खरेदी करते, एवढा आटापिटा कशासाठी संस्थान करत आहे ,शिवाय कामगारांना पगार देण्यासाठी एफडी मोडुन पगार।करावा लागतो, कामगारांचा 40% पगार  कपात करावा लागतो तर मग जमीन खरेदी करण्याची सध्यातरी आवश्यकता काय होती।। असा सवाल करत हा उच्च न्यायालयाचा तात्पुरते नेमलेल्या विश्वस्तांनी जणू अपमानच केला असल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याने या गोष्टीचा निषेध करत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी  या सर्व गोष्टींची उच्च न्यायालयाने चौकशी करावी तसेच विधी व न्याय खात्याने ही चौकशी  करावी अशी मागणी संजय काळे यांनी केली आहे.

शिर्डी (राजेंद्र गडकरी)-कोव्हिड१९ विरुद्ध अहोरात्र लढणाऱ्या देश विदेशातील कोरोना योध्द्यांना  आणखी  स्फूर्ती मिळण्यासाठी तसेच कोरोनाचा  लवकर नायनाट व्हावा, यासाठी श्री साईबाबांना प्रार्थना करत राहाता तालुक्यातील हजारो साई भक्तांनी आज दि,२१मेला दुसर्‍या गुरुवारीही   तालुक्यातील गावागावातील घराघरात कुटुंबासहित सामूहिक श्री साई चरित्र ग्रंथाचे पारायण करत व सामूहिक घरात आरती करत श्री साईबाबांकडे साकडे घातले,  या उपक्रमात  राहता तालुक्यातील मोठ्या संख्येने साई भक्त व हजारो कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते, त्यास साईभक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला,
जगातील सर्वच देशांमध्ये कोरोनाने हाहाकार माजला असून दररोज देशात, जगात मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत, अशा कोरोना विरोधात लढण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलीस, महसूल, अधिकारी-कर्मचारी ,स्वच्छता कर्मचारी,प्रत्रकार, प्रशासन व प्रत्येक जण आपापल्या परीने अहोरात्र काम करीत आहे, असे कोरोनावॉरियर्स आपला जीव धोक्यात घालून कोरोनाला हटवण्यासाठी लढा देत आहेत, रुग्णांची सेवा करीत आहेत,यालॉकडाउन काळात सर्वसामान्य गोरगरीब व सर्व नागरिक घराघरात आहेत, त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करत आहेत ,सुविधा पुरवीत आहेत, अशा सर्वाना  पूर्ती मिळावी मिळावी, त्यांचे कौतुक अभिनंदन व्हावे, म्हणून व या देशातून, जगातून कोरोनाचा लवकर नायनाट व्हावा, यासाठी श्री साईबाबांना आज गुरुवार दि,२१मे रोजी साकडे घालण्यात आलेआहे, शिर्डी येथील श्री साई निर्माण ग्रुप द्वारकामाई प्रतिष्ठान, श्री साई संदेश प्रतिष्ठान रुई यांच्यावतीने आज गुरुवार दिनांक२१ मे रोजी सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत राहाता तालुक्यातील प्रत्येक घराघरात श्री मंगलाचरण, श्री साईस्तवनमंजरी व लकी ड्रॉ द्वारे निघालेल्या अध्यायाचे वाचन आपल्या घरात राहून देवघरासमोर किंवा श्री साईंच्या प्रतिमेसमोर मनोभावे करून सामूहिक श्री साईचरित्र पारायण  घराघरात करण्यात आले, लॉकडाऊन चे नियम पाळत प्रत्येकाने आपापल्या घरात श्री साईचरित्र पारायण यांचे वाचन करून श्री साईबाबांची प्रार्थना करत कोरोनाला हटवण्या साठी साईबाबांकडे साकडे घातले, या धार्मिक उपक्रमाला मागील गुरुवारी 14 मेला शिर्डी व परिसरात मोठा प्रतिसाद मिळाला,होता, असाच मोठा प्रतिसाद आज गुरुवारी 21 मेला राहता तालुक्यातून गावागावातून मोठ्याप्रमाणात मिळाला आहे, तसेच पुढच्या गुरुवारी२८ मे रोजी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील गावागावात असे सामूहिक पारायण घराघरात राबविण्यात येणार आहे, साईचरित्र पारायणा चा तिसरा टप्पा गुरुवार दिनांक 28 मे रोजी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील ,प्रत्येक गावागावात होणारअसुन , त्यानंतर ४जूनला संपूर्ण देशात  व त्यानंतर पुढच्या गुरुवारी११जुनला संपूर्ण जगातील साईभक्त  असे घरात राहून  श्री साई चरित्र ग्रंथाचे पारायण करणार आहेत  ,हा एक  मोठा उपक्रम  राबविण्यात येत असून सर्वांनी मोठ्या संख्येने या धर्मीक उपक्रमात सहभागी होण्याचे आव्हान  साई निर्माण ग्रुप ,साई संदेश प्रतिष्ठान व द्वारकामाई प्रतिष्ठानने केले आहे .

शिर्डी (जय शर्मा)-कोरोणाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊन सुरू असून शिर्डीचे श्री साईबाबा मंदिर दर्शनासाठी बंद आहे, त्यामुळे श्री साईबाबा संस्थान मध्ये तात्पुरत्या स्वरूपातील आऊटसोर्सिंगमध्ये काम करणारे कामगार अद्यापही पगाराविना आहेत, या काळातला त्यांना पगार झालेला नाही, त्यामुळे या गरीब ,सर्वसामान्य कुटुंबातील कामगारांना आता उपासमारीची वेळ आली असून साई संस्थानने या आऊटसोर्सिंग कामगारांना त्वरित पगार करावेत अशी मागणी आता या कामगारांकडून होऊ लागली आहे,
 लॉक डाऊन मुळे श्री साईबाबा संस्थानने श्रीसाईमंदिर बंद केल्यामुळे व साईभक्त येथे येणे बंद असल्यामुळे तसेच येथे गर्दी होऊ नये म्हणून काही कामगारांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत, मात्र स्वच्छता वॉचमेन, पुजारी व काही कामगारांना  ड्युटी देण्यात आले आहेत, आऊटसोर्सिंगचे कामगार काही घरी आहेत ,तर ड्युटीवर आहेत ,याकाळात आर्थिक टंचाई सर्वांनाच बसत आहे, त्यात गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील साई संस्थांमध्ये काम करणारे आउटसोर्सिंगचे हे कामगार यांनाही या काळात पगार झालेला नाही, गेल्या दोन-अडीच महिन्यापासून पगार नसल्याने ह्या कामगारावर व,त्याच्या कुटुंबावर आता उपाशी राहण्याची वेळ  आली आहे, यापुढे साई संस्थानने जसे कायम कामगारांना पगार केलेत तसेच आउटसोर्सिंग च्या या कामगारांना पगार करावेत, अशी मागणी या कामगारांकडून होत आहे, अन्यथा या   आउटसोर्सिंग कामगारांमधील काही कामगार आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत, तरी या सर्व गोष्टींचा विचार करून साईबाबा संस्थानने या आऊटसोर्सिंग कामगारांचे पगार द्यावेत, अशी मागणी आता या कामगाराबरोबर त्यांच्या कुटुंबीय व तसेच शिर्डीकर  व साईभक्तांमधूनही होऊ लागली आहे.

शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र गडकरी )दि. २१- जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यात आपण बर्‍यापैकी यशस्वी ठरलो आहोत. जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करीत खबरदारी घेतली तर आपण या संकटावर निश्चितपणे मात करु. आगामी काळात कोरोना संसर्गाचे रुग्ण सापडले नाहीत, तर जिल्हा ०१ जून रोजी कोरोनामुक्त होईल, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
          पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाटी करावयाच्या विविध उपाययोजनांचा तसेच इतर योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत मायकलवार, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदींची यावेळी उपस्थिती होती.
          पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सध्या आपल्याकडे कोरोना वाधित ६८ रुग्ण आहेत. त्यापैकी ४९ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आगामी काळात कोरोना रुग्ण सापडले नाहीत, तर आपण ०१ जून रोजी कोरोनामुक्त होऊ. त्यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करणे आणि आरोग्य यंत्रणेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करणे अपेक्षित असल्याचे सांगितले. जिल्ह्यात १२ मार्च २०२० रोजी पहिला रुग्ण सापडला होता.  मे महिन्यात बाहेरुन येणार्‍या नागरिक बाधित आढळण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे. नागरिकांनी स्वताच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
          लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील नागरिकांना परत त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चांगला पाठपुरावा केल्यामुळे आतापर्यंत ३० हजार नागरिकांपैकी २३ हजारांपेक्षा अधिक मजूर, कामगार, भाविक, विद्यार्थी त्यांच्या राज्यात परत पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत १० विशेष श्रमिक रेल्वेमार्फत त्यांना रवाना करण्यात आले आहे. आणखी ०६ रेल्वेद्वारे उर्वरित नागरिकांना त्यांच्या राज्यात परत पाठविण्यात येणार आहे. याशिवाय, परजिल्ह्यातून तसेच परराज्यातून १६ हजार नागरिक आपल्या जिल्ह्यात परत आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
          जिल्ह्यातील नागरिक, जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेसह सर्वच शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांनी कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी कौतुक केले.
     यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या विविध सामाजिक योजनांच्या जिल्ह्यातील अंमलबजावणीचा आढावाही घेतला. संजय गांधी निराधार अनुदान, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन अशा विशेष साहाय्य योजनेतील १ लाख ६२ हजार १४८ लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
          जिल्ह्यातील मोठ्या धरणांत सध्या ३६ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असून मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा२४ टक्के असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्हयात सध्या २१ शासकीय आणि ६१ खाजगी टॅंकरद्वारे ७२ गावे आणि २९१ वाड्यांना पाणीपुरवठा होत असून टॅंकर मंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकार्‍यांना दिल्याची माहितीही त्यांनी दिली. रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात सध्या २०६९ कामे सुरु असून त्यावर १० हजार ३१० मजूर कामांवर असल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
          जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी तसेच केशरी कार्डधारकांना राज्य शासनाने ठरवून दिलेल्या नियतनाप्रमाणे धान्य वाटप करण्यात आले आहे. मे महिन्यातील ८३ टक्के धान्याचे वाटप पूर्ण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत प्रतिमाह अर्धा किलो चणाडाळ आणि अर्धा किलो तूरडाळ वाटप करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget