Latest Post


शिर्डी (जय शर्मा) - सध्या कोरोणामुळे सर्वत्र लॉकं डाऊन सुरू आहे, त्यात उन्हाळा कडक जाणवायला सुरुवात झाली आहे ,शाळा, महाविद्यालये दुकाने, कामधंदा सर्व बंद आहे, त्यामुळे अनेक तरुण नुकत्याच गोदावरी उजवा कालव्याला आलेल्या  उन्हाळी आवर्तनामुळे दुपारी पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटत आहेत ,मात्र यावेळी सामाजिक दूरीच भान ठेवलं जात आहे,  राहता तालुक्यातून जाणारा गोदावरी उजवा कालवा उन्हाळी आवर्तन सोडल्यामुळे काठोकाठ भरून वाहत आहे, त्यामुळे सध्या या कालव्याच्या आसपासचे तरुण मुले भर दुपारच्या वेळेत या  कालव्यामध्ये पोहण्यासाठी येत असतात, सध्या कालव्याला पाणी असल्यामुळे या वाहत्या पाण्यात पोहण्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत , अंतराअंतरावर पोहत असतात, सामाजिक दुरीचं भान ते ठेवत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले, लॉकडाऊन मुळे सर्व बंद आहे,शिर्डीचे वॉटर पार्क बंदआहे,, त्यात कडक उन्हाळा अशा परिस्थितीत भर दुपारी उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी व दुपारचा टाईमपास करण्यासाठी काहीजण या गोदावरी उजवा कालव्याच्या पाण्यात वाटरपार्क समजूनच पोहण्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत, या कालव्याच्या पाण्यात आसपासच्या वस्तीवरील गाया म्हशी असे पाळीव प्राणी ही दुपारच्या वेळेस पाण्यामध्ये डुंबण्याचा आनंद घेत असतात, असे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे, अनेक ठिकाणी महिला कपडे धुण्यासाठी , कुणी आपल्या शेळ्या-मेंढ्या पाळीव प्राणी पाणी पाजण्यासाठी आणत असतात, तरुण मुले तर सूर्यास्त होईपर्यंत या पाटामध्ये पोहत असतात, त्यामुळे लॉकडाऊनच्या  परिस्थितीतही  गोदावरी उजवा कालव्याच्या कडेला  दुर दुर का होईना पण माणसे दिसून येत असतात, सध्या या कालव्याला पाणी आल्यामुळे राहता तालुक्यातील कालवा परिसरातील सर्वजण खुश असल्याचे दिसून येत आहेत, या कालव्याला पाणी आल्यामुळे विहिरींनाही पाणी वाढले आहे, तसेच अनेक साठवण बंधारे भरले गेले असल्यामुळे सध्या पिण्याच्यापाण्याची टंचाई फारशी नाही , गोदावरी उजवा कालव्याला आलेल्या या उन्हाळी आवर्तनामुळे शेतकरी ,तरुण तसेच नागरिक,महिला सर्वजण खुश आहेत.

शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र गडकरी )  श्री साईबाबामुळे अांतरराष्ट्रीय क्षेत्र असणाऱ्या व देशात स्वच्छ सुंदर शहराचा दुसरे बक्षीस मिळवून मान मिळवणाऱ्या शिर्डीतील उपनगरात नगरपंचायतीने लावलेल्या रस्त्याच्या दुभाजकातील झाडे पाण्याअभावी जळून जात असून नगरपालिकेचे पाणी नेमकी कुठे मुरते। असा प्रश्न शिर्डीकर करत आहेत, शिर्डी नगरपंचायतला करापोटी दर वर्षाला मोठी रक्कम जमा होत असते, या रकमेतून शिर्डीला स्वच्छ व  सुंदर  करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत, त्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत, याच खर्चातून शिर्डी शहरातील उपनगरात रस्त्याच्या दुभाजकाला विविध वृक्षे लावण्यात आले आहेत नगर-मनमाड महामार्गच्या दुभाजकात वृक्षांना नगरपंचायत टँकरने पाणी देते तसेच सध्या लॉक डाऊन मुळे प्रदूषण नसल्याने ही वृक्षे हिरवीगार दिसत आहेत, मात्र उपनगरातील वृक्षांना पाणी नसल्यामुळे ते वाळून गेलेले आहेत, नगरपालिका फक्त नगर-मनमाड रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या वृक्षांना पाणी देते व नागरिकांना नगरपंचायत खूप मोठे काम करत आहे असे भासवते, मात्र उपनगरातील झाडे पाण्याअभावी जळून जात आहेत तिकडे कोणाचे लक्ष नाही,  लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे,पाण्याच्या टँकरची फक्त बिले काढले जात असल्याचा आरोप करताना शिर्डीचे ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटणी  आरोप केले आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र व राज्याच्या आदेशानुसार लॉकडाऊन तीन मे रोजी उठेल की नाही याबाबत शंका आहे. मात्र, जिल्ह्यात करोनाची विद्यमान परिस्थिती पाहता आणि नव्याने एकही करोना  रुग्ण न आढळ्यास जिल्हा 10 मे नंतर ग्रीन झोनमध्ये येईल. मात्र नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. करोनावर अद्यापही लस निघालेली नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी करोना विषयी व खरीब हंगामाच्या पार्श्वभूमीवर आढवा बैठक घेतली.त्यानंतर त्यांनी प्रेसशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात जामखेड, संगमनेर तालुका वगळता इतर तालुके करोनामुक्त आहे.तसेच जिल्ह्याबाहेर अडकलेले नागरिकांना लवकरच जिल्ह्यात येता येणार आहे. मात्र, त्यांना 14 दिवस वैद्यकीय अधिकारी यांच्या निगराणीखाली ठेवले जाणार आहे. आतापर्यंत 1 हजार 453 अहवाला पुण्याच्या वैद्यकीय प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले आहे. त्यापैकी 43 करोना बाधित सापडले होते. त्यापैकी 25 रुग्ण करोना मुक्त झाले आहेत.तसेच यंदा हवामान विभागाच्या आंदाजानुसार मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे. शेतकर्‍याना लागणारे बी-बियाणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) कोरोना च्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये शहर पोलिस व नगरपालिका प्रशासनाने नागरिकांच्या हितासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांची कठोर अंमलबजावणी सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून मास्क न लावता गाडी चालवणारे आमदार लहू कानडे यांच्या ड्रायव्हरला सुद्धा दंड आकारून त्याच्याकडून पाचशे रुपयाची वसुली नगरपालिका कर्मचाऱ्यांनी केली .
 पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन संयुक्तपणे शहरांमध्ये जनतेच्या आरोग्याची काळजी घेत आहेत . दररोज सकाळी शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या मास्क न लावणाऱ्या व रस्त्यावर थुंकणाऱ्या गावकऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे . यासाठी नगरपालिकेने चार टीम तयार केल्या आहेत . सकाळच्या सत्रात सध्या हे काम सुरू असून दिवसभर हे काम करण्यात यावे अशी मागणी जनतेतून केली जात आहे .
 शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यअधिकारी प्रकाश जाधव, आरोग्य अधिकारी आरणे,पालिकेचे कर्मचारी व पोलिस अशा दोन्ही यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करीत आहेत . राज्यांमध्ये सर्वत्र कोरोनाचे थैमान सुरू असताना स्थानिक अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन करून शहरांमध्ये कुठेही पेशंट आढळणार नाही यासाठी पुरेपूर काळजी घेतली जात आहे . सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन मध्ये शितिलथा देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू असून त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही यासाठी पोलीस व पालिका प्रशासनाने शहरांमध्ये येणाऱ्या लोकांची नाकेबंदी करावी . नवीन लोकांना शहरात येऊ देऊ नये . सबळ कारण असल्याशिवाय कोणालाही जाण्या-येण्याची परवानगी देऊ नये . अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.
शहरांमध्ये सध्या रमजान महिना सुरू असून वार्ड नंबर 2 मध्ये संध्याकाळी मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर दिसून येतात . काल सायंकाळी पोलिसांनी वॉर्ड नंबर दोन, मिल्लत नगर या भागामध्ये गस्त घालून बाहेर फिरणाऱ्या लोकांना घरात जाण्याचे आवाहन केले . मात्र पोलिस पुढे गेल्यानंतर मागे लोक बाहेर येतात . त्यासाठी शहर पोलिसांनी वार्ड नंबर दोनमध्ये चौका चौकांमध्ये पॉइंट तयार करून रमजान ईद होईपर्यंत तेथे लक्ष द्यावे तसेच लोकांनी बाहेर न येण्याची काळजी घ्यावी व आपले रक्षण आपणच करावे असे आवाहनही ज्येष्ठ लोकांनी केले आहे . शहर पोलीस रात्रंदिवस एक करून शहरांमध्ये गस्त घालत असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवीत आहेत. त्याबद्दल शहर पोलिसांच्या कामगिरीचे सुद्धा समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 शिर्डी  (जय शर्मा)
 कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन सुरू असून शिर्डीतही सर्व बंद आहे ,अत्यावश्यक सेवा जरी सुरू असल्या तरी लॉकडाऊनचे नियम पाळणे बंधनकारक असताना शिर्डीत मात्र भाजीपाला दुकानांमध्ये सोशल डिस्टंन्सचा फज्जा उडतआहे, सर्व नियम पायदळी तुडवली जात आहेत, मात्र नगरपंचायत याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे,
शिर्डीत इतर सर्व दुकाने बंद आहेत, अत्यावश्यक सेवा म्हणून भाजीपाल्याचे दुकाने, मेडिकल, किराणा दुकाने  मसाल्याची दुकाने सुरू आहेत,
मात्र येथे मसाला दळण्यासाठी सध्या महिलांची गर्दी होत असून येथे सोशल डिस्टंन्स पाळला जात नाही ,पिठाच्या गिरणी वर दळण्यासाठी जाणाऱ्या महिला सोशल डिस्टंन्स पाळत नाहीत मात्र याकडे कोणाचे लक्ष नाही, भाजीपाला घेण्यासाठी गर्दी होते ,सामाजिक दुरीचे भान ठेवलं जात नाही, शिर्डीतील श्रीरामनगर येथील महाराणा प्रताप चौकात अनेक भाजीपाला विक्रेते व ग्राहक यांच्या तोंडाला मास्क नसते , सर्व नियम पायदळी तुडवून लोक भाजीपाला घेण्यासाठी गर्दी करतात, शिर्डीत श्रीसाई कृपेने व परिसरात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण नाही, मात्र अशी परिस्थिती राहिली तर दुर्दैवाने कोरोनाचा संसर्ग होण्यास वेळ लागणार नाही, असे होऊ नये म्हणून नगरपंचायतीने अशा लॉकडाऊन चे नियम मोडणाऱ्या भाजीपाला विक्रेते व ग्राहकांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे, मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यावर कारवाई होते ,शहरात फिरणाऱ्यांवर कारवाई होते, मग भाजीपाला तसेच किराणा दुकानदार व मसाला व पिठाच्या दळणाच्या गिरणीवर  नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावंर कारवाई होण्याची गरज आहे, मात्र तसे होताना दिसत नाही, त्यामुळे शिर्डी नगरपंचायत ,पोलीस यांनी याकडे विशेष लक्ष देऊन अशा ठिकाणी विशेष पथकाच्या साहाय्याने कारवाई करणे गरजेचे आहे असे  शिर्डीकर बोलत आहेत.

शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र गडकरी )  श्री साईबाबामुळे अांतरराष्ट्रीय क्षेत्र असणाऱ्या व देशात स्वच्छ सुंदर शहराचा दुसरे बक्षीस मिळवून मान मिळवणाऱ्या शिर्डीतील उपनगरात नगरपंचायतीने लावलेल्या रस्त्याच्या दुभाजकातील झाडे पाण्याअभावी जळून जात असून नगरपालिकेचे पाणी नेमकी कुठे मुरते। असा प्रश्न शिर्डीकर करत आहेत, शिर्डी नगरपंचायतला करापोटी दर वर्षाला मोठी रक्कम जमा होत असते, या रकमेतून शिर्डीला स्वच्छ व  सुंदर  करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत, त्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत, याच खर्चातून शिर्डी शहरातील उपनगरात रस्त्याच्या दुभाजकाला विविध वृक्षे लावण्यात आले आहेत नगर-मनमाड महामार्गच्या दुभाजकात वृक्षांना नगरपंचायत टँकरने पाणी देते तसेच सध्या लॉक डाऊन मुळे प्रदूषण नसल्याने ही वृक्षे हिरवीगार दिसत आहेत, मात्र उपनगरातील वृक्षांना पाणी नसल्यामुळे ते वाळून गेलेले आहेत, नगरपालिका फक्त नगर-मनमाड रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या वृक्षांना पाणी देते व नागरिकांना नगरपंचायत खूप मोठे काम करत आहे असे भासवते, मात्र उपनगरातील झाडे पाण्याअभावी जळून जात आहेत तिकडे कोणाचे लक्ष नाही,  लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे,पाण्याच्या टँकरची फक्त बिले काढले जात असल्याचा आरोप करताना शिर्डीचे ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटणी  आरोप केले आहे

शिर्डी राजेंद्र गडकरी -देशात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे, अशा परिस्थितीत सर्वत्र बंद असून संचारबंदी जारी आहे ,अशा काळात महाराष्ट्र दिऩ आला असून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी  राहाता तालुक्यात कुठेही शासकीय-निमशासकीय शाळा ,महाविद्यालये याठिकाणी 1मे महाराष्ट्रदिनानिमित्त होणारा ध्वजारोहण कार्यक्रम करण्‍यात येणार नाही,,साध्या पद्धतीने यावर्षी महाराष्ट्र दिन साजरा होणार असल्याची माहिती राहता तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली,
सध्या कोरोनामुळे सर्वत्र बंद आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे ,अशा परिस्थितीत एक मे हा महाराष्ट्र दिन आला असून शासकीय आदेशानुसार सर्वत्र हा दिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे, राहता तालुक्यातही 1मे महाराष्ट्र दिनी सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालये, या ठिकाणी ध्वजारोहण होणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी व कुठेही लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करू नये, विनाकारण फिरू नये, गर्दी करू नये, मास्क व सोशल डिस्टंन्स पाळावे, आपल्या घरातच राहावे, असे आवाहन तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे ,त्याच प्रमाणे राहता तालुक्यातील प्रत्येक गावात सरपंचांच्या अध्यक्षतेखाली गाव पातळीवर कोरोना ग्रामसुरक्षा कमिटी बनवण्यात येणार असून त्यामध्ये कामगार तलाठी, ग्रामसेवक, सदस्य राहणार असून पोलीस पाटील सदस्य सचिव राहणार आहेत, आपल्या गावात बाहेरील गावातून येणारे विद्यार्थी, कामगार पर्यटक,भाविक ,पाहुणे नातेवाईक, कोणीही असो त्यांची नोंद या समितीने ठेवणे महत्त्वाचे आहे, बाहेरून आलेल्या पण परवानगी नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला गावात प्रवेश देऊ नये, जर एखादी बाहेरील जिल्ह्यातील किंवा राज्यातील किंवा गावातील व्यक्ती आपल्या गावात येऊन राहत असेल तर त्या व्यक्तीची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करावी तसेच बाहेरील गावातून आलेल्या व्यक्तीचे चौदा दिवस विलगीकरण करणे महत्त्वाचे आहे, या सर्वांची नोंद कोरोना ग्राम सुरक्षा समितीने ठेवणे महत्त्वाचे आहे,प्रत्येक गावात अशा समित्या शासकीय परिपत्रकान्वे करणे आवश्यक आहे ,तरी सर्वांनी आपल्या गावात त्वरित कोरोना ग्रामसुरक्षा समिती स्थापन कराव्यात, असेही राहताचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी म्हटले आहे,

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget