Latest Post

शिर्डी- जितेश लोकचंदानी-सध्या कोरोना मुळे जगात हाहाकार उडाला आहे , देशातही  कोरोनाने मोठी संकटकालीन परिस्थिती निर्माण झाली आहे , त्यामुळे सर्वत्र लॉक डाऊन सुरू आहे , अशा परिस्थितीत  देशातील  सर्व सरकारी अधिकारी कर्मचारी  आपला जीव धोक्यात घालून  अहोरात्र व सक्षमपणे  काम करत आहे,  असे असताना  राजकीय नेते व लोकप्रतिनिधी यांचे मग कामच काय । असा सवाल भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी केला आहे,
 एका पत्रकान्वये त्यांनी पुढे म्हटले आहे की , देशात सध्या कोरोना मुळे मोठी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा परिस्थितीत देशातील, राज्यातील सर्व शासकीय अधिकारी ,कर्मचारी ,शिपाई सर्व जो तो आपापल्या परीने या संकट समयी अहोरात्र कोरोणाचा मुकाबला करण्यासाठी झटत आहे ,स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहे व हा देश चालवत आहे ,जर सरकारी अधिकारी ,कर्मचारी सक्षम पणे हा देश चालवत असतील तर मग निवडून गेलेले लोकप्रतिनिधी यांचे काम तरी काय आहे।। हे लोकप्रतिनिधी व राजकीय नेते सध्या आपल्या घरात  शांतपणे बसून आहे, संकटसमयी त्यांना  ना आपल्या मतदार संघाची ,ना आपल्या राज्याची, ना देशाच्या नागरिकांची चिंता आहे,  फक्त निवडणुका पुरतेच  घरोघरी फिरणारे  वेगवेगळ्या वस्तू ,,पैसे वाटून  गोरगरिबांची  सेवा करतो असे  दाखवणारे  मात्र आता सध्या  कोठे आहेत । असा मोठा सवाल निर्माण होत आहे, आमदारकी आणि खासदारकीच्या निवडणुकीमध्ये तालुका अथवा जिल्हा विकास आघाडी स्थापन करून पक्ष बदलून अनेक प्रतिनिधी निवडणूक लढवतात .निवडणुकीच्या काळात प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचतात. विशेष म्हणजे बाहेरगावी असलेल्या मतदारांना सुद्धा मतदानासाठी अनेक युक्त्या वापरून घेऊन येतात .स्वतः निवडून येण्यासाठी वस्तू आणि पैसे वाटप करण्याचे गैरप्रकार निवडणूक काळात उघडकीस आलेले आहेत. निवडणुकीच्या काळात कायदा धाब्यावर बसवून अनेक उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आले आहे .ज्या पक्षाने वाढवले ,मोठे केले, अनेक पदे दिली त्या पक्षाला निवडणुकीमध्ये सोडचिठ्ठी दिल्याची अनेक उदाहरणे आहेत .चुकीचे वर्तन केले तरी या सर्व बाबी आम्ही जनहितासाठी करीत असल्याचा संबंधितांनी मुलामा दिला व निवडणुका लढवल्या . मग आज जागतिक संकट असलेल्या कोरोनाच्या काळात काहीच  जनहित करता येणार नाही का ?असा खडा सवाल श्री सुधीर भद्रे यांनी केला आहे .
 हाताच्या बोटावर मोजण्याइतके जे लोकप्रतिनिधी छान काम करत आहेत त्यांचे भारतीय जनसंसदने कौतुक करून आभार मानले आहेत. लॉकडाऊन मध्ये अनेक लोकांना अन्न नाही ,पाण्याची अडचण जाणवते आहे ,मजुरांना किमान वेतन नाही , शेतकरी ,मजूर ,काच -कागद -पत्रा गोळा करणारे इत्यादी अनेक समाजघटक जन्मापासून कधीही न अनुभवलेला लॉक डाऊन अनुभवत आहेत. आधीच जीवनाचा संघर्ष त्यांना कठीण जात होता ,त्यात कोरोनामुळे आभाळ फाटल्यासारखे वाटत आहे . अनंत अडचणी त्यांच्यासमोर उभ्या राहिल्या आहेत .अशा वेळी निवडून आलेल्या आमदार, खासदार व द्वितीय क्रमांकाची मते मिळविणाऱ्यांनी फक्त  स्वतःच्या कुटुंबाची काळजी न घेता सध्या निवडणुकीचा माहोल असल्याप्रमाणे प्रत्येक मतदार व त्याच्या कुटुंबाच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवाव्यात .यासाठी घराबाहेर येण्याची अजिबात आवश्यकता नाही ,कारण लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ता रुपी घट्ट जाळे शहरी आणि ग्रामीण भागात आहे .लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्यकर्त्यांना निवडणूक काळासारखे सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी आर्थिक , धान्य , सॅनिटायझर , पीपीई किट , अशा एक ना अनेक  स्वरूपात मदत करावी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे लोकप्रतिनिधींची सुद्धा देशाला गरज असल्याचे सिद्ध करून द्यावे ।असे आवाहन सर्वश्री अशोक सब्बन, अॅड.कारभारी गवळी, कैलास पठारे, अशोक ढगे, विर बहादुर प्रजापती, बबलू खोसला सुनील टाक , भगवान जगताप व जिल्हाध्यक्ष श्री सुधीर  यांनी केले आहे.

शिर्डी ।राजेंद्र गडकरी /जय शर्मा-शिर्डी येथील संभाजीनगर मध्ये पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन पतीने तिला चाकूने भोसकून व स्वतःही गळफास घेऊन जीवन संपवले ,मात्र  पत्नी जबर जखमी झाल्याने आसपासच्या लोकांनी तीला शिर्डीच्या श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल दवाखान्यामध्ये उपचारार्थ दाखल केले,या प्रकाराने शिर्डी व परिसरात परिसरात खळबळ उडाली आहे, गेल्या काही दिवसापासून लॉक डाऊन मुळे शिर्डीच काय परंतु जिल्ह्यात शांतता वाटत असताना हा प्रकार शिर्डीत घडल्याने सर्वत्र मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे,
   यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शिर्डी येथील संभाजीनगर भागात राहणारे कैलास दिवाकर ठोकळ याची पत्नी अनिता कैलास ठोकळ या दोघांचे आपापसात नेहमी भांडण होत होते, कैलास ठोकळ आपल्या पत्नीवर नेहमी चारित्र्याचा संशय घेत होता ,यातून त्यांचे नेहमी वादावादी होत होती, असेच 17। 4 । 20 20 रोजी रात्री कैलास व।पत्नी अनिता याच्यांत चारित्र्याच्या संशयावरून  दोघांत भांडण झाले ,त्यामुळे कैलास ठोकळचा मुलगा चंद्रकांत हा आपल्या घर मालकाला बोलण्यास जात असतानाच कैलास ठोकल्याने रागाच्या भरात चाकूने आपली पत्नी अनिता ठोकळ यांच्यावर वार केले, चाकूने अनिताला भोकल्यामुळे  ती जबर जखमी झाली, व खाली पडली, हे पाहताच स्वतः कैलास ठोकळ याने दोरीने आपला गळा आवळून स्वतःचे जीवन संपवले, पत्नी मात्र जबर जखमी झाल्याने व मुलाने चंद्रकांत आरडाओरड केल्याने आसपासचे लोक जमा होऊन या जखमी महिलेला शिर्डीचे श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे, या प्रकरणाचा शिर्डी पोलिस अधिक तपास करत आहेत, लॉक डाऊन काळाची ही घटना घडल्यामुळे व सर्व शिर्डीत कडकडीत बंद असल्याने व  अशी ही घटना येथे झाल्याने शिर्डी आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना अशोक सहकारी साखर कारखान्याने ईतर कारखान्या प्रमाणे आर्थिक मदत करावी तसेच सँनिटायझर किटचे वाटप करावे अशी मागणी बाजार समितीचे संचालक सुधीर नवले व ईतर शेतकऱ्यांनी केली आहे. या बाबत प्रसिध्दीला दिलेल्या निवेदनात नवले यांनी म्हटले आहे की कोरोना मुळे परिसरातील शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले शेतात तयार झालेला भाजीपाला तसेच द्राक्ष डाळींब  कांदा गहु मका आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तयार झालेला भाजीपाला द्राक्ष टरबुज खरबुज मातीमोल भावाने विकावे लागले अशोक कारखान्याने नेहमीच परिसरातील शेतकऱ्यांना  मदत केली आहे या संकट काळात अशोक सहकारी साखर कारखान्याच्या वतीने हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात यावा शेतकऱ्यांना ईतर कारखान्या प्रमाणे आपल्याही  कारखान्याने मदत करावी अशी मागणी बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले यांनी केली आहे या निवेदनावर सुधीर नवले यांच्यासह शिवाजी पा वाबळे प्रकाश नवले ,भाऊसाहेब वाबळे ,मधुकर अनाप ,शाम चव्हाण ,कारभारी कुताळ ,नामदेव बोंबले ,गोरक्षनाथ कुर्हे ,सविता मेहेत्रे  आदिच्या सह्या आहेत.

शिर्डी। जितेश लोकचंदानी-सध्या कोरोनामुळे  सर्वत्र लॉक डाऊन सुरू आहे ,लॉक डाऊन तीन मे पर्यंत वाढवण्यात आला आहे, अशा परिस्थितीत सर्व जण घरात आहेत, त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला अन्नधान्याची गरज आहे पिवळे व केसरी शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकाना मार्फत धान्य मिळणार आहे, मिळत आहे,  मात्र  ज्यांच्याकडे कोणतीच शिधापत्रिका नाही ,आशा वंचित कुटुंबांना सुद्धा कामगार तलाठी व ग्रामसेवक यांच्यामार्फत सर्वे करून त्यांना या तीन महिन्यासाठी तरी अन्नधान्य पुरवठा रेशन दुकाना मार्फत व्हावा,अनेक लोक परराज्यातून कामगार म्हणून जिल्यात आले आहे,त्यांनाही रेशनवर धान्य मिळणे गरजेचे आहे, यासाठी कार्यवाही करावी  अशा  सूचना शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी जिल्हाधिकारी यांना केल्या आहेत,
   खासदार सदाशिव लोखंडे यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांना एका पत्राने कळविले आहे की आपण शिर्डी विधानसभा मतदारसंघात सर्व तहसीलदार गट विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक ,नगरपालिका नगरपंचायत यांचे कार्यकारी अधिकारी यांच्या बैठका घेऊन रेशन दुकाना मार्फत होणारा अन्नधान्य पुरवठा सुरळीत होतो की नाही यासंबंधी  चर्चा केली असता जिल्ह्यात सर्वत्र रेशनदुकाना मार्फत अन्नधान्य पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे समजते, मात्र ज्यांना पिवळे व केशरी रेशन कार्ड नाही अशा वंचित कुटुंबांना सुद्धा या लॉक डाऊन च्या संकटसमयी अन्नधान्य मिळावे ,त्यासाठी प्रत्येक गावातील कामगार तलाठी व ग्रामसेवक यांच्यामार्फत अशा कुटुंबांचा सर्वे होऊन त्यांना पत्र देऊन रेशन धान्य दुकाना मार्फत या वंचित कुटुंबांना धान्य पुरवठा केला जावा, असे म्हटले आहे तसेच हा धान्य पुरवठा रेशन दुकाना मार्फत होताना लॉक डाऊन चे नियम पाळले जावेत कुठे रेशन दुकानात गर्दी होता कामा नये, तसेच रेशन दुकानदाराकडून या काळात जर काळाबाजार उघडकीस आला तर त्यावर कठोर कारवाई करावी, असे खासदार सदाशिव लोखंडे यांनी म्हटले आहे,
चौकट
या लॉकडाऊनच्या काळात सर्व कुटूबांना पंतप्रधान अन्नधान्य योजनेमार्फत देण्यात येणारे प्रत्येकी पाच किलो मोफत तांदूळच येथे दिले जाणार आहे, मात्र नुकतेच केंद्र शासनाचे प्रधान गृहसचिव यांनी रेशनकार्ड धारकांना मोफत पाच किलो तांदूळ किंवा गहू असे द्यावयाचे आहे, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, मुख्यमंत्र्यांनीही तसे कालच सांगितले आहे ,मात्र गाव पातळीवर त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे,ज्याला तांदूळ किंवा ज्याला गव्हू लागतील त्यांना ते दिले पाहिजे, असे शिधापत्रिकाधारक बोलत आहेत,

शिर्डी ।जितेश लोकचंदानी। निवासी संपादक
सध्या देशात, राज्यात कोरोनामुळे लॉकंडाऊन सुरू आहे, या लॉक डाऊन  काळात  गोरगरीब सर्वसामान्य व गरजूंना  मदतीचा हात म्हणून अनेक ठिकाणी  अन्नदान,  जेवण, नाश्ता  व खाद्य पदार्थांचे वाटप  केले जात आहे,  मात्र  काही ठिकाणी  वाटप करताना फोटो काढून ते सोशल मीडियावर देऊन  त्याचा मोठा प्रचार केला जातो, त्यामुळे समाज  मनावर त्याचा विपरीत परिणाम होतो  आहे ,त्यावर बंधन येणे गरजेचे  आहे, किंवा अशा जाणीवपूर्वक या गोष्टीचा फायदा घेत सोशल मीडियावर फोटो टाकून प्रचार करणाऱ्या विरोधात कारवाई करावी अशी बिंदास न्यूज ला नुकतीच बातमी येऊन गेली
,या बातमीच्या वृत्ताचा दखल जिल्हाधिकारी यांनी घेऊन त्वरित आदेश काढत जर गोरगरिबांना याकाळात अन्नदान किंवा खाद्य पदार्थाची मदत करताना कोणी फोटो सोशल मीडियावर किंवा माध्यमाला प्रसिद्ध केला तर त्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे हा बिनधास्त न्यूज या बातमीचा इफेक्ट आहे, व जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांचे नागरिकांमधून निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन होत आहे
भयंकर अशा कोरोना विषाणूमुळे  सर्व जग हादरले आहे , कोरोनाचा संसर्ग देशात  वाढू नये  ,म्हणून देशात एकविस दिवसाचा लॉक डाऊन करण्यात आला, हा 21 दिवसांचा लॉकडाऊन 14 एप्रिल ला संपत आहे, त्यानंतरही लॉकडाऊनचा कालावधी 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आला आहे, सर्वत्र अत्यावश्यक सेवा सोडून बंद आहे ,त्यामुळे अनेक जण सर्व कामकाज बंद असल्याने घरात आहेत, गोरगरीब सर्वसामान्यांना काम धंदा नसल्यामुळे आर्थिक चंणचण मोठ्या प्रमाणात भासत आहे, ग्रामीण भागात हे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे गोरगरीब व गरजूंना अन्न ,जेवण खाद्य पदार्थाचे अनेक ठिकाणी  मदत म्हणून वाटप केले जात आहे, मात्र या खाद्य पदार्थांचे वाटप करताना फोटोसेशन व हे फोटो सोशल मीडियावर टाकून प्रचार करण्याच्या प्रकार मोठ्या प्रमाणात आता घडत आहे, त्यामुळे या फोटोसेशन वर बंदी आणावी किंवा असे करणार्‍यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे,
सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉक डाऊन आहे व 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढला आहे, त्यामुळे सर्वजण कामधंदा सोडून घरात आहेत, सर्व दुकाने बंद आहेत, अशा परिस्थितीत सर्वांना आर्थिक चणचण भासत आहे ,मात्र अशा गोरगरीब सर्वसामान्य माणसांना एक माणुसकीचा हात दाखवत अनेक दानशूर व्यक्ती वेगवेगळ्या प्रकाराने या संकट समयी सर्वसामान्य व गरजूंना मदत करीत आहेत, ही  मदत वेगवेगळ्या प्रकारची आहे ,ही चांगली गोष्ट आहे, व अशा वेळी  मानवतेच्या दृष्टिकोनातून  एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे ,मात्र काहीजण अन्न, जेवण ,नाष्टा व खाद्य पदार्थांचे वाटप करताना आपले फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकत असल्याने व त्याचा प्रचार मोठ्या प्रमाणात आता होऊ लागल्याने यावर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी बातमी बिंदास न्यूजला आली होती
 राजस्थानमधील अजमेर  येथील जिल्हाधिकारी शर्मा यांनी तसे आदेश काढले असून खाद्य पदार्थांचे वाटप करताना फोटो काढून ते जर सोशल मीडियावर टाकले तर अशा व्यक्तींवर भारतीय कायद्यान्वये कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे अजमेरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे ,असेच आता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात करण्याची गरज आहे, कोरोणामुळे सध्या राज्यात मोठे संकट निर्माण झाले आहे, अशा परिस्थितीत मदत करणे, एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे आहे, मात्र असे करताना विशेषता अन्नदान करताना फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकणे योग्य नाही ,अन्नदान किंवा मदत करण्यापेक्षा अनेक जण नुसता आपला प्रचार किंवा या प्रकाराचा जास्त बाऊ करण्यामध्ये पुढे आहेत, थोडेफार नावापुरते अन्नदान किंवा खाद्य पदार्थांचे वाटप करायचे व फोटो काढून ते सोशल मेडीयावर टाकून त्याचा मोठा गवगवा करायचा, असे प्रकार आता अनेक ठिकाणी होऊ लागली आहेत ,त्यामुळे त्याचा समाजावर विपरीत परिणाम होत आहे, म्हणून यापुढे तरी प्रत्येकाने मदत करताना विशेषता अन्नदान व खाद्यपदार्थ गरजूंना वाटप करताना, लॉक डाऊन चे नियम पाळत व त्याचे फोटो सोशल मीडियावर न देता ही मदत करावी ,अन्यथा जाणीवपूर्वक फोटो काढून सोशल मीडियावर टाकल्यानंतर व ते  उघडकीस आल्यानंतर  अशा व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी बिनधास्त न्यूजमध्ये देण्यात आली होती,
 या न्यूज चा परिणाम म्हणून माननीय जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांनी त्वरित दखल घेऊन जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन काळात कोणी अन्नदान किंवा खाद्यपदार्थ वाटप केले व त्याचे फोटो कडून ते सोशल मीडिया किंवा माध्यमांना प्रसिद्धीसाठी देऊन स्वतःच्या गवगवा केला तर अशा व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल असा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी  आदेश काढला आहे, यामुळे आता जिल्ह्यामध्येअसे फोटो सोशल मीडियावर टाकने कमी झाल्याचे दिसून येत आहे  गरिबांना मदत करणे गरजेचे आहे, मात्र त्याचा गवगवा नको असे नागरिकांचे म्हणणे आहे.

वैद्यकीय अधिकारी गोकुल घोघरे याण्च्या माहीती वरुण शिर्डीत एकही रुग्ण नाही शिर्डी राजेंद्र गडकरी/जय शर्मा  जगात, देशात , देश-विदेशातील साईभक्तांनी गजबजलेली शिर्डी मात्र या कोरेणापासून मुक्त आहे, व श्री साईबाबांच्या कृपेनेच शिर्डीत हे घडत आहे व पुढेही कोरोना पासून शिर्डीला श्री साईबाबा वाचवतील। अशी श्रद्धा साईभक्तांमधून सध्या व्यक्त होत आहे ,
 श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असून या शिर्डी शहरात
श्री साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो साईभक्त देश-विदेशातून येत असतात ,सध्या लॉकडाऊन मुळे श्री साई मंदिर दर्शनासाठी बंद आहे, मात्र त्या अगोदर येथे भक्तांची दररोज मोठी गर्दी होत होती, अशा नेहमी देश-विदेशातील साईभक्तांनी गजबजलेल्या शिर्डीत मात्र गेल्या महिनाभरापासून सर्व काही शांत आहे ,येथे कोरोनाचा एकही रुग्ण श्री साईबाबांच्या आशीर्वादाने अजून आढळलेला नाही, शिर्डी व परिसरातील सुमारे 40 ते 42 संशयितांचे स्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, मात्र एकही त्यामध्ये पॉझिटिव्ह आला नाही, ही सर्व किमया श्रीसाईबाबांचीच असल्याचे येथे चर्चा आहे ,,।शिर्डीत श्री साईबाबा हयात असताना  मानमोडी  महामारी ची साथ सर्वत्र मोठ्या प्रमाणात आली होती, देशात सर्वत्र
हाहाकार उडाला होता ,मात्र त्यावेळी सुद्धा शिर्डीत ही महामारी आली नव्हती, कारण त्यावेळी शिर्डीत ह्या मानमोडीची साथ येऊ नये म्हणून श्री साईबाबांनी शिर्डीच्या वेशीवर स्वता दळून पीठ  टाकले होते, त्यानंतर शिर्डीत  महामारी कधीच आली नाही, आत्तासुद्धा लॉकडाऊन सुरू होण्याअगोदर शिर्डीतील महिला साईभक्तांनी संपूर्ण शिर्डी शहराच्या वेशीवर पीठ टाकून रांगोळ्या काढत कोरोना हमारी शिर्डीत येऊ नये म्हणून श्री साईनाथ साकडे घातले होते, त्यानंतर शिर्डीकरांनी,व।साईभक्तांनी श्री साईबाबांवर श्रद्धा ठेवत स्वतःहून शिर्डी परिक्रमा काढली होती व त्यात श्री साईबाबांना कोरोनाची साथ शिर्डीत येऊ नये, म्हणून साकडे घातले होते ,त्यामुळे की काय
,श्री साईबाबांच्या शिर्डीत अद्याप एकही रुग्ण कोरोणाचा आढळून आला नाही ,ही साईबाबांची ही कृपाचआहे, असे शिर्डीकर व साईभक्त सध्या बोलत आहेत,
श्री साईबाबा हयात असताना श्री साईबाबांनी विविध प्रकारच्या रुग्णांवर प्रथम जडीबुटी नंतर उदी देऊन त्यांचा आजार बरा केला, हे सत्य असताना सध्याच्या या कोरोना मुळे झालेल्या आपत्तीजनक परिस्थितीत देशातील सर्व शहरे ,गावे मोठ्या चिंतेत असताना शिर्डीत मात्र दररोज देश-विदेशातील हजारो साईभक्त येत जात असताना येथे मात्र एकही कोरोना चा रुग्ण अद्याप आढळला नाही, हे एक विशेष असून श्रीसाईबाबांची ही कृपा असल्याचे येथे सध्या बोलले जात आहे,
 सध्याचे विज्ञान युग आहे ,मात्र या विज्ञान युगात एक शक्ती मोठी आहे ,तीच सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून श्रीसाईबाबा असल्याचे आता सध्या शिर्डीत दिसून येत आहे,कोरोना विषाणू पुढे अमेरिका, इटली ,स्पेन, ब्रिटन अशाअनेक देशांनी हात टेकले आहे, मात्र या सर्व गोष्टी  दैवी शक्तीवर अवलंबून आहे व हे प्रत्येकाला सध्या मान्य करावे लागेल, असे आता शिर्डीतून आपापसात चर्चा ऐकू येत आहे, कोणी हिला श्रद्धा किंवा अंधश्रद्धाही म्हणतील। पण शिर्डीकर व साईभक्तांच्या दृष्टीने ही साईवरील श्रद्धा आहे व शिर्डीत कोरोनाचा रुग्ण आढळला नाही ही साईचीच पुण्याई समजली जात आहे.

शिर्डी। राजेंद्र गडकरी । शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थान चे रक्तपेढी सुरू असून येथे साईभक्त व शिर्डीकर नेहमीच रक्तदान करीत असतात, आज भारतरत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती  निमित्त येथील रहिवाशी रक्तदान करण्यास श्री साईनाथ रक्तपेढीमध्ये गेले असता रक्तपेढीत रक्त साठा अधिक असल्याने रक्त घेता येणार नसल्याचे सांगून दहा पैकी फक्त दोन जणांचे रक्तदान घेण्यात आले, त्यामुळे इतर रक्तदात्यां मध्ये मोठी नाराजी निर्माण झाली, इच्छा असूनही डॉ,बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान करता आले नसल्याचे शल्य या तरुणांमध्ये होते,
सध्या देशात लॉकडाऊनची परिस्थिती आहे सर्वत्र बंद आहे,त्यात आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, सर्वत्र ती साध्या पद्धतीने साजरी होत आहे, त्यामुळे शिर्डीतील व परिसरातील काही तरुणांनी व व्यक्तींनी जयंती निमित्त रक्तदान करण्याचे ठरवून येथील श्री साईबाबा संस्थान रक्तपेढीत सर्वजण गेले, तेथे त्यांनी विनंती केली ,मात्र येथील श्री साईबाबा संस्थानच्या रक्तपेढी ने त्यांना आमच्याकडे रक्तसाठा सध्या अधिक आहे ,त्यामुळे आपले रक्तदान घेता येणार नाही, त्यामुळे रक्तदान करण्यासाठी गेलेल्या दहा पैकी फक्त अविनाश शेजवळ, विशाल कोळगे या दोघांचे रक्तदान घेण्यात आले, मात्र उर्वरित व्यक्तींचे रक्तदान घेण्यात आले नाही, त्यामुळे ह्या रक्तदान केलेल्या व मनात इच्छा असतानाही रक्तदान करता न आल्याने या तरुणांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती, आज डॉ,बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना म्हणून, अभिवादन म्हणून आम्ही रक्तदान करणार होतो ,मात्र ते करता न आल्याने आम्ही तीव्र नाराज झालो आहोत, रक्तदान करणाऱ्या व्यक्तींना यापुढे असे प्रकार घडू नये ,रक्तदान घेऊन दुसर्‍या रक्त पिढीला पाठवावे रक्तदात्यांना नाराज करू नये,,अशी मागणी या तरुणांकडून सध्या होत आहे, तसेच त्या रक्तपेढीत यावेळी  सिमोन जगताप यांनी आम्ही डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान करण्यासाठी येथे आलो होतो, मात्र आम्हाला रक्तदान करता आले नाही, तरी नंतर आम्ही रक्तदान करू, प्रत्येकाने मात्र लॉकडाऊन चे नियम पाळावे कोरोणाचा मुकाबला करण्यासाठी मास्क वापरणे, शक्यतो घराबाहेर पडू नये, दक्षता घ्यावी ,असे आवाहनही सिमोन  जगताप व  एडवोकेट अविनाश शेजवळ यांनी यावेळी केले, यावेळी रक्तपेढीतही सोशल डिस्टंन्स व नियम पाळले गेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून यावेळी या तरुणांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत त्यांना अभिवादन केले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget