शिर्डी। जितेश लोकचंदानी-सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉक डाऊन सुरू आहे ,लॉक डाऊन तीन मे पर्यंत वाढवण्यात आला आहे, अशा परिस्थितीत सर्व जण घरात आहेत, त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला अन्नधान्याची गरज आहे पिवळे व केसरी शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकाना मार्फत धान्य मिळणार आहे, मिळत आहे, मात्र ज्यांच्याकडे कोणतीच शिधापत्रिका नाही ,आशा वंचित कुटुंबांना सुद्धा कामगार तलाठी व ग्रामसेवक यांच्यामार्फत सर्वे करून त्यांना या तीन महिन्यासाठी तरी अन्नधान्य पुरवठा रेशन दुकाना मार्फत व्हावा,अनेक लोक परराज्यातून कामगार म्हणून जिल्यात आले आहे,त्यांनाही रेशनवर धान्य मिळणे गरजेचे आहे, यासाठी कार्यवाही करावी अशा सूचना शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी जिल्हाधिकारी यांना केल्या आहेत,
खासदार सदाशिव लोखंडे यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांना एका पत्राने कळविले आहे की आपण शिर्डी विधानसभा मतदारसंघात सर्व तहसीलदार गट विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक ,नगरपालिका नगरपंचायत यांचे कार्यकारी अधिकारी यांच्या बैठका घेऊन रेशन दुकाना मार्फत होणारा अन्नधान्य पुरवठा सुरळीत होतो की नाही यासंबंधी चर्चा केली असता जिल्ह्यात सर्वत्र रेशनदुकाना मार्फत अन्नधान्य पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे समजते, मात्र ज्यांना पिवळे व केशरी रेशन कार्ड नाही अशा वंचित कुटुंबांना सुद्धा या लॉक डाऊन च्या संकटसमयी अन्नधान्य मिळावे ,त्यासाठी प्रत्येक गावातील कामगार तलाठी व ग्रामसेवक यांच्यामार्फत अशा कुटुंबांचा सर्वे होऊन त्यांना पत्र देऊन रेशन धान्य दुकाना मार्फत या वंचित कुटुंबांना धान्य पुरवठा केला जावा, असे म्हटले आहे तसेच हा धान्य पुरवठा रेशन दुकाना मार्फत होताना लॉक डाऊन चे नियम पाळले जावेत कुठे रेशन दुकानात गर्दी होता कामा नये, तसेच रेशन दुकानदाराकडून या काळात जर काळाबाजार उघडकीस आला तर त्यावर कठोर कारवाई करावी, असे खासदार सदाशिव लोखंडे यांनी म्हटले आहे,
चौकट
या लॉकडाऊनच्या काळात सर्व कुटूबांना पंतप्रधान अन्नधान्य योजनेमार्फत देण्यात येणारे प्रत्येकी पाच किलो मोफत तांदूळच येथे दिले जाणार आहे, मात्र नुकतेच केंद्र शासनाचे प्रधान गृहसचिव यांनी रेशनकार्ड धारकांना मोफत पाच किलो तांदूळ किंवा गहू असे द्यावयाचे आहे, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, मुख्यमंत्र्यांनीही तसे कालच सांगितले आहे ,मात्र गाव पातळीवर त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे,ज्याला तांदूळ किंवा ज्याला गव्हू लागतील त्यांना ते दिले पाहिजे, असे शिधापत्रिकाधारक बोलत आहेत,
खासदार सदाशिव लोखंडे यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांना एका पत्राने कळविले आहे की आपण शिर्डी विधानसभा मतदारसंघात सर्व तहसीलदार गट विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक ,नगरपालिका नगरपंचायत यांचे कार्यकारी अधिकारी यांच्या बैठका घेऊन रेशन दुकाना मार्फत होणारा अन्नधान्य पुरवठा सुरळीत होतो की नाही यासंबंधी चर्चा केली असता जिल्ह्यात सर्वत्र रेशनदुकाना मार्फत अन्नधान्य पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे समजते, मात्र ज्यांना पिवळे व केशरी रेशन कार्ड नाही अशा वंचित कुटुंबांना सुद्धा या लॉक डाऊन च्या संकटसमयी अन्नधान्य मिळावे ,त्यासाठी प्रत्येक गावातील कामगार तलाठी व ग्रामसेवक यांच्यामार्फत अशा कुटुंबांचा सर्वे होऊन त्यांना पत्र देऊन रेशन धान्य दुकाना मार्फत या वंचित कुटुंबांना धान्य पुरवठा केला जावा, असे म्हटले आहे तसेच हा धान्य पुरवठा रेशन दुकाना मार्फत होताना लॉक डाऊन चे नियम पाळले जावेत कुठे रेशन दुकानात गर्दी होता कामा नये, तसेच रेशन दुकानदाराकडून या काळात जर काळाबाजार उघडकीस आला तर त्यावर कठोर कारवाई करावी, असे खासदार सदाशिव लोखंडे यांनी म्हटले आहे,
चौकट
या लॉकडाऊनच्या काळात सर्व कुटूबांना पंतप्रधान अन्नधान्य योजनेमार्फत देण्यात येणारे प्रत्येकी पाच किलो मोफत तांदूळच येथे दिले जाणार आहे, मात्र नुकतेच केंद्र शासनाचे प्रधान गृहसचिव यांनी रेशनकार्ड धारकांना मोफत पाच किलो तांदूळ किंवा गहू असे द्यावयाचे आहे, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, मुख्यमंत्र्यांनीही तसे कालच सांगितले आहे ,मात्र गाव पातळीवर त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे,ज्याला तांदूळ किंवा ज्याला गव्हू लागतील त्यांना ते दिले पाहिजे, असे शिधापत्रिकाधारक बोलत आहेत,
Post a Comment