Latest Post

वैद्यकीय अधिकारी गोकुल घोघरे याण्च्या माहीती वरुण शिर्डीत एकही रुग्ण नाही शिर्डी राजेंद्र गडकरी/जय शर्मा  जगात, देशात , देश-विदेशातील साईभक्तांनी गजबजलेली शिर्डी मात्र या कोरेणापासून मुक्त आहे, व श्री साईबाबांच्या कृपेनेच शिर्डीत हे घडत आहे व पुढेही कोरोना पासून शिर्डीला श्री साईबाबा वाचवतील। अशी श्रद्धा साईभक्तांमधून सध्या व्यक्त होत आहे ,
 श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असून या शिर्डी शहरात
श्री साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो साईभक्त देश-विदेशातून येत असतात ,सध्या लॉकडाऊन मुळे श्री साई मंदिर दर्शनासाठी बंद आहे, मात्र त्या अगोदर येथे भक्तांची दररोज मोठी गर्दी होत होती, अशा नेहमी देश-विदेशातील साईभक्तांनी गजबजलेल्या शिर्डीत मात्र गेल्या महिनाभरापासून सर्व काही शांत आहे ,येथे कोरोनाचा एकही रुग्ण श्री साईबाबांच्या आशीर्वादाने अजून आढळलेला नाही, शिर्डी व परिसरातील सुमारे 40 ते 42 संशयितांचे स्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, मात्र एकही त्यामध्ये पॉझिटिव्ह आला नाही, ही सर्व किमया श्रीसाईबाबांचीच असल्याचे येथे चर्चा आहे ,,।शिर्डीत श्री साईबाबा हयात असताना  मानमोडी  महामारी ची साथ सर्वत्र मोठ्या प्रमाणात आली होती, देशात सर्वत्र
हाहाकार उडाला होता ,मात्र त्यावेळी सुद्धा शिर्डीत ही महामारी आली नव्हती, कारण त्यावेळी शिर्डीत ह्या मानमोडीची साथ येऊ नये म्हणून श्री साईबाबांनी शिर्डीच्या वेशीवर स्वता दळून पीठ  टाकले होते, त्यानंतर शिर्डीत  महामारी कधीच आली नाही, आत्तासुद्धा लॉकडाऊन सुरू होण्याअगोदर शिर्डीतील महिला साईभक्तांनी संपूर्ण शिर्डी शहराच्या वेशीवर पीठ टाकून रांगोळ्या काढत कोरोना हमारी शिर्डीत येऊ नये म्हणून श्री साईनाथ साकडे घातले होते, त्यानंतर शिर्डीकरांनी,व।साईभक्तांनी श्री साईबाबांवर श्रद्धा ठेवत स्वतःहून शिर्डी परिक्रमा काढली होती व त्यात श्री साईबाबांना कोरोनाची साथ शिर्डीत येऊ नये, म्हणून साकडे घातले होते ,त्यामुळे की काय
,श्री साईबाबांच्या शिर्डीत अद्याप एकही रुग्ण कोरोणाचा आढळून आला नाही ,ही साईबाबांची ही कृपाचआहे, असे शिर्डीकर व साईभक्त सध्या बोलत आहेत,
श्री साईबाबा हयात असताना श्री साईबाबांनी विविध प्रकारच्या रुग्णांवर प्रथम जडीबुटी नंतर उदी देऊन त्यांचा आजार बरा केला, हे सत्य असताना सध्याच्या या कोरोना मुळे झालेल्या आपत्तीजनक परिस्थितीत देशातील सर्व शहरे ,गावे मोठ्या चिंतेत असताना शिर्डीत मात्र दररोज देश-विदेशातील हजारो साईभक्त येत जात असताना येथे मात्र एकही कोरोना चा रुग्ण अद्याप आढळला नाही, हे एक विशेष असून श्रीसाईबाबांची ही कृपा असल्याचे येथे सध्या बोलले जात आहे,
 सध्याचे विज्ञान युग आहे ,मात्र या विज्ञान युगात एक शक्ती मोठी आहे ,तीच सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून श्रीसाईबाबा असल्याचे आता सध्या शिर्डीत दिसून येत आहे,कोरोना विषाणू पुढे अमेरिका, इटली ,स्पेन, ब्रिटन अशाअनेक देशांनी हात टेकले आहे, मात्र या सर्व गोष्टी  दैवी शक्तीवर अवलंबून आहे व हे प्रत्येकाला सध्या मान्य करावे लागेल, असे आता शिर्डीतून आपापसात चर्चा ऐकू येत आहे, कोणी हिला श्रद्धा किंवा अंधश्रद्धाही म्हणतील। पण शिर्डीकर व साईभक्तांच्या दृष्टीने ही साईवरील श्रद्धा आहे व शिर्डीत कोरोनाचा रुग्ण आढळला नाही ही साईचीच पुण्याई समजली जात आहे.

शिर्डी। राजेंद्र गडकरी । शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थान चे रक्तपेढी सुरू असून येथे साईभक्त व शिर्डीकर नेहमीच रक्तदान करीत असतात, आज भारतरत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती  निमित्त येथील रहिवाशी रक्तदान करण्यास श्री साईनाथ रक्तपेढीमध्ये गेले असता रक्तपेढीत रक्त साठा अधिक असल्याने रक्त घेता येणार नसल्याचे सांगून दहा पैकी फक्त दोन जणांचे रक्तदान घेण्यात आले, त्यामुळे इतर रक्तदात्यां मध्ये मोठी नाराजी निर्माण झाली, इच्छा असूनही डॉ,बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान करता आले नसल्याचे शल्य या तरुणांमध्ये होते,
सध्या देशात लॉकडाऊनची परिस्थिती आहे सर्वत्र बंद आहे,त्यात आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, सर्वत्र ती साध्या पद्धतीने साजरी होत आहे, त्यामुळे शिर्डीतील व परिसरातील काही तरुणांनी व व्यक्तींनी जयंती निमित्त रक्तदान करण्याचे ठरवून येथील श्री साईबाबा संस्थान रक्तपेढीत सर्वजण गेले, तेथे त्यांनी विनंती केली ,मात्र येथील श्री साईबाबा संस्थानच्या रक्तपेढी ने त्यांना आमच्याकडे रक्तसाठा सध्या अधिक आहे ,त्यामुळे आपले रक्तदान घेता येणार नाही, त्यामुळे रक्तदान करण्यासाठी गेलेल्या दहा पैकी फक्त अविनाश शेजवळ, विशाल कोळगे या दोघांचे रक्तदान घेण्यात आले, मात्र उर्वरित व्यक्तींचे रक्तदान घेण्यात आले नाही, त्यामुळे ह्या रक्तदान केलेल्या व मनात इच्छा असतानाही रक्तदान करता न आल्याने या तरुणांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती, आज डॉ,बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना म्हणून, अभिवादन म्हणून आम्ही रक्तदान करणार होतो ,मात्र ते करता न आल्याने आम्ही तीव्र नाराज झालो आहोत, रक्तदान करणाऱ्या व्यक्तींना यापुढे असे प्रकार घडू नये ,रक्तदान घेऊन दुसर्‍या रक्त पिढीला पाठवावे रक्तदात्यांना नाराज करू नये,,अशी मागणी या तरुणांकडून सध्या होत आहे, तसेच त्या रक्तपेढीत यावेळी  सिमोन जगताप यांनी आम्ही डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान करण्यासाठी येथे आलो होतो, मात्र आम्हाला रक्तदान करता आले नाही, तरी नंतर आम्ही रक्तदान करू, प्रत्येकाने मात्र लॉकडाऊन चे नियम पाळावे कोरोणाचा मुकाबला करण्यासाठी मास्क वापरणे, शक्यतो घराबाहेर पडू नये, दक्षता घ्यावी ,असे आवाहनही सिमोन  जगताप व  एडवोकेट अविनाश शेजवळ यांनी यावेळी केले, यावेळी रक्तपेढीतही सोशल डिस्टंन्स व नियम पाळले गेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून यावेळी या तरुणांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत त्यांना अभिवादन केले.

श्रीरामपूर  (प्रतिनिधी  )- कोरोनाचे आलेले संकट लक्षात घेता सालाबाद प्रमाणे साजरा होणारा हजरत सैलानी बाबां दरबार चा ६१ वा उरुस  हा पोलीस बांधवांना सँनिटायझर डोर,नागरिकांना सँनिटायझर निर्जंतुकीकरण कक्ष व गरीब गरजवंतांना भाजीपाला किराणा सामान भेट देवुन साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर 
शहरातील हजरत सैलानी बाबांचा जंगी उरुस शरीफ  दरवर्षी हजरत सैलानी बाबा दरबार सांस्कृतिक  व शैक्षणिक  ट्रस्टच्या वतीने मोठ्या उत्सहात साजरा केला जात असे हजरत सैलानी बाबांच्या उरुसाचे हे ६१ वे वर्ष  होते त्या निमित्ताने अनेक सांस्कृतिक व धार्मिक  कार्यक्रमाचे आयोजन दि . १५ एप्रिल ते १८ एप्रिल २०२० कालावधीत करण्यात आले होते परंतु  देशावर अचानक कोरोनाचे संकट आले प्रशासनानेही सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध  आणले या सर्व बाबींचा विचार करुन ट्रस्टने या वर्षीचा उरुस साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला तसेच उरुन निमित्ताने होणारा खर्च हा पोलीस बांधवा करीता सँनिटायझर तसेच सामाजातील दुर्बल घटकांना भाजीपाला तसेच किराणा वस्तूचे वाटप करुन करण्यात आल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष असलम बिनसाद यांनी सांगितले. तर उरुस कमिटीच्या या उपक्रमा बद्दल उरूस कमिटीचे अध्यक्ष कृष्णा धुवाविया उपाध्यक्ष  सलीम बिनसाद सल्लागार आजित डोखे खजिनदार कलीम बिनसाद सहाय्यक खजिनदार सुरेश बालतुरे सचिव प्रशांत गौड संघटक नवलशेठ बोरा आदिचे अनेकांनी अभिनंदन केले आहे. 

अहमदनगर  : जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यापैकी २१ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत.दरम्यान, बुधवारी पाठवलेले १३ आणि आज पाठविण्यात आलेले २० असे ३३ स्त्राव अहवालाची अद्याप प्रतीक्षा असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत १२१५ व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील  ११४५ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव आले आहेत. ज्या अहवालाची प्रतीक्षा आहे त्यामध्ये १४ दिवस पूर्ण केलेल्या आणखी दोघा परदेशी नागरिकांचा समावेश आहे.जिल्ह्यात सारीचे रुग्णही आढळत असून ११ एप्रिलपासून ते आजपर्यंत ४२ रूग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय आणि महात्मा फुले जीवनदायी योजने अंतर्गत मान्यता दिलेल्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये २३ पुरुष, १५ स्त्री आणि  ०४ मुलांचा समावेश आहे.

शिर्डी।  जितेश लोकचंदानी। आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डी शहरांमध्ये नगर-मनमाड व शहरातील इतर रस्त्याच्या मधोमध दुभाजकामध्ये शोभेची झाडे लावलेली होती ,परंतु दररोजच्या वाहनांच्या वर्दळीमुळे व प्रदूषणामुळे ही झाडे काळी पडली होती, मात्र लॉकडाऊन शिर्डीत सुरू झाल्यापासून सर्व वाहने व वर्दळ बंद आहे ,त्यामुळे प्रदूषणही खूपच कमी झाले आहे, व त्यामुळे रस्त्याच्या दुभाजका मधली झाडे आता टवटवीत व हिरवीगार अशी दिसू लागली आहेत, सध्या कडक उन्हाळा सुरू असतानाही ही झाडे अशी हिरवीगार व टवटवीत वाटू लागली असल्याने हा लॉक डाऊनच्या बंदकाळाचा परिणाम असल्याची चर्चा सध्या येथे होत असून येथील नागरिकाकडून या प्रकाराबद्दल  आश्चर्यही व्यक्त होत आहे,
शिर्डीत दररोज हजारो साईभक्त देश-विदेशातून येत असतात, त्यामुळे शिर्डीतील रस्ते सुशोभीकरण करण्यात आले आहे ,नगर-मनमाड व इतर ठिकाणी ,रिंग रोड अशा सर्व ठिकाणी रस्त्याच्या दुभाजका मध्ये विविध जातीची सुशोभित अशी वृक्षे शिर्डी नगरपंचायत  ने लावली आहेत ,अनेक दिवसांपासून ही वृक्ष आहेत ,मात्र या वृक्षांची मोठी देखभाल नगरपंचायत करते, तरी ही वृक्षे वाहनांचा धूर व प्रदूषण यामुळे काळवंडलेली दिसत होती, मात्र सध्या लॉकडाऊन काळात येथे वाहने येत जात नसल्याने व इतर प्रदूषण फारच कमी झाल्याने ही दुभाजका  मधली व इतर ठिकाणची वृक्षे आता अगदी हिरवीगार व टवटवीत दिसू लागले असून येणारे जाणाऱ्यांचे लक्ष आता याकडे जातआहे,व व सर्वांनाच वृक्ष आपल्याकडे  पाहण्यासाठी आकर्षित  करत आहेत,

शिर्डी ।राजेंद्र गडकरी  ।
सध्या देशात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे, अहमदनगर जिल्ह्यातही लॉक डाऊन सुरू असल्याने जिल्ह्यात सर्व बंद आहे, मात्र त्यातू  न अत्यावश्यक सेवा वगळण्यात आले आहे ,अशा अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना सध्या येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन त्यांना अडचण होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस कार्यालया मार्फत ऑनलाइन पास देण्यात येणार आहेत मात्र त्यासाठी  ऑनलाईन अर्ज करणे महत्त्वाचे आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे,
 सध्या कोव्हीड19 विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात 144 कलम जारी करण्यात आलेला आहे ,त्यामुळे सर्व बंद आहे ,मात्र या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली आहे, मात्र अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींना या बंद काळात येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन या व्यक्तींना विशेष पास देण्यात येणार आहे, त्यामध्ये बँक अधिकारी, कर्मचारी, शासकीय-निमशासकीय निमशासकीय महामंडळे,, विविध आस्थापने, तसेच दवाखाने व आरोग्य विभागातील अधिकारी, डॉक्टर नर्स ,आरोग्य कर्मचारी, सेविका तसेच शासनाने ज्या कंपन्यांना या काळात सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे अशा कंपन्यातील कर्मचारी ,अंबुलन्स दूध विक्रेते, फळ विक्रेते, पेट्रोल पंप, टेलिकम्युनिकेशन, केबल टीव्ही, तसेच पत्रकार व आरटीओ चे परवाना पत्र घेतलेले माल वाहनधारक  आदी ठिकाणी काम करणारे अधिकारी ,कर्मचारी  परवानाधारक किराणा, मेडिकल   आदी अत्यावश्यक सेवा देणारे व्यक्तींना आपल्या कंपनीचे किंवा आस्थापनेचे ओळखपत्र किंवा पत्र ऑनलाइन अर्जासोबतजोडून ते जिल्हा पोलीस कार्यालयाकडे पाठवून त्यानंतर या अर्जाची, ओळखपत्राची शहनिशा करून जिल्हा पोलीस कार्यालयामार्फत या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींना या लॉक डाऊन च्या काळात अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी संचार करणे भाग पडणार असल्यामुळे त्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून विशेष पास दिले जाणार आहेत तसेच  अंत्यविधीसाठी  रक्तातल्या व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी जाणाऱ्या  दोन व्यक्तींना तेही त्यांच्याकडे मयत व्यक्तीच्या मृत्यूचा दाखला असला तरच  अर्ज करून पास मिळणार आहे , त्याचप्रमाणे वैद्यकीय उपचार घेणाऱ्या डॉक्टरांचे त्यासाठी विशेष पत्र असणाऱ्या रुग्ण यांना विशिष्ट कालावधीसाठी करून पास मिळणार आहे, त्यासाठी या---https://covid19mh.in वेबसाईटवर त्यांनी आपल्या ओळखपत्र सहित विशेष नमुन्यातील अर्ज ऑनलाईन भरावा अशी आवाहन जिल्हा पोलीस कार्यालयामार्फत एका  पत्रकान्वये करण्यात आले आहे.

शिर्डी। जितेश लोकचंदानी। निवासी संपादक
 सध्या कोराना मुळे देशात लॉकडाऊन  सुरू आहे, सर्वत्र संचारबंदी जारी आहे, सर्व बंद आहे ,परंतु शिर्डी व परिसरात  अवैध गुटखा साठा व अवैध दारूसाठा  आणि त्याची विक्री दाम दुप्पट रक्कम घेऊन गुपचुपपणे सुरू आहे, यावर स्थानिक पोलिसांचे मात्र दुर्लक्ष होताना दिसून येत आहे, जिल्हा पोलिसांनी तसेच जिल्हा दारूबंदी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी व जिल्हा अन्नभेसळ अधिकाऱ्यांनी याकडे गुप्त पद्धतीने चौकशी करून या अवैध व्यवसाय व  अवैध दारू व गुटखा साठा करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे,
जिल्ह्यात सध्या जिल्हाधिकारी साहेबांनी एका आदेशान्वये या लॉकडाऊन काळात संचारबंदी व कलम 144 लागू केले आहेत, अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद आहे ,जिल्ह्यातील सर्व देशी दारू दुकाने, परमीटरूम, वाईन्स शॉपी बंद आहे , मात्र अनेकांनी अवैधरित्या बियर, दारू यांचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवला आहे व या बंद काळात दुप्पट, तिप्पट रक्कम घेऊन बिअर व दारूची विक्री गुपचुपपणे होत आहे, असे असताना स्थानिक पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे, शिवाय राज्यात गुटखा बंदी पूर्वीपासूनच असताना सर्रास अनेक ठिकाणी गुटखा मिळत होता आता तर लॉकडाऊन सुरू आहे, तरीसुद्धा अनेक ठिकाणी अवैध  गुटखा साठा करून अनेक दुकानात गुपचुपपणे ह्या गुटख्याची विक्री केली जाते व मोठ्या प्रमाणात नफा कमवला जातो, स्थानिक पोलीस याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे ,त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याला नुकतेच बदलून आलेले कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार तसेच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी त्याचप्रमाणे नुकतेच शिर्डीमध्ये धाड टाकून अवैद्य बियरसाठा जप्त करणारे जिल्हा दारूबंदी उत्पादन शुल्क अधिकारी व कर्मचारी यांनी याकडे लक्ष घालावे, तसेच जिल्हा अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी यांनी जिल्ह्यात गुप्तपणे व आपल्या खबऱ्या मार्फत चौकशी करून कोणत्या ठिकाणी अवैधगुटखा साठा करून ठेवला आहे ,कोण गुटखा होलसेल व किरकोळ विक्री करतो, दाम दुप्पट ने गुपचुपपणे गुटखे विकून मोठा पैसा सध्या कमावतो, याचा तपास लावणे महत्त्वाचे आहे, शिर्डी व परिसरातील गावांमध्ये अवैध दारू साठी अवैद्य गुटका साठे मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी असताना मात्र स्थानिक पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे, स्थानिक पोलिसांचे यामध्ये काही गौडबंगाल आहे का। याची सविस्तर चौकशी करून अशा अवैध दारू साठे व अवैध गुटखा साठे करून ठेवणाऱ्या व या लॉकडाऊंनच्या काळात अव्वाच्या सव्वा पैसा कमावणाऱ्या व्यापाऱ्यांवर, दुकानदारांवर ,विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, सर्वसामान्य माणसांना बाहेर फिरणे मुश्कील होते ,भाजीपाला विक्रेत्यांवर  कारवाई होते ,पण असे अनेक किराणा दुकानदार लॉकडाऊन चे नियम पाळत नाही, दिसण्या पुरते दुकानापुढे फक्त भावफलक लावून ठेवले आहे ,तसेच सोशल डिस्टन्स साठी अंतरा अंतरावर गोलाकार निशाणी करून ठेवले आहे, मात्र त्याचा प्रत्यक्ष उपयोग होताना दिसत नाही, अनेक ठिकाणी लोक दुकानासमोर गर्दी करून किराणा माल घेताना दिसतात, कोणतेही लॉक डॉऊन चे नियम पाळत नाही, अनेकांच्या तोंडाला मास्क ही नसतो ,जर एखादा  दुर्दैवाने कोरोना बाधीत रुग्ण दुकानदाराच्या संपर्कात आला तर त्या दुकानात गावातील परिसरातील हजारो लोक दररोज सकाळ-दुपार किराणा घेण्यास येत असतात, त्यांनाही संसर्ग होण्याची शक्यता दाट होऊ शकते ,त्यामुळे अशा ठिकाणी काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे, मात्र या काळातच दामदुप्पट पैसा कमवण्याची संधी समजून हे व्यापारी या लॉकडाऊन च्या नियमाकडे दुर्लक्ष करीत आहे, कोणत्याही माल अधिक रक्कम घेऊन ग्राहकांना विक्री केली जाते, साठा कमी आहे ,मालाचे शॉर्टेज आले आहे, वरूनच किंमत वाढली आहे ,मालाची गाडी आली नाही ,असे अनेक कारणे दाखवून या मालाची किंमत वाढवली जात आहे,
 तसेचजोपर्यंत पोलीस समोरआहे, तोपर्यंत नियमात सर्व दाखवले जाते, मात्र पोलिस व अधिकारी गेले की परत जैसे थे परिस्थिती होते ,यावर आता पोलिसांनी, अधिकाऱ्यांनी साध्या वेशात येऊन अशा ठिकाणी छापे घालणे, गरजेचे झाले आहे, सध्या गोरगरीब ,सर्वसामान्य माणूस घरात बसलेलाआहे, काम धंदा नाही ,आर्थिक चणचण जाणवत आहे ,अशा परिस्थितीत व्यापारी, दुकानदार मात्र सर्वसामान्य गोरगरिबांची आर्थिक लुटालूट सध्या अनेक ठिकाणी करताना दिसून येत आहे, अश्या व्यापारी, दुकानदार व अवैध दारू गुटखा साठा करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधिकारी व  सर्व विभागाचे अधिकारी याकडे अधिक लक्ष देतील व कारवाई करतील अशी नागरिकांची अपेक्षा आहे,.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget