Latest Post

बुलडाणा - 14 एप्रिल
आज जिल्हा प्रशासनाला प्राप्त स्वेब नमुन्यात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णां मध्ये 3 रुग्ण हे मलकापूरचे असून ते यापूर्वी सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील आहेत.
तर एक रुग्ण हा बुलडाणा येथील असून तो दिल्ली वरून परतलेला असल्याची माहिती आहे.बुलडाणा जिल्ह्यातील आधीच्या कोरोना बाधित रुग्णाच्या निकट संपर्कातील 4 व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या 21 झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुमन रावत चंद्रा यांनी दिली आहे.
       मागील 4 दिवसांपासून जवळपास 50 रिपोर्ट प्रलंबीत होते ते सर्व निगेटिव्ह आले होते. परंतु परवा आणि काल जे स्वॅब नव्याने पाठविले होते, त्यांचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. मलकापूरच्या एकुण स्वॅबपैकी नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीष रावळ कोरोना निगेटिव्ह निघालेले आहेत. शिवाय मलकपूरच्या कोरोना रुग्णाला तपासणार डॉक्टरसुद्धा निगेटिव्ह आहेत.परंतु संबंधीत कोरोना संसर्गीताच्या कुटूंबातील तीन जण पॉझिटीव्ह निघाल्याची माहिती आहे. तर बुलडाणा शहरात कोरोना संसर्गीताची एकाने वाढ झाली आहे. संबंधीत नवीन कोरोना रुग्ण जौहर नगर येथील रहिवाशी असून त्याचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला होता पण दुसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे.एकूण रुग्ण संख्या 21 वर पोचल्याने बुलडाणा जिल्हा रेड झोन ठरत असून मलकापूरसाठीही ही धोक्याची घंटा आहे. एकट्या मलकापूरमध्ये एकुण चार रुग्ण झाले आहेत.आता बुलडाणा एकुण 6 (एक मृत), मलकापूर 4, शेगांव 3, चिखली 3, खामगांव ग्रामीण (चितोडा) 2, देऊळगांवराजा 2 आणि सिंदखेडराजा 1 असे एकुण 21 जण जिल्ह्यात कोरोना बाधित.

शिर्डी। जितेश लोकचंदानी निवासी संपादक
 देशात कोरोना मुळे मोठी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, देशभर लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे, अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बंद आहे, दारू दुकाने व परमिटरूम, बियरबार सुद्धा बंद आहेत, मात्र काही बियरबार वाल्यांनी मोठा विनापरवाना अवैध साठा करून ठेवला असून ते दामदुपटीने विक्री करत आहेत ,
अशा बिअरशॉपी, वाईन्स, परमिटरूम यांच्यावर जिल्हा दारूबंदी व  उत्पादक शुल्क अधिकारी व पोलिसांनी  अधिक कडक पहारा सुरु केला आहे, यातूनच जिल्हा दारूबंदी व उत्पादन शुल्क पोलिसांनी गुप्त माहिती मिळताच निमगाव कोऱ्हाळे हद्दीतील आनंद बिअर शॉपी वर धाड टाकली व या शॉपी पाठीमागील बाजूस असलेल्या पत्र्याच्याशेड गोडाऊन मधून  लाखो रुपये किमतीचे बियरचे बॉक्स  होते,  ते जप्त करण्यात आले, यामुळे शिर्डी व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे, विशेष म्हणजे  या बिअर शॉपी जवळच शिर्डी पोलीस स्टेशन आहे, मात्र या पोलिस स्टेशनला या गोष्टीची काहीही खबर नसताना जिल्हा दारूबंदी व उत्पादन शुल्क पोलिसांना मात्र ह्या गोष्टीची माहिती मिळते व हे जिल्हा दारूबंदी व उत्पादन शुल्क अधिकारी व पोलिसकर्मचारी शिर्डीत येऊन या बियर शॉपी च्या गोडाऊन मध्ये धाड टाकून अवैध  साठा केलेली बियर जप्त करतात शिर्डी पोलीस स्टेशन मात्र या प्रकाराबाबत अनभिन असते, या गोष्टीबद्दल शिर्डी करांमधून मोठी उलट-सुलट चर्चा सुरू आहे, जिल्हा पोलीस कारवाई करतात मात्र शिर्डी पोलिसांना काही माहीत नाही, असे कसे होऊ शकते ।यामध्ये काहीतरी गौडबंगाल असल्याशिवाय असे होणार नाही, अशी चर्चा आता शिर्डी करांमधून होऊ लागली आहे,
 सध्या या लॉकडाऊन काळात दारू दुकाने बंद आहेत, दारू विक्री करणे, यास परवानगी नाही, मात्र काही बिअरबार वाल्यांनी ,   वाईन्स दुकानवाल्यानी,  जवळच्या गोडाउन मध्ये अवैध साठा करून बिअर, दारू या काळात दुप्पट ,तिप्पट रक्कम घेऊन विक्री केली जाते ,हे जिल्हा दारूबंदी व उत्पादन शुल्क पोलिसांना समजल्यानंतर या पोलिसांनी त्वरित कारवाई करत संशयित अशा ठिकाणी धाडी टाकल्या,  त्यात या आनंद बिअर शॉपी वर धाड टाकली असता या बिअर शॉपी च्या पाठीमागील बाजूस  पत्र्याच्या शेड गोडाउन मध्ये असलेल्या  24 लाख 39 हजार 72 रुपये किमतीचे किंगफिशर, कॅनोन, बडवायझर अशा विविध कंपन्यांच्या बियर व विविध कंपनीचे वाईन्स च्या छोट्या, मोठ्या।अश्या एकूण 964 बाटल्यांच्या बॉक्सचा  साठा करून ठेवलेला होता , तो या गोडावूनमधून जप्त करण्यात आला, व एका ट्रकमध्ये  भरून तो नगर कडे रवाना करण्यात आला, या गोडाऊन चे मालक व बिअर शॉपी चे  मालक योगेश नंदकुमार कडलक  यांच्यावर  गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली,
मा, राहुल द्विवेदी , जिल्हाधिकारी अहमदनगर, व राज्य दारूबंदी उत्पादन शुल्क विभागीय उपायुक्त प्रसादजी सुर्वे तसेच या खात्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक पराग नवलकर, कोपरगाव चे निरीक्षक घोरतळे ,निरीक्षक संजय सराफ अनिल पाटील, अजित बडदे भाऊसाहेब भोर ,निहाल शेख, राजेंद्र कदम ,विलास कंठाळे प्रवीण साळवे, पांडुरंग गदादे, आदींच्या पोलीस अधिकारी व पोलिसांच्या साह्याने या बिअर शॉपी वर धाड टाकण्यात आली व कारवाई करण्यात आली, जिल्ह्यात ही मोठी कारवाई समजली जाते ,मात्र या बिअर शॉपी पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या शिर्डी पोलीस स्टेशनला मात्र याची काहीच माहित नव्हती याबद्दल नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू आहे ,जिल्हा दारूबंदी उत्पादनशुल्क पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे शिर्डी व परिसरातून अभिनंदन होत आहे मात्र शिर्डी पोलिसांबद्दल शिर्डी करांच्या मनात आता वेगळी चर्चा ऐकायला मिळू लागली आहे , लॉकडाऊन देशात सुरू झाल्यापासून सर्व दारूधंदे बिअर शॉपी बंद आहेत, मात्र तरीही ही अनेक ठिकाणी रानात ,आडबाजूला काही लोक दारू ,बिअर घेऊन पार्टी करताना दिसतात, जर सर्वत्र दारूधंदे बिअर शॉपी, वाईन्स बंद आहेत, मग हे दारु, बियर या लोकांना कुठून मिळते ।हा प्रश्न मोठा असून अशा परवानगी नसतानाही साठा करून ठेवलेल्या बियर व विविध प्रकारच्या दारू च्या बाटल्या हे दारूविक्रीते, मालक दुप्पट ,तिप्पट रक्कम घेऊन लोकांना गुपचूपपणे विकतात, असा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी हा प्रकार सध्या गुपचुपपणे सुरू असून त्यावर जिल्हाधिकारी व जिल्हा  पोलीस अधीक्षक यांनी विशेष लक्ष घालण्याची गरज असल्याचे नागरिक बोलत आहेत,
 लॉक डाऊन काळात लोकांना ताज्या भाज्या अनेक अत्यावश्यक गोष्टी मिळत नाही, तरी सर्व सामान्य माणूस कोरोणाचा मुकाबला करण्यासाठी लॉक डाऊन चे नियम पाळत घरात आहेत ,मात्र काही लोक या लॉक डाऊन चा नियम तोडून दारू, बियर गुपचुप दाम दुप्पट पैसा कमवण्यासाठी विक्री करत आहेत व काही लोक हे बिअर किंवा दारू दाम दुप्पट रक्कम देऊन आडबाजूला किंवा निवांत स्थळी ,आड बाजूला जाऊ पर्टी करतात, हे चुकीचे असून यावर यावर आता अधिक लक्ष देणे गरजेचे आहे, जिल्हा दारूबंदी व व उत्पादन शुल्क पोलिसांनी अधिकाऱ्यांनी जिल्ह्याभर अशी मोहीम सुरू केली आहे  शिर्डीत या जिल्हा पोलिसांनी आनंद बिअर शॉपीवर धाड टाकून हे सिद्ध केले आहे हे मात्र हाकेच्या अंतरावर असणारे शिर्डी पोलीस स्टेशन व येथील पोलिस अधिकारी कर्मचारी यांना या गोष्टीबद्दल किंवा या प्रकाराबद्दल काहीच माहित नाही, हे विशेष आहे ,यात काहीतरी गौडबंगाल असल्याचे शिर्डीकर बोलताहेत ,इतर वेळी असे प्रकार सर्रास सुरूच असतात, मात्र सध्या देश तर भयानक परिस्थितीतून जात असताना व  लॉकडाऊनची परिस्थिती येथे असताना हे सर्व नियम पायदळी तुडवून जर असा प्रकार येथे होत असेल तर मग शिर्डी पोलीस काय करत आहेत, असा सवाल शिर्डी करांमधून आता उपस्थित होत आहे,

चौकट
शिर्डी व परिसरात विविध कंपन्यांचे गुटखा अवैधरित्या साठा करून काही व्यापा-यांनी ठेवला असून या गुटखा विक्रेते व व्यापारी यांचीही पोलिसांनी गुप्त माहिती काढून शोध लावून या अवैध गुटखा साठा करणाऱ्या होलसेल व किरकोळ गुटखा व्यापारी यावर धाडी टाकाव्या व कडक कारवाई करावी,
 राज्यात गुटखा बंदी असताना येथे गुटखा विकला जातो, सध्या तर लॉक डाऊन आहे, इतर राज्यातून चोरून येणारा गुटखा बंद आहे, मात्र अवैध करून ठेवलेला त्यांचा साठा अद्यापही जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहे, त्यामुळेच तिप्पट ,चार पट रक्कम घेऊन विविध कंपन्यांचे गुटखे येथे विकले जातात ,गुपचूपपणे या गुटख्याची विक्री होत आहे, शिर्डी परिसरातही चुपचाप पणे गुटके मिळतात, हे गुटखे कुठून आले व यांचा साठा कोठे आहे ।कोण होलसेल विक्रेते आहे यांची गुप्त माहिती काढून धाडी टाकून अशांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे ,असे आता शिर्डी करांमधून बोलले जात आहे व जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार हे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत ते नक्कीच या गोष्टीकडे लक्ष देतील असे शिर्डीकर यांचे मत आहे,

सावळीविहीर। राजेंद्र गडकरी।            
सावळीविहीर व परिसरात भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली,
  सध्या देशात ,राज्यात  कोरोनामुळे मोठी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे, एकविस दिवसाचा आज लॉकडाऊन संपत असला तरी परत तीन मे पर्यंत हा लॉक डाऊन वाढवण्यात आला आहे, अशा लॉक डाऊन च्या काळात भारतरत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांची  129 वी जयंती आज आली असल्याने येथे या।काळात लॉकडाऊनचे नियम पाळत प्रत्येकाने ही जयंती आप आपल्या घरात साजरी केली, व या महामानवाला अभिवादन करण्यात आले ,
अनेकांनी आपल्या घरावर निळ्या गुढी उभारून व घरातल्या घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करून या महामानवला अभिवादन केले, तसेच येथील जी,प, शाळेजवळील डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपूर्णकृती  पुतळ्याला ग्रामपंचायत च्या वतीने लॉक डाऊन चे नियम पाळत व सोशल डिंस्टन्स ठेवत ,बाळासाहेब जपे, संतोष आगलावे, सोपान पवार ,अनिल वाघमारे,  सुरेश वाघमारे, आदींनी पुष्पहार अर्पण करत साध्या पद्धतीने जयंती साजरी केली ,या परिसरात डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपूर्णाकृती पुतळ्याजवळ व परिसरात हारांनी सजावट करण्यात आली होती , लॉकडॉऊन काळात ही  जयंती आल्यामुळे सर्वत्र साध्या पद्धतीने व दरवर्षीपेक्षा यावर्षी मिरवणूक किंवा मोठा गाजावाजा न करता सर्वांनी आपापल्या घरात राहून ही जयंती साजरी केली, सावळीविहीर येथे  कालच एका रिक्षांमधून स्पीकरवर गावामध्ये विश्वरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कोणीही मोठ्या संख्येने घराबाहेर पडू नये, प्रत्येकाने आपापल्या घरी डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी ,लॉक डाऊन चे नियम पाळावेत, दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या, त्या सूचनेप्रमाणे आज सर्वांनी आपल्या घरातच डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली ,
तसेच बुद्धविहारांमध्ये बौद्धाचार्य गौतम गोडगे ,सुशिल पवार, अशोक जाधव, आदींनी आपल्या तोंडाला मास्क बांधून व सोशल डिस्टंन्स पाळत गर्दी न करता, डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून साध्या पद्धतीने जयंती साजरी केली ,तसेच नुकतीच गेल्या शनिवारी महात्मा ज्योतिराव फुले जयंती होती, त्यानिमित्त बुद्धविहार येथे श्री महात्मा ज्योतिराव फुले यांनाही त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून ही जयंती साजरी करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले होते,     महामानव विश्वरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  गरजूंना या लॉक डाऊन काळात हातभार लागावा म्हणून आपापल्या परीने मदत करण्यात आली, कोठेही लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले नाही,
सावळीविहीर परिसरातील निमगाव, निघोज, सावळीविहिर खुर्द, रुई, कोहकी ,अशा  गावांमध्येही या लॉकडाऊन काळात साध्या पद्धतीने व घराघरात डॉ, बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली, व अभिवादन करण्यात आले.

अहमदनगर (प्रतिनिधी) कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागात राहणारी महिला कोरोनाशी झुंज देत असताना अखेर मंगळवारी पहाटे तिने अखेरचा श्‍वास घेतला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी याबाबत माहिती दिली. यामुळे जिल्ह्यातील दोघांचा कोरोमुळे बळी गेला आहे. तर जिल्ह्यात उपचार घेणारी पहिली व्यक्ती मृत्यूमुखी पडली आहे.मागील आठवड्यात श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धन येथील एका तरूणाला कोरोनामुळे जीव गमवावा लागला. आता या महिलेच्या मृत्यूमुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 28 जणांना लागण झाली आहे. गेल्या शुक्रवारी कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागातील या 60 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली असल्याचे आढळून आले होते. त्या आधीच तिला ग्रामीण रुग्णालयात न्यूमोनियाची उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आल्यानंतर या महिलेस नगर येथील बूथ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी तिला जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज सकाळी जिल्हा रुग्णालयातील महिलेचा मृत्यू .

श्रीरामपूर : नेवासा येथे सोमवारी एक कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आला. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या श्रीरामपूर शहरातील नऊ जणांना नगर येथील सिव्हिल रुग्णालयात दुपारी हलविण्यात आले. संबंधित कोरोनाग्रस्त रुग्णाची तपासणी करणारे दोन जण हे वैद्यकीय क्षेत्रातील असल्याने श्रीरामपूरमध्ये एकच धास्ती निर्माण झाली आहे.नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नगर शहरानंतर जिल्ह्यातील नेवासे, संगमनेर, राहता, कोपरगाव व श्रीरामपूर तालुक्यात रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात ग्रामीण भागातही एका रुग्णाचा कोरोनाच्या संसगार्मुळे पुणे येथील ससून रुग्णालयात मृत्यू झाला होता.नेवासे येथे सोमवारी एक रुग्ण मिळून आला. सोमवारी त्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला. मात्र या रुग्णाचा श्रीरामपूर येथील नऊ जणांशी संपर्क झाल्याची माहिती आहे. खोकला आल्यामुळे या रुग्णाने शुक्रवार व शनिवार या दोन दिवशी श्रीरामपूर येथे दोन वैद्यकीत तज्ज्ञांकडून तपासणी करून घेतल्याची माहिती आहे. त्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या त्या दोघांसह नऊ जणांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली.

शिर्डी  जितेश लोकचंदानी निवासी संपादक
देशात सध्या कोरोना मुळे हाहाकार माजला आहे, राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत, सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे, त्यामुळे अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद आहे ,अशा परिस्थितीत सोशल डिस्टेंस प्रत्येकाने पाळणे  आवश्यक आहे, मात्र असे असतानाही शिर्डीत पोलीस स्टेशनच्या आवारातच पोलीस स्टेशनच्या नवीन बांधकाम साठी आलेले परराज्यांतील मजूर कोणत्याही लॉक डाऊन चा नियम न पाळता बिनधास्तपणे येथे राहत आहेत, एकत्रित पत्ते खेळताना,
गप्पा करताना हे मजूर दिसून येत आहेत, पोलीस स्टेशनच्या भिंती जवळअसणारे हे मजूर मात्र शिर्डी पोलिसांना ,कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांना आत्तापर्यंत दिसले गेले नाही का। असा सवाल शिर्डीकरांमधून आता उपस्थित होऊ लागला आहे ,दुसऱ्याला सांगे ब्रह्मज्ञान व आपण कोरडे पाषाण ।अशी शिर्डी पोलीस स्टेशनची ची परिस्थिती झाली आहे,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉक डाउन ची घोषणा केली व सर्व देशभरातील शहरे गावे हे कडकडीत बंद आहेत ,सर्वकाही ठप्प आहे ,काम धंदे बंद आहेत, सर्व जण घरात आहेत, लॉक डाऊन चे नियम सर्व पाळत आहेत ,मात्र ह्या नियमांची पोलीसां कडुण शिर्डीत एैशीतशी होताना दिसत आहे व पोलीस वसाहतीच्या बांधकामावर असणाऱ्या मजुरांकडून  असा प्रकार होत आहे, त्यामुळे बाहेर नियम  सांगणारे आपल्या जवळच्याना  नियम का सांगत नाही ।असा प्रश्न निर्माण झाला आहे,
    आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डी मध्ये सध्या लॉकडीऊन सुरू आहे, अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बंद आहे, 17 मार्चपासून श्री साईबाबांचे मंदिर सुद्धा दर्शनासाठी भक्तांना बंद आहे, अशी कडक अमलबजावणी येथे होत आहे ,मात्र अशा लॉकडीऊनच्या काळात शिर्डी पोलीस स्टेशनच्या कॅम्पसमध्ये पोलीस वसाहतीचे सध्या काम सुरू आहे ,मुंबई पोलीस निधि अन्तर्गत   शिर्डी पोलीस स्टेशनच्या आवारात शिर्डी विभागीय पोलीस कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व पोलीस कर्मचाऱ्यांना निवासस्थाने असे एकूण 112 सदनिकांचे बांधकाम येथे होत आहेत, हे बांधकाम श्रीनाथ कंट्रक्शन नाशिक व वास्तुविशारद भुतडा श्रीरामपूर यांच्यामार्फत केले जात आहे, या ठेकेदारांकडून येथील बांधकामावर मध्यप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश येथील शेकडो पुरुष, महिला मोलमजुरी करण्यासाठी आलेले आहेत ,हे परप्रांतीय मजूर शिर्डी पोलीस स्टेशन जवळच असणा्र्या या नवीन बांधकामाच्या खोल्यांमध्ये दिसतात, या मजुरांना कोरोनाची काही माहिती नाही असली तरी  ते फारसे त्याकडे लक्ष देत नाही, यांच्याकडे कोण येते, कोण जाते ,ते कोणाला भेटताच ,याची कोणतीही नोंद नाही, या लोकांची कोणतीही तपासणी झालेली नाही, हे मजूर एकत्रित बसून गप्पा मारतात, पत्ते खेळतात, बिड्या ओढतात,  जेवण करतात असे दिसून येते, मात्र ह्या सर्व गोष्टी शिर्डी पोलिस जवळ असतानाही पोलिसांना  ते दिसत का नाही ।असा प्रश्न शिर्डीकर करत आहेत,
 शिर्डी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये व शिर्डी शहरामध्ये कडक अंमलबजावणी करणारे पोलीस आपल्या कॅम्पस मध्ये असणाऱ्या या परप्रांतीय मजुरांवर इतके मेहरबान का। असा सवालही येथे नागरिकांमधून आता विचारला जात आहे ,याची चौकशी वरिष्ठ पातळीवरून होणे गरजेचे आहे, जर एखादा परप्रांतीय मजूर परराज्यातून आलेला असेल तर मोठी समस्या उद्भउ शकते, व या मजुरां पैकी कोणी कोरोना च्या रुग्णाच्या संपर्कात आलेला असेल तर मोठी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे प्रथम या सर्व लोकांची तपासणी करणे गरजेचे आहे, शिवाय सोशल डिंस्टन्स व मास्क हे मजूर वापरत नाहीत, त्यांना लॉक डाउन चे नियम सांगणे महत्त्वाचे आहे, अन्यथा या लोकांवरही कारवाई करणे आवश्यक आहे, सध्या शिर्डी व परिसरात कोरोना चा रुग्ण आढळलेला अद्याप तरी नाही, मात्र अशी अनदेखि झाली तर मात्र भविष्यात मोठा पेच निर्माण होऊ शकतो, त्यामुळे दक्षता घेणे महत्त्वाचे आहे ,सर्वांना नियम सारखे लक्ष घातले पाहिजे ,अशी मागणी आता होत आहे.

सावळीविहीर। राजेंद्र गडकरी। सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे, सर्व काही बंद आहे, राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहे, त्यामुळे दक्षता घेणे महत्त्वाचे आहे ,शासकीय यंत्रणा त्यासाठी  मोठी कडक अंमलबजावणी करत असताना सावळीविहीर येथे मात्र लक्ष्मीरोडला नगर-मनमाड रस्त्याच्या दुतर्फा भाजीपाल्याचा बाजार आता दररोज सकाळी भरला जात असून येथे लॉक डाऊनच्या नियमाची पायमल्ली होताना दिसत आहे ,याकडे शासकीय अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी लक्ष देणे महत्त्वाचे असल्याचे नागरिकांची मागणी आहे,देशात राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे,देशात, महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण सापडले आहे, त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे, शिर्डी व परिसरातही सर्वत्र बंद आहे, अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने बंद आहेत, आठवडे बाजारही बंद आहे, असे असताना अत्यावश्यक सेवा च्या नावाखाली अनेक भाजीपाला वाले दररोज सकाळी सावळीविहीर येथे नगर मनमाड रोडच्या कडेला विक्रीसाठी बसतात, भाजीपाला घेण्यासाठी येथे लोकांची गर्दी होते ,अनेकांच्या तोंडाला मास्क किंवा साधा रुमाल बांधलेला नसतो, त्याच प्रमाणे सोशल डिंस्टन्स  पाळली जात नाही, येते भाजीपाला घेताना गर्दी होते,, कोणती दक्षता पाळली जात नाही याकडे दुर्लक्ष होत आहे,येथे गुरुवारी आठवडे बाजार भरू दिला जात नाही, मात्र आता भाजीपाला विक्रेते हे सावळीविहीर च्या लक्ष्मीवाडी वर नगर मनमाड रस्त्याच्या कडेला बसून दररोज सकाळी  मोठ्या संख्येने भाजीपाला विक्री करत आहेत, मात्र लॉकडाऊन चे नियम पाळताना दिसत नाही, येथील शासकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे , सामाजिक कार्यकर्ते किरण आगलावे यांनी या भाजीपाला विक्रेत्यांना लॉक डाऊन चे नियम सांगून त्यांना दक्षता घेण्याचे आवाहन केले, मात्र कोणी ऐकण्याच्या परिस्थितीत नाही ,जो तो आपल्या मनमानी प्रमाणे आपला व्यवसाय करण्यात दंग होता, भाजीपाला अत्यावश्यक असला तरी लॉक डाऊन चे नियम पाळणे गरजेचे आहे व येथे ते पाळले जात नाही, त्यामुळे अशा भाजीपाला विक्रेत्यांना सक्त ताकिद देणे महत्त्वाचे आहे, अन्यथा दुर्देवाने काही प्रकार घडला तर त्यास जबाबदार कोण असा प्रश्नही येथील सूज्ञ नागरिक विचारत आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget