Latest Post

राहता -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहता येथील मदरसा माहादे नोमानी कडून अडीशे तीनशे  गोरगरिबांना किराणा सामान तसेच मासही वाटण्यात आले आहे. लोकांना जनजागृती करण्यात आले आहे संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती असल्याणे  लोकांनी घराबाहेर निघू नये असे अवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केले आहे तसेच मदरसा महादे नोमानी चे अध्यक्ष म्हणले आहे की राहता शहरामध्ये उपाशी राहू नये या उद्देशाने शहरांमध्ये गोरगरीब लोकांना किराणा सामानचे वाटप करण्यात आले .

असेच गोरगरिबांना सरवांनि  मदत करावि असे आवाहन करण्यात  आले.
मौलाना यूसुफ मिल्ली. मौलाना याहया कासमी.
मौलाना रऊफ आझाद. मौलाना लतीफ़ कासमी.
मौलाना रफीक कासमी.हाफिज अकिल फैजी.
मौलाना कमरूद्दीन नदवी.हाफिज मूकिम फैजी.
मौलाना ईबराहीम शाह.मूफ्ती रहिम रहमानी.शाहा मुश्ताक,शाह इलियास भाई
 यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच मदरसा माहादे नोमानी त्यांचे लोकांनी आभार मानले.

सगळीकडे लाॅक डाउन  असताना निमगाव कोर्राळे गावातील हेलीपॅड रोडवर राहत असलेले शिवसेनेचे कार्यकर्ते बाळासाहेब काळु ठाकरे यांच्या घरासमोर उभी केलैली स्विप्ट डिझायर एम एच १७ a ,z  ६५०१  हे चार चाकी गाडी उभी असताना सोमवार दिनांक १एप्रील २०२०रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास पेटवून कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला यात  गाडीचे मोठे नुकसान झाल्यामुळे निमगाव कोर्राळे गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे
  अधिक माहिती अशी की निमगाव कोर्राळे गावात बाळासाहेब ठाकरे यांचे हाॅटेल आहे  ज्या परीसरात हि घटना घडली आहे त्या परीसरात काही दिवसांपूर्वी तिहेरी हत्याकांड घडले होते तसेच  समोरच असलेल्या मोकळ्या मैदानात खुनाच्या घटना घडल्या होत्या  त्या बरोबरच खुन खुनाचा प्रयत्न मारहाण लुटमार आणि आता थेट चार चाकी पेटवून संपुर्ण घरचं उडवून देण्याचा प्रयत्न एका जागरूक तरुणांच्या दक्षतेमुळे उघडकीस आला असून  वाहन पेटवून   पळुन जात असताना दुचाकी वर दोन तरुण सी सी टिव्ही फुटेज मध्ये दिसत असुन  घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दीपक गंधाले व पोलिस  पथक घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून तपासासाठी  चौकशी सुरू केली आहे  श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखी तक्रार शिर्डी पोलीसांनी घेतली असून  या घटनेबाबत पोलिस निरीक्षक दीपक गंधाले यांनी सांगितले की संशयित आरोपीचे नावे मिळाली असून सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे  तपास सुरू करण्यात आला असून लवकरच  संशयितांना ताब्यात घेऊन  कठोर पणे चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आमच्या प्रतिनिधिना  सांगितले या घटनेनंतर शिर्डी सह ग्रामीण भागात घबराट पसरली आहे.

कोरोना विषाणु (कोव्हीड १९) हा संसर्गजन्य आजार नियंत्रीत ठेवण्याकरीता मा.पंतप्रधान भारत सरकार,
मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा.जिल्हाधिकारी अहमदनगर, मा.पोलीस अधीक्षक, अहमदनगर तसेच भारत सरकार प्रशासन " कोरोना विषाणु " या संसर्गजन्य आजाराचा समाजात प्रसार होणार नाही व कोरेना बाधीत रुग्णांची संख्येत बाढ होवु नये याकरीता उच्चस्तराच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना या विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे आवश्यक आहे. कोरोना विषाणुचे प्रसाराचे माध्यम पाहता सदर विषाणुची लागण एका संक्रमीत रुग्णाकडुन अन्य व्यक्तीस / इसमास त्याचे संपर्कात आल्याने होण्याची शक्यता असते.
महराष्ट्र राज्य शासनाने कोरोना विषाणुचा ( कोव्हीड - १९ ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथराग
प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासुन लागु करुन खंड २,३,४ मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमीत केलेली आहे. याच अनुशंगाने मा.जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी आदेश क्रमाक आव्यमपु/कार्या १९/२०८/२०२० आदेश अहमदनगर दि. १६/०३/२०२० अन्वये कोरोना विषाणुचा प्रादुभाव रोखण्यासाठी
प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणुन अहमदनगर जिल्हयातील कोणत्याही व्यक्तीस/संस्था/संघटना
कोव्हीड - १९ बाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा, अनाधिकृत माहिती इलेक्ट्रॉनिक किंवा सोशल मिडीयाच्या
माध्यमातुन पसरविणेस साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसुचना व
नियमावलीमधील तरतुदीनुसार आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ३० (१) अन्वये प्रतिबंध केलेबाबत आदेश जारी केलेले आहेत. आरोपी इसम नामे ताहिर शेख रा.मुकुंदनगर ता.जि.अहमदनगर याने त्याचे मोबाईल नंबर ९२७०८४७५७५ वरुन कोरोना आजारा संदर्भात सुफीयाना शेख युवा मंच या व इतर ग्रुपवर ' दि. २९/०३/२०२० रोजी आज रात १० बजे से मुकुंदनगर फकिरवाडा भाग मिलीट्रीच्या हातात देणार असुन मुकुंदनगर फकिरवाडा भागातील सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी. तसेच दि. ३०/०३/२०२० रोजी विविध ग्रुपवर " आज मिलीटी मस्जीद के सामने कुछ सरकारी अधिकारी के साथ घुम रही है और घरके लोगोंके बारेमे पुछे तो नाम और मोबाईल नंबर नही देना " असे खोटा मेसेज पाठवुन जनतेत खोटी माहिती व अफवा पसरवुन मा.जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे आदेशाचे उल्लंघन केले म्हणुन आरोपी ताहिर शेख रा.मुकुंदनगर मोबाईल नंबर ९२७०८४७५७५ याचेवर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला गु.र.नं. 1 ३६९/२०२० भारतीय दंड संहिता कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात तरी अहमदनगर पोलीस दलातर्फे सर्वाना आवाहन करण्यात येते की, कोरोना संसर्गजन्य आजारा संदर्भात व्हॉटसअप किंवा इतर प्रसार माध्यमांमध्ये निराधार, अफवा असलेली माहिती प्रसारीत करु नये. तसेच भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत विश्वसनीय प्रशासकीय वृताव्दारे प्रसारीत केलेल्या माहिती व्यतीरिक्त इतर खोटया आशयाचे वृत्तांवर विश्वास ठेवु नये. मा.जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर प्रचलीत कायदयान्वये सक्त व कठोर कारवाई करण्यात येईल.

निवासी संपादक जितेश लोकचंदानी     सोलापूर : संचारबंदीच्या काळात कारवाई न करण्यासाठी पैशाची मागणी केल्याप्रकरणी सोलापुरातील एका पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सोलापुरातील औद्योगिक पोलीस चौकीत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित दिवसे याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे सोलापूरतल्या अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने देखील बंद करून घरात बसावे, असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले होते. त्यानुसार संपूर्ण सोलापूरमध्ये बंद पाळण्यात आला. परंतु विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई न करण्यासाठी संबंधीत पोलीस अधिकाऱ्याने पैशाची मागणी केली होती. ही घटना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यापर्यत पोहोचली. त्यावरून पोलीस आयुक्तांनी त्याबाबत चौकशी केली आणि तातडीने सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित दिवसे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. आता सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित दिवसे यांना नियंत्रण कक्षात बसवल्याची माहिती मिळते आहे

बेलापूर  (प्रतिनिधी  )-शासनाच्या सुचने नुसार   जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानातुन तीन महीन्याचे धान्य उपलब्ध करुन देण्यात येणार वाटपात कसुर करणार्यावर कायदेशीर कारवाई  केली जाईल असा ईशारा जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिला आहे                      या बाबत प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात जिल्हा पुरवठा अधिकारी माळी यांनी पुढे म्हटले आहे की जिल्ह्यातील सर्व धान्य दुकानदारांना एप्रिल  मे जुन असे  तीन महीन्याचे धान्य  वाटप करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत सर्व प्रथम अत्यंत गरजु मोल मजुरी करणारे हातावर पोट भरणारे या सर्वांना पहील्या टप्प्यात प्राधान्याने धान्य द्यावयाचे असुन दुसर्या टप्प्यात गरजु उत्पन्नाचे मर्यादित साधने असणारे कार्डधारक यांना वाटप करावयाचे आहे त्या नंतर राहीलेल्या कार्डधारकांना वाटप करावयाचे असुन कुणीही धान्यापासुन वंचित राहु नये याची काळजी दुकानदाराने घ्यावयाची आहे काम चुकारपणा करणार्या तसेच धान्य वाटपात कसुर करणार्या  दुकानदारावर कठोर कारवाई केली जाईल कार्डधारकांनी एकाच वेळेस दुकानावर गर्दी करु नये कुणाच्या वाटपा बाबत तक्रारी असल्यास पुरवठा निरीक्षक  तहसीलदार यांच्याशी संपर्क  साधावा असेही अवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी माळी यांनी केले आहे.

कोरोना विषाणूंचा प्रसार होऊ नये यासाठी बाहेरून आलेल्या नागरिकास घरातच बंदिस्त ठेवण्यासाठी आवश्यक असलेला “होम कोरोंटाईनचा” शिक्का मारणे व मास्क लावण्यास सांगण्यास गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना कल्याण येथे नोकरीस असलेले मात्र कोपरगाव तालुक्यातील देर्डे-कोऱ्हाळे ग्रामपंचायत हद्दीतील कायम निवासी असलेले आरोपी लक्ष्मीकांत कारभारी विघे व त्यांचे दोन मुले सौमित्र लक्ष्मीकांत विघे,सौरभ लक्ष्मीकांत विघे यांनी धक्काबुक्की केल्याचा गुन्हा कोपरगाव महसूल विभागाचे कर्मचारी रवींद्र नारायण देशमुख यांनी दाखल केल्याने तालुक्यात खळबळ उडाली होति ह्या आरोपींना कोपरगाव येथे हजर कोर्टात समोर हजर केले असता 1दिवसाची पोलिस कोठडी सुणवण्यात आली.

शिर्डी,प्रतिनिधि  राजकुमार गडकरी दि.30- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष या नात्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005 अन्वये आदेश पारित केले असून त्याची जिल्हात अंमलबजावणी करण्यात येत आहे. शिर्डी नगर पंचायत हद्दीतील स्थलांतरीत कामगार व बेघर व्यक्ती यांना अन्नदान व अन्न पाकिटांचे वाटप करण्यात येत आहे. अशाप्रकारच्या सार्वजनिक उपक्रमांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर, लॉकडाऊन उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे आवश्यक आहे.
            यासाठी उपविभागीय दंडाधिकारी, शिर्डी भाग ,शिर्डी श्री.गोविंद शिंदे यांनी, साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीतील तरतूदीनुसार त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार  व आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005 चे कलम 30 अन्वये लॉकडाऊन या उपाययोजनेमुळे शिर्डी शहर आणि पंचक्रोषी परिसरात अडकलेल्या, स्थलांतरीत कामगार व बेघर व्यक्ती यांना अन्न, वस्त्र, निवारा व वैद्यकीय देखभाल पुरविणे आवश्यक असल्यामुळे निघोज ता.राहाता येथील साई पालखी निवारा या संस्थेचे दोन हॉल 30 मार्च,2020 पासून पुढील आदेशापर्यत अधिग्रहीत केले आहेत. सर्व संबधितांनी याची नोंद घ्यावी असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget