Latest Post

श्रीरामपूर (प्रतिनिधी) देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी व सर्व प्रशासकीय यंत्रणा जनतेच्या भल्यासाठी नागरिकांनी घरातच रहावे कोणीही बाहेर विनाकारण येऊ नये प्रशासनास सहकार्य करा आपली सुरक्षा परिवाराची सुरक्षा -श्रीहरी बहिरट पो . निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन 


बुलढाणा - 29 मार्च
देश ही नही पूरे विश्व मे कोरोना वायरस की दहशत फैली हुई है.इस वायरस का संसर्ग ना हो इस लिए देशभर को लॉकडाउन कर दिया गया है ऐसे में जीवनावश्यक वस्तु छोड़कर सभी दुकाने एंव कारोबार बंद रखने के कडे निर्देश होने के बाद भी टायर पंक्चर की 2 दुकाने खुली रखनेवाले 2 लोगों पर रापयुर थाने में आज 29 मार्च को अपराध दर्ज कर दोनों को गिरफ्तार किया गया है.
    बुलढाणा तहसिल अंतर्गत के ग्राम पिंपलगांव सराय में आज दोपहर के समय रायपुर पुलिस थाने की टीम पीएसआई योगेंद्र मोरे,पुलिस कर्मी विजय हुडेकर, सुरेश मोरे,अमोल गवई आदि गश्त पर थे कि उन्हें ग्राम पिंपलगांव सराय में दोपहर 4 बजे के समय शासन के आदेश का उल्लंघन कर 2 टायर पंक्चर की दुकानें खुली नज़र दोनों दुकान चालकों को पकड़कर रायपुर थाने में लाया गया जहां पीएसआई योगेंद्र मोरे की शिकायत पर आरोपी दुकान चालक संजय भीमराव चौहान (45) व रमेश भीमराव चौहान (40) के खिलाफ धारा 188,269 के तहत अपराध दर्ज कर लिया गया है.आगे की जांच बिटजमादार यशवंत तायडे कर रहे है.

अहमदनगर, दि. २९ - जिल्ह्यात आज आणखी दोन व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे पुण्याच्या एनआयव्हीने दिलेल्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. या व्यक्ती परदेशी नागरिक असून त्यातील एक फ्रान्स तर दुसरी व्यक्ती आयव्हरी कोस्ट येथील आहे. या व्यक्तीसोबत असणार्‍या इतर व्यक्तींनाही ताब्यात घेतले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा शोध आता पोलीस आणि आरोग्य यंत्रणेने सुरु केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांनी स्वताहून जिल्हा रुग्णालयात येऊन त्यांची तपासणी करुन घ्यावी, तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दीत जाणे टाळावे.स्वताच्या आणि समाजाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, या व्यक्ती थांबलेल्या परिसराला सील करण्याचे आणि हा परिसर औषध फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
या दोन व्यक्तीसह १४ जणांचा ग्रुप मॉरिशस येथून दिल्ली येथे आला होता. त्यानंतर हा ग्रुप २ आठवडे दिल्ली येथे थांबला. या कालावधीत त्यांनी दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि पुन्हा दिल्ली असा प्रवासही केला. विविध ठिकाणांना भेटी दिल्या. दिनांक १४ मार्च रोजी रेल्वेने हे सर्वजण नगर येथे आले. ते शहरातील मुकुंदनगर भागात राहिले. दुसर्‍या दिवशी ते जामखेडला रवाना झाले. तेथे ते २६ मार्चपर्यंत होते. मात्र या व्यक्ती तेथे राहत असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलीस, महसूल प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने कार्यवाही करुन या १४ जणांना ताब्यात घेत थेट जिल्हा रुग्णालयात पाठवले. काल या १४ जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाकडून एनआयव्हीकडे पाठविण्यात आले. त्यापैकी ५ स्त्राव नमुन्यांचा अहवाल आज प्राप्त झाला. त्यातील या दोन व्यक्ती बाधित असल्याचे स्पष्ट झाले. इतर तीन जणांचा अहवाल निगेटीव आला असून उर्वरित ०९ अहवाल अद्याप येणे बाकी आहे. या सर्वांना जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून बाधित दोन रुग्णांना बूथ ह़ॉस्पिटलमधील आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात पाठवले जाणार आहे.
यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या पाच झाली असली तरी एका रुग्णाचा १४ दिवसांनंतरचा अहवाल निगेटीव आल्याने त्याला घरी सोडण्यात आले होते. त्यामुळे आयसोलेशनमध्ये सध्या ०४ जणांना ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, आता आज कोरोना बाधित आढळलेल्या या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांची माहिती जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणेकडून काढली जात आहे. मुकुंदनगर आणि जामखेड या भागात ज्याठिकाणी या व्यक्ती राहिल्या, तेथे त्यांना अनेकजण भेटल्याची शक्यता गृहित धरुन प्रशासनाने माहिती घेणे सुरु केले आहे. मुकुंदनगर परिसर आता सील करण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरु केली आहे. तसेच, मुकुंदनगर आणि जामखेड येथील ज्या व्यक्ती या बाधित नागरिकांच्या संपर्कात आल्या, त्यांनी स्वताहून पुढे येऊन त्यांची आरोग्य तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, सार्वजनिक ठिकाणचा संपर्क टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी केले आहे. प्रशासनातील सर्व यंत्रणा या जिल्ह्याचे आरोग्य व्यवस्थित राहावे, यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना नागरिकांनी साथ दिली पाहिजे. जे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, ते नागरिकांच्या हितासाठीच आहेत, त्यामुळे त्याची अंमलबजावणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

 शिर्डी -नेहमी रात्रंदिवस देश-विदेशातील साई भक्तांनी गजबजलेली श्री साईंची शिर्डी सध्या लॉक डाउनमुळे ठप्प असून सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने,  ट्रॅव्हल्स, बसेस बंद असून देशातील मंदिराप्रमाणे श्री साईबाबा समाधी मंदिरही सन 1940 नंतर या परिस्थितीत 17 मार्चपासून दु,३ नंतर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे, शिर्डीत प्रथम च इतका सन्नाटा दिसत असून रस्ते ओस पडले आहेत, शिर्डीत राज्यव परराज्यातून येणाऱ्या एसटी बसेस ,
राज्यातून, देशातून येणाऱ्या रेल्वे,  तसेच विमाने ही बंद आहेत, त्यामुळे शिर्डी बस स्टँड, साईनगर शिर्डी रेल्वे स्थानक व श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळही सुने सुने दिसत आहे शिर्डी शहरातून जाणारा  नगर मनमाड महामार्ग  सुद्धा ओस पडला आहे, श्री साईबाबा संस्थानने आपले प्रसादालय व भक्त निवासे  ही बंद केले आहेत ,परंतु येथील आरोग्य पोलीस कर्मचारी व रुग्णालयातील नातेवाईक , गरजूंना नाश्ता भोजन देण्याची व्यवस्था साई संस्थांनी केली आहे,  सर्वत्र लॉक डाऊन मुळे  शुकशुकाट असताना शिर्डी बस स्थानकावर मात्र  येणारे जाणारे लोक  दिसत आहे,  शिर्डी परिसरातील गावे व वाड्या-वस्त्यांवर सकाळ, संध्याकाळ दुध डेअरी यांवर शेतकऱ्यांची, दूध उत्पादकांची थोडीफार गर्दी दिसून येत आहे,
किराणा दुकानात काहीतरी खरेदीसाठी बहाना करत लोकबाहेर येत असून अनेक ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून मास्क किंवा सोशल डिस्टंस, दक्षता घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे, शहरात लॉक डाउन पाळला जात असला तरी शिर्डी परिसरातील काही गावे खेडे वाड्या वस्त्या यावर या लॉक डाऊन चा म्हणावा तसा परिणाम दिसून येत नाही, लोक दिवसभर घरात असले तरी सायंकाळी काही लोक दूध घालण्याच्या किराणा घेण्याच्या बहाण्याने  बाहेर दिसतात, पोलिसही सकाळी आपल्या पोलिस वाहनांमधून मधून स्पीकर लावून गर्दी करू नका, मास्क लावा म्हणून सांगतात, सकाळी एकदा फेरी मारल्यानंतर  परत त्यांचाही चक्कर होत नाही, ग्रामीण भागात सर्वत्र हीच परिस्थिती सध्या दिसून येते आहे, ग्रामीण भागात सध्या गहू ,मका ज्वारी काढण्यासाठी आल्याने व मजूर मिळत नसल्याने ग्रामीण भागातले शेतकरी हार्वेस्टर, मशीनद्वारे किंवा घरातील कुटुंबातील सदस्यांना घेऊन शेतात जाऊन काम करत आहे, पिके सोंगत आहेत, काही शेतकरी शेतातून काढलेले कांदे गोण्यांमध्ये भरण्याचे काम करत आहे, तर कोणी द्राक्षे काढण्याचे काम करताना दिसून येत आहे, अशी परिस्थिती ग्रामीण भागात दिसत असून लॉक डाऊन शहरात आहे तसाच तो ग्रामीण भागातही असला तरी शेतीत काम करणारे हे आपल्या कामात मग्न आहेत, वाड्या-वस्त्यांवर शेतीत दुर दुर असणारे मळ्यामध्ये लॉक डॉऊनचा प्रभाव फारसा दिसून येत नाही, दूध धंदा व दूध डेअरी सध्या जरी चालू असल्या तरी भविष्यात ग्रामीण भागातले दूध शहरांमध्ये जाणे खूपच कमी झाले असल्याने ग्रामीण भागातील दूध डेअरी ह्या लवकरच बंद करण्याची वेळ येणार असल्याचे दूध डेअरी चे मालक बोलत आहेत, दूध वाहतूक करणारे ट्रक चालक व इतर कर्मचारी ही शहरात जाण्यात उत्सुक नसल्याने  दूध आता ग्रामीण भागातून शहरापर्यंत पोहोचले जाणे मुश्कील होत आहे ,त्यामुळे भविष्यात काही दिवसातच ग्रामीण भागातील दूध गावातच राहण्याची शक्यता आहे ,त्यामुळे शासनाने दूध उत्पादक का नाही ही यापुढे मदत करावी अशी मागणी होत आहे.

कोल्हार (साईप्रसाद कुंभकर्ण ) :- कोरोना या भयंकर आजाराच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र कासारे  येथे रविवार दिनांक 29 मार्च रोजी संपन्न होणारा श्री कालिका मातेचा यात्रोत्सव रद्द करण्यात आला असल्याची माहिती कासारे येथील कालिका देवी मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने देण्यात आली.

कालिका देवी मंदिराच्या सर्व विश्वस्त मंडळाची बैठक संपन्न झाली माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे आदेशास बांधील राहून हा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे दरवर्षी या यात्रोत्सवास महाराष्ट्रभरातून कासार समाज बांधव मोठ्या संख्येने कासारे  येथे येऊन कालिका मातेच्या यात्रा उत्सवात सहभागी होतात व श्री कालिका मातेच्या दर्शनाचा लाभ घेतात परंतु ह्या वर्षी कोरोना या भयंकर आजाराच्या पार्श्वभूमीवर हा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला.

तसेच राहता तालुका कासार समाज संघटनेच्या वतीने घेण्यात येणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आले आहे हा निर्णय बैठकीत घेण्यात आला या बैठकीस सुधीर डंबीर,नंदकुमार कोळपकर, नरेंद्र डंबीर ,संजय डंबीर, आबासाहेब आंभोरे ,संतोष कोळपकर, प्राध्यापक चंद्रकांत खांड्गौरे ,शशिकांत कडुसकर, दत्तात्रय कोळपकर ,रामभाऊ रासने ,अशोक कोळपकर ,दास कुंभकर्ण, कालिदास डंबाळे आदी उपस्थित होते.

शिर्डी ।।राजकुमार गडकरी ।।शिर्डीतील सांडपाणी हे सर्रासपणे शेतीसाठी वापरले जात असून अनेकजन हे पाणी ड्रेनेज मधून थेट पाइपलाइन करून मोटर पंपाच्या साह्याने आपल्या शेतातील पिकांना देत असल्यामुळे या शेतीच्या आसपास व रस्त्याने जाणाऱ्यां येणारांना मोठ्या दुर्गंधी ला तोंड द्यावे लागत असून आरोग्यास ते धोकादायक ठरत आहे, त्याचप्रमाणे शेतीतील पिकेही या खराब पाण्यामुळे खाण्यास हानिकारक ठरत असल्याने याचा विचार करून तसेच या उघड्या ड्रेनेजमध्ये आत्तापर्यंत चार ते पाच लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, हे लक्षात घेऊन शिर्डी नगरपंचायतीने हे उघडे ड्रेनेज बंद करावेत तसेच हे सांडपाणी
 उघड्यावर पिकांना देऊन दुर्गंधी करणाऱ्यांना प्रतिबंध करावा अशी मागणी शिर्डी करांनी केली आहे,
          शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असून शिर्डीला देशातील स्वच्छ सुंदर शिर्डीचा विशेष पुरस्कारही यापूर्वी मिळालेला आहे ,शिर्डीत श्री साई संस्थान व शिर्डी नगरपंचायत स्वच्छतेबाबत अतिशय जागरूक आहे, असे असतानाही शिर्डीत मात्र जे शहराचे सांडपाणी अंडरग्राउंड नाल्यांमधून शहराबाहेर सोडले जाते मात्र या अंडरग्राउंड नाल्या अनेक ठिकाणी  उघड्या असल्याने आसपासचे शेतकरी पाइपलाइन करून मोटार पंपाच्या साह्याने हे सांडपाणी उपसून आपल्या शेतीसाठी वापरतात, हे सांडपाणी दुर्गंधीयुक्त असते ,ते शेतीत वापरल्यानंतर आसपास रहिवाशांना व या शेतीच्या आसपास असणाऱ्या रस्त्यांवरून जाणाऱ्या येणाऱ्यांना दुर्गंधीचा मोठा त्रास होतो, सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनाही  या दुर्गंधीचा मोठा त्रास होतो,  हे आरोग्यास अपायकारक आहे ,हे सांडपाणी दूषित असते, ते शेतातील पिकांना दिल्यामुळे ही पिकेही खराब होतात, ते खाण्यास हानिकारक असतात, परंतु याचा कोणी विचार करत नाही ,शिवाय ज्या उघड्या ड्रेनेज मधून  हे सांडपाणी पाईप लाईनने मोटरपंप च्या साह्याने घेतले जाते, अशा उघड्या ड्रेनेज मध्ये आत्तापर्यंत शिर्डीतील चार ते पाच लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, हे सर्व माहीत असतानाही अजूनही अशा उघड्या ड्रेनेज मधून मोटार पंप च्या साह्याने थेट पाइपलाइन करून आपल्या शेतात हे सांडपाणी घेतले जाते, मात्र याचा भविष्यात मोठा आरोग्यास धोका आहे, हे जाणून आपापल्यापरीने शेतकऱ्यांनी हे सांडपाणी घेणे बंद करावे, तसेच शिर्डी नगर पंचायतीने तरी त्याची दखल घेऊन उघडे ड्रेनेज बंद करावेत व सांडपाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांना मनाई करावी आणि या सांडपाण्यामुळे परिसरात होणारी   रोगराई, डासांचा प्रादुर्भाव व दुर्गंधी टाळावी, अशी मागणी शिर्डी करानी केली आहे.

। प्रतिनिधी ।। सावळीविहीर ग्रामपंचायतीच्या  वतीने कोरोना व्हायरसचा व इतर साथींचे रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथे  औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे,
   । सध्या सर्वत्र कोरोना या विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वत्र लॉकडाऊनआहे, सर्व दुकाने ,कामकाज ठप्प आहे, लोक घरात आहेत, मात्र घरात डासांच्या प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिक त्रस्त होत आहेत, त्यामुळे येथील ग्रामपंचायती तर्फे गाव स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे,  सावळीविहीर बुद्रुक येथे  सध्याचे ढगाळ वातावरण, कधी अवकाळी पाऊस यामुळे  डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होऊन 
साथींच्या रोगांचा प्रादुर्भाव  वाढला आहे , डासांमुळे मलेरिया थंडी ताप अशा रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली , साथींचे आजारांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे येथे जंतनाशक फवारणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली होती  सावळीविहीर ग्रामपंचायतने  ताबडतोब या मागणीची दखल घेऊन सावळीविहीर गावात जंतनाशक फवारणी सुरू केली,  गावातील गल्ली ,रस्त्यावर  ट्रॅक्‍टरच्या साह्याने फवारणी करण्यात येत होती, हि जंतुनाशक फवारणी गावात सर्वत्र व गल्या मध्ये करावी, वाड्या-वस्त्यांवर ही करावी ,असे नागरिक बोलत होते, यावेळी सावळीविहीर बुद्रुकचे सरपंच  रूपालीआगलावे, उपसरपंच वृषाली  जपे, तसेच बाळासाहेब जपे ,संतोष आगलावे, चंद्रकांत जपे, विनोद भोसले, ग्रामसेवक खर्डे सावळीविहीर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गागरे,सागर पगारे, पारडे, बाप्पु जपे, गणेश कापसे, अनिल वाघमारे  राहुल गोपीनाथ आगलावे व सर्व सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी बबन आरणे, नाना पवार,अनिल त्रिभुवन यांनी स्वतः उभे राहून गावात ही फवारणी केली, जंतनाशक फवारणीमुळे येथील साथीच्या रोगाला आळा बसेल, त्यामुळे येथे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी येथील आरोग्य केंद्रानेही नियोजन व उपाययोजना केल्या पाहिजेत, असेही मत येथे नागरिक व्यक्त करत आहेत, 

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget