Latest Post


श्रीरामपूर- कोरोना विषाणू संसर्गामुळे उदभलेल्या आपत्तकालीन परिस्थितीत वाहतुक परवाने देण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, श्रीरामपूर येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी खान यांनी दिली आहे.
या संदर्भात जारी करण्यात आलेल्या एका शासकीय प्रसिद्धी पत्रकात खान यांनी नमूद केले आहे की, राज्याचे परिवहन आयुक्त यांनी आज (26 मार्च) रोजी दिलेल्या निर्देशानुसार पोलीस व परिवहन विभागाकडून अत्यावश्यक सेवा व वस्तु यांची वाहतुक करणाऱ्या मालवाहु वाहनांना प्रमाणपत्र जारी करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार पोलीस विभागाने आवश्यक ते सहकार्य करावे, व कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी सदरचे प्रमाणपत्र हे केवळ लॉकडाऊनच्या कालावधीपुरते वैध राहील. 
सध्या लागु असलेल्या संचारबंदीमुळे अत्यावश्यक मालवाहु वाहनधारकांना कार्यालयात येणे अडचणीचे होत असल्याने तसेच परिवहन कार्यालयातील गर्दी  टाळण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष  कार्यालयात मध्ये स्थापित केला असुन मालवाहु मालकांनी प्रत्यक्ष कार्यालयीन वेळेत येऊन अर्ज केल्यास त्यांना त्वरित प्रमाणपत्र देण्यात येईल किंवा ज्या वाहन मालकांना कार्यालयात येणे शक्य नाही त्यांना ईमेलद्वारे प्रमाणपत्र जारी करण्याची व्यवस्था जारी करण्यात आली आहे. त्यासाठी mh17@mahatranscom.in या ईमेलवर अर्ज सादर करावेत.
आर्ज  करतांना लागणारे फॉर्म  
वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (आर.सी.बुक)
वाहना संदर्भातील सर्व प्रकारच्या कर पुस्तिका
वाहनाचे विमा प्रमाणपत्र (इन्शुरन्स)
वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टीफिकेट)
वाहनाचा परवाना (परमिट)
वाहन चालकाची अनुज्ञप्ती (लायसन्स)
वाहन चालकाचे व सहाय्यकाचे ओळखपत्र 
या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ज्या ईमेलवरुन अर्ज केला आहे त्या ईमेल पत्त्यावर परवानगी प्रमाणपत्र अग्रेषित केले जाईल. त्याची प्रिंट काढून सादर पास वापरता येईल असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


♦महानगरातून आलेले आहे 200 पेक्षा जास्त लोक
🟢येथे "लॉकडाउन" ठेंग्यावर
बुलडाणा - 26 मार्च
जवळ असलेल्या देऊळघाट येथे आज 26 मार्चला जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाने महानगरातून आलेल्या 99 लोकांच्या हातावर शिक्का मारून त्यांना पुढील 14 दिवससाठी होम कोरोनटाइन करण्यात आले आहे.हे लोक आजारी नसून फक्त खबरदारी म्हणून ही उपाययोजना करण्यात आली असली तरीही येथील जनता कलम 144 चा सर्रास उल्लंघन करीत आहे.
      बुलडाणा जिल्ह्यातील मोठ्या गावा पैकी देऊळघाट एक आहे जे बुलडाणा पासून अवघ्या 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे.येथील अनेक लोक रोजगारसाठी मुंबई,भिवंडी,पुणे,सूरत अश्या महानगरात गेलेले आहे.मागील काही दिवसापासुन कोरोना वायरसने देश भरात थैमान घातले असून संपूर्ण देशा लॉकडाउन ची घोषणा करण्यात आली.अनेक महानगरात गेलेले लोक आपल्या मुळ गावी परतले.देऊळघाट येथे आरोग्य सेविका,आशा वर्कर यांच्या माध्यमाने बाहेर गावातून आलेल्या लोकांचा सर्वे करण्यात आला.मुंबई,पुणे या शहरात कोविड-19 चे रुग्ण मोठ्या प्रमाणात मिळून आले म्हणू ग्राम पंचायत व जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाने खबरदारी घेत देऊळघाट या गावात बाहेरुन आलेल्या लोकांना घरीच थांबवन्याचे सांगितले तरीही बरेच लोक बाहेर फिरत होते म्हणून आज आरोग्य अधिकारी डॉ. अरुण जवंजाळ यांनी सरपंच गज़नफर खान,तंटामुक्त समिति अध्यक्ष जुनैद खान,बिट जमादार चोपडे यांना सोबत घेऊन आपली आरोग्य टीम घेऊन बाहेरुन आलेल्या लोकांच्या घरी पोचले व 99 लोकांच्या हाती होम कोरोनटाइनचा शिक्का लावून त्यांना पुढील 14 दिवस घरी राहण्याचे निर्देश दिले.हे सर्व 99 लोकांची तब्यत बरी असून फक्त खबरदारी म्हणून हे पाऊल उचलल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. अरुण जवंजाळ यांनी दिली आहे.लोकांनी आपल्या घरीच रहावे,कोणीही बेकाम घरा बाहेर येऊ नये अशी विनंती सरपंच गज़नफर खान यांनी केली आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी व सर्व प्रशासकीय यंत्रणा जनतेच्या भल्यासाठी रात्रंदिवस जीव तोडून राबत असताना शासनाच्या आदेशांना हरताळ फासण्याचे काम वार्ड नंबर दोन मध्ये केले जात आहे .विशेष म्हणजे पोलिसांनी या परिस्थितीकडे सपशेल दुर्लक्ष करीत मौलाना आझाद चौकात पाण्याच्या टाकीजवळ खुच्र्या टाकून बसणे पसंत केल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे .देशासह राज्यात सर्वत्र लॉक डाऊन करून कोरोनाच्या भयानक रोगावर नियंत्रण मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे . त्याचाच एक भाग म्हणून श्रीरामपूर शहरात ठिकठिकाणी अडथळे निर्माण करून रस्ते बंद करण्यात आले आहेत .सय्यद बाबा चौक, मौलाना आझाद चौक, गोंधवणी रोड, काजीबाबा रोडही बंद करण्यात आला आहे . मात्र सुभेदार वस्तीतील आतील भागात सर्वत्र नागरिक रस्त्यावर दिसत आहेत . सुलतान नगर , कुरेशी जमात खाना, चौधरी बिल्डिंग कॉर्नर, बीफ मार्केट चौक, घरकुल परिसर, गुलशन चौक, सोमेश्वर पथ, बजरंग चौक, मिल्लत नगर पूल, संजयनगर रोड, फातेमा कॉलनी, गोंधवणी पूल, दशमेश नगर चौक या परिसरात सर्वत्र लोकांचे टोळके ठिकठिकाणी इमारतींच्या ओटयांवर बसून गप्पा मारतांना दिसत आहेत . कुठलेही अंतर न राखता शेजारी बसून चर्चा झडत आहेत .
भाजीपाला व फळविक्रेते बिनदिक्कतपणे गल्लीबोळातील रस्त्यांवर फिरत आहेत . घरकुलातील इमारतींच्या जिन्यावर बसून महिलांच्या गप्पा चालू आहेत .
रस्ते बंद असल्याने पोलिसांची चारचाकी किंवा दुचाकी वाहने या भागात दोन् दिवसापासून फिरकलेली नाहीत . कायदयाचा कोणताही धाक नसल्याने नागरिक बिनदिक्कत फिरत आहेत . पुढारी छाप कार्यकर्तच लोकांना घेऊन बसलेले दिसून येत आहेत . हीच परिस्थिती कायम राहिल्यास श्रीरामपुरात कोरोनाची साखळी खंडित होण्याऐवजी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे . या सर्व परिस्थिची जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांनी तातडीने दखल घेऊन या भागात बाहेर फिरणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी सुजाण नागरिकांनी केली आहे .
पोलीसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष
शहर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी सर्व प्रमुख मशिदींच्या ध्वनिक्षेपकांवरुन नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले होते . मात्र उनाड व टारगट प्रवृत्तींच्या लोकांवर त्याचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे वर्तमान परिस्थितीवरून दिसून येत आहे .

नवी दिल्ली : कोरोनामुळे देशाच्या विकासाची चाके थांबली आहेत. यामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. तर उद्योगधंदे बंद झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने मोठे मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वंकष आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. निर्मला सीतारामन यांनी आज दुपारी कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे झालेल्या नुकसानीवरून दिलासा देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधानांनी देशात लॉकडाऊन केले आहे. गरीबांसाठी, कामगारांना तात्काळ मदत देण्यासाठी, ग्रामीण भागातील लोकांना मदत देण्यासाठी 1.7 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करत आहे. है पैसे नागरिकांच्या थेट खात्यामध्ये टाकण्यात येतील, असे सीतारामन यांनी सांगितले. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत हे पॅकेज देण्यात आले आहे. कुणीही भुकेला राहू नये आणि हातात पैसेही असावेत, हा उद्देश असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.कोरोना व्हायरसमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी मोदी सरकारने तब्बल १.७ लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहन पॅकेज दिले आहे. या योजनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय, अर्थ मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांनी शिक्कामोर्तब केले. हा निधी तब्बल 10 कोटी लोकांच्या थेट बँक खात्यात वळविला जाणार आहे. तसेच लॉकडाऊनमुळे परिणाम झालेल्या  व्यवसायांना मदत करण्यासाठी वापरला जाईल. 
महत्वाच्या घोषणा कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावाचा सामना करणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिक आणि आरोग्य सेवेसाठी प्रत्येक व्यक्तीसाठी ५०  लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून पुढील ३ महिने ८० कोटी लोकांना दर माणसी ५ किलो तांदूळ किंवा गहू देण्याचे ठरविण्यात आले आहे. यामध्ये आणखी ५ किलोंची वाढ करण्यात आली आहे. तसेच १ किलो डाळही देण्यात येणार आहे.मनरेगातून ५ कोटी कुटुंबांना महिना २ हजार रुपये देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील मनरेगाच्या नागरिकांना मिळणारी बिदागी १८२ रुपयांवरून २०० रुपये करण्यात आली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना २००० रुपये देण्यात येणार आहेत. याचा फायदा 8.69 करोड शेतकऱ्यांना होणार आहे. जनधन योजनेंतर्गत २० कोटी महिला खातेधारकांना महिना ५०० रुपये देण्यात येणार. उज्ज्वला योजनेंतर्गत ८.३ कोटी बीपीएल कुटुंबीयांना पुढील तीन महिने तीन सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत.वृद्ध, दिव्यांग, पेन्शनधारकांना पुढील तीन महिने १००० रुपये देण्यात येणार आहेत. ३ कोटी लोकांना फायदा.बचत गटाच्या महिलांना कोणतीही संपत्ती तारण न ठेवता मिळणारे कर्ज दुपटीने वाढविले. आता २० लाखांचे कर्ज मिळणार. ७ कोटी महिलांना फायदा. सरकार पुढील तीन महिने खासगी नोकरदारांच्या पीएफ खात्यामध्ये कंपनी आणि कर्मचाऱ्याचा भाग असे दोन्ही २४ टक्के टाकणार आहे. यासाठी ही कंपनी १०० पेक्षा कमी कर्मचारी आणि ९० टक्के कर्मचाऱ्यांचा पगार १५००० पेक्षा कमी असायला हवा.कर्मचारी त्यांच्या पीएफ खात्यातून ७५ टक्के नॉन रिफंडेबल ऍडव्हान्समध्ये  पैसे काढू शकणार आहेत. किंवा तीन महिन्यांच्या पगाराएवढी रक्कम काढू शकणार आहे.भारतामध्ये बुधवारी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. यामुळे १३० कोटी लोकसंख्येला घर सोडण्यावर बंदी आणण्यात आली आहे. कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी जगभरात लॉकडाऊन करण्यात येत आहे.  020-21 या आर्थिक वर्षासाठी सरकार कर्ज वाढवू शकते. येत्या आर्थिक वर्षासाठी 7.8 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची सरकारची योजना आहे. आरबीआयला केंद्राचे बाँड खरेदी करण्यास सांगितले होते. मात्र, महागाईच्या भीतीने गेल्या दशकभरापासून आरबीआयने खरेदी केलेली नाही. यामुळे आता आरबीआला जगातील अन्य देशांसारखाच सरकारी बाँड खरेदी करावा लागणार आहे. राज्यांकडेही आहे पर्यायजर रोख रकमेची कमतरता पडली तर सरकार आरबीआयची वेज-अँड मिन्स ही सुविधाही वापरू शकते. हे आरबीआयने राज्यांना देऊ केलेली ओव्हरड्राफ्ट सुविधा असते. अर्थमंत्रालयाने या योजनेवर काही बोलण्यास नकार दिला असून आरबीआयनेही रॉयटर्सला पाठविलेल्या मेलला काही उत्तर दिलेले नाही.

अहमदनगर (प्रतिनिधी)  हातावर होम क्वॉरंटाईनचा शिक्का असलेला एक रुग्ण रस्त्यावर फिरत असताना पोलिसांना दिसला. शहर पोलिसांनी त्याला सर्जेपुरा येथे फिरत असताना ताब्यात घेतले आहे. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णाबरोबर एक व्यक्ती होती. या दोघांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश शहर उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिले आहे.लोकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून प्रशासनाकडून घरात थांबण्याचे आहवान करण्यात येत आहे. शहरातील चौका-चौकात पोलीस तैनात आहे. होम क्वॉरंटाईनचा शिक्का असलेल्यांना घरीच थांबण्याचे आदेश आहे. पोलिसांकडून त्यांची दोन वेळा हजरी घेण्यात येते. आज दुपारी सर्जेपुरामध्ये तोफखाना पोलीस बंदोबस्तावर होते. त्यावेळी एका दुचाकीवरून दोघे फिरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.त्याचवेळी त्या दोघांना पोलिसांनी थांबून चौकशी केली. त्यातील एकाच्या हातावर होम क्वॉरंटाईन शिक्का आढळला. पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यानुसार त्याला रुग्णवाहिका बोलावून जिल्हा रुग्णालयात पाठवले. दरम्यान या रुग्णावर आणि त्याच्याबरोबर असलेल्या व्यक्तिवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश उपअधीक्षक मिटके यांनी दिली आहे.

बेलापूर (देविदास देसाई )- बेलापूर  परिसरातील गोखलेवाडी शिवारात  कुत्र्याला पकडण्याच्या नादात बिबट्या  विहीरीत पडला . अखेर मोठ्या प्रयत्नानंतर त्यास बाहेर काढण्यात ग्रामस्थ व वन विभागाला यश आले    .        काल सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास बबन बाबुराव दाणी यांच्या वस्तीवर असणार्या कुत्र्याला पकडण्याच्या नादात बिबट्या दाणी याची गट नंबर १५७ मध्ये असणार्या विहीरीत पडला . ही घटना बबन दाणी यांच्या लक्षात येताच त्यांनी आजुबाजुच्या शेतकऱ्यांना ही घटना सांगितली . तसेच जिल्हा परिषद सदस्य शरद नवले बाजार समितीचे
जखमी झालेला कुत्रा
संचालक सुधीर नवले यांना कळविले . त्यांनंतर वन विभागाशी संपर्क  साधण्यात आला . वन विभागाच्या कर्मचार्यानी उक्कलगाव येथुन पिंजरा आणण्यास सांगितले . त्या नुसार बबन दाणी , बाळासाहेब भुजाडी ,प्रकाश मेहेत्रे ,  वाल्मीक भुजाडी , विजय बर्डे , राजेंद्र बर्डे ,  दत्तु सरोदे , संजय भुजाडी ,  सोहम लगे ,  गणेश मेहेत्रे ,  गोरख काळे ,  अशोक शेळके ,  भास्कर वाघ यांनी उक्कलगाव येथुन पिंजरा आणला .    जेसीबीच्या सहाय्याने पिंजरा विहीरीत सोडला  ,परंतु  त्या पिंजर्याच्या कड्याच तुटल्या कसाबसा पिंजरा विहीरीत सोडुन बिबट्याला पिंजर्यात येण्यास भाग पाडले . सायंकाळी साडे आठ वाजता विहीरीत पडलेला बिबट्याला पहाटे  साडे तीन वाजता विहीरी बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले  .या कामी गोखलेवाडीतील तरुणांची मोठी मदत मिळाली . या बाबत वनरक्षक ऐ आर पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की हा नर बिबट्या असुन त्याची पुर्ण वाढ झालेली आहे तो साडेचार वर्षाचा असावा या वेळी वन विभागाचे एस एम लांडे गोरक्ष सुरसे उपस्थित  होते या वेळी वन अधिकारी फोनच उचलत नसल्याचे शेतकऱ्यांनी  सांगितले तसेच पिंजरे देखील  अद्ययावत असावे असेही शेतकऱ्यांंचे म्हणणे आहे

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेद्र मोदीजींनी संपुर्ण देशात लाँक डाउनची घोषणा केली असुन मोलमजुरी करणार्या गोरगरीब जनतेला मोफत धान्य पुरवठा करण्यात यावा .अशी मागणी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई  यांनी  पुरवठा मंत्री  नामदार छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे  .         जिल्हा धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने पुरवठा मंत्री नामदार छागन भुजबळ यांना पाठविलेल्या निवेदनात देसाई यांनी पुढे म्हटले आहे की कोरोनाच्या धास्तीमुळे सर्वसामान्य जनता घरातच बसुन आहे त्यांना कामधंदा नसल्यामुळे त्यांच्याकडे पैसे उपलब्ध होवुच शकत नाही . शासनाने कार्डधारकांना तीन महीन्याचे धान्य एकाच वेळी देण्याचा निर्णय  घेतला असला तरी सर्व सामान्य जनता मेटाकुटीस आलेली आहे . अनेक कुटूंब अशी आहेत की ती दररोज काम करुन खाणारी आहेत .अशा कुटुंबांनी काय खायचे, हाच मोठा प्रश्न आहे . शासनाने धान्य उपलब्ध करुन दिले असले तरी ते घ्यायला देखील त्यांच्याकडे  पैसा नाही . त्यामुळे शासनाने गोरगरीब जनतेला विनामुल्य धान्य उपलब्ध करुन द्यावे .जेणे करुन गोरगरीब जनतेचा उदरनिर्वाह चालु शकेल, असेही निवेदनात म्हटले आहे .  या निवेदनावर देविदास देसाई  , रज्जाक पठाण, मिनाताई कळकुंबे  ,विश्वासराव जाधव , विजय दिघे  ,बाबा कराड, सुरेश उभेदळ ,बाळासाहेब देवखीळे , मच्छिंद्र पवार , बजरंग दरंदले , चंद्रकांत झुरंगे , भाऊसाहेब वाघमारे ,माणिक जाधव  ,ज्ञानेश्वर वहाडणे  ,गणेश यलम, कैलास  बोरावके  ,गजानन खाडे , खताळ, गणपत भांगरे , रावसाहेब भगत  ,सुरेश कोकाटे , माळवदे , बाबासाहेब ढाकणे  आदिंच्या सह्या आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget