बेलापूर ( प्रतिनिधी )- कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेद्र मोदीजींनी संपुर्ण देशात लाँक डाउनची घोषणा केली असुन मोलमजुरी करणार्या गोरगरीब जनतेला मोफत धान्य पुरवठा करण्यात यावा .अशी मागणी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे . जिल्हा धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने पुरवठा मंत्री नामदार छागन भुजबळ यांना पाठविलेल्या निवेदनात देसाई यांनी पुढे म्हटले आहे की कोरोनाच्या धास्तीमुळे सर्वसामान्य जनता घरातच बसुन आहे त्यांना कामधंदा नसल्यामुळे त्यांच्याकडे पैसे उपलब्ध होवुच शकत नाही . शासनाने कार्डधारकांना तीन महीन्याचे धान्य एकाच वेळी देण्याचा निर्णय घेतला असला तरी सर्व सामान्य जनता मेटाकुटीस आलेली आहे . अनेक कुटूंब अशी आहेत की ती दररोज काम करुन खाणारी आहेत .अशा कुटुंबांनी काय खायचे, हाच मोठा प्रश्न आहे . शासनाने धान्य उपलब्ध करुन दिले असले तरी ते घ्यायला देखील त्यांच्याकडे पैसा नाही . त्यामुळे शासनाने गोरगरीब जनतेला विनामुल्य धान्य उपलब्ध करुन द्यावे .जेणे करुन गोरगरीब जनतेचा उदरनिर्वाह चालु शकेल, असेही निवेदनात म्हटले आहे . या निवेदनावर देविदास देसाई , रज्जाक पठाण, मिनाताई कळकुंबे ,विश्वासराव जाधव , विजय दिघे ,बाबा कराड, सुरेश उभेदळ ,बाळासाहेब देवखीळे , मच्छिंद्र पवार , बजरंग दरंदले , चंद्रकांत झुरंगे , भाऊसाहेब वाघमारे ,माणिक जाधव ,ज्ञानेश्वर वहाडणे ,गणेश यलम, कैलास बोरावके ,गजानन खाडे , खताळ, गणपत भांगरे , रावसाहेब भगत ,सुरेश कोकाटे , माळवदे , बाबासाहेब ढाकणे आदिंच्या सह्या आहेत.
Post a Comment