Latest Post

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात श्रीरामपूर बंद
एन.आर.सी./एन.पी.आर/सी.ए.ए 
या संविधानविरोधी कायद्याचा विरोध आज श्रीरामपूर बंद करून करण्यात आला.
बहुजन क्रांती मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटनेच्या वतीने या कायद्याच्या विरोधात भारत बंद चे आवाहन केले होते.
श्रीरामपूर मधील सर्व नागरिक व व्यापारी यांनी आपापली दुकाने बंद करून बंद पाळला.या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर येथे या कायद्याच्या विरोधात निषेध सभा घेण्यात आली,यावेळी  एन.आर.सी./एन.पी.आर/सी.ए.ए हे कायदे रद्द करून डी. एन.ए तपासणी करून एन.आर.सी लागू करावी हि मागणी करण्यात आली व निवडणुकीत इ.व्ही.एम मशीन बंद करण्यात यावे,ओबीसींची जातवार जनगणना करण्यात यावी याही मागण्या या वेळी करण्यात आल्या निषेध सभेत 
एस के चौदांते (संयोजक बहुजन क्रांती मोर्चा)
तुषार पारखे (संयोजक श्रीरामपूर शहर)
मुश्ताक तांबोळी (राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा)
अहमद जहागीरदार(संविधान बचाव समिती)दिलीप त्रिभुवन,सुनील मगर(बी एस पी),अँथोनी शेळके(आर.पी.आय)
शिवाजी गांगुर्डे( राष्ट्रीय अध्यक्ष एकलव्य भिल्ल समाज संघटना)
डॉ सलीम शेख
अमारप्रीत सिंग( शीख समुदाय)
अशोक बागुल (रिपब्लिकन नेते)
मुख्तार शहा(नगरसेवक)
सुधाकर भोसले(राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा)
दिलीप बडधे(राष्ट्रीय ओबीसी मोर्चा)
जोएफ जामदार( जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी)
साजिद मिर्झा(एम आय एम)दीपक कदम(अल्पसंख्यांक ख्रिस्ती संघटना)
फिरोज पठाण(जिल्हाध्यक्ष भीम आर्मी)
भगवान रोकडे(भीम आर्मी)
सुभाष तोरणे(ख्रिश्चन संघटना)
मास्टर सरवरअली
रज्जाकभाई शेख (भारतीय लहुजी सेना जिल्हाध्यक्ष)
पोपट ढोकने,शब्बीर पठाण,रामदास रोकडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.वरील मागण्यासाठी बंद मध्ये भारत मुक्ती मोर्चा,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा,राष्ट्रीय ओबीसी मोर्चा,संविधान बचाव समिती,शीख समाज संघटना,एकलव्य भिल्ल समाज संघटना,विविध रिपब्लिकन गट,बी एस पी,समाजवादी पक्ष,एम आई एम,भीम आर्मी,ख्रिश्चन संघटना आदी संघटना सक्रिय सहभागी झाल्या होत्या.

नाशिक | प्रतिनिधी:-नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात असलेल्या मेशी गावानजीक काल (दि.२८) सायंकाळी चारच्या सुमारास बस आणि रिक्षाची धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातातील मृतांचा आकडा २४ वर पोहोचला असून अजूनही एका बेपत्ता मुलाचा शोध एनडीआरएफच्या टीमकडून केला जात आहे.देवळा तालुक्यातील मेशी फाट्याजवळ ही भीषण दुर्घटना घडली होती.  अपघातानंतर दोन्ही वाहने विहिरीत कोसळल्याने अधिक जीवितहानी झाली. बसने दिलेल्या जोरदार धडकेत रिक्षाचा चक्काचूर होऊन रिक्षा विहिरीत कोसळली.या अपघातात २४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात अपघातात ३४ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बस मालेगावकडून कळवण येथे चालली होती.विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते. अंधार पडल्यामुळे आणि विहिरीत १५ ते २० फुट पाणी असल्यामुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे मध्यरात्री शोधकार्य थांबविण्यात आले होते.
आज सकाळपासून पुन्हा एनडीआरएफकडून शोधकार्य हाती घेण्यात आले आहे. रात्री २३ मृतदेह हाती आल्यानंतर आज सकाळी पुन्हा एक मृतदेह मिळून आला. तसेच अजून एक मुलगा बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.जे प्रवासी या अपघातात मृत झाले आहेत त्यांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत केली जाणार आहे. तर जे प्रवासी जखमी झाले आहेत त्यांच्यावर होणाऱ्या उपचारांचा खर्च एस टी महामंडळातर्फे करण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली. तर गंभीर जखमी प्रवाशांना पाच लाखांची मदत केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.तर बसही रीक्षापाठोपाठ विहिरीचा कठडा तोडून विहिरीत पडली. त्यामुळे बसमधील प्रवाशी अधिक जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, मृतांची ओळख पटवून शवविच्छेदन करत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

दिलीप शिशुपाल पवार (स्थानिक गुन्हे शाखा, पोलिस निरीक्षक) 
अहमदनगर - प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवारी (दि.26) अहमदनगर पोलीस मुख्यालयातील सकाळी झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील विशेष तपास, गुन्हे उघड आणि चांगली प्रशासकीय कामगिरी केल्याबद्दल मंदार मल्लिकार्जुन जवळे (उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव विभाग), दिलीप शिशुपाल पवार (स्थानिक गुन्हे शाखा, पोलिस निरीक्षक) यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री हसन मुश्रिफ यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके आदी उपस्थित होते.अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये याप्रमाणे
श्रीहरी रामचंद्र बहीरट(पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे) 
श्रीहरी रामचंद्र बहीरट (पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे), अरुण भागीरथ परदेशी (पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे), दौलतराव शिवराम जाधव (पोलीस निरीक्षक, श्रीगोंदा पोलीस ठाणे), संदीप भगवान पाटील (सहाय्यक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा), पवन शंकर सुपनर (पोलीस उप निरीक्षक एमआयडीसी पोलीस ठाणे, अ.नगर), पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर सिताराम गोसावी (स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय विठ्ठल गव्हाणे (स्थानिक गुन्हे शाखा),पोलीस नाईक रवींद्र आबासाहेब कर्डिले (स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस नाईक संदीप कचरु पवार (स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस हेड कॉन्स्टेबल जालिंदर काशिनाथ लोंढे (श्रीरामपूर, शहर पोलीस ठाणे), पोलीस कॉन्स्टेबल किशोर सुभाष जाधव (श्रीरामपूर, शहर पोलीस ठाणे), पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश मनोहर गोसावी (सायबर पोलीस ठाणे), पोलीस कॉन्स्टेबल अभिजित दत्तात्रय आरकल (सायबर पोलीस ठाणे), पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरसय्या गुंडू (सायबर पोलीस ठाणे), पोलीस नाईक संदीप विक्रम चव्हाण (एमआयडीसी पोलीस ठाणे), पोलीस नाईक विजय विठ्ठल नवले (एमआयडीसी, पोलीस ठाणे), पोलीस कॉन्स्टेबल रशिद बादशहा शेख (राहता, पोलीस ठाणे), पोलीस कॉन्स्टेबल अजित अशोक पटारे (राहाता, पोलीस ठाणे), संतोष ज्ञानेश्वर बोळगे (श्रीगोंदा) आदींचा सन्मान करण्यात आला.

अहमदनगर (प्रतिनिधी)  नेवासा तालुक्यातील पानेगाव-खेडले रस्त्यावर रस्ता विचारण्याच्या बहाण्याने डोळ्यात मिरची पूड टाकून निखील आंबिलवादे या सराफ व्यावसायिकाकडील 7 लाख 90 हजार 778 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लुटल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या ‘लुटी’ ची सुपारी चक्क कोल्हारमधील सराफ विजय उर्फ बब्बू रामकृष्ण देडगावकर यानेच दिली होती. त्यासाठी त्याने श्रीरामपूरच्या ‘लुटारू’ गँगला हाताशी धरून या कृत्याला अंजाम दिला. यातील चौघांना गजाआड करण्यात आले असून अन्य संबंधित सराफासह पाचजण पसार झालेत. त्यांचा एलसीबीचे पोलीस कसून शोध घेत आहेत.श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील निखील शशिकांत रणनवरे हा लुटेरे टोळीचा मास्टरमाइंड असल्याचे पोलिसांनी सांगितले. या लुटीत एका महिलेचाही सहभाग आहे.निखिल बाळासाहेब आंबिलवादे (रा. खेडले परमानंद, ता.नेवासा) हे त्यांचे मांजरीतील गुरूकृपा ज्वेलर्स दुकानातील 7 लाख 90 हजार रूपयांचे सोन्याचे, चांदीचे दागिने घेऊन पानेगाव ते खेडले परमानंद रोडने पानेगाव शिवारातून जात असताना मोटारसायकलवरील तिघांनी रस्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याकडील दागिन्यांची बॅग चोरून नेली. ही घटना 21 जानेवारीला सायंकाळी 5.15 वाजता घडली. याबाबत सोनई पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी पोलिसांनी चक्रे फिरविली. अशातच पो. नि. दिलीप पवार यांना गुप्त खबर्‍याकडून हा गुन्हा टाकळीभान येथील निखील शशिकांत रणनवरे व त्याच्या सहकार्‍यांनी केला असल्याची माहिती कळाली. त्यानंतर पवार यांनी आपल्या सहकार्‍यांमार्फत टाकळीभानचा निखील रणनवरे (वय 21),श्रीरामपूरच्या वॉर्ड नं. 1, फातेमा हाऊसिंगमधील सोहेल जुबेर शेख (21) श्रीरामपूरच्या वॉर्ड नं. 1, फातेमा हाऊसिंगमधीलच आवेज उर्फ बाबा जुबेर शेख (23), आणि नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करून त्यांची कसून चौकशी केली असता निखील रणनवरे याने कबुली दिल.निखील रणनवरेसह बेलापुरातील चाँदनगरचा शाहरूख सांडू सय्यद, टाकळीभानचे मतीन पठाण, सोहेल जुबेर शेख, आवेज उर्फ बाबा जुबेर शेख, गौरव बारकू अवसरमल, प्रकाश उर्फ भावड्या भिमराव रणनवरे, निखील रणनवरेचा जोडीदार शहारूख सय्यद (रा. श्रीरामपूर) याची माहिला नातेवाईक आलिशा आजीज शेख हिची देडगावकराशी ओळख आहे. या महिलेच्या माध्यमातून कोल्हारचा सराफ विजय देडगावकराच्या घरी सर्वजण जमले. तेथे खेडले परमानंद येथील आंबिलवादे या सराफाचे मांजरी येथे श्रीगुरूकृपा नावाचे सराफी दुकान आहे. रात्री तो दुकानातील सोने बॅगमध्ये भरून मोटारसायकलने घरी जातो. रस्त्यात अडवून त्याला मारहाण करा, सोने लुटा, त्याचा मोबादला देऊ असा कट देडगावकरच्या घरात शिजला. त्यानंतर लूट करण्यासाठी या टोळीने नियोजन केले.त्यानुसार 21 तारखेला दुपारी शाहरूख सय्यद, गौरव अवसरमल, प्रकाश रणनवरे हे युनिकॉर्न मोटारसायकलवर होते. त्यानंतर आंबिलवादे यांच्या दुकानाजवळ पाहणी करण्यासाठी सोहेल शेखला सोडले. निखील रणनवरेसह अन्य आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी थांबले. सोनार निखील आंबिलवादे यांनी दुकान बंद करताच, तेथे असलेल्या साहेलने रणनवरेला इशारा केला. लगेचच रणनवरेने स्वतःच्या मोबाईलवरून सोनार पांढर्‍या रंगाच्या मोपेड मोटारसायकलवर बॅग घेऊन निघाल्याची माहिती दिली. व या सोनाराचा पानेगाव चौकापर्यंत पाठलाग केला. व युनिकॉर्न मोटारसायकवर असणार्‍या शाहरूख, गौरव आणि प्रकाश यांनी आंबिलवादे यांना रस्ता विचारण्याचा बहाणा करून त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली आणि सोने-चांदीची दागिने असलेली बॅग लांबविली.लुटीनंतर टाकळीभान मार्गे ही टोळी श्रीरामपूरातील संजयनगरमधील अलिशा शेख हिच्या घरात एकत्र आली. तिने देडगावकराला फोन करून मोहीम फत्ते झाल्याची माहिती दिली. त्यावर देडगावकराने सोने घेऊन कोल्हारला येण्याचे सांगितले. शाहरूख सय्यद, निखिल रणनवरे, प्रकाश रणनवरे व अलिशा शेख नॅनो कारने कोल्हारला देडगावकरच्या घरी पोहचले. लुटलेल्या सोन्याचे 5 लाख वीस हजार रुपये देईल असे सांगत देडगावकराने काही पैसे दिले बाकीचे तीन दिवसांत देण्याचे ठरले असल्याची कबुली निखील रणनवरे याने पोलिसांना दिली.  अटक केलेल्या चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेण्याचे आदेश देण्यात आले.लुटणारी गँग..निखील शशिकांत रणनवरे (रा. टाकळीभान), सोहेल जुबेर शेख, आवेज ऊर्फ बाबा जुबेर शेख (दोघेही रा. वॉर्ड नं. 1, फातेमा सोसायटी, श्रीरामपूर) आणि मतीन गुलाब पठाण (रा. बेलपिंपळगाव, ता.नेवासा) या चौघांना अटक.शाहरूख सांडू सय्यद (रा. बेलापूर), गौरव बारकू अवसरमल, प्रकाश उर्फ भावड्या भीमराव रणनवरे (रा. टाकळीभान), आलिशा अजीज शेख (संजयनगर,श्रीरामपूर) आणि विजय ऊर्फ बब्बू रामकृष्ण देडगावकर (कोल्हार)हे सगळे पसार आहे. 

शिरसगाव[वार्ताहर]हरिगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक विकासाचे काम शासनाच्या आदेशानंतर,माजी सामाजिक न्यायमंत्री यांच्या हस्ते झालेल्या भूमिपूजनानंतर अद्याप सुरु झाले नाही शासनाकडून ९५ लाख रु त्यासाठी मंजूर झाले निविदा निघून वर्क ऑर्डर झाली परंतु काम सुरु झाले नसल्याने रवींद्र वाहूळ,बाळू बोर्डे,माधव झाल्टे हे तिघे अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २४ जानेवारीपासून आमरण उपोषणास बसले आहेत.तेथे विविध पदाधिकारी,आमदार लहू कानडे,सार्वजनिक बांधकाम विभाग उजागरे,राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष माणिक विधाते,श्रीरामपूर उपनगराध्यक्ष करण ससाणे,सभापती सचिन गुजर,मुन्ना पठाण सरपंच अस्मिता नवगिरे,अनिता भालेराव,सीताबाई गायकवाड,कोमल जाधव,सुर्यकांत चाबुकस्वार,रसूल पठाण,प्रा.किरण खाजेकर,डॉ,नंदकुमार वाघमारे,दिलीप त्रिभुवन चेतन त्रिभुवन,सुनील शिणगारे, भीमराज बागुल,जिल्हाधिकारी कार्यालय अधिकारी आदींनी उपोषणार्थी यांची भेट घेतली.पण हरिगाव ग्रामविकास अधिकारी मात्र ४ दिवसात फिरकले नाहीत.पालकमंत्री ना.मुश्रीफ यांना २५ जाने.ला शिष्टमंडळ भेटले उपोषण संदर्भात २७ जाने.रोजी तातडीने अहमदनगर येथे संबंधित अधिकारी यांची बैठक झाली..त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.प्रा.किरण खाजेकर यांच्या नेतृत्वाखाली हरिगाव शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय,नगर रचना विभागीय कार्यालय येथे भेटले.त्यांचे समवेत दिलीप त्रिभुवन,सुनील शिणगारे,डॉ नंदकुमार वाघमारे,चेडे,चंद्रकांत खरात दीपक नवगिरे,रमेश भालेराव,रसूल पठाण,,अशोक  खरात,अमोल वाहूळ,विनायक वाघमारे,सुनील रूपटक्के,सचिन बोधककळू बावस्कर,हरीश मढीकर,अनिल लिहिणार,सुनील पवार,महेबूब शेख,,संदीप लोखंडे आदी होते.तेंव्हा सकारात्मक चर्चा झाली व हा प्रश्न सकारात्मक सोडविला जाईल असे निवासी जिल्हाधिकारी यांनी सांगितले.तसेच दि २४ जाने.पासून अहमदनगर येथे बसलेल्या डॉ आंबेडकर स्मारक विकास काम सुरु करणे बाबत उपोषणार्थीना पाठींबा देणेसाठी सरपंच ग्रामस्थ हरिगाव,यांनी दि २७ जाने रोजी हरिगाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.बंद शांततेत पाळला.संध्यकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तहसीलदार महसूल निखारे,यांनी लेखी पत्र तातडीने नगररचना कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना सूचना दिल्याचे प्रत दिल्याने तीन उपोषणार्थी यांचे आमरण उपोषण संध्यकाळी तहसीलदार नगर गिरीश वाखारे,यांच्या हस्ते लिंबूपाणी देऊन सोडण्यात आले.त्यावेळी नेमाणे गृह विभाग,ठोंबरे,प्रा.किरण खाजेकर उपस्थित होते.

सातारा : भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. लोणंद येथील सोना अलायन्स कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना मारहाण आणि त्यांच्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणी दाखल खटल्यात सातारा सत्र न्यायालयाने उदयनराजे भोसले यांच्यासह 12 जणांना निर्दोष ठरवलं आहे.
उदयनराजे भोसले यांच्यासह 12 जणांवर सोना अलायन्स कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना मारहाण केल्याचा आणि 24 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप होता. त्यानंतर राजकुमार जैन यांनी 23 मार्च 2017 रोजी उदयनराजे भोसले यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान या प्रकरणात मध्यंतरीच्या काळात उदयनराजेंच्या अडचणी वाढल्याचंही बोललं गेलं. मात्र, सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने यावर निकाल सुनावत आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
काय आहे प्रकरण?
सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे सोना अलायन्स नावाची लोखंडाच्या भुकटीपासून विटा तयार करणारी कंपनी आहे. या कंपनीत उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली कामगारांची संघटना आहे. उदयनराजे भोसलेंनी 18 फेब्रुवारी रोजी कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना सातारा विश्रामगृहात बोलावून खंडणीची मागणी केली आणि बेदम मारहाण केली, असा आरोप जैन यांनी केला. या प्रकरणी त्यांनी पोलीस तक्रारही दिली. या तक्रारीनुसार उदयनराजे आणि त्यांच्या साथीदारांवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात उदयनराजेंसह 9 जणांना 2017 मध्ये अटकही झाली होती.
उदयनराजे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे उदयनराजेंच्या अडचणी वाढल्या होत्या.

कोल्हार ( साईप्रसाद कुंभकर्ण ) :-
शिवशाही बस व ईरटीका कारच्या धडकेत सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना कोल्हार येथील पुलानजीक दुपारी साडे तीनच्या दरम्यान घडली
याबाबत सविस्तर असे की कोपरगाव पुणे ही शिवशाही बस क्रमांक mh 14 GD 8440दुपारी कोल्हारहून  पुण्याकडे जात असताना विरुद्ध दिशेने  शनिशिंगणापूर हुन शिर्डी कडे जाणाऱ्या ईरटीका कार नंबर एम एच 17 , 5150 नंबरच्या कारची  पुलानजीक धडक होऊन ईरटीका कार मधील अपर्णा अनिल लामा( वय 20 )पार्वती चंद्रप्रकाश लामा( वय 64) पूनम अनिल लामा( वय 42) कांची देढू डुबका (वय 65 )नारिम उदय  डुबका (वय 50) सर्व (राहणार दार्जिलिंग ) व ईरटीका कार चालक निखिल संजय अत्रे (वय  23) (राहणार राहाता) असे सहाजण गंभीर जखमी झाले जखमींना लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार बाबासाहेब लबडे यांनी स्वतः लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
 या अपघातात ईरटीका कार च्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला व शिवशाही बसचे नुकसान झाले अपघातानंतर वाहतूकीची कोंडी झाल्याने नगर-मनमाड राज्य मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget