Latest Post

बेलापूरः श्रीक्षेत्र बेलापूर नगरीमध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्री महाराज यांचा ७५०वा जन्मोत्सव सोहळा उद्या शुक्रवार(दि.१५)रोजी संपन्न होणार आहे.                                   यानिमित्त ज्ञानेश्वर महाराजांची भव्य शोभायात्रा  तसेच भव्य दीपोत्सव कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी मिरवणूक मार्गावर  महिला भगिनींनी  सडा रांगोळी काढणे व प्रत्येकी पाच पणत्या  तेल आणि वातीसह  दिपोत्सवासाठी आणाव्यात .शोभायाञा मिरवणुकीमध्ये कलश घेऊन सहभागी व्हावे सोबत थोडासा प्रसाद आणावा असे आवाहन करण्यात आले आहे.                               या भव्य कार्यक्रमाचे   महिला भगिनींनी व ग्रामस्थांनी उपस्थित राहुन या सुवर्ण क्षणाचे साक्षिदार व्हावे.शुक्रवारी १५आॕगष्ट रोजी  सायंकाळी ४ ते ६ वा. या वेळेत श्री केशव गोविंद मंदिर येथुन संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक व ६.३० वाजता भव्य दीपोत्सव होईल.तरी भाविकांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समस्त वारकरी संप्रदाय व ग्रामस्थांनी  केले आहे.

बेलापूरःबेलापूर बुll ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर  रविवार(दि.१७)रोजी स.९ वा. रयत शिक्षण संस्था,सातारा येथील ख्यातनाम कलाशिक्षक  राजेन्द्र घोडके यांचे मार्गदर्शनाखाली पहिले ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'शाडु मातीच्या गणपती मुर्ती बनविण्याची कार्यशाळा'आयोजित करण्यात आली आहे.                                        शाडु मातीच्या गणपती मुर्ती पर्यारणपुरक मानल्या जातात.याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती होणेच्या हेतूने सदरच्या कार्यशाळेचे आयोजन रविवार १७ आॕगष्ट रोजी सकाळी ९ वा. श्री.संत सावता महाराज मंदिर(अरुणकुमार वैद्य पथ)येथे आयोजित करण्यात आले आहे.                                                           या शिबिरात फक्त बेलापूर-ऐनतपूर येथील विद्यार्थी सहभागी होवू शकतील.प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या १००विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळेल.शाडू माती  आयोजक देतील तर पाण्यासाठी आवश्यक भांडे विद्यार्थ्याने सोबत आणावे. नाव नोंदणीसाठी ग्रामपंचायत बेलापूर कार्यालयात  सचिन साळुंके(९६५७७११००१),प्रमोद जनरल स्टोअर्सचे हेमंत मुथा(८३०८४८०९,व सुदर्शन सुपर शाॕपीचे सुधीर करवा (९०११७९४४९८)यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन ग्रामपंचायत बेलापूर बुll व सत्यमेव ग्रुपच्यावतीने करण्यात आले आहे.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे): स्व. माधवरावजी दगडूजी मुळे प्रतिष्ठान, अहमदनगर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय भव्य निबंध स्पर्धेत जिल्ह्यातील १५० शाळांमधील सुमारे ६,००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विविध सामाजिक, शैक्षणिक व प्रेरणादायी विषयांवर विद्यार्थ्यांनी आपली लेखनकौशल्ये प्रभावीपणे सादर केली.सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव येथून इयत्ता ८ वी ते १० वी गटातील ९३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यामध्ये इयत्ता ८ वीचा गुणी विद्यार्थी कुमार आराध्य संतोष मलिक याने उत्कृष्ट लेखनशैली, विषयाची सखोल मांडणी आणि भाषेवरील प्रभुत्व यांच्या जोरावर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला.आराध्यचा हा विजय संपूर्ण शाळेसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.प्राचार्य के. एल. वाकचौरे,उपप्राचार्य शुभांगी अमृतकर,पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे,पल्लवी ससाणे,नाथलीन फर्नांडिस तसेच शिक्षक व पालकवर्ग यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचे यश मेहनत,सातत्यपूर्ण सराव आणि मार्गदर्शकांच्या योग्य दिशादर्शनाचे फलित असल्याचे गौरवण्यात आले.

श्रीरामपूर( प्रतिनिधी)- तालुक्यातील प्रवरा नदीवर शेतकऱ्यांनी टाकलेल्या वीज मोटार व केबलची मोठ्या प्रमाणात चोरी होत असून या चोरांचा तातडीने बंदोबस्त करावा अशा मागणीचे निवेदन मांडवे फत्याबाद कुरणपूर कडीत येथील ग्रामस्थांनी कोल्हार पोलीस स्टेशनला दिलेले आहे पोलिसांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की आम्ही प्रवरा नदीवर वीज मोटर टाकून शेती करता पाणीपुरवठा करत असतो गेल्या चार महिन्यापूर्वी प्रवरां नदीवरील वीज मोटार त्याचबरोबर वीज मोटारीच्या केबल चोरी गेलेल्या होत्या त्यावेळी आम्ही तक्रार दाखल केली नाही त्याचाच परिणाम पुन्हा एकदा प्रवरा नदीवर बसविलेल्या विज मोटारी त्याचबरोबर मोटारीच्या केबल चोरट्यांनी चोरुन नेल्या असून या चोरांचा तातडीने बंदोबस्त करावा काही महिन्यापूर्वी कुरणपूर परिसरातील शेतकऱ्यांच्या देखील अशाच पद्धतीने केबल चोरून नेण्यात आलेल्या होत्या हे चोरटे चार चाकी वाहनातून येऊन केबल चोरी करतात त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते अगोदरच पावसाने व्यत्यय आणल्यामुळे शेतकरी अडचणी सापडलेला आहे त्यातच मोटारीच्या केबल व विज मोटारी चोरी गेल्यामुळे परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे त्यामुळे या चोरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे .पोलिसांना दिलेल्या या निवेदनावर सर्वश्री भाऊसाहेब वडीतके , जगन्नाथ चितळकर, शहाजी वडीतके, नंदकुमार चितळकर, उद्धव जोशी, अण्णासाहेब गेठे, बाबासाहेब चितळकर, मुनीर पिंजारी, बबनराव वडीतके, नरेंद्र जोशी, मच्छिंद्र तांबे, संदीप चितळकर, संपत चितळकर, सुधाकर जोशी, सोन्याबापू वडीतके आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत

बेलापूर(प्रतिनिधी)-श्रीरामपुर तालुक्यातील बेलापुर खूर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.सविता प्रकाश राजुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.त्यांच्या निवडी बद्दल पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय दादा विखे पाटील तसेच अशोक उद्योग समुहाचे सर्वेसर्वा भानुदास मुरकुटे , शरद नवले यांनी अभिनंदन केले आहे  .                         बेलापूर खुर्द ग्रामपंचायत च्या सरपंच प्रणालीताई भगत यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाकरता नुकतीच निवडणूक घेण्यात आली. त्या निवडणुकीत सविता राजुळे यांचा एकमेव अर्ज आला होता त्यामुळे सरपंच पदी सौ.राजुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .या वेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल गाडे, वसंत पुजारी, दिलीप भगत ,राजेंद्र बारहाते, माजी सरपंच सौ प्रणाली भगत, कल्पना ताई भगत ,राणी पुजारी, नयनाताई बडधे, प्रियंकाताई थोरात आदि सदस्य हजर होते. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून नितीन मुळे यांनी काम पाहिले त्यांना ग्रामविकास अधिकारी राजेंद्र मेहत्रे ,कामगार तलाठी शिंदे मॅडम यांनी सहकार्य केले. या वेळी तनपुरे कारखान्याचे माजी संचालक द्वारकनाथ बडदे, ज्ञानदेव वाकडे ,विनय भगत, राजेंद्र कुंकूलोळ, सुनील क्षिरसागर, शशिकांत पुजारी ,रामदास थोरात ,राकेश बडदे ,बी. एम. पुजारी, गोरख भगत, पंकज खर्डे ,

 जितेश महाडिक, विक्रांत पाटील, पंकज पाटील, पोलीस पाटील उमेश बारहाते, युवराज जोशी, ऋषिकेश बारहाते, चंद्रकांत गाढे, ऋषिकेश महाडिक, रणजीत काळे, सतीश बारहाते, अशोक महाडिक, राजेंद्र गागरे, शंकर बारहाते, अनिल बारहाते ,प्रशांत बडदे, नंदू कुऱ्हे, समीर सय्यद, अर्जुन गोरे, कैलास थोरात, गणेश महाडिक, अमोल जोशी, किशोर कांबळे ,राहुल शेलार, सुनील बडधे, संतोष बडधे, महेश बडधे, सागर तागड आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते

बेलापूर -(प्रतिनिधी)गावात खाजगी सावकारांचा सुळसुळाट झालेला असुन हेच खाजगी सावकार 50%पासुन 120% टक्क्यापर्यंत व्याज वसूल करीत आहेत मात्र या विषयावर ग्रामपंचायत गप्प का आहे, असा  सवाल सामाजिक कार्यकर्ते विक्रम नाईक यांनी केला आहे.

याबाबत नाईक यांनी ग्रामविकास अधिकारी व सरपंचांना निवेदन  पाठविले असुन त्यात पुढे म्हटले आहे की खाजगी सावकाराचा गावाला वेढा  पडला असून काही ठराविक लोक गोरगरीब तसेच अडलेल्या नडलेल्या कडून मन मानेल त्या पद्धतीने व्याजाची आकारणी करून जनतेला लुबाडत आहेत याबाबत अनेक तक्रारी दाखल झालेल्या होत्या परंतु त्या सावकाराच्या दडपशाहीमुळे दडपल्या गेल्या. कुणाच्या जमिनी, कुणाच्या चार चाकी, कुणाच्या दोन चाकी, कुणाची मालमत्ता घर गहाण ठेवून हे सावकार खुलेआम 50 टक्के पासून ते 120% पर्यंत व्याजाची आकारणी करून लबाडणूक करत आहेत यांचा व्याजाचा दर हा दर महा असून महिना संपला की हे लोक संबंधित व्यक्तीकडे तगादा लावतात अर्वाचे भाषा वापरून दादागिरी करतात व त्याने गहाण टाकलेल्या मालमत्ता विकण्याचा दम देतात त्यामुळे अनेक गोरगरिबांना आपल्या मालमत्ता सोडून देण्याची वेळ येत आहे तरी बेलापुराला पडलेला हा  खाजगी सावकारकीचा विळखा सुटणार कधी याबाबत विक्रम नाईक यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना सवाल विचारला आहे. तसेच बेलापूर गाव मध्ये किती अधिकृत व किती अनाधिकृत सावकार आहेत याची यादी माननीय जिल्हाधिकारी यांना पाठवली आहे काय याचीही माहिती  त्यांनी ग्रामपंचायतकडे मागवली आहे तसेच संबंधित सावकाराची कर्ज वसुली कशी असते तसेच किती टक्के व्याज घेतली जाते याबाबतही ग्रामपंचायत प्रशासनाकडून माहिती मागविण्यात आलेली आहे ग्रामपंचायतीचे प्रशासन अधिकारी  ही माहिती देत नसेल तर बेकायदेशीरपणे चाललेल्या या सावकारकीला  ग्रामपंचायतचा छुपा पाठिंबा तर नाही ना असा सवाल नाईक यांनी विचारला असून याबाबत लवकरच तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विक्रम नाईक यांनी दिलेला आह 

 जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पष्ट आदेशानंतरही ग्रामपंचायतने खाजगी सावकारकीकडे कठोर पावले का उचललेली नाहीत, याकडे नाईक यांनी लक्ष वेधले आहे. “गाव बुडतंय आणि ग्रामपंचायत बघ्याची भूमिका घेत आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.

बेकायदेशीर सावकारी थांबवण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेवुन गोरगरीबांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी नाईक यांनी केली आहे.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे) –अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ,मुंबई यांच्या वतीने आयोजित शास्त्रीय संगीत गायन आणि तबला वादन परीक्षा सन २०२४-२५ मध्ये श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगावच्या विद्यार्थ्यांनी लक्षणीय यश संपादन केले आहे. या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी आपली कला, मेहनत आणि संगीताची समज दाखवत उत्कृष्ट गुणांनी यश प्राप्त केले.

गायन परीक्षेत एकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.यामध्ये २० विद्यार्थी विशेष श्रेणीसह उत्तीर्ण होत शाळेचा मान उंचावला.तबला वादन परीक्षेत ६० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता त्यापैकी २५ विद्यार्थी विशेष गुण श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले तर बाकीचे विद्यार्थी प्रथम व द्वितीय श्रेणीत उल्लेखनीय कामगिरी करत कौतुकास पात्र ठरले.विद्यार्थ्यांना संगीताचे प्रशिक्षण देताना रेखा गायकवाड (गायन) आणि उस्ताद श्री. दिग्विजय भोरे (तबला) यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे दर्जेदार यश प्राप्त केले, हे विशेष उल्लेखनीय आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे, उपप्राचार्य शुभांगी अमृतकर, पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे, नैथालिन फर्नांडिस यांच्यासह सर्व शिक्षकवृंद आणि इतर कर्मचाऱ्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शास्त्रीय संगीत आणि वादन या भारतीय संस्कृतीतील मौल्यवान कला शालेय पातळीवरच जोपासत विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे काम श्री शारदा स्कूल सातत्याने करत आहे. विद्यार्थ्यांमधील कलागुणांचा विकास,आत्मविश्वासाची वाढ आणि सांस्कृतिक भान या उद्देशाने घेतले जाणारे हे प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी असून, शाळेचा सांस्कृतिक पाया अधिक भक्कम करणारे ठरत आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget