निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यामध्ये विक्रम मोरे यांच्या माध्यमातून निर्मल वारीचे उत्कृष्ट नियोजन..!
विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीसोबत राज्य शासनाने २६५ फिरते शौचालय उपलब्ध करून दिले आहेत. त्याच्या व्यवस्थापनाचे, स्वच्छतेचे, वापराचे नियोजन, तसेच वारकऱ्यांच्या प्रबोधनाचे नियोजन सेवा सहयोग आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक गेली १० वर्षे अव्याहतपणे करत आहे. वारीचा प्रवास स्वच्छ व निर्मल करण्यासाठी स्वयंसेवकांनी पुढे येत हा उपक्रम सुरू केला. ज्याला आता राज्य शासनाची आणि समाजातील विविध संस्थांची मोठी साथ मिळत आहे. दरवर्षी वारी अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी होत चालली आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पसरणारे अनारोग्य जवळपास नष्टच झाले आहे.” मागील १० वर्षात वारीमध्ये उघड्यावर शौचाला जाण्याचे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत घटल्याचे जाधव यांनी सांगितले. नियमित वारी करणारे वारकरी शौचालयाचा वापर करत असून, दींडी चालक आणि स्थानिक नागरिकांकडूनही शौचालयाचा आग्रह होत आहे. ज्याला वारकऱ्यांचाही सकात्मक प्रतिसाद लाभत असून विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी पालखी सोहळ्यामध्ये आदित्य एंटरप्राइजेस या कंपनीकडून तसेच या कंपनीचे संचालक विक्रम मोरे यांच्या माध्यमातून शौचालयाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले यामुळे या पालखी सोहळ्यामध्ये कुठल्याही वारकऱ्याला गैरसोईचा सामना करावा लागला नाही..!









