Latest Post


श्रीरामपूर - नगरपालिकेने सात दिवसापूर्वी दिलेल्या नोटिसीची मुदत संपल्यानंतर आज सकाळी साडेदहा वाजता नगरपालिकेचे अतिक्रमणविरोधी विभागाने मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, अतिक्रमण अधिकारी संजय शेळके, नगर अभियंता सूर्यकांत गवळी आदींच्या फौज फाट्यासह बेलापूर रोड पासून रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली.मोठ्या प्रमाणात लोकांच्या मालमत्तेची नासधूस झाल्याचे दिसून आले.

सदर मोहीम राबविताना पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपुजे व शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विशेष कृती दलाच्या तुकडीसह महिला पोलीसही यामध्ये सहभागी झाले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याने कोणीही फारसा प्रतिकार केला नाही. दोन जेसीबी, फायर फायटरची गाडी आणि इतर नगरपालिकेचा स्टाफ यांच्या सहकार्याने सदरची अतिक्रमण मोहीम राबविली जात आहे. यावेळी रस्त्यावर बघ्यांची खूप मोठी गर्दी झालेली आहे .

बेलापूर रोडला पश्चिम बाजूने ही मोहीम सुरू झाल्यानंतर पूर्वेकडील लोकांनी स्वयंस्फूर्तीने आपली अतिक्रमणे काढायला सुरुवात केली आहे. खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पत्र्याचे शेड, दुकाने पुढे आल्याचे दिसून आले. अनेकांनी आपले सामान हलवण्यासाठी पूर्ण कुटुंब रस्त्यावर उतरवल्याचे ही दिसत आहे.

सदरची अतिक्रमण मोहीम थांबवावी किंवा दुकानदारांचा सहानुभूतीने विचार करावा याबाबत शहरातील राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन साकडे घातले.आमदार हेमंत ओगले, माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाने आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून याबाबत विनंती केली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी शासन नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिल्याने पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ही मोहीम राबविली जात आहे.

सदरची मोहीम सुरू राहणार असून नागरिकांनी आपापली अतिक्रमणे काढून घेऊन आपले नुकसान टाळावे व नगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी केली आहे.

बेलापूर (प्रतिनिधी)- येथील सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपच्या वतीने वार्तालाप,हळदी कुंकू व स्नेहभोजन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचा महिलांनी व सत्यमेव जयते ग्रुपच्या सदस्यांनी तसेच बाळ गोपाळानी मन मुराद आनंद लुटला.  सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपच्या वतीने नुकताच अनमोल रसवंती गृह याठिकाणी सहकुटुंब हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या उपक्रमाचा उद्देश सांगताना सत्यमेव जयते ग्रुपचे देविदास देसाई व अभिषेक खंडागळे यांनी सांगितले की महिलांना दररोजच्या कामातून थोडीशी मोकळीक मिळावी किचन, टीव्ही आणि मोबाईल या विळख्यातून महिलांना बाहेर काढण्याकरिता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात अनेकांनी आपली कला सादर केली इरफान जागीरदार यांनी दाताने नारळ सोलून दाखविला अनेकांनी सुंदर असे उखाणे घेऊन या कार्यक्रमाचे रंगत वाढवली काहींनी आपल्या आयुष्यात आलेले अनुभव तसेच चुटकुले विनोद सांगितले कार्यक्रमाची सुरुवात किरण गागरे यांच्या अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान या भजनाने झाली अनेक महिलांनीही या मनमुराद गप्पागोष्टी मध्ये सहभाग नोंदविला व आपल्या विचारांना वाट मोकळी करून दिली यावेळी सौ प्रतिभा देसाई रत्नमाला डावरे मानवी खंडागळे राजश्री गुंजन आरती अंबिलवादे नयना बोरा जयश्री अमोलिक कावेरी गागरे मयुरी आंबेकर योगिता काळे तुझ्या दाणी सोनाली देवरे सुवर्णा सोनवणे संगीता घोंडगे संजीवनी सूर्यवंशी यांच्यासह अभिषेक खंडागळे देविदास देसाई, विष्णुपंत डावरे,संजय भोंडगे, दिपक क्षत्रिय, संपत बोरा, किरण गागरे, विशाल आंबेकर, महेश ओहोळ, बाबासाहेब काळे, बाबुलाल पठाण, इरफान शेख,संदिप सोनवणे,दिलीप अमोलिक, बाबासाहेब काळे,गोपी दाणी,सुरेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते

इंटरनेटच्या अतिवापरामुळे वाचन संस्कृती राहिली नाहीपोलिस उपनिरीक्षक चौधरी

बेलापूर (प्रतिनिधी) वाचाल तर वाचाल, वाचाल तर शिकाल, वाचाल तर टिकाल आणि वाचनासाठी गरज आहे ती पुस्तकाची. वाचनाने वक्ता, श्रोता, नेता तयार होतो त्याचबरोबर उत्तम श्रवण कौशल्य जीवनात योग्य मार्ग दाखवित असल्याचे मत सात्रळ  कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक नवनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.                   


श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे सिद्धेश्वर ग्रामीण ग्रंथालय व वाचनालय आयोजित वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाच्या सांगता समारोहप्रसंगी तसेच संस्थेने घेतलेल्या वकृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते कार्यक्रमचे अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष आदिनाथ वडीतके हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, प्राध्यापक डॉक्टर एकनाथ ढोणे, वनपाल अक्षय बडे ह. भ. प. बापूसाहेब चिंधे,प्रशांत विटनोर,सोसायटीचे चेअरमन सोन्याबापु जाटे आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात प्राध्यापक शिंदे म्हणाले की आज समाजात समाजासाठी धडपड करणाऱ्या माणसाची उणीव भासत आहे प्रत्येक जण स्वतःच हित पाहून कार्य करत आहे. आपल्या पूर्वजांनी बलिदान दिले नसते आज समाजासाठी धडपडणारे माणसं खूप कमी आहे पुस्तक हे माणसाचं मन निर्मळ करणारी साबण आहे. असेही  प्राध्यापक शिंदे म्हणाले.

 

     यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी म्हणाले की इंटरनेटच्या अतिवापरामुळे वाचन संस्कृती लोक पावत चालली आहे. तरुणांमध्ये संयम राहिलेला नाही रागाच्या भरात तरुणांकडून अनेक अपराध घडत आहेत. शासनाने राबविलेले वाचन संकल्प हा महाराष्ट्राचा अभिनव उपक्रम केवळ विद्यार्थ्यांसाठी नसून तो सर्वांसाठी आहे. असेही पोलीस उपनिरीक्षक चौधरी म्हणाले.

सचिव सुनील शिंदे यांनी प्रस्तविक केले वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवड्याच्या सांगता समारोह कार्यक्रम प्रसंगी ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथालय परिसराची सामूहिक स्वच्छता, ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ वाचन आदी उपक्रम राबविण्यात आले आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १ जानेवारीपासून सुरू झालेला हा उपक्रम १५ जानेवारीपर्यंत राबविला आहे. आज आपल्या ग्रंथालयामध्ये १३४६५ ग्रंथ उपलब्ध असून नियमित वचकांसाठी १३ वृत्तपत्र व मासिकही उपलब्ध आहे.असे  सचिव शिंदे यांनी सांगितले.

     यावेळी प्राध्यापक डॉक्टर एकनाथ ढोणे, विद्यार्थिनी प्रिया वडीतके यांची भाषणे झाली.

      यावेळी वनपाल अक्षय बडे, 

ह.भ.प. बापूसाहेब चिंधे सर, सोसायटीचे चेअरमन सोन्याबापु जाटे,मुख्याध्यापक म्हसे सर, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक चित्ते मॅडम, संस्थेचे संचालक चंद्रकांत वडीतके,शिंदे सर , तुपे सर, दळवी सर,, काटकर सर, रवींद्र काळे सर, दळवी सर, सौ.शिंदे,सौ.बेलकर,पंढरीनाथ भोसले, संजय विश्वासे, वृक्षसंवर्धक अजित देठे, ग्रंथपाल सुभाष भोसले, शिवाजी कोऱ्हाळे, संदीप शेरमाळे, रमेश भोसले, इंद्रभान तुपे,आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रस्ताविक संस्थेचे सचिव सुनील शिंदे यांनी तर आभार सौ वाघ मॅडम यांनी मांडले.

गौरव डेंगळे/नवी दिल्ली/१७/१/२०२५ भारतीय महिला खो खो संघाने उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशचा धुव्वा उडवला.यासह भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.भारताचं वर्ल्डकप जेतेपद फक्त दोन विजय दूर आहे. भारताने चौथ्या सामन्यात १०० गुणांचा आकडा पार केला आहे. भारताचा उपांत्य फेरीत सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे.भारतीय महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत जबरदस्त खेळी केली. भारतीय कर्णधार प्रियांका इंगळे हीने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम अटॅक करण्याचा निर्णय केला.पहिल्या डावात भारताने एकही ड्रीम रन दिला नाही.त्यामुळे पहिल्या डावात भारताने ५०-० अशी आघाडी मिळवली होती.ही आघाडी कमी करण्याचं मोठं आव्हान बांगलादेशपुढे होतं.पण बांगलादेशने हा फरक कमी करण्याऐवजी ६ ड्रिम पॉईंट्स दिले.तर अटॅक करताना फक्त ८ गुण मिळवले.म्हणजेच दुसऱ्या डावात बांगलादेशकडे फक्त २ गुण होते.तर भारताकडे ४८ गुणांची आघाडी होती.तिसऱ्या डावात अटॅक करताना भारताने आक्रमक अटॅक केला.एका पाठोपाठ एक बॅच तंबूत पाठवत होते.त्यामुळे भारताच्या पारड्यात एका पाठोपाठ एक गुण मिळत होते. तिसऱ्या डावात भारताकडे १०६ गुण होते. त्यामुळे तिसऱ्या डावातच भारताचा विजय पक्का झाला होता. कारण ९८ धावांची आघाडी भारताकडे होती. त्यामुळे चौथ्या डावात अटॅक करून ९८ धावांचा फरक कमी करणं कठीण होतं.त्यात भारताने चौथ्या डावातही ड्रीम रनही मिळवला.भारताने हा सामना १०९-१६ गुणांनी जिंकला.


उपांत्यपूर्व फेरीचे निकाल:

पहिला उपांत्यपूर्व सामना: युगांडाचा न्यूझीलंडवर ७१-२६ ने विजय. 

दुसरा उपांत्यपूर्व सामना: दक्षिण आफ्रिकेचा केनियावर ५१-४६ ने विजय. 

तिसरा उपांत्यपूर्व सामना: नेपाळचा इराणवर १०३-०८ ने विजय. 

चौथा उपांत्यपूर्व सामना: भारताचा बांगलादेशवर १०९-१६ ने विजय.

बेलापूरःबेलापूर बु ग्रामंचायतीच्या उपसरपंच पदावर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील तसेच जि.प.सदस्य शरद नवले व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या नेतृत्वाखालील गावकरी मंडळाच्या सौ.प्रियंका प्रभात(केशव) कु-हे यांची बिनविरोध निवड झाली.                                  उपसरपंच पदासाठी सरपंच स्वाती अमोलिक यांचे अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक संपन्न झाली.बैठकीस मावळत्या उपसरपंच तबसुम बागवान ,अभिषेक खंडागळे,मुश्ताक शेख,चंद्रकांत नवले,उज्वला कुताळ,सुशिलाबाई पवार, मीना साळवी, शिलाताई पोळ,वैभव कु-हे,भरत साळुंके,रमेश अमोलिक आदी सदस्य उपस्थित होते.निर्धारित वेळेत सौ.प्रियका कु-हे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची उपसरपंच पदावर बिनविरोध निवड झाल्याचे ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे यांनी जाहीर केले.    निवडीनंतर आभाराच्या सभेत शरद नवले,अभिषेक खंडागळे,जालिंदर कुऱ्हे,भास्करराव खंडागळे,विष्णुपंत डावरे, भाऊसाहेब कुताळ आदिंची भाषणे झाली.याप्रसंगी जालिंदर कु-हे,भाऊसाहेब कुताळ,प्रफुल्ल डावरे,बाळासाहेब दाणी,सुरेश बाबुराव कुऱ्हे,रावसाहेब अमोलिक,सचिन वाघ, रमेश काळे,भाऊसाहेब तेलोरे,अजिज शेख, जब्बार पठाण,अशोक कुऱ्हे,विष्णूपंत कुऱ्हे,शफिक बागवान,बाबुलाल पठाण,प्रशांत मुंडलिक, मास्तर हुडे, हेमंत मुथा,योगेश राकेचा,बाबुराव पवार,महेश कु-हे,विशाल आंबेकर,दादासाहेब कुताळ,रफिक शेख,शशिकांत तेलोरे, सुभाष शेलार,अशोक आंबिलवादे,बाळासाहेब शेलार,पञकार देविदास देसाई,दिलिप दायमा,सोमनाथ शिरसाठ,अभिषेक निर्मळ, नितीन खोसे, प्रकाश साळुंके, राम कुऱ्हे,कान्हा लगे,ग्रामस्थ तसेच यांचेसह गावकरी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बेलापूरःगावाच्या विकासासाठी मतभेद विसरुन सर्वांनी एकञ यावे.विरोधासाठी विरोध न करता विधायक कामाला पाठींबा तर चुकीची कामे होत असतील तर त्याला विरोध केला गेला पाहिजे असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले यांनी व्यक्त केले.                              ---बेलापूर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने बेलापूर प्रेस क्लबच्या सदस्यांसह अन्य पञकारांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी श्री.नवले बोलत होते.यावेळी राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार मिळाल्याबद्दल नवनाथ कुताळ तसेच भास्कर खंडागळे ,रणजीत श्रीगोड,मारुतराव राशिनकर,सुनिल मुथा,विष्णुपंत डावरे,ज्ञानेश गव्हले,देविदास देसाई,सुनिल नवले,दिलिप दायमा,सुहास शेलार,शरद पुजारी,रुपेश सिकची,आतिष देसर्डा यांचेसह अभिजीत राका,गणेश साळुंके आदिंचा सत्कार करण्यात आला.                            ---याप्रसंगी पं.समितीचे माजी सभापती दत्ता कु-हे,भास्कर खंडागळे,सुनील मुथा,नवनाथ कुताळ,मारुतराव राशिनकर,ज्ञानेश्वर गव्हले,लहानुभाऊ नागले यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास पंडीतराव बोंबले,प्रकाश पा.नाईक,विश्वनाथ गवते,चंद्रकांत नाईक,तुकाराम मेहेञे, बाळासाहेब दुधाळ,कलेश सातभाई,सुधाकर खंडागळे,प्रकाश कु-हे ,बाळासाहेब लगे,बंटी शेलार,सुरेश कु-हे,शफिक आतार,संजय शेलार,रमेश अमोलिक ,अशोक प्रधान,अन्तोन अमोलिक,रमेश शेलार, आयजुभाई शेख,  आदि उपस्थित होते.

गौरव डेंगळे (नवी दिल्ली) १३/१/२०२५ खो खो विश्वचषक २०२५ मध्ये उद्घाटन सामना भारत विरुद्ध नेपाळ सामना नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर पार पडला.खो खो वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने विजयी सलामी दिली.भारताचा पहिलाच सामना नेपाळशी रंगला होता.या सामन्यात भारताने पहिल्या डावातच मोठी आघाडी घेतली होती.भारताला अटॅक करण्याची संधी मिळाली होती.भारताने पहिल्या डावात २४ गुण मिळवले.त्यानंतर दुसऱ्या डावात जेव्हा नेपाळ संघ अटॅक करण्यासाठी आला. तेव्हा भारताने जबरदस्त पद्धतीने झुंजवलं. नेपाळने आपल्या डावात २० जणांना बाद करण्यात यश मिळवलं. पण भारताने ४ गुणांची आघाडी घेतली होती. मात्र तिसऱ्या डावात बचावत्मक पवित्र्यात असलेल्या नेपाळने कमबॅक केलं. टीम इंडियाला फक्त १८ जणांना बाद करता आलं.तर नेपाळला चांगल्या डिफेंससाठी एक गुण मिळाला. तिसऱ्या डावानंतर भारताकडे २१ गुण होते. नेपाळला हा सामना जिंकायचा तर २२ जणांना बाद करणं आवश्यक होतं. पण चौथ्या डावात टीम इंडियाचे खेळाडू भारी पडले. दुसऱ्या बॅचने नेपाळला चांगलंच झुंजवलं. त्यामुळे एकीकडे वेळ कापरासारखा उडत होता. दुसरीकडे नेपाळचे खेळाडू एक एक खेळाडू बाद करण्यासाठी प्रयत्न करत होता. अखेर नेपाळला फक्त १६ गुण मिळता आले. एकूण भारताचे ४२ आणि नेपाळचे ३७ गुण होते.भारताने हा सामना पाच गुणांनी जिंकला.भारताच्या शिव पोथीर रेड्डी याला बेस्ट अटॅकिंगसाठी पुरस्कार देण्यात आला. तर नेपाळच्या रोहितकुमार वर्माला सर्वोत्तम डिफेंसाठी सामन्यानंतर गौरविण्यात आलं आहे. या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला आदित्य गणपुले याने.. त्याला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार होता. पण व्हिसाच्या समस्येमुळे पाकिस्तान संघ भारतात पोहोचू शकला नाही. त्यामुळे भारताचा सामना नेपाळसोबत आयोजित केला गेला. अ गटात नेपाळ, पेरू, ब्राझील आणि भूतान भारतासोबत असून प्रत्येकी एक सामना खेळतील. उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी अव्वल दोन स्थान मिळवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget