Latest Post

बेलापूर*(प्रतिनिधी)-वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथे कार्यरत असणारे राजेंद्र सखाराम कासोदे यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली असून त्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे राजेंद्र कासोदे  हे मूळचे आगर वाडगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथील रहिवासी असून सन 1990 मध्ये ते छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस भरती झाले होते सन 1990 ते 1993 त्यांनी पोलीस मुख्यालय येथे सेवा केली त्यानंतर सन 1993 ला एस आय डी मुंबई यांचे मार्फत बॉम्बशोधक पथकात काम केले 1997 ला महामार्ग रस्ता सुरक्षा पथक ट्रॅफिक मध्ये सेवा केली 2000 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा कार्यालयामध्ये सेवा केली 2004 ते 2009 ग्रामीण ट्रॅफिक पोलीस म्हणून सेवा केली 2009 ते 2014 छत्रपती संभाजीनगर येथे बॉम्बशोधक पथकात सेवा केली 2014 ते 2021पोलीस स्टेशन विरगाव येथे सेवा केली 2021 ते 2024 त्यांनी पोलीस स्टेशन वैजापूर येथे काम केले त्यांना  नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली असून आपल्या समाजाच्या दृष्टीने ही एक आनंदाची बाब आहे त्यांच्या हातून अशी सेवा घडो सदिच्छा अनेक नियुक्ती केली कासोदे यांना मिळालेल्या बढतीबद्दल अनेकांनी त्यांच्या अभिनंदन केले आहे

बेलापूर (प्रतिनिधी)-शासनाने हॉटेलमधून प्लॅस्टिकच्या कपामध्ये चहा देण्यावर बंदी घातलेली असताना बेलापूर गाव व परिसरात सर्व हॉटेलमध्ये सर्रासपणे नियमाचे उल्लंघन करून प्लास्टिक कप मध्ये चहा दिला असून हा प्रकार म्हणजे ग्राहकांच्या आरोग्याची खेळण्याचाच प्रकार असून बेलापूर ग्रामपंचायत ने याबाबत तातडीने दखल घ्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे    बेलापूर गाव व परिसरात अनेक हॉटेल्स असून या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या नावाने दर्जेदार चहाची विक्री केली जात आहे बेलापूर गावात चहा पिणारे अनेक शौकीन देखील आहेत या चहा शौकिनांची हाऊस पुरवण्याकरता चहा विक्रेत्यांनी वेगवेगळ्या नावाने इतरांपेक्षा आपण कसा दर्जेदार चहा ग्राहकांना देऊ या करता प्रत्येक जण प्रयत्नशील आहे परंतु ही विक्री करताना चहा पिण्यासाठी वापरण्यात येणारे कपबशी, काचेचे ग्लास हे धुण्याचा त्रास होऊ नये म्हणून वापरा आणि फेका अशा प्रकारचे प्लास्टिकचे कप वापरले जात होते परंतु हे कप चहा पिणाराच्या आरोग्यास घातक असल्यामुळे शासनाने या प्लास्टिक कप वर बंदी आणलेली आहे असे असतानाही बेलापुरातील सर्व हॉटेल्स वर ग्राहकांना या प्लॅस्टिकच्या कप मधूनच चहा दिला जात असून प्रशासनाने याबाबत दखल घ्यावी व हॉटेल व्यवसायिकांना प्लॅस्टिकचे कप वापरण्यावर बंदी घालावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे

बेलापूर प्रतिनिधी: अंधश्रद्धेमुळे समाजाचे शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान होत असल्यामुळे सर्वांनी अंधश्रद्धेपासून दूर राहावे, श्रद्धा ठेवा, परंतु अंधश्रद्धा, अंधविश्वास ठेवू नका असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते देविदास देसाई यांनी केले.              

बेलापूर खुर्द येथील श्री हरिहर केशव गोविंद भगवान बन येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व रयत शिक्षण संस्थेचे रावबहादूर नारायणराव बोरावके कॉलेज ,श्रीरामपूर आणि स्वामी सहजानंद भारती कॉलेज ऑफ एज्युकेशन श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष संस्कार शिबिर सन 2024- 25 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबिरार्थी समोर मार्गदर्शन करताना ते  प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 

शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना देविदास देसाई पुढे म्हणाले की श्रद्धा असावी‌. पण ती डोळस असावी. आज समाजात देवाधर्माच्या नावाखाली खुलेआम फसवणूक केली जात आहे. अंगात येणे हा एक मानसिक आजार असून अशा आजारी व्यक्तींना त्वरित मानसोपचार तज्ञाकडे नेणे आवश्यक आहे. भूत, भानामती, करणी करण्याच्या नावाखाली आज मोठ्या प्रमाणात आर्थिक  फसवणूक केली जात आहे. यातून समाजाची फार मोठी हानी होते. कुणालाही जादूटोणा तंत्र मंत्र करता येत नाही. असे जर  असते तर आपण आपल्या देशाच्या सीमेवरील सैन्य हटवून हे तंत्र मंत्र करणारे बुवा बाबा यांनाच सीमेवर बसवून मंत्र मारून समोरील शत्रूसैनिक मारण्यास सांगितले असते. परंतु तसे काही होत नाही. त्यामुळे कुणीही तंत्र मंत्र विद्या वशीकरण यास घाबरून जाऊ नये. आपल्या साधूसंतांनी देखील अंधश्रद्धेवर कडाडून टीका केलेली आहे. सोळाव्या शतकात संत तुकाराम महाराजांनी नवसे करणे कन्यारत्न होती, तरी का करणे लागे पती असे सांगितलेले असतानाही आजही मुलं होण्याकरता नवस केले जातात हे दुर्दैव आहे. आज गुप्तधनाच्या लालसेपोटी नरबळी दिल्याच्याही घटना घडत आहेत. माणूस  मंगळ ग्रहावर वस्ती करण्याच्या प्रयत्नात असतानाच गुप्तधनाच्या लालसे पोटी लहान बालकांचे बळी दिले जात आहेत हे दुर्दैवच म्हणावे लागेल. माता पित्याची जिवंतपणीच सेवा करा. भविष्य हे थोतांड असून त्यावर विश्वास ठेवू नका. आपल्या मनगटावर विश्वास ठेवून काम करा यश आपोआपच मिळेल. भविष्य म्हणजे ठराविक ठोकताळे  असतात असे ते म्हणाले. त्यावेळी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत असताना पकडलेल्या भोंदू बाबाचे अनेक किस्से विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांनीही त्यास टाळ्याच्या गजरात भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. जलाल पटेल  यांनी करून दिला. अध्यक्षिय मनोगत डॉ. योगिता रांधवणे यांनी व्यक्त केले. त्यातून त्यांनी अंधश्रद्धेच्या विचारापासून सर्वांना दूर राहण्याचे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाधिकारी डॉ. बाबासाहेब तोंडे, प्रा. डॉ. किरण थोरात, प्रा. कीर्ती अमोलिक, डॉ. चेतना जाधव, प्रा. वैशाली वाघ, प्रा. समीना शेख, प्रा. प्रतिभा गाडे आदीसह विद्यार्थी विद्यार्थिनी व नागरिक उपस्थित होते. शेवटी प्राध्यापक डॉक्टर भागवत शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले

खंडाळा (गौरव डेंगळे) : खंडाळा येथील चित्तरंजन येथे गट नंबर ५३,५४,५५  शॉर्टसर्किटमुळे रविवार (दि.५ जानेवारी) लागलेल्या आगीत ८ ते १० एकर ऊस खाक झाल्याने शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.या शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.

खंडाळा येथे रविवारी दुपारी १:०० वाजेच्या सुमारास विजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे ऊस पिकाला आग लागली. यामध्ये शेतकरी नवनाथ गंगाधर ढोकचौळे, रावसाहेब रंगनाथ ढोकचौळे, बबन किसन ढोकचौळे, सागर शंकर सदाफळ या शेतकर्‍यांच्या शेतातील ऊस व ठिबक सिंचन जळून गेला.या सर्वांची शेती एकमेकाला लागून असून,या सर्वच ८ ते १० एकरामधील क्षेत्रावर उसाचे पीक होते. या ठिकाणी अचानक वीजवाहक तारांमध्ये घर्षण होत उसाला आग लागली. यावेळी प्रवारा कारखान्याचा अग्निशमन बंब बोलावला गेला होता. पण आटोक्यात काय आग आली नाही.गावातील १०० ते २०० युवकांनी देखील आज आग विजवायचा प्रयत्न केला. यावेळी कामगार तलाठी पवार भाऊसाहेब व त्यांचे सहकारी दिलीप रंधे यांनी घटनास्थळी येऊन जळीताचा पंचनामा केला.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे): नुकत्याच सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने ५० वी कुमार व कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये आझाद क्रीडा मंडळचा खेळाडू जयंत बाळासाहेब काळे याची महाराष्ट्र राज्याच्या संघामध्ये निवड झाली आहे.

उत्तराखंड येथे होणार अमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने उत्तराखंड कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने

५० वी कुमार-कुमारी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये जयंत काळे महाराष्ट्र संघामध्ये आपल्या खेळाची चमक दाखवणार आहे.सांगली येथे झालेल्या स्पर्धेमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. गेली २ ते ३ वर्षापासून तो टाकळीभान येथील आझाद क्रीडा मंडळ या ठिकाणी कबड्डीचा सराव करत आहे. जयंत हा वाकडी येथील प्रगतशील शेतकरी श्री हरिभाऊ विठ्ठल काळे यांचा नातू व बाळासाहेब हरिभाऊ काळे यांचा चिरंजीव आहे.कबड्डी खेळाचे तज्ञ प्रशिक्षक रवींद्र गाढे यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.निवड झाल्याबद्दल त्याचे व्यवस्थापक अक्षय थोरात व सर्व आझाद क्रीडा मंडळाचे खेळाडू, क्रीडाप्रेमी व टाकळीभान येथील पदाधिकारी त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.

गौरव डेंगळे/दिल्ली ५/१/२०२५: सोमवार दि १३ जानेवारी २०२५ पासून भारताची राजधानी दिल्ली येथे पहिली खो-खो विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे.यामध्ये एकूण २४ संघांनी सहभाग नोंदवला असून यजमान भारतासह अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भूतान, ब्राझील, इंग्लड, जर्मनी, घाना, इंडोनेशिया, इराण, केनिया, मलेशिया, नेपाळ, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, पेरू, पोलंड, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, श्रीलंका, युगांडा आणि अमेरिका एवढे देश सहभागी होत आहेत. 

भारताच्या ग्रामीण भागासह शहरी भागात देखील खो-खो खेळ प्रसिद्ध असून या खेळाचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. आता हा खेळ जागतिक पातळीवर खेळला जाणार असल्याने खो-खो प्रेमींसाठी ही एक पर्वणी असणार आहे. भारताचे पारडे या विश्वकरंडक स्पर्धेत जड वाटत असले तरी शेजारील आशियाई देशांकडून देखील चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. #TheWorldGoesKho हा हॅशटॅग या स्पर्धेसाठी वापरण्यात येत असून नुकतेच शुंभकर म्हणून तेजस आणि तारा यांचे देखील अनावरण झाले आहे.पुरुष आणि महिला यांची एकत्रितपणे होणारी ही स्पर्धा खो-खो खेळाच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरेल यात काही शंका नाही. खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख सुधांशू मित्तल यांनी खो-खो हा खेळ ऑलम्पिक पर्यंत घेऊन जाण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.त्यामुळे या खेळाकडे शाळकरी मुलांसह तरुण वर्ग अजून आकर्षित होईल. भारताचा स्वतःचा असणारा हा खेळ जागतिक स्तरावर खेळला जात असल्याचा आनंद खो-खो प्रेमींमध्ये दिसून येत आहे.

कोपरगांव (गौरव डेंगळे): एकीकडे,तंत्रज्ञानाच्या मॉडेलचे प्रात्यक्षिक जे गणित आणि विज्ञानाच्या ज्ञानावर आधारित जीवन सोपे आणि सुरक्षित बनवते.विज्ञान मॉडेल्स वायू प्रदूषण,वाहतूक समस्या, पावसाचा अभाव,पर्यावरण संरक्षण,इत्यादी समस्यांवर उपायांची आशा निर्माण करत होते.मुली आणि शिक्षकांनी गणित आणि विज्ञान शिकवण्याच्या सोप्या पद्धती, खेळातून शिकणे,सेंद्रिय शेती आणि खते,हिंदी-इंग्रजी व्याकरण डझनभर मॉडेल्सवर चर्चा केली आणि मेळ्यात कारखान्यांमधून निघणारा धूर आणि चौकाचौकांवरील

वाहनांमधून निघणारा धूर कार्बनमुक्त करण्यासाठी,अंमली पदार्थांचे व्यसन आणि डोळ्यांच्या आजारांच्या समस्येला तोंड देण्यासाठी तक्ते तयार करून प्रदर्शित करण्यात आले.सोमैया विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल,कोपरगाव येथे शालेय स्तरावर गणित-विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये ३०० पेक्षा अधिक उपक्रम विद्यार्थ्यांनी तयार केले होते.इयत्ता १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी गणित-विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा संदीप जगझाप व प्रा शेख हे होते. यावेळी शाळेचे प्राचार्य श्री के एल वाकचौरे,उपप्राचार्या सौ शुभांगी अमृतकर, पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे,सौ पल्लवी

ससाणे,सौ नैथलिन फर्नांडिस यांच्यासह गणित व विज्ञान विषयाचे सर्व शिक्षक तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.प्रा जगझाप म्हणाले की, आत्मविश्वास आणि प्रबळ इच्छाशक्ती हा यशाचा मूळ मंत्र आहे.एखाद्या व्यक्तीला अपयशातून यशाचे चांगले मार्ग सापडतात.प्रा शेख यांनी प्रदर्शनात मुलांनी बनवलेल्या विविध प्रकल्पांचे कौतुक केले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget