Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-व्हाँट्सअप गृपच्या माध्यमातून रुग्णाच्या उपचाराकरीता जमा केलेला निधी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते वाघ कुटुंबीयांना देण्यात आला      नेवासा तालुक्यातील दगडू मुरलीधर वाघ हे आजारी पडले आगोदरच मोलमजुरी करुन गुजराण करणाऱ्या वाघ कुटुंबीयावर जणू आभाळच कोसळले त्यांचा मुलगा प्रशांत याने वडीलास प्रवरानगर येथील दवाखान्यात दाखल केले त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले परंतु सततच्या आजारपणामुळे वाघ कुटुंबीय पुर्णतः हवालदिल झाले होते घरातील कर्त्या माणसाचा दवाखान्याचा खर्च कसा भागवावा हीच चिंता वाघ कुटुंबीयांना पडली होती ही बाब बेलापुर येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार  देविदास देसाई  यांना समजली त्यांनी तातडीने प्रशांत मुरलीधर वाघ याचा फोन पे नंबर देवुन एक हात मदतीचा म्हणून आपण यथा योग्य गरीब कुटुंबाला मदत करावी असे अवाहन केले त्यांच्या अवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी सढळ हाताने मदत केली दुर्दैवाने दगडू वाघ यांचे उपचार सुरु असतानाच निधन झाले त्यांचे निधन झाल्याचे समजल्यावरही अनेकांनी त्या कुटुंबाला एक हात मदतीचा देण्याच्या उद्देशाने मदतनिधी पाठविला हा निधी कै .दगडू वाघ यांच्या दशक्रिया विधीच्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते देविदास देसाई यांनी जमा झालेला निधी नेवासा तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते कै दगडू वाघ यांच्या पत्नी मिनाताई वाघ यांच्याकडे सूपुर्त केला राबविलेला स्तूत्य उपक्रम पाहुन माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी देखील आपली वैयक्तिक मदत दिली तसेच असे सामाजिक उपक्रम सर्वत्र राबविण्याची गरज आहे आपल्या छोट्याशा मदतीमुळे एखाद्याचा जिवा वाचु शकतो एखाद्या कुटुंबाला आधार मिळु शकतो असे सांगून या उपक्रमाचे कौतुक केले

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-आपल्या विविध मागण्या संदर्भात महसुल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले असुन या आंदोलनामुळे महसुलचे कामकाज ठप्प झाले आहे त्याचा त्रास सर्व सामान्याना होत आहे .                                   महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेच्या वतीने महसुल विभागाचा सुधारित आकृतीबंध दांगट समीतीच्या अहवालातील शिफारशीप्रमाणे कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात लागु न करता करावा .अव्वल कारकुन ,मंडलअधिकारी संवर्गातुन नायब तहसीलदार संवर्गात तात्काळ पदोन्नती देवुन आदेश निर्गमीत करावेत महसुल विभागाचा आकृतीबंध तात्काळ मंजुर करुन पुरवठा  विभागाच्या पद भरतीमुळे रिक्त होणारे महसुल कर्मचारी यांना महसुल सेवेत सामावुन घ्यावे वेतन देयके उणे प्राधिकारपत्रावर काढण्याबाबत तात्काळ शासन निर्णय निर्गमीत करण्यात यावा ,महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांची अधिसुचना दिनांक ३/२/२०२३ नुसार तात्काळ अव्वल कारकुन यांचे वेतन निश्चित करण्यात यावे ,महसुल सहाय्यकाचा ग्रेडपे १९०० वरुन२४०० करण्यात यावा महसुल सहाय्यकाची सेवा जेष्ठता यादी केवळ महाराष्ट्र महसुल अर्हता परीक्षा नियम १९९९ मधील तरतुदीनुसार तयार करण्यात यवी आदिसह अनेक मागण्या करीता हे आंदोलन सुरु करण्यात आले होते पहील्या दिवशी काळ्या फिती लावुन कामकाज करण्यात आले त्यानंतर दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत निदर्शने नंतर लेखणी बंद आंदोलन व आता काम बंद आंदोलन सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जिवन आहेर सरचिटणीस किशोर हटकर कार्याध्यक्ष लक्ष्मण नरमवारे संघटक चंदु प्रधान समन्वयक राजु धाडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर कर्मचारी संघटनेने आंदोलन सुरु केलेले आहे.या आंदोलनात ऐ एस ऐडके एन ई मंडलीक ऐ आर पुंड एस एस गायकवाड एस आर खाडे एस डी आल्हाट राजु निकाळे आर डी शेले ऐ डी रणनवरे एस एस देसाई डी एस आमले ऐ एस राजवाळ एम जी नाईक मिलींद नवगीरे एस वाय चंदन एम एस खरपुडे आदिसह महसुल कर्मचारी सहभागी झाले आहेत.

कोपरगाव (गौरव डेंगळे):श्री ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराज भक्त मंडळाच्या वतीने प्रभात फेरी आयोजन आषाढी एकादशी निमित्त गुरुवार दिनांक १७ जुलै रोजी प्रभात फेरी उत्साहात संपन्न झाली.सकाळी ६:०० वा धारणगाव रोड शुभमनगर येथून ते आनंदनगरच्या महादेव मंदिरापर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली. महादेव मंदिरामध्ये महाआरतीचा आयोजन करण्यात आले होते. प्रभात फेरीमध्ये एकच गजर होता श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा.प्रभात फेरीमध्ये २५ ते ३० माता बहिणींसह 

बालगोपाळही सहभागी झाले होते.मागील दोन वर्षापासून एकादशीच्या दिवशी प्रभात फेरीच्या आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान प्रभात फेरीच्या सांगतेवेळी प्रभात फेरीच्या आयोजिका भागवताचार्य ह भ प रेखाताई गायकवाड यांनी सांगितले आज दुग्ध शर्करा योग आहे.श्रीक्षेत्र मुळेगाव थडी पासून श्री संत जनार्दन स्वामी महाराज समाधी स्थळापर्यंत पायी दिंडी सोहळा परमपूज्य स्वामी कैलास आनंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाने होत असतो ही दिंडी गोंदवले कर्मा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रांगणात भेट देऊन महाप्रसाद घेऊन दिंडी समाधी स्थळाकडे स्थानपन्न झाली याला दुग्ध शर्करा योग म्हणतात असे त्यांनी सांगितले.

मानवता संदेश फाउंडेशन तर्फे वृक्षारोपण संपन्न

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - आजच्या वातावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि भविष्यातील वातावरणाचा विचार करता वृक्षारोपणाची चळवळ ही लोक चळवळ होण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी काम करणे आवश्यक आहे .वृक्षारोपणासाठी सर्व प्रकारची मदत आपण करू. आज जे वृक्षारोपण होत आहे त्यासाठी जाळ्या सुद्धा उपलब्ध करून देऊ .मानवता संदेश फाउंडेशनने हाती घेतलेले कार्य खरोखर मानवतेसाठी उपयुक्त आहे .सलीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरांमध्ये विविध प्रकारचे सामाजिक काम उत्कृष्टपणे सुरू आहे. त्यांच्या या कार्याला माझे नेहमी सहकार्य राहील असे प्रतिपादन तालुक्याचे आमदार लहुजी कानडे यांनी केले.


मिल्लत नगर भागात मानवता संदेश फाउंडेशन व जॉगिंग ट्रॅक कमिटी तर्फे कॅनल साईडला मानवता संदेश फाउंडेशनचे समन्वयक पत्रकार सलीमखान पठाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम आमदार कानडे,माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक,युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर,श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक अशोक उपाध्ये,

अहमदभाई जहागीरदार, साजिद मिर्झा, जोएफ जमादार यांच्या हस्ते पार पडला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कानडे बोलत होते.

मिल्लत नगर परिसरातील ज्या काही समस्या आहेत त्या सर्व लवकरच आपण सोडवू त्यासाठी नगरपालिकेत सर्व विभागांची बैठक बोलावून सर्व समस्या मार्गी लावू.शहरांमध्ये आपण जे काही काम केले आहे ते आपल्यासमोर आहे. जनतेने मला लोकप्रतिनिधी केल्यामुळे जनतेची कामे करण्याचा मी प्रयत्न केला असे ही ते म्हणाले.

युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे यांनी देखील या उपक्रमाचे स्वागत करून संयोजकांचे अभिनंदन केले.श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक उपाध्ये यांनी आपल्या भाषणामध्ये सलीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरांमध्ये आम्ही सर्वजण काम करीत असून सामाजिक वातावरण निकोप ठेवण्यासाठी त्यांचे मोलाची योगदान आहे. वृक्षारोपण करणे हे एक पुण्याचे काम आहे. हे काम सर्वांनीच पुढे नेण्याची आवश्यकता आहे असे सांगितले. शेवटी ॲडवोकेट समीन बागवान यांनी आभार मानले.

यावेळी विविध प्रकारच्या साठ वृक्षांचे रोपण करण्यात आले.

आमदार कानडे, अनुराधाताई आदिक, सचिन गुजर,सिद्धार्थ मुरकुटे,अशोक उपाध्ये, अहमद जागीरदार, आयाज तांबोळी, साजिद मिर्झा,तौफिक शेख,सुनील साळवे, , सतीश म्हसे,नगरसेवक मुक्तार शाह, कलीम कुरेशी,पत्रकार लाल मोहम्मद जागीरदार, रज्जाक पठाण,डॉ. सलीम शेख,तौफिक शेख, मुख्तार मणियार, मेहबूब प्यारे,अश्फाक शेख, महबूबअली शाह, जोएब जमादार, मुश्ताक शेख, शन्नू दारूवाला,

शौकत शेख,आदित्य आदिक,नियाज शेख,अवि पोहेकर,सैफ शेख,हबीब तांबोळी,

फिरोज पठाण,असलम सय्यद,कलीम रॉयल शेख,वसीम जहागीरदार,

साजिद शेख, अनवर टेलर, डॉ.अदनान मुसाणी,अझहर शेख, अश्फाक शेख,नंदकुमार आरोटे, गोसावी, सलाउद्दीन शेख,शंकर गायकवाड, सरवरअली मास्टर,जाकीर पटेल,असलम बिनसाद, एस के खान,शाहिद शेख,हाजी इमाम सय्यद, एडवोकेट मोहसीन शेख, एडवोकेट समीन बागवान,दीपक कदम, भैय्या शाह,समीरखान पठाण,समीर शेख,

फारुख पटेल,कामरान पठाण,शोएब पठाण, अमन पठाण,नजीरभाई शेख,किशोर त्रिभुवन, प्रदीप दळवी,सचिन शिंदे, शरद नागरगोजे,

शाहीन शेख,खालिद मोमीन,शादाब शेख, तनवीर शेख,हबीब तांबोळी,बिया शेख, सज्जाद नवाब आदींच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.

प्रस्ताविक सलीमखान पठाण यांनी केले.

शेवटी एडवोकेट समीन बागवान यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नजीरभाई शेख,तनवीर शेख, डॉक्टर सलीम शेख, खालीद मोमीन,एस के खान आदींनी विशेष परिश्रम घेतले.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे):आषाढी एकादशी म्हटलं म्हणजे आपल्याला आठवतो ते पंढरपूर,पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी अनेक दिंड्या मधील अनेक वारकरी पायी चालत पंढरपूरच्या दिशेने जाऊन विठुरायाचे दर्शन घेतात.वारी म्हटलं म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी संस्कृती आणि त्याबरोबरच संतपरंपरा,अनेक संत महंताच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, महाराष्ट्र भूमीमध्ये वारकऱ्यांची दिंडी परंपरा ही अविरत चालू आहे.या परंपरेचाच एक भाग म्हणून श्रीरामपूर मधील न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये देखील दिंडीचे आयोजन दरवर्षी प्रमाणे  करण्यात आले होते.या दिंडीमध्ये शाळेतील सर्व मुलांनी अगदी आनंदाने भाग घेतला.कार्यक्रमाची सुरुवात गणपती बाप्पा आणि विठुरायाच्या आरतीने झाली. त्यानंतर वारकरी परंपरेवर अनेक विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर सुंदर अशा अभंगाच्या जल्लोषामध्ये इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. त्यानंतर दिंडीची सुरुवात सुरुवात झाली दिंडी कर्मवीर भाऊराव पाटील चौक या ठिकाणाहून रामराव अधिक पुतळ्याजवळ असणाऱ्या पटांगणामध्ये गेली. त्या ठिकाणी मुलांनी फुगडी खेळून दिंडीचा आनंद घेतला त्या ठिकाणाहून दिंडी परत शाळेत आली.या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सचिव जन्मजय टेकावडे,प्राचार्य घोगरे,शाळेची शिक्षक वृंद उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ज्येष्ठ शिक्षिका चव्हाण,नरोटे तसेच इतर शिक्षक वृंदांनी अथक परिश्रम घेतले.

बेलापुर (प्रतिनिधी  )-भंगारवाल्याकडून खरेदी केलेल्या संशयास्पद तांब्याच्या तारा पुणे येथे घेऊन जाणारी दोन वाहने श्रीरामपूर पोलिसांनी अर्थपूर्ण तडजोड करून सोडून दिल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील मुथा यांनी केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना सुनील मुथा यांनी सांगितले की रविवारी रात्री श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजस्थान व श्रीरामपूर पासिंगच्या दोन वाहनातून  संशयास्पद तांब्याचा तारा पुणे येथे घेऊन  जात असल्याची खबर श्रीरामपूर पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याला मिळाली. त्याने काही कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन सदरची वाहने बेलापूर येथील नगर बायपासला पाठलाग करून पकडली. चालकांची कसून चौकशी केली असता ते दिल्लीचे रहिवासी असून सध्या श्रीरामपूर येथील वॉर्ड नंबर दोन मध्ये राहत असल्याचे समजले तसेच त्यांच्याकडे सदर मालाची कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याचे उघड झाले. ही चौकशी चालू असतानाच श्रीरामपूर येथील वॉर्ड नंबर दोन मधून काहीजण बेलापूर पोलीस स्टेशनला दाखल झाले. त्यातील तीन जणांनी पोलिसांशी घासाघीस करून काही लाखांची यशस्वी तडजोड केली. त्यानंतर रात्री दीड वाजता कोणतीही नोंद न घेता दोन्ही वाहने सोडून देण्यात आली. सदर वाहने पकडून पोलीस स्टेशनला आणल्याचे सीसीटीव्ही मध्ये बंदिस्त झाले आहे. अशा तऱ्हेने रक्षकच चोरभामट्यांचे हितचिंतक बनत असतील तर हा अतिशय गंभीर प्रकार आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून आर्थिक तडजोड करणारा अधिकारी, त्याचा रायटर, सदर प्रकरणातील  इतर कर्मचारी कोण होतेयाची सखोल चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी मुथा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी संविधान बचाव समिती श्रीरामपुर, तसेच समस्त मुस्लीम समाज श्रीरामपुर यांच्यावतीने  दि. १४/०७/२०२४ रोजी दुपारी विशालगड जि.कोल्हापुर याठिकाणी अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली समाज कंटकाच्या जमावाने तेथील नागरिकांच्या घरावर तलवारी, काठ्या, कोयते असली घातक शस्त्र घेऊन विशिष्ट समाजातील लोकांच्या घराची मोडतोड केली व वाहनांची जाळपोळ केली. धार्मिक स्थळांची विटंबना केली. तसेच महिला व लहान मुले, वृध्द महिला, व पुरुषही या हल्ल्यातुन सुटलेले नाही. त्यांना सुध्दा जबरदस्त मारहाण करण्यात आल्याचे आपण सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिले आहे

अशी तीव्र भावना समाजातील नागरिकांनी  व्यक्त केली

सदरचा कायदा हातात घेऊन नागरी वस्तीवर हल्ले करुन नागरीकांमध्ये दहशत निर्माण करण्या-या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा जाहिर निषेध करत  या सर्व लोकांवर कोणीत्याही व कुठलाही पदाधिका-याच्या पदाचा मुलाहिजा न ठेवता कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी चे निवेदन तहसीलदार मिलिंद वाघ यांना देण्यात आले याप्रसंगी श्रीरामपूर मुस्लिम समाजातील जेष्ठ व प्रतिष्ठित नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget