Latest Post

श्रीरामपूर-अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून प्रस्तावित श्रीरामपूर जिल्हा करण्याची मागणी अंतिम टप्प्यात असताना त्या मागणीला सुरुंग लावून जिल्ह्याचे मुख्यालय शिर्डी येथे नेण्याचा घाट पालकमंत्र्यांनी घातला असून आगामी काळात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी 70 कोटी रुपयांची तरतूद मंजूर करून घेऊन सदरचे कार्यालयाची इमारत शिर्डीमध्ये बांधण्यासाठी शेती महामंडळाची जागा महसूल खाते अंतर्गत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न देखील झाला आहे. त्यामुळे श्रीरामपूर जिल्हा होण्याचे स्वप्न धुळीस मिळणार आहे. याबाबत श्रीरामपूर तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींनी जागरूक होऊन या प्रश्नी आवाज उठवावा व शेती महामंडळाची जागा श्रीरामपूर परिसरात देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने सदरचे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय श्रीरामपूरात होण्यासाठी प्रयत्न करावे व त्यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारावे अशी मागणी श्रीरामपूर जिल्हा प्रेमी नागरिकांनी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी विकास आराखड्याची घोषणा करतांना शिर्डीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीसाठी शेती महामंडळाची जागा उपलब्ध करण्यात आली असून त्यासाठी 70 कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे सुतोवाच केले. सदरची बातमी प्रसार माध्यमातून प्रसारित होताच श्रीरामपूर जिल्हा प्रेमींमध्ये एकच खळबळ निर्माण होऊन तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

 1991 साली सोनई येथे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून गेली 32 वर्षे श्रीरामपूर जिल्ह्याचा प्रश्न प्रलंबित आहे. श्रीरामपूर जिल्ह्यासाठी अनेक आंदोलने झाली. शासनाच्या विविध खात्यांनी केलेल्या शिफारशीनुसार जिल्ह्यासाठी श्रीरामपूर हेच ठिकाण योग्य आहे यावर शासन पातळीवर एक मत देखील झाले. मात्र मागील काळामध्ये संगमनेरचे बाळासाहेब थोरात महसूल मंत्री असल्याने त्यांनी श्रीरामपूर जिल्हा होऊ दिला नाही तसेच राधाकृष्ण विखे पाटील देखील गेले अनेक वर्षे मंत्री आहेत. मात्र त्यांनी देखील याबाबत फारसे प्रयत्न केले नाहीत.

श्रीरामपूर तालुक्याचे भूमिपुत्र माजी मंत्री कै.गोविंदराव आदिक व माजी आमदार कै.जयंत ससाणे यांनी श्रीरामपूर जिल्ह्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. आदिक साहेबांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात त्यासाठी आवश्यक त्या सर्व शिफारसी घेऊन जिल्हा विभाजनाच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांची सही देखील घेऊन ठेवली आहे. श्रीरामपूर जिल्हा घोषित होत असतांना विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत मेन रोडवर झालेल्या कार्यक्रम प्रसंगी तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ऐनवेळी उठून मुख्यमंत्र्यांना विनंती केल्याने तो निर्णय घोषित झाला नाही आणि तेव्हापासून श्रीरामपूर जिल्ह्याचे भिजत घोंगडे पडले आहे.

 सध्या श्रीरामपूर तालुक्याला प्रभावी नेतृत्व नसल्यामुळे श्रीरामपूर जिल्ह्याचा हाता तोंडाशी आलेला घास काढून घेण्याचे कारस्थान रचले जात आहे. त्यासाठी श्रीरामपुरातील सर्वपक्षीय नेते मंडळींनी एकत्र येऊन श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी नियोजित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची वास्तू श्रीरामपूर तालुक्यात झाली पाहिजे यासाठी जोरदार आंदोलन करण्याची गरज आहे. श्रीरामपूर परिसरामध्ये शेती महामंडळाची जमीन मोठ्या प्रमाणात आहे. महसूल खात्याच्या अंतर्गत ही बाब येत असल्याने महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील यांना साकडे घालून शिर्डी येथे होऊ घातलेले अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय श्रीरामपुरातच झाले पाहिजे यासाठी वेळप्रसंगी बेमुदत श्रीरामपूर बंद ठेवून आंदोलन करावे अशी भावना सर्वसामान्य श्रीरामपूरकरांनी व्यक्त केली आहे. 

विद्यमान आमदार लहूजी कानडे यांनी याबाबत पुढाकार घेऊन श्रीरामपुरात सर्व पक्षीयांना सोबत घेऊन आंदोलन उभारावे तसेच श्रीरामपूर जिल्हा कृती समितीने देखील यामध्ये आता मागे राहू नये. कारण *अभी नही तो कभी नही* या न्यायाने श्रीरामपूर जिल्ह्याचा अंतिम टप्प्यात आलेला प्रश्न सोडविण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात यावे यासाठी सर्व श्रीरामपूरकर सज्ज आहेत अशा भावना तालुक्यातून व्यक्त होत आहे.


खंडाळा प्रतिनिधी -दि.१४ मे २०२३ पासून मारुती मंदिर, खंडाळा येथे ७ दिवसीय श्रीमद भागवत कथेचे दररोज सायं.७ ते ९ या वेळेत आयोजन करण्यात येणार आहे.यांच कार्यक्रमासंदर्भात आज *भागवताचार्य महंत स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज* (मठाधिपती,श्री क्षेत्र अडबंगनाथ देवस्थान) हस्ते भूमिपूजन व धर्मध्वजाच्या अनावराणाचा कार्यक्रम विधिवत संपन्न झाला.यावेळी मार्गदर्शन करताना महाराज म्हणाले की,जिथे भागवत पारायण होते तिथे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण साक्षात

विराजमान होतात.जो भागवत ग्रंथाचे श्रवण-पठण करतो तो आपल्या वडिलांचे कुळ,आईचे कुळ आणि पत्नीचे कुळ या तीनही कुळांचा उद्धार होतो.ते पुढे म्हणाले की धर्मध्वजाचे महत्त्व म्हणजे साक्षात हनुमानजी या ध्वजावर गावाच्या रक्षणासाठी विराजमान होतात.श्रीमद भागवत कथेने संपूर्ण गावाचे कल्याण होणार आहे म्हणूनच जास्त जास्त संख्येने या कथेचा लाभ घ्यायचा आहे.श्रीमद् भागवत कथेचं आयोजन केल्याबद्दल नगरकर कुटुंबियांचं महाराजांनी अभिनंदन केले तसेच गावकऱ्यांना या कथेचा प्रचार प्रसार जास्त संख्येने करण्याचे आवाहन केले.

🚩🚩 श्रीमदभागवतकथा 🚩🚩

रविवार 🔶दि.१४ ते २१ मे २०२३ 

दररोज संध्याकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत 🔶 

मारुती मंदिर,खंडाळा,श्रीरामपूर 

 🚩🚩🚩

बेलापुर  (प्रतिनिधी )-विश्व प्रेस स्वतंत्रता दिनाचे औचित्य साधुन पिछडा वर्ग आयोग नवी दिल्ली यांच्या वतीने पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नवनाथ कुताळ यांना जाहीर झाला आहे                जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन पिछडा वर्ग आयोग नवी दिल्ली यांच्या वतीने प्रिंट मिडीया व ईलेक्ट्रिक माध्यमातून काम करणाऱ्या पत्रकारांना कलम के सिपाही या पुरस्कार दिले जातात.जागतिक वृत्तपत्र स्वतंत्रता दिनानिमित्त पिछडा वर्ग आयोगाचे चेअरमन जगदीश यादव सचिव रणजित सिंह डाँक्टर भरत झा ,डाँक्टर धर्मपाल भारद्वाज यांनी देशभरातून पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांची कलम के सिपाही हा पुरस्कार जाहीर करण्यात आले त्यात बेलापूरचे पत्रकार नवनाथ कुताळ यांच्यासह देशभरातुन पंकज अग्रवाल संत्येंद्र त्रिपाठी ब्रिजेश शर्मा के डी पाठक ,राकेश कुमार सिंह ,नविन गौतम ,आरती , मनोरंजन कुमार ,ज्ञान प्रकाश,शैलेंद्र पांडे, सुशील गर्ग ,संदीप गुलाटी ,दिपीका जयस्वाल ,राजेश जाँन हरजिंदरसिह महेश देशपांडे ,मिलींद देखणे ,प्रदीप पेंढारे विनायाक लांडे ,ईम्रान शेख ,अनुप चावला आदिंचा समावेश आहे

बेलापुर - (प्रतिनिधी  )-तालुक्यातील बेलापूर येथील वीज उपकेंद्रात असणाऱ्या रोहित्राची क्षमता कमी पडत असल्याने ओव्हरलोड होऊन वारंवार वीज पुरवठा खंडित होण्यामुळे ग्राहक वैतागून गेले आहेत.मात्र आता एका रोहित्राची पाच एमव्हीए एवढी क्षमता वाढवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार असल्याची माहिती उद्योजक जितेंद्र तोरणे यांनी दिली आहे.

      या बाबता माहीती देताना उद्योजक तोरणेयांनी सांगितले की बेलापूर येथे ३३ केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र असून येथे ५ एमव्हीए क्षमतेचे तीन व ३.१५ एमव्हीए क्षमतेचे एक असे एकूण १८.१५ एमव्हीए क्षमतेचे एकूण चार रोहित्र आहेत.या वीज उपकेंद्रातून बेलापूर,ऐनतपूर, बेलापूर खुर्द,नरसाळी,उक्कलगाव, वळदगाव,उंबरगाव,पढेगाव,मालुंजा,लाडगाव,कान्हेगाव आदी गावातील सुमारे दहा हजार पेक्षा जास्त ग्राहकांना वीज पुरवठा होतो.मात्र मागणी जास्त होत असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होणे,बिघाड होणे आदी प्रकार होतात. या प्रकारांमुळे ग्राहक वैतागले असून यातून सुटका करण्याची मागणी वारंवार ग्राहक करीत होते.याबाबत खासदार सदाशिव लोखंडे यांनी २३ फेब्रुवारी २०२३ रोजी उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले होते.त्याची दखल घेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी २९ मार्च रोजी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक यांना कार्यवाहीबाबत अवगत केले.त्यावर त्यांनी नाशिक विभागाचे मुख्य अभियंता पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले असून त्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.हा प्रस्ताव सादर होऊन अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर बेलापूर वीज उपकेंद्रातील रोहित्राची क्षमता वाढून विजेच्या खेळखंडोबाच्या जाचातून ग्राहकांची सुटका होणार आहे.

       दरम्यान याबाबत पाठपुरावा करून कार्यवाही केल्याबाबत जितेंद्र तोरणे व रणजित बनकर यांनी खासदार लोखंडे यांचे आभार मानले आहेत.तोरणे यांनी श्रीरामपूर येथे होणाऱ्या २२० केव्ही वीज केंद्रासाठीही विशेष पाठपुरावा केला आहे.त्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली होती.अनेक वेळा निवेदन देऊनही पाठपुरावा केला होता.

प्रतिनिधी- Dy.s.p. संदीप मिटके यांना शिर्डी शहर परिसरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत खात्रीशिर बातमी मिळाली.  त्याप्रमाणे शिर्डी परिसरात सहा वेगवेगळ्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन  पंचासमक्ष छापा टाकुन 15 पिडीत  महिलांची सुटका करण्यात आली आहे. 11 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपी विरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन येथे प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे . 

 एकाच वेळी हॉटेल एक्झिक्युटिव्ह इन, हॉटेल साई कीर्ती पॅलेस, हॉटेल एस पी,हॉटेल साई शितल, हॉटेल गणेश पॅलेस, हॉटेल साई महाराजा अशा सहा ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापे टाकण्यात आले. या कारवाईमुळे शिर्डी शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. शिर्डी सारख्या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी चालत असलेल्या अनैतिक व्यवसायावर केलेल्या कठोर कारवाईमुळे  साई भक्तांनी आणि शिर्डीकरांनी DySP संदीप मिटके  यांचे  कौतुक केले.

*सदरची कारवाई मा. श्री. बी.जी. शेखर पाटील IG, मा.श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, मा.स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके , PI विलास पुजारी, Pi डोहिफोडे, PI डांगे, Pi चौधरी, pi पाटील, pi इंगळे, Api मानिक चौधरीं API थोरात, psi बोरसे व इतर पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केली.*

बेलापुर  (प्रतिनिधी  )-अवैध व्यवसायामुळे गावाची शांतता धोक्यात आली असुन गावात सुरु असलेले अवैध व्यवसाय मटका गुटखा त्वरीत बंद करण्यात यावा अन्यथा ग्रामस्थासह बेलापुर पोलीस स्टेशन समोर उपोषणास बसण्याचा इशारा बेलापूरचे सरपंच महेंद्र साळवी यांनी दिला आहे .                          या बाबत जिल्हा पोलीस अधिक्षक यांना पाठविलेल्या निवेदनात सरपंच महेंद्र साळवी यांनी पुढे म्हटले आहे की बेलापुरगाव हे सुसंस्कृत गाव असुन गावात सुरु असलेल्या अवैध व्यवसायामुळे गावाची शांतता धोक्यात आलेली आहे आनेक गुन्हेगारांचा वावर गावात वाढला आहे शासनाने वाळू खूली केल्यामुळे वाळू तस्करी करणारे वाळू तस्कर आता अवैध व्यवसायाकडे वळू लागले आहे गावात काही मोठी घटना घडण्या आगोदर हे अवैध व्यवसाय बंद करण्यात यावे असे निवेदन जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन दिले होते त्यामुळे काही काळ हे व्यवसाय बंद राहीले आता पुन्हा काहींनी मध्यस्थी करुन नव्या जोमाने अवैध व्यवसाय सुरु केले असुन अनेक तरुण मुले विद्यार्थी कष्टकरी मजुर अवैध व्यवसायाच्या अहारी जात आहे मटका गुटखा दारु यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत आहे तरी आपण गावातील अवैध व्यवसाय तातडीने बंद करावेत अशी मागणी बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने सरपंच महेंद्र साळवी यांनी केली असुन हे व्यवसाय दोन दिवसात बंद न केल्यास आपण ग्रामस्थासह बेलापुर पोलीस स्टेशन येथे उपोषणास बसु असा इशाराही सरपंच साळवी यांनी दिला आहे या निवेदनाच्या प्रति मा मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री महसुल तथा पालकमंत्री पोलीस महासंचालक जिल्हाधिकारी अहमदनगर अप्पर  पोलीस अधिक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीरामपुर शहर यांना पाठविण्यात आलेल्या आहेत

श्रीरामपूर : हजरत सैलानी बाबा दरगाह श्रीरामपूर यांचा,६४ वा उर्स मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना. १ मे रोजी छोटा मजीद शोला यांचा कार्यक्रम संपन्न झाला. व २ मे २०२३ रोजी प्रसिद्ध कव्वाल रईस अनिस साबरी यांचा पूर्व नियोजित कार्यक्रम होणार होता. मात्र रईस अनिस साबरी यांची आई गेल्या काही दिवसांपासून दिल्ली येथील आपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून. काल त्यांची बायपास सर्जरी झाल्या नंतर, त्यांची प्रकृती खालावल्याने प्रसिद्ध कव्वाल रईस अनिस साबरी यांना श्रीरामपूर येथील हजरत सैलानी बाबा उर्सास येणे शक्य होणार नसल्याने. रईस अनिस साबरी यांनी आपोलो हॉस्पिटलमधून दिलगिरी व्यक्त
करत,आपल्या परिस्थिती संदर्भात व्हिडीओ द्वारे शहर वासीयांची माफी मागितली असून आपल्या टीम सोबत दुसरा कव्वाल पाठवत असल्याचे माहिती व्हिडीओच्या माध्यमातून, आज पहाटे स्वतः दिली आहे. त्यामुळे आज रईस अनिस साबरी यांचा पूर्व नियोजित कार्यक्रम रद्द झाला असून. त्यांच्या ठिकाणी दुस-या कव्वालाच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार असल्याची माहिती. हजरत सैलानी बाबा उर्स कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget