श्रीमद भागवत कथेच्या धर्म ध्वजचे भागवताचार्य महंत स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांच्या हस्ते अनावरण.

खंडाळा प्रतिनिधी -दि.१४ मे २०२३ पासून मारुती मंदिर, खंडाळा येथे ७ दिवसीय श्रीमद भागवत कथेचे दररोज सायं.७ ते ९ या वेळेत आयोजन करण्यात येणार आहे.यांच कार्यक्रमासंदर्भात आज *भागवताचार्य महंत स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज* (मठाधिपती,श्री क्षेत्र अडबंगनाथ देवस्थान) हस्ते भूमिपूजन व धर्मध्वजाच्या अनावराणाचा कार्यक्रम विधिवत संपन्न झाला.यावेळी मार्गदर्शन करताना महाराज म्हणाले की,जिथे भागवत पारायण होते तिथे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण साक्षात

विराजमान होतात.जो भागवत ग्रंथाचे श्रवण-पठण करतो तो आपल्या वडिलांचे कुळ,आईचे कुळ आणि पत्नीचे कुळ या तीनही कुळांचा उद्धार होतो.ते पुढे म्हणाले की धर्मध्वजाचे महत्त्व म्हणजे साक्षात हनुमानजी या ध्वजावर गावाच्या रक्षणासाठी विराजमान होतात.श्रीमद भागवत कथेने संपूर्ण गावाचे कल्याण होणार आहे म्हणूनच जास्त जास्त संख्येने या कथेचा लाभ घ्यायचा आहे.श्रीमद् भागवत कथेचं आयोजन केल्याबद्दल नगरकर कुटुंबियांचं महाराजांनी अभिनंदन केले तसेच गावकऱ्यांना या कथेचा प्रचार प्रसार जास्त संख्येने करण्याचे आवाहन केले.

🚩🚩 श्रीमदभागवतकथा 🚩🚩

रविवार 🔶दि.१४ ते २१ मे २०२३ 

दररोज संध्याकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत 🔶 

मारुती मंदिर,खंडाळा,श्रीरामपूर 

 🚩🚩🚩

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget