Latest Post

बेलापूर (वार्ताहर) येथील नाभिक समाज संघटनेच्या वतीने शहीद भाई वीर कोतवाल यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. वीर भाई कोतवाल चौकात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, रवींद्र खटोड, सुधीर नवले, शरद नवले, भरत साळुंके, चंद्रकांत नाईक, प्रसाद खरात , वैभव कु-हे, पुरुषोत्तम भराटे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.क्रार्यक्रम यशस्वीतेसाठी समाजाचे स्थानिक अध्यक्ष भाऊसाहेब कुटे, सुनिल सोनवणे, गोरक्षनाथ कणसे, रमेश कुटे, विजय हुडे,नंदु भागवत,सागर हुडे, सतीश सोनवणे, विजय शेजूळ, निलेश हुडे, कृष्णा भागवत, योगेश बोरसे, नवीन भागवत, गणेश कणसे, आनंद वैदय, बबनराव रावताळे आदींनी परिश्रम घेतले.

श्रीरामपूर - महाराष्ट्र शासनाने महावितरण कंपनीच्या अधिपत्याखालील क्षेत्रात खाजगी कंपनीस चालवायला देण्यासाठी समांतर परवाना न मिळणेबाबत महावितरण च्या अधिकारी कर्मचारी  संपाला आप'चे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांनी आम आदमी पार्टीचा जाहीर पाठिंबा दिला यावेळी कामगार नेते नागेश सावंत तसेच महावितरणाचे सर्व अधिकारी कर्मचारी,व आप'चे कार्यकर्ते उपस्थित होते,महावितरण महापारेषण व महानिर्मिती कंपन्यातील खाजगीकरण धोरण बंद करा महावितरण मध्ये खाजगी कंपनीला समांतर वीज वितरणाचा परवाना देऊ नका कंत्राटी आऊटसोर्सिंग व सुरक्षारक्षक कामगारांना कायम करा तिन्ही कंपन्यातील रिक्त जागा भरा इम्पेनलमेंट पद्धतीचे कंत्राटीकरण बंद करा, महावितरण मधील 2019 नंतरचे उपकेंद्रे कंपनी मार्फत चालवा व उपकेंद्रात कायम कर्मचाऱ्यांची पदस्थापना करा या मागण्यांसाठी हा संप चालू आहे, राज्यातील महसुली दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असा ठाणे नवी मुंबई उरण, पनवेल ,तळोजा विभागासाठी महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाचे समांतर परवानासाठी अर्ज आलेला आहे असा परवाना देण्यात आला तर राज्याच्या वीज उद्योगावर त्याचे विपरीत परिणाम होतील सदरचे ग्राहक जर महावितरण कंपनीकडून खाजगी भांडवलदार यांच्याकडे गेले तर उर्वरित वीज ग्राहकांना दरवाढीचा मोठा फटका बसू शकतो व त्यामुळे महाराष्ट्रातील जनता भविष्यात वाढीव वीजदरामुळे वीज वापर करू शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊन महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला त्याचा फटका बसणार, अदानी हे पंतप्रधान  यांचे चांगले मित्र आहे आणि म्हणूनच स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आणि आदानींच्या फायद्यासाठी देशातील एअरपोर्ट, बीएसएनएल, भारतातील बंदरे, व धारावली पूर्ण विकास प्रकल्प आणि आता महावितरण कंपनीला सुद्धा आदानी यांना देण्याचा सरकारचा डाव आहे हे सर्व राजकीय स्वार्थ व आदांच्या फायद्यासाठी चालू असल्याचा आरोप आप'चे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांनी केला,

शिर्डी प्रतिनिधी-शिर्डी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील पोहेगाव येथील बाजारतळाजवळील डोर्‍हाळे रोड लगत असलेल्या बंधार्‍यात रविवार 1 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या पूर्वी एका अज्ञात तरुणाचा मृतदेह मिळून आला होता. शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राहाता ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला होता. या घटनेची फिर्याद पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी दिली होती.शिर्डी पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भादंवी 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. घटना घडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ काही तासांत गंभीर खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.सदर गुन्ह्याबाबत पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, मयत सोमनाथ शंकर कल्लारे (वय 33 रा. रांजणगाव, ता. राहाता) मित्रासमवेत खटकळी येथे रात्रीच्या वेळी वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टी करत असताना मयताने एकाचा मोबाईल घेऊन मारहाण केली. तो निघून गेला. मात्र इतर मित्रांनी का त्रास देतो असे म्हणत असताना झालेल्या मारहाणीत मयत जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला.31 डिसेंबर रोजी मृतदेह दोन दुचाकी वरुन गोणीत बांधुन मृतदेह पोहेगाव येथे फेकून देण्यात आला. या खुनात संशयित म्हणून दिनेश फुलचंद बनसोडे (वय 22), सचिन उत्तम पवार (वय 22), प्रशांत बाळासाहेब गायकवाड (वय 22), सिध्दांत प्रमोद निकाळे (वय 20) सर्व राहणार राहाता या चौघांना शिताफीने पकडण्यात आले असून आणखी संशयिताचा शोध सुरू आहे.या खुनात जो मयत आहे त्यांच्यावर लोणी, राहाता पोलीस स्टेशन मध्ये 11 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच या प्रकरणात अटक करणार्‍या आलेले 4 आरोपी व पसार असलेले 3 आरोपी यांच्यावर राहाता- शिर्डी तसेच विविध ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये मोटरसायकल चोरी तसेच विविध प्रकारचे चोरीचे गुन्हे दाखल आहेत.सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण दातरे, संभाजी पाटील, अंजय अंधारे, नितीन शेलार, सुर्यकांत ढाके संदिप गडाख, राजवीर बिरदवडे यांनी काम पाहिले. गुन्हा घडल्यानंतर काही तासांतच शिर्डी पोलीस निरीक्षक गुलाब पाटील यांच्या पथकाने या गुन्ह्यातील आरोपींचा तात्काळ शोध लावला त्याबद्दल त्यांच्या कामगिरीची सर्वत्र चर्चा होत आहे.

अहमदनगर प्रतिनिधी-नुकत्याच औरंगाबाद येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद मास्टर स्पर्धेत अहमदनगर पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी अतुलनीय कामगिरी करून नगर पोलिसांचा झेंडा उंच फडकविला. या क्रीडा पोलिसांचे अहमदनगर पोलीस दलातून मोठे कौतुक होत आहे.

औरंगाबाद येथे राज्य अजिंक्य पद मास्टर स्पर्धा आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेत पोलीस दलातील अनेक संघ व पोलीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता अहमदनगर पोलीस दलातील महिला पोलीस हवालदार अर्चना काळे आणि पोलीस हवलदार अनवर अली सय्यद यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेच्या पूर्वतयारीत अनवर अली सय्यद आणि अर्चना काळे यांनी अहमदनगर पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानात मोठे परिश्रम करून सराव केला होता. या स्पर्धेत जाताना त्यांचे क्रीडाशिक्षक यांनी मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या तसेच पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी शुभेच्छा देऊन या दोन्ही खेळाडूंना दिले होते.

 पोलीस हवालदार अन्वरअली सय्यदअली सय्यद यांनी 900 मीटर शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. तसेच लांब उडी स्पर्धेत सहभाग घेऊन प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक मिळवले. आणि शंभर मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांकावर येऊन सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला.  तसेच महिला पोलीस हवालदार अर्चना काळे यांनी 100 मीटर स्पर्धेत प्रथम क्रमांकावर येऊन सुवर्णपदक मिळविले. त्याचबरोबर 200 मीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. आणि 400 मीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक वर येऊन सुवर्णपदकावर हक्क प्रस्थापित केला. या दोन्ही क्रीडा पोलिसांनी औरंगाबाद येथील  क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाचा वर्षाव करून अहमदनगर पोलिस दलाची मान उंचावली. या स्पर्धेमध्ये दोन्ही खेळाडूंनी एकूण सहा सुवर्णपदक मिळवल्याने पोलीस दलातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. पोलीस अधीक्षक राकेश यांनी खेळाडूंचे कौतुक करून त्यांचा सन्मान केला व आगामी स्पर्धेतही अशीच सुवर्ण कामगिरी करून पोलीस दलाचे नाव उंच करून पोलीस दलाची शान राखावी अशी सदिच्छा व्यक्त केली.

बेलापुरातील गावकरी पतसंस्थेचे संचालक सामाजिक कार्यकर्ते महेश कुऱ्हे  यांचा वाढदिवस बेलापुरातील पत्रकार देविदास देसाई यांच्या हस्ते बिनधास्त न्यूज व तिरंगा न्यूजचे संपादक असलम बिनसाद गांवकरी पतसंस्थेचे संचालक अजीज शेख भाऊसाहेब वाघमारे उपस्थित होते राज्याचे महसुल व दुग्ध विकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही कुऱ्हे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

बेलापुर  (प्रतिनिधी  )-रासायनिक खताच्या अती वापरामुळे आपले पोषण करणाऱ्या मातीतील जिवाणू लोप पावत चालले असुन माती जिवंत, सजिव ठेवावयाची असेल तर सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय असुन माता गोमाता व माती यांची काळजी घेण्याची गरज असल्याचे मत साँईल चार्जर टेक्नाँलाँजीचे जनक राम मुखेकर यांनी व्यक्त केले                   श्रीरामपुर तालुक्यातील उक्कलगाव येथील पुरुषोत्तम आण्णासाहेब थोरात यांच्या गाय गोठ्यास त्यांनी भेट दिली त्या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना राम मुखेकर पुढे म्हणाले की  माता-पिता ,गोमाता , व माती या सर्वांचे रक्षण करण्याची, काळजी घेण्याची वेळ आलेली आहे माता-पित्यांची काळजी न घेतल्यामुळे समाजात वृद्धाश्रमांची सख्या वाढत आहे हे आपले दुर्दैव आहे गोमातेची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे शेतकरी बंधुंचा दुग्ध व्यवसाय अडचणीत सापडला आहे लंपीसारख्या आजाराने पशुधन धोक्यात आलेले आहे रासायनिक खते वापरुन पिकवीलेले अन्न आपण खात असल्यामुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे आपल्याला सकस आहार न मिळणे हेच आजाराचे मुख्य कारण आहे तेच पिकांच्याही बाबतीत होत आहे पिकात असलेल्या कमजोरीमुळे पिकावर रोग येतो त्यामुळे कमजोरीवर उपाय करण्या ऐवजी आपण रोगावरच मोठ्या प्रमाणात खर्च करतो परिणामी खर्च अधिक व उत्पन्न कमी अशी अवस्था होते त्यामुळे पिकाला, झाडाला सशक्त मजबुत बनवायचे असेल तर भरपुर पोषण द्या पिकाला भरपुर पोषण दिले तर रोगच येणार नाही रासायनिक खताचा वापर टाळा सेंद्रिय शेती करा उत्पन्नही जोमदार निघेल पिकविणारा अन खाणारा दोघेही समाधानी राहील असेही ते म्हणाले या वेळी ब्राम्हणगाव भांड येथील शेतकरी सुरेश वारुळे यांनी सेंद्रिय शेतीचे काय फायदे होतात याचे अनुभव सांगितले  या वेळी शेखर वाकचौरे वरुण तुवर विशाल कोकणे आण्णासाहेब जाधव देवराम वाबळे  सौरभ उगले अमित घोडके उमेश मुखेकर प्रविण आहेर सदाशिव कोळसे अक्षय खरात इश्वर दरंदले प्रतापराव पटारे ज्ञानदेव थोरात नवनाथ गडाख विठ्ठल बोठे शंकर थोरात आदिसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार देविदास देसाई यांनी केले तर शेतकरी संघटनेचे प्रकाश आण्णासाहेब थोरात यांनी आभार मानले

नागपुर ,श्रीरामपुर (प्रतिनिधी  )-स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध मागण्या संदर्भात विचार विनिमय करुन योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे अश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनच्या शिष्टमंडळाला दिले                                        स्वस्त धान्य दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी तातडीने 4 जी मशिन देण्यात यावी एनआयसीच्या कामकाजात सुधारणा करण्यात यावी आदीसह विविध मागण्या संदर्भात आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष गणपतराव डोळसे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवुन निवेदन दिले                   महाराष्ट्र  एकुण ५५ हजार स्वस्त धान्य दुकाने असुन दुकानदारांना कमी प्रमाणात कमीशन मिळत असल्यामुळे  दुकानदारांच्या कमीशनमध्ये वाढ करण्यात यावी अनेक वेळा नेट अभावी दुकाने बंद ठेवण्याची वेळ येते त्यामुळे कार्डधारकांची गैरसोय होते म्हणून दुकानदारांना 4 जी मशिन देण्यात यावे पाँज मशिनला सुविधा पुरविणाऱ्या एनआयसीच्या कामकाजात सुधारणा व्हावी कुठलेच धान्य वेळेवर मिळत नाही त्यामुळे त्या महिन्याचे धान्य त्याच महिन्याला मिळावे मोफत धान्य वाटपाचे कमीशन तातडीने वर्ग करण्यात यावे आवश्यक त्या ठिकाणी केरोसीन वितरण सुरु करण्यात यावे आयएसओ मानांकनाची सक्ती करण्यात येवु नये अशा मागण्याचे निवेदन आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनच्या वतीने राज्याचे अध्यक्ष गणपतराव डोळसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले या वेळी विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ इगतपुरी तालुक्याचे आमदार हिरामन खोसकर  आमदार सरोज अहीरे आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष गणपतराव डोळसे जनरल सेक्रेटरी बाबुराव ममाणे नागपुर विभागीय अध्यक्ष संजय पाटील नांदेंड जिल्हाध्यक्ष अशोकराव ऐडके नागपुर शहराध्यक्ष सुभाष मुसळे वर्धा जिल्हाध्यक्ष संजय देशमुख हिंगोली जिल्हाध्यक्ष भिकुबाई मोहीते नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे शाहु गायकवाड धर्मराज चौधरी अरुण बागडे इगतपुरी गोपी मोरे दिंडोरी सुदाम पवार देविदास पगारे दशरथ मेधने कैलास मोखनळ राहुल गायकवाड अमोल धात्रक केशव भुसारे नितीन शार्दुल प्रकाश पगार रवी माळगावे भास्कर पताडे आदि पदाधिकारी उपस्थित होते

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget