Latest Post

श्रीरामपुर प्रतिनिधी:पत्रकारिते सोबतच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना मिळालेल्या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) यासह येथील विविध संघटनांच्यावतीने पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.ज्येष्ठ साहित्यिक रज्जाकभाई शेख (सर) आणि टीम संचलित दोस्ती फाऊंडेशन अहमदनगर यांच्यावतीने दिला जाणारा लोककलावंत पै. मजनूभाई शेख राज्यस्तरीय गौरव पुरस्कार २०२२ हा राज्यस्तरीय पत्रकाररत्न पुरस्कार येथील ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांना तर   राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय नगरकर आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्रीमती रेहाना गणी मुजावर- शेख यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार तसेच अ.भा.लहुजी सेनेच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार असलमभाई

बिनसाद यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर समाज प्रबोधन पुरस्कार मिळाल्याबद्दल व तालुक्यातील सराला गोवर्धनपूरचे कर्तव्यदक्ष ग्रामसेवक रुबाब पटेल यांची अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य,त्रिदल सेवा संघ,परिवर्तन फाऊंडेशन,समता फाऊंडेशन,परिवर्तन शिक्षक संघ,पेन्शन शिक्षक संघ यांच्यावतीने येथील समता कार्यालयात पुरस्कार प्राप्त मान्यवरांना शुभेच्छा देत त्यांचा  शॉल,पुस्तक आणि पुश्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.यावेळी चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली,चर्मकार संघर्ष समिती अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष संजय दळवी, महिला जिल्हाध्यक्षा सौ.सुनंदा दिलीप शेंडे, जिल्हा संघटक दिलीप शेंडे सर,तालुका खजिनदार नामदेव कानडे,ज्येष्ठ सल्लागार नामदेव नन्नवरे, संघटक अशोकराव खैरे सर, सुभाष पोटे, कार्याध्यक्ष प्रेमचंद वाघमारे, जिल्हा उपाध्यक्षा सौ.सोनल प्रेमचंद वाघमारे, जिल्हा उपसचिव सौ.आशाताई संजय दळवी, सौ.अर्चनाताई सतिशराव जाधव, परिवर्तन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष (माजी नायब तहसीलदार) उत्तमराव दाभाडे, त्रिदल सेवा संघाचे मेजर कृष्णा सरदार,परिवर्तन शिक्षक संघाचे सतिश जाधव सर,पेन्शन शिक्षक संघाचे सुरेश कांबळे सर, शाकिर शेख सर,गुलाबभाई शेख, ग्रामसेवक श्री.मनियार भाऊसाहेब,समता फाऊंडेशनचे इंजि मोहसिन शौकत शेख, सौ.सलवा मोहसीन शेख, सरताज शौकत शेख,अफजल मेमन, मतीन शेख,कु.पुजा सकट, रेहान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी सत्काराला उत्तर देताना शौकतभाई शेख म्हणाले की, दोस्ती फाऊंडेशनमध्ये वकील, इंजिनिअर,डॉक्टर,शिक्षक, साहित्यिक अशी विद्वान सदस्य मंडळी आहेत,त्यांनी राज्यभरातील विविध क्षेत्रात सामाजाभिमुख आणि  उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा शोध घेत त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे,इतर पुरस्कारार्थींच्या तुलनेत माझे योगदान आगदी नगण्य असे आहे,तरी देखील मला दिला गेलेला राज्यस्तरीय पत्रकार रत्न पुरस्काराबद्दल तसेच आपण सर्वांनी केलेल्या आम्हा सर्वांच्या सत्कारबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे, सदरील पुरस्कार आणि आपण केलेला सत्कार यातुन मोठे बळ प्राप्त झाले आहे, पुढे हेच पुरस्कार आणि आपले प्रेम व सदिच्छा प्रेरणास्वरुप आम्हास बळ देण्याकामी महत्वाचे ठरेल असेही ते म्हणाले.या वेळी इतर मान्यवरांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.या छोटेखानी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिलीप शेंडे (सर) यांनी केले तर ॲड.मोहसिन शेख यांनी आभार मानले.

अहमदनगर येथे १४ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या,हिंदू जन आक्रोश मोर्चा दरम्यान, सेनेच्या महिला पदाधिकारी आशा निंबाळकर यांनी,केलेल्या भाषणा दरम्यान अतिशय खालच्या पातळीवर जाऊन. मुस्लिम समाजा बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने. या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र निंबाळकर यांच्या वादग्रस्त विधानाची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने. मुस्लिम समाजाच्या भावना दुखल्याने,श्रीरामपूर येथील मुस्लिम समाजातील जेष्ठ नागरिकांसह, युवकांनी शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना निवेदन देऊन. सेनेच्या महिला पदाधिकारी आशा निंबाळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्या विरोधात,व आयोजक तसेच संयोजकांवर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलीय. सदरचे निवेदन स्वीकारून, वरिष्ठांच्या आदेशानुसार , श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दिल्याने.

बेलापुर (प्रतिनिधी  )दळण वळणाच्या दृष्टीने  राहुरी व श्रीरामपुर या दोन तालुक्याला जोडणारा  प्रवरा नदीवरील कान्हेगाव पुलाच्या बांधकामास राज्याचे  महसुल व दुग्ध विकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा यांनी बारा कोटी रुपये मंजुर केले असल्याची माहीती मा .जि प सदस्य शरद नवले यांनी दिली आहे               या बाबत प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात मा जि प सदस्य शरद नवले यांनी पुढे म्हटले आहे की राहुरी तालुक्यातील केंदळ मानोरी टाकळीमीया जातप करजगाव मुसळवाडी दरडगाव खुडसरगाव पाथरे लाख त्रींबकपुर आदिसह पंधरा ते विस गावे व श्रीरामपुर  तालुक्यातील लाडगाव कान्हेगाव पढेगाव वांगी उंबरगाव वळदगाव बेलापुर कारेगाव अशी श्रीरामपुर तालुक्यातील अनेक गावे जोडणारा प्रवरा नदीवर पुल असावा अशी दोन्ही तालुक्यातील नागरीकांची अनेक वर्षापासून मागणी होती प्रवरा नदीला पाणी असल्यास  दोन्ही तालुक्यातील गावांचा संपर्क तुटत होता केवळ उन्हाळ्यात प्रवरा नदीला पाणी नसेल तरच प्रवरा काठावरील गावांचा संपर्क होत होता दोन्ही तालुक्याला जोडणारा हा अत्यंत जवळचा मार्ग म्हणजे हा पुल होता त्यामुळे नागरीक प्रवरा नदीवर पुल व्हावा अशी वारवार मागणी करत होते दोन्ही तालुक्यातील ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करुन माझ्यासह भाजपाचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे  उपसभापती बाळासाहेब तोरणे रामभाऊ लिप्टे गीरीधर आसने महेश खरात मुकुंद लबडे अर्जुन खरात हनुमान खरात प्रविण लिप्टे आदिंनी नामदार राधाकृष्ण विखे पा यांच्याकडे सतत पाठपुरावा केला अखेर ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करुन महसुल मंत्री  नामदार राधाकृष्ण विखे पा .यांनी प्रवरा नदीवरील दोन तालुक्याच्या दृष्टीने दळणवळणा करीता महत्वाचा ठरणारा  कान्हेगाव पुलास बारा कोटी रुपये इतका निधी मंजुर केला असुन या पुलामुळे अनेक गावे आपापसात जोडली जाणार असल्याचेही नवले यांनी सांगितले

महाराष्ट्र पोलीस मेगासिटी सहकारी गृहरचना संस्था (मर्यादित), लोहगाव पुणे ही सभासदांना किफायतशीर दरात, हक्काचे निवासस्थान मिळावे या हेतूने, पोलिसांनी पोलिसांकरिता स्थापन केलेली सहकारी गृहरचना संस्था असून लोहगाव येथे ११६ एकर जमीनीवर मोठे गृहसंकुल उभारले जात आहे. संस्थेच्या सभासदांची संख्या ७२१३ इतकी असून १२ वर्षात प्रथमच संस्थेची २०२२-२०२७ या कालावधीसाठी निवडणूक घेण्यात आली.

     दि.११/१२/२०२२ रोजी पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, नाशिक, नागपूर व अमरावती या १० शहरांमध्ये मतदान होऊन दि. १३/१२/२०२२ रोजी शिवाजी मराठा हायस्कूल शुक्रवार पेठ पुणे येथे मतमोजणी झाली.


     ही संपूर्ण प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती निलम पिंगळे, उपनिबंधक सहकारी संस्था पुणे (२) यांच्या अधिपत्याखाली शांततापूर्वक पार पडली. 

     यापूर्वी असलेल्या संचालक मंडळाच्या गलथान व मनमानी कारभारामुळे मेगासिटी प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नसून गेल्या १० महिन्यांपासून संस्थेचा कारभार प्रशासकाचे ताब्यात होता. या निवडणुकीत संस्थेच्या जागरूक व समविचारी सभासदांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या 'जागृती' पॅनेलचे सर्व १९ उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आले असून विरोधातील क्रांती व सावधान या दोन्ही पॅनलचा दारुण पराभव होऊन सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.अनामत गमावलेल्या पराभूत उमेदवारांमध्ये पुण्यातून नुकतेच बदलून गेलेले वाहतूक पोलिस उपायुक्त श्री राहुल श्रीरामे यांचाही समावेश आहे.

जागृती पॅनेलचे विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

१) श्री प्रदीप देशपांडे, विशेष पोलिस महानिरीक्षक (नि)

२) श्री अरविंद पाटील, सहायक पोलिस आयुक्त (नि)

३) श्री राजेन्द्र मोरे, पोलिस उपअधीक्षक (नि)

४) श्री भारतकुमार राणे, पोलिस उपअधीक्षक (नि)

५) श्री सुरेश भामरे, सहायक पोलिस आयुक्त (नि) नाशिक

६) श्री बरकत मुजावर, पोलिस उपअधीक्षक (नि) पुणे

७) श्री नारायण इंगळे, पोलिस उपअधीक्षक, (नि) नाशिक 

८) श्री किशोर जगताप, सहायक पोलिस आयुक्त (नि), मुंबई 

९ ) श्री सतीश टाक पोलिस निरिक्षक ( नि) औरंगाबाद 

१०) श्री अर्जुन गायकवाड पोलिस निरिक्षक (नि) नवी मुंबई ११ ) श्री दत्तात्रय दराडे पोलिस निरिक्षक (नि) मुंबई 

१२) श्री पोपटराव आव्हाड, पोलिस निरीक्षक, मुंबई 

१३) श्री धनंजय कंधारकर, पोलिस निरीक्षक, (नि) मुंबई

१४) श्री सुभाष भालसिंग, सहायक पोलिस उपनिरीक्षक, अहमदनगर 

१५) श्री गणेश ठाकरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक (नि) पुणे 

१६) श्री प्रल्हाद भोसले, पोलिस उपनिरीक्षक (नि) पुणे 

१७) श्री शेळके मनीष बाबुराव, पुणे 

१८) सौ.निलम बो-हाडे, पोलिस हवालदार, ठाणे

१९) सौ. वैशाली जगताप, वरिष्ठ लिपीक, पोलिस आयुक्तालय, पुणे.

निवडणूक प्रक्रिया चालू असताना या संस्थेच्या माजी सेक्रेटरी मोहंमद रफी खान यांनी प्रशासकाच्या अनुपस्थितीत संस्थेच्या कार्यालयात येऊन, कर्मचाऱ्यांना हाताशी धरून, एक पोते भरुन काही महत्त्वाचे कागदपत्रे व फायली चोरून नेल्यामुळे त्याचे विरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात नुकताच एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या कमिटीच्या सभासदांनी गठित केलेल्या संपूर्ण पॅनेलचा पराभव झाल्यामुळे व संवेदनशील प्रामाणिक सभासदांनी संस्थेच्या कारभारात लक्ष घातल्याने गैरकारभारास जबाबदार असलेल्या जुन्या संचालकांचे आता धाबे दणाणले आहे. प्रकल्पातील एकही इमारत अद्याप पूर्ण झाली नसून संस्थेच्या कारभा-यांनी बिल्डर कंपनीला २७१ कोटी रुपये दिले आहेत, तरी एकाही सदस्याला घर मिळालेले नाही याबद्दल जबाबदार असलेल्या सगळ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याची भावना विजयी पॅनेलचे प्रवक्ते श्री अरविंद पाटील यांनी व्यक्त केली.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -पैसे कमवायला फक्त ५ वी पर्यंत शिक्षण गरजेचे आहे हे एका उद्योजकाचे विधान आज प्रत्यक्षात पाहण्याची संधी परमवीर शहीद अब्दुलहमीद नगरपालिका डिजीटल उर्दू शाळा क्र.५ ने आयोजित आपना बाजार मध्ये प्राप्त झाली.एखाद्या खाद्य महोत्सवाला लाजवेल एवढे खाद्य पदार्थ या बाज़ारातील खाऊ गल्लीत पाहण्यास मिळाले.मुलांनी स्वछतेबाबत घेतलेली काळजी ही पंचतारांकित हॉटेलच्या शेफ प्रमाणे होती.प्रत्येक स्टॉलवर लेबलप्रमाणे ठेवलेले खाद्यपदार्थ व एका दिवसासाठी व्यासायिक झालेली ही लहान मुले, त्यांचा उत्साह व आनंद पाहण्यासारखा होता. त्यातून पालकांनी व शिक्षकांनी घेतलेले परिश्रम दिसून येत होते. खरं तर या संपूर्ण उपक्रमाचे श्रेय हे शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक सलिमखान पठाण सर यांना जाते. त्यांनी आपल्या काळात नगरपालिका शाळेचे रूपांतर एका कॉन्वेंट शाळेत केले असे म्हणण्यास हरकत नाही.आगामी काही दिवसात ते निवृत्त होणार असले तरी उर्दू शाळा क्रमांक पाचची निर्माण झालेली प्रतिमा येथील शिक्षक पुढे कायम ठेवतील याची मला खात्री आहे. विद्यार्थी हिताचे असेच उपक्रम या शाळेने राबवावेत.आगामी काळात विविध शैक्षणिक उपक्रमाकरीता उर्दू शाळा क्र ५ ला खुप साऱ्या शुभेच्छा मी आपल्या सर्वांच्या वतीने देतो असे प्रतिपादन गरीबनवाज फाउंडेशनचे संस्थापक,माजी नगरसेवक मुख्तारभाई शाह यांनी केले.
येथील नगरपालिकेच्या उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये मुलांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी आयोजित केलेल्या अपना बाजारच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अनोख्या अशा या अपना बाजारचे उद्घाटन नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांचे हस्ते करण्यात आले.त्याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मुख्तार शाह बोलत होते.
यावेळी माजी नगरसेविका जायदाबी कुरेशी,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तरन्नुम मुनीर शेख,उपाध्यक्ष अजीम शेख, युवक काँग्रेसचे जाफर शहा, सरवर अली मास्टर, मुक्तार मणियार,अहमद शाह, शरीफ मेमन,आदिल मखदुमी, फिरोज पोपटिया,असलम बिनसाद,फारुख तांबोळी,मुख्याध्यापिका परविन शेख,कांचन मुसळे,नाझिया शेख,नाहीद शेख आदींसह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांनी शाळा क्रमांक पाच मध्ये विद्यार्थ्यांच्या हिताचे वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबविले जातात. दैनंदिन जीवनामध्ये मुलांना व्यवहार न्याय मिळण्यासाठी आयोजित केलेला आजचा हा आपला बाजारचा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय आहे.यातून मुलांना जीवनासाठी आवश्यक व्यवहाराचे ज्ञान प्राप्त होईल.अशा उपक्रमांची आज गरज आहे.या कार्यक्रमासाठी सर्वपक्षी लोक राजकीय अधिनिवेश बाजूला ठेवून शैक्षणिक कार्याला प्रोत्साहन देऊन देण्यासाठी एकत्र आले ही अभिनंदनीय बाब आहे असे नमूद करून शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या कामाचे कौतुक केले.
प्रास्ताविक भाषणामध्ये मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांनी दरवर्षी शाळेमध्ये अशा प्रकारच्या बाजाराचे आयोजन केले जाते. मागील दोन वर्षांमध्ये कोरोना काळामुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे यावर्षी पालक आणि विद्यार्थी यांच्या आग्रहास्तव हा अपना बाजार भरविण्यात आला आहे. पालक व विद्यार्थी यांच्यात खूपच उत्साह आहे. त्यातूनच मोठ्या संख्येने स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत असे सांगितले.
या अपना बाजार मध्ये स्टेशनरी,भाजीपाला, खेळणी, कटलरी, किराणा आदी सामानाची दुकाने लावण्यात आली होती. सर्वात जास्त लक्ष वेधले ते खाऊ गल्ली विभागातील खाद्यपदार्थांच्या स्टॉलनी. विद्यार्थ्यांनी स्वतः वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करून आणले होते. पालक आणि परिसरातील नागरिकांनी या बाजारामध्ये मोठी गर्दी केल्याने चार तासांमध्ये अपेक्षित असणारा हा अपना बाजार दोन तासातच संपला. नगरपालिका शाळा क्रमांक चार,सहा, नऊ तसेच खासदार गोविंदराव आदिक उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थ्यांनी या बाजाराला भेट दिली.
बाजारामध्ये ३२ हजार रुपयांची उलाढाल झाली.हैदराबादी बिर्याणी या स्टॉलला तोटा सहन करावा लागला. इतर स्टॉल मात्र नफ्यात राहिले.
एक आगळावेगळा उपक्रम म्हणून या अपना बाजारची चर्चा शाळेचे विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिकांमध्ये होती. आलेल्या सर्व मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन पाहणी केली तसेच खरेदी सुद्धा केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसिफ मृत्यूचा यांनी केले तर आभार फारूक शाह यांनी मानले.
सदरचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे व शाळेचे मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री फारूक शाह, आसिफ मुर्तुजा,एजाज चौधरी,जुनेद काकर, वहिदा सय्यद, नसरीन इनामदार, शाहीन शेख, अस्मा पटेल,बशीरा पठाण, निलोफर शेख, मिनाज शेख, यास्मिन पठाण, रिजवाना कुरेशी, रेश्मा सय्यद,हिना पठाण आदींनी विशेष परिश्रम घेतले.

अहमदनगर प्रतिनिधी- जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारा विरोधात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेने,एकाच आठवड्यात दुसरी कारवाई करत.३ गावठी कट्टे, ३ जिवंत काडतुसांसह ५ सराईत आरोपींना गजाआड केले आहे. ज्यात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे,कोल्हार बुद्रुक येथील राजवाडा गौतमनगर परिसरात सापळा रचून. बेकायदेशीर रित्या विक्रीच्या उद्देशाने आणलेल्या, दुर्गेश बापु शिंदे वय वर्ष ३५,रा. सरस्वती कॉलनी, वॉर्ड नं.७, श्रीरामपूर, हारुण ऊर्फ राजु रशिद शेख, वय वर्ष ३१, रा.अहिल्यादेवी नगर, वॉर्ड नं.२, श्रीरामपूर, अश्पाक ऊर्फ मुन्ना रफिक पटेल, वय वर्ष २१, रा. बेलापुर रोड, शहानगर, कोल्हार ब्रुद्रुक, प्रसन्न विलास लोखंडे, वय वर्ष ३२, रा. गौतमनगर, राजवाडा, कोल्हार बुा, तालुका राहाता, सदानंद राजेंद्र मनतोडे, वय वर्ष २७, राहणार शिबलापुर, तालुका संगमनेर अशा ५ जणांना ताब्यात घेतले असून. आरोपीं विरोधात लोणी पोलीस ठाण्यात,आर्म ऍ़क्ट ३/२५, ७ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून. या प्रकारणाचा पुढील तपास लोणी पोलीस करत आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,  अप्पर पोलीस अधीक्षक,श्रीमती. स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिक्षक, संजय सातव, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली,सहाय्यक फौजदारी मनोहर शेजवळ, भाऊसाहेब काळे,पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक शंकर चौधरी, संदीप चव्हाण, लक्ष्मण खोकले, दिलीप शिंदे, राहुल सोळुंके, पोलीस कॉन्स्टेबल रणजीत जाधव,संभाजी कोतकर व भरत बुधवंत आदींच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

श्रीरामपूर : शहरात लग्नाचा बनाव करून. ३ वर्षांपासून अत्याचार होत असल्या संदर्भात, एका जिमच्या मालका विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने.शहरातील महिला वर्गात खळबळ उडाली आहे. ज्यात जिम मध्ये येणाऱ्या,एका विशिष्ट समाजाच्या, पीडित मुलीला. वेळोवेळी फेसबुक,मोबाईल मेसेज करून. एका मंदिरात हार घालून, व डोक्यात कुंकू भरून. आपले लग्न झाल्याचे सांगत. लवकरच रजिस्टर मॅरेज करून सोबत राहू असे म्हणत. श्रीरामपूर, पुणे अशा विविध ठिकाणी, पिडितेवर वेळोवेळी शारिरीक अत्याचार करत. पीडितेकडून आपला स्वार्थ निघाल्यानंतर, तिला लग्नास नकार देत, तिला मारहाण करून. आपल्या संबंधा संदर्भात कोणाला सांगितल्यास, तुझ्या घरच्यांची बदनामी करून. तुझ्या भावाला जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याने सतत होत असलेल्या अत्याचारास कंटाळून. पीडित मुलीने बेलापूर येथील नदीपात्रात, आपला जीव देत असतांना. तेथील काही नागरिकांनी तिचा जीव वाचवून, उपचाराकरिता साखर कामगार रुग्णालयात दाखल केल्यानंतर. घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून,जिम ट्रेनर मालक युवराज विजय शिंदे राहणार मेनरोड श्रीरामपूर, यांच्या विरोधात भादवी कलम ३७६, ३७६ (२), एन, ४२०, ३२३, ५०४,५०६ अन्वये,श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहे. पुन्हा एका जिम चालकाकडून,मुलींवर शारिरीक अत्याचाराची घटना, समोर आल्याने.महिला मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget