Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-कपड्याला ईस्री करताना विजेचा शाँक लागुन पंधरा वर्ष वयाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे या बाबत समजलेली माहीती अशी की विशाल भागीनाथ पिटेकर हा पंधरा वर्ष वयाचा मुलगा शाळेत जाण्याकरीता कपड्याला ईस्री करत होता कपड्याला ईस्री करताना त्याला विजेचा शाँक लागला तो लाबं फेकला गेला घरातील नातेवाईकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी विजेची बटन बंद केली व त्यास तातडीने दवाखान्यात हलविले परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले बेलापुर पोलीसा स्टेशन समोरील नवनाथ धनवटे यांचा तो नातू आहे

बेलापूर प्रतिनिधि देवीदास देसाई -क्रांति गुरू लहुजी वस्तात साळवे यांची २८८वी जयंती मोठ्या उत्साह महाराष्ट्र भर  साजरी करण्यात येत आहे . त्याच प्रमाणे श्रीरामपुर शहरा मध्ये दि . ३०नोव्हबर २०२२ रोज़ी ठीक सायंकाळी ६:००वा डॉ बाबासाहेब अंबेडकर स्मारक, रेल्वे स्टेशन जवळ भारतीय लहुजी सेना आयोजीत क्रांति गुरू लहुजी साळवे २८८वा जन्मोत्सव व पुरस्कार वितरण सोहळा व आर्केस्ट्रा (लहु गर्जना)  कार्यक्रम मोठ्या उत्साह साजरी होनार  आहे ,सदर कार्यक्रम मध्ये प्रमुख पाहुने भारतीय लहुजी सेना च्ये  मा श्री  व्ही जी रेड्डी साहबे ( सेना प्रमुख मुंबई ), मा श्री  रामचन्द्र जाधव साहबे ( मा शिक्षक  महा संचालक) , मा के के आव्हाड साहेब  ( सामाजिक कार्यकर्ते ) उपस्थित राहनार आहे.भारतीय लहुजी सेना च्या वतीनेमा श्री , व्ही जी रेड्डी साहेब यांना(समाज रत्न पुरस्कार, मुंबई  )रईस रज्जाक भाई शेख ( युवा उद्योजक, श्रीरामपुर )हाजी लतीफ भाई करीम भाई सय्यद (मौलाना आजाद समाज भुषण पुरस्कार श्रीरामपुर )अभिमान पांडुरंग कांबळे( क्रांति गुरू लहुजी वस्तात साळवे समाज भुषण पुरस्कार,पुणे )राजेद्र बाळासाहेब आल्हाट( वृक्ष मित्र , रहाता ) सोहेल कलिम भाई शेख (युवा भुषण , श्रीरामपुर) बाळासाहेब कचरू कदम (प्रगतिशील शेतकरी ,नेवासा)सुनील भीमराव संकट ( लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाज भुषण पुरस्कार अहमदनगर)भाऊसाहेब नारायणन चौधरी( आर्दश शेतकरी ,रहाता)असलम भाई बिनसाद तिरंगा न्युज व बिनदास न्यूज संपादक( बाळशास्त्री जांभेळकर समाज प्रबोधन श्रीरामपुर) राजेश संपतराव घोरपडे साहबे (तलाठी) श्रीरामपुर भुषण पुरस्कार ,श्रीरामपुर)अजहर हानिफ शेख ABS (डाॅ अब्दुल कलाम समाज भुषण पुरस्कार,श्रीरामपुर  )सुभाष दादा त्रिभोवन (डाॅ बाबासाहेब अंबेडकर समाज भुषण पुरस्कार, श्रीरामपुर )मंजूषा ताई ढोकचौळे ( आर्दश महिला समाज़ भुषण  पुरस्कार  श्रीरामपुर )अर्जुन भाऊ दाभाडे (हिंदु रक्षक, श्रीरामपुर)ह.भ. प ज्ञानेश्वर महाराज अढाव ( नाथ गौरव श्रीरामपुर )ह.भ.प प्रतीक्षा ताई जाधव( समाज जागृति, कोपरगाव)अदी सामाजिक कार्य करणारे यांना भारतीय लहुजी सेना च्ये व कार्यक्रमाचे आयोजक  बाळासाहेब बागुल राष्ट्रीय प्रमुख ,हानिफ भाई पठान राष्ट्रीय सचिव, ऑड रमेश कोळेकर राष्ट्रीय कादेशीर  सल्लागार  ,  रज्जाक भाई शेख अहमदनगर जिल्हा प्रमुख, रईस भाई शेख जिल्हा प्रसिद्धि प्रमुख, सुरेश दादा अढागळे महा प्रमुख, यांचे वतीने पुरस्कार जाहिर करण्यात आले आहे . सदर कार्यक्रमा मध्ये हजारो च्या संख्या ने महाराष्ट्र मध्युण लोक जयंती साजरी करण्यात  येणार आहे .






 

बेलापुर  (प्रतिनिधी  )-अहमदनगर येथील वाडीया पार्क मैदानावर पार पडलेल्या १५ वर्ष वयोगटातील मुलीच्या क्रिकेट चाचणीमध्ये बेलापुरची कन्या मिसबा जावेद शेख हीची जिल्हा क्रिकेट संघात निवड झाली आहे                                      पुणे येथे खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत अहमदनगर  जिल्हा क्रिकेट संघात मिसबा हीची निवड झाली आहे   श्रीरामपुर येथील साई अँकेदमीकडून खेळताना उत्कृष्ठ क्षेत्ररक्षण उत्तम फलंदाज म्हणून तीची निवड करण्यात आलेली आहे   मिसबा ही   विद्यानिकेतन इंग्लिश मेडीयम स्कूल ऐनतपुर येथे झाले आहे बेलापुरच्या माजी उपसरपंच शिरीन शेख व माजी क्रिकेट खेळाडू जावेद शेख यांच्या त्या कन्या आहेत तिला साई क्रिकेट अँकेडमीचे महेश बोरावके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तिच्या निवडी बद्दल मा जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे पत्रकार देविदास देसाई कैलास चायल कै खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड भरत साळूंके जेषौठ नेते सुनिल मुथा विष्णूपंत डावरे दिलीप दायमा किशोर कदम आदिंनी अभिनंदन केले आहे

पुणे (गौरव डेंगळे) : पुणे विभागातून निवड झाल्याबद्दल अभिनंदन करीत कुठल्याही स्पर्धेत सहभागी होताना आपला संघ विजयी होईल व आपल्या संघातील प्रत्येक खेळाडूला त्याचा खेळ कसा उंचावता येईल हेच लक्षात ठेवून आपण स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं असे प्रतिपादन मिलेनियम नॅशनल स्कूलचे संचालक अन्वित फाटक यांनी आज राज्य व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी सहभागी होणारा पुणे विभागीय मुलींच्या संघाला जर्सी  वाटप व शुभेच्छा समारंभ दरम्यान केले. दिनांक १७ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर दरम्यान मिलेनियम नॅशनल स्कूल येथे १५ सदस्य मुलींचा पुणे विभागीय व्हॉलीबॉल संघाचे सराव शिबिर आयोजित करण्यात आले होते. अहमदनगर जिल्ह्यातील दाढ येथे संपन्न झालेल्या विभागीय निवड चाचणी स्पर्धेतून या संभाव्य १५ खेळाडूंची निवड करण्यात आली होती. स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी संघातील खेळाडूंना मिलेनियम नॅशनल स्कूलचे संचालक अन्वित फाटक व नेहा फाटक आदींच्या हस्ते खेळाची जर्सी प्रदान करण्यात आली.

यावेळी पुढे बोलताना फाटक म्हणले की युवा मुलींनी या सर्व शिबिरासाठी आलेल्या मुलींचा खेळ बघून आपण देखील या खेळामध्ये प्राविण्य मिळवावे जेणेकरून आपल्या राज्याचा संघ बलाढ्य होईल व तो राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निश्चित पदक मिळवेल. मला आशा आहे की चंद्रपूर येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जाणारा पुणे विभागीय मुलींचा संघ निश्चित सुवर्णपदकास गवसणी घालेल यात शंकाच नाही असे ते पुढे म्हणाले.

या प्रसंगी मिलेनियम नॅशनल स्कुलचे क्रीडा अधिकारी रामदास लेकावळे यांनीही संघास शुभेच्छा दिल्या, राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक कुलदीप

कोंडे, सचिन चव्हाण, पंकज शिंदे आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचलन महेश गायकवाड यांनी केले व आभार प्रदर्शन राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक कुलदीप कोंडे यांनी केले.

श्रीरामपूर(प्रतिनिधी)लहानपणी मी भरपुर क्रिकेट खेळायचो व त्यातून एक गोष्ट शिकलो की कधी कधी आपल्याला माहिती असत की आपण हरणार आहोत तरी सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत खेळावं लागत आणि कधी कधी त्या प्रयत्नांमध्ये सुद्धा एखादा नो बॉल पडून दिखील यश मिळू शकत . आयुष्यातही असच असत मित्रांनो आपण हरलोय किंवा हरत आहोत असं माहिती असताना सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत खेळणे गरजेचं असत काय माहिती कधी बाजी पलटुन जाईल आणि आपले अपयश यशामध्ये बदलून जाईल असे प्रतिपादन ग्रॅज्युएट व लस्सीचे संचालक स्वप्निल लांडे यांनी श्रीरामपूर सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी केले.यावेळी सार्थक बहुउद्देश्य संस्थेचे अध्यक्ष उमेश तांबडे, साई इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या अस्मिता गायकवाड,हेमंत सोलंकी, दिगंबर पिनाटे,एस सोनवणे,शुभम पवार,तुषार पवार, अस्मिता परदेशी,अतुल जाधव,अमोल शिरोळे,दौलत पवार, वैष्णवी इंगळे स्पर्धा आयोजक गौरव डेंगळे, नितीन गायधने, नितीन बलराज तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.आज झालेल्या अंतिम सामन्यात साई इलेव्हन संघाने बेलापूर फायटर संघाचा ४ गडी राखून पराभव करून ५ व्या श्रीरामपूर सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.श्रीरामपूर फायटर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी  करण्याचा निर्णय घेतला.बेलापूर फायटर संघाने निर्धारित ६ षटकार ३६ धावा केल्या. विजयासाठी ३७ धावांचा आव्हान साई इलेव्हन संघाने पाचव्या षटकात चार गडी राखून पूर्ण केले व स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेत्या संघाला ₹ ५०००/- व चषक डिझायर गॅलरीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.उपांत फेरीच्या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी करणारा चैतन्य शिंदे,कुणाल थोरात तसेच स्पर्धेमध्ये उत्कृष्ट यष्टीरक्षण करणारा जस्मित गुलाटी,उत्कृष्ट क्षेत्रक्षण करणारा ध्रुव मुथा, उत्कृष्ट गोलंदाजी करणारा पवन बच्छाव,उत्कृष्ट फलंदाजी करणारा युवराज पवार यांना मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

बेलापुर  ( प्रतिनिधी  )- वैद्यकिय क्षेत्रांत काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपण देव मानतो परंतु पैशाला कमिशनला जास्त महत्व प्राप्त झाल्यामुळे हेच देव दुसऱ्याकडे केलेल्या सोनोग्राफीचा अहवाल पाहुन उपचारास नकार देतात त्यांना आपण काय म्हणणार ?                          अशीच एक घटना तालुक्याच्या ठिकाणी घडली रुग्ण हा बेलापुर गावातील होता दहा दिवसाच्या बाळाला डॉक्टर सोनोग्राफी सुचवतात, आपण घाई घाईने सोनोग्राफी करून तो रिपोर्ट घेऊन डॉक्टरांकडे जातो., परंतु डॉक्टरांनी  सुचविलेल्या सोनोग्राफी सेंटर मधून सोनोग्राफी न केल्यामुळे डॉक्टर सदर बाळावर उपचार करण्यास नकार देतात त्यावेळी आपली काय अवस्था होईल.?

 श्रीरामपूर येथील एका वैद्यकिय अधिकाऱ्याने केवळ बाळाची सोनोग्राफी आपण सुचविलेल्या सोनोग्राफी सेंटर मधून केली नाही म्हणून सदर बाळा वर उपचार करण्यास नकार दिला.

वैद्यकीय क्षेत्रात चालू असलेली कट कमीशन प्रॅक्टिस या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे सदर अन्यायग्रस्ताने बेलापुर  येथील सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे ज्येष्ठ नेते सुनील मुथा यांच्या कानावर ही घटना घातली.

सुनील मुथा यांनी विश्व हिंदू परिषदेचे डॉक्टर दिलीप शिरसाठ तसेच ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर संकेत मुंदडा यांना सदर घटनेची माहिती देऊन रुग्णास न्याय न मिळाल्यास या बाबतीत आपण रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू असा इशाराही दिला. त्यानंतर वेगाने चक्रे फिरली आणि सदर रुग्णास पुन्हा उपचारासाठी बोलावून त्याच्यावर उपचार करण्यात आले.

श्रीरामपूर शहरातील वैद्यकीय क्षेत्रात काही डॉक्टर आणि सोनोग्राफी सेंटरचे चालक यांचे रॅकेट असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. गरीब लोक पैशाची जमवाजमव करून महागड्या उपचाराकरीता खर्च करतात सोनोग्राफी करतात. परंतु ती सोनोग्राफी ग्राह्य धरली नाही तर परत सोनोग्राफी करण्यासाठी पैसे आणायचे कुठून... याचाही डॉक्टरांनी विचार करायला हवा. जनसामान्यांच्या मनातल्या आपल्या या प्रतिमेला तडा जाऊ नये याची पुरेपूर काळजी डॉक्टरांनीही घ्यायला हवी. रुग्ण सेवा हीच  ईश्वर सेवा  या ब्रीदवाक्य प्रमाणे सामाजिक बांधिलकी जपून आपला व्यवसाय केल्यास भविष्यातअसे संघर्षाचे प्रसंग निर्माण होणारच नाहीत अशी आशा मुथा यांनी व्यक्त केली. तरीही भविष्यात अशा प्रकारचा अन्याय रुग्णांवर झाल्यास संबंधित डॉक्टरांविरुद्ध कर्तव्यात कसूर केला म्हणून भादवी 166 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही सुनील मुथा यांनी दिला आहे..

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुरला दुषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारीवरुन बेलापुर ग्रामपंचायतीने बैठक बोलविली अन आजी माजी सदस्य  पदाधिकारी, ग्रामस्थ ,कामगार यांच्याकडून समस्येचे निकारण करण्याबाबत चर्चा झाली.अन त्यातून जे धक्कादायक सत्य बाहेर आले ते समजल्यावर "बरे झाले बैठक बोलविली " असेच म्हणावे लागले .    गेल्या दोन तीन महीन्यापासुन बेलापुर व परिसराला दुषित पाणी पुरवठा होत होता या बाबत सदस्य भरत साळूंके, रविंद्र खटोड सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले, चंद्रकांत नाईक यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या दुषित पाण्याचे नमुनेही व्हाटस्अप गृपवर फिरले. गांवकरी मंडळाचे मार्गदर्शक शरद नवले यांनी सरपंच महेंद्र  साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना तातडीने कारण शोधण्याच्या सूचना दिल्या.यावर उपाय योजना संदर्भात चर्चा करण्यासाठी सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी ग्रामस्थांची बैठक बोलविली. या बैठकीच्या चर्चेतून असे समोर आले की अनेक वर्षापासुन टाकी स्वच्छ केलेली नाही त्यामुळे तातडीने टाकी स्वच्छ करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामपंचायतीने तातडीने टाकी स्वच्छ करण्याच्या कामास सुरुवात केली असता भयानक सत्य समोर आले. त्या टाकीत चार ते पाच फुटापर्यत गाळ साचलेला होता अन हेच गाळ मिश्रीत पाणी बेलापुर व परिसरातील नागरीक गेल्या अनेक वर्षांपासून पित होते.त्या टाकीतील बऱ्याच वर्षापासून साचलेला गाळ काढण्याचे काम सुरु करण्यात आले असता मागील काळात टाकी केव्हा साफ करण्यात आली होती याची माहीती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता टाकी स्वच्छ केल्याची तारीख महीना वर्षच सापडले नाही या वरुन अनेक वर्षापासून नागरीक गाळ मिश्रीत पाणीच पित होते हे उघड झाले. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजाराचे प्रमाण सर्वात जास्त आहे.हे माहीत आसताना देखील त्याकडे दुर्लक्ष झाले आरोग्य विभागही या बाबत अनभिज्ञ होता पाण्याच्या  टाकीत साचलेला प्रचंड गाळ हा वरुन पडलेल्या पाण्यामुळे ढवळून निघत होता व तेच ढवळलेले गाळ मिश्रीत पाणी नागरीकाना पिण्यास येत होते हे या निमित्ताने समोर आले आहे.याबाबत  सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सांगितले की बैठकीत झालेल्या चर्चे नुसार बेलापूर बु ग्रामपंचायतीच्या वतीने ५ लाख लिटर पिण्याच्या पाण्याच्या टाकीतील गाळ काढणे व टाकी स्वच्छ करण्याच्या कामास सुरुवात केली आहे.त्या नंतर २ लाख लिटर ची टाकी देखील गाळ काढून स्वच्छ करण्यात येणार आहे.मेन टाकीवरील पाण्याचे सर्व हौद देखील गाळ काढून स्वच्छ करण्यात येणार आहेत.या आधी अमरधाम, खटकळी-गावठाण,२० घरकुल, अयोध्या कॉलनी येथील पाण्याच्या टाक्या गाळ काढून स्वच्छ करण्यात आल्या आहेत. तसेच सातभाई वस्ती, गायकवाड वस्ती, कुऱ्हे वस्ती, रामगड, सुभाषवाडी येथील टाक्या देखील लवकरच साफ करण्यात येणार आहेत.परिसरात असणाऱ्या सर्वच बारा पाणी साठवण टाक्याची स्वच्छता वेळो वेळी करण्यात यावी व टाकी केव्हा स्वच्छ केली ते टाकीवर तसेच बेलापुर ग्रामपंचायतीच्या नोंदवहीत नोंद केली जावी अशीही नागरीकांची मागणी आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget