या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पत्रकार श्री दिलीप दायमा हे होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांची सुंदर भाषणे ,बडबडगीत सादर केली .तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध संस्था तसेच परिसरातील व्यक्तींनी खाऊचे वाटप केले. शालेय गरजू विद्यार्थ्यांना श्रीरामपूर येथील काजल लोंगाणी मॅडम यांनी गणवेश वाटप केले या कार्यक्रमात कुंदन कुताळ,विजय कुताळ,शैलेश अमोलिक,मंगेश नजन,खंडागळे गुरुजी पत्रकार दिलीप दायमा यांनी शुभेच्छापर भाषणे केली.
या प्रसंगी चंद्रकांत नवले पाटील,रविंद्र कुताळ्,मनोज अमोलिक, दत्तात्रय पटेकर, श्रीकांत अमोलिक,बाबासाहेब धायकर ,निलेश सोनवणे दत्तात्रय खोसे, नवाब शेख, सागर साळवे, मेघाताई बंगाळ
निलेशअमोलिक ,नवले व अमोलीक ताई उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी श्री कल्हापुरे सर यांनी सर्वांचे आभार मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री कल्हापुरे सर व रावळे सर यांनी अथक परिश्रम घेतले.
त्याचाच एक भाग म्हणून या ही वर्षी त्यांनी चौकात अत्यंत आकर्षक सजावट केली होती. राष्ट्रध्वज सेल्फी पॉईंट उभारला होता. या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या शर्टला राष्ट्रध्वज चिकटवून मंडळाचे सदस्य शुभेच्छा देत होते . या लक्ष्यवेधी सजावटीचे शहरातील अनेक शासकीय अधिकारी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
त्यांच्या या उत्तम कार्याबद्दल त्यांना ॲड.समिन बागवान मित्र परिवाराच्या वतीने संविधान उद्देशिकेची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना बागवान म्हणाले की,शहरासह तालुक्यात देश प्रेम वाढविण्यासाठी व सामाजिक एकोपा जपण्यासाठी हा सातत्यपूर्ण उपक्रम कौतकास्पद असून इतरांना ही दिशादर्शक ठरेल.
यातून पुढे शहरासाठी विधायक कामे होतील आशावादही त्यांनी व्यक्त केला.
त्याचप्रमाणे नेवासा रोड येथील व्यापारी व रहिवासी यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त ऍड.समिन बागवान मित्र मंडळातर्फे मिठाई वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवि त्रिभुवन यांनी केले तर आभार प्रवीण जमधडे यांनी मानले.
यावेळी कॉ. जीवन सुरुडे, इरफान बागवान,महेबुब प्यारे,रवि त्रिभुवन,मुदस्सर शेख, रियाज शेख ,अबूजर पठाण, जावेदभाई पठाण,दिलावर बागवान, ॲड.फिरोज शेख,मोसिन पठाण,नाजीश शाह, ॲड.सोनवणे,अन्वर पठाण, मोहसीन प्यारे ,अकबर सय्यद, शोयब शेख, आमिर खान,अल्ताफ शेख,आय पी डेकोरेशन चे इरफान पठाण व इलियास पठाण यांनी केलेल्या उत्कृष्ट सजावटीसाठी त्यांचा ही सत्कार करण्यात आला तसेच याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार बरकतअली शेख, तृतीयपंथी आशु शेख, शाळेचे शिक्षक, पालक उपस्थित होते.
अध्यक्षपदावरून बोलताना बरकत अली म्हणाले की,माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक माऊली मुरकुटे यांनी भगीरथ प्रयत्नाने ज्ञान गंगा ग्रामीण भागात स्थापित केली.
डॉ.मुरकुटे ह्या हाडाची शिक्षिका असून पंचक्रोशी दर्जेदार शिक्षण देण्याचा वसा घेतला आहे.
आपल्या समाजाचाच भाग असलेल्या तृतीयपंथीयांना, आज २१ व्या शतकातही उपेक्षेचे, अवहेलनेचेच जगणे जगावे लागत आहे. जमेची बाब म्हणजे कायद्याने तरी त्यांची बाजू उचलून धरायला सुरुवात केली आहे.
कुणाच्या घरी बाळ जन्माला आलं, कोणी नवीन व्यवसाय सुरू केला किंवा कोणाच्या घरी लग्न वा अन्य मोठा सामाजिक समारंभ असेल, तरच आपल्या समाजाला तृतीयपंथीयांची आठवण येते. पण तृतीयपंथी हे समाजाचाच भाग आहेत, याचा कधीच सखोलपणे विचार केला जात नाही. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं आवश्यक आहे. तृतीयपंथीयांना आजही वेगवेगळ्या अनुभवांना सामोरं जावं लागतं. तृतीयपंथीयांच्या क्षमतेवर विश्वास ठेवला जात नाही, त्यांचा कुठल्याच स्तरावर स्वीकार केला जात नाही, माणूस म्हणून मनाप्रमाणे जगू दिलं जात नाही. शिक्षणाच्या हक्कापासूनदेखील ते वंचित आहेत, आपली ओळख सांगताना त्यांना केवळ नाव पुरेसं ठरत नाही तर सोबत जात, धर्म, कुटुंब यांचे दाखले जोडावे लागतात. परंतु कुटुंबानेच बेदखल केल्यानंतर पुरावे आणणार कुठून हा प्रश्न समोर उभा राहतो. ज्यामुळे ते समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील होऊ शकत नाहीत. या सर्व परिस्थितीमुळे आजही त्यांच्यासाठी रोजचं जिणं संघर्षमयच आहे.
शहरी आणि ग्रामीण भागातील तृतीयपंथीयांच्या समस्या आणि संघर्ष वेगळा आहे. त्याचा सखोल अभ्यास होण्याची आणि धोरण बनवताना स्वतंत्रपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. असे मत प्राईडच्या संस्थापिका ,सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी चिमकुल्या विध्यार्थ्यांनी विविध कलागुण व मनोगते व्यक्त केले.प्राईड स्कुल व कॉलेज प्राचार्या सौ.गोटे यांनी प्रास्ताविक केले.
टाकळीभान प्राईड शाळेचे मुख्याध्यापक प्रा.घोगरे यांनी आभार मानले
🙏
या बैठकीच्या अध्यस्थानी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री.बरकत अली शेख हे होते. बैठकीचे सूत्रसंचालन पत्रकार कासम शेख यांनी केले तर प्रास्ताविक पत्रकार सुभाष राव गायकवाड यांनी केले या कार्यक्रमात महाराष्ट्र लघु वृत्तपत्र पत्रकार संघाच्या सदस्यपदी काही नवीन पत्रकारांना सदस्यपदी घेण्यात आले असून त्यांना शेख बरकत अली यांच्या हस्ते नियुक्ती पत्र व ओळखपत्र प्रदान करण्यात आले
या बैठकीत देवळाली प्रवरा येथील महाराष्ट्र लघु वृत्तपत्र पत्रकार संघाचे राहुरी तालुका प्रमुख जेष्ट पत्रकार इब्राहीम शेख यांची इंडियन कॉग्रेस ब्रिग्रेड कमेटी (महाराष्ट्र) च्या राहुरी तालुका अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. तसेच श्रीरामपुर येथील युवा पत्रकार इम्रान शेख यांची इंडियन काँग्रेस ब्रिगेड कमिटीच्या श्रीरामपुर शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या दोघांचे निवडीचे पत्र इंडियन कांग्रेस बिग्रेड कमिटीचे महाराष्ट्र राज्य प्रभारी बरकत अली शेख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी पत्रकार कासम शेख, इब्राहीम शेख, असलम बीनसाद, सुभाष गायकवाड, गुलाब भाई शेख, एजाज सय्यद, इम्रान शेख ,यांनी उपस्थित पत्रकारां समोर मार्गदर्शनस्पद मनोगत व्यक्त केले व याकार्यक्रमाचे अध्यक्ष बरकत अली शेख यांनी पत्रकारीता कशी करावी या बाबत उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहम्मद पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बी. के. सौदागर, उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष राज मोहम्मद शेख, पत्रकार असलम बीनसाद,इब्राहीम शेख, सुभाष गायकवाड, कासम शेख, शफी शेख, शब्बीर कुरेशी मोईन शाह गुलाब भाई शेख, जमीर शेख, भैय्या शेख, यांनी शेवटी उपस्थितांचेआभार मानले