Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी )-स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त व बेलापुर ग्रामपंचायतीच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त बेलापूरात प्रथमच सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळावरील भोंग्यातून राष्टगीत लावण्यात आले होते                                 हर घर तिरंगा मोहीमेंतर्गत सकाळी साडेआठ वाजता गावातील सर्व नागरीकांनी एकाच वेळेस ध्वज उभारले त्यानंतर सकाळी नऊ वाजता बेलापूरातील मुख्य पेठेतील जामा मस्जिद साईबाबा मंदिर, बिरोबा मंदिर श्री चक्रधर स्वामी मठ गावातील शालोम चर्च,ईनामदार मशिद,शिलोह चर्च आदि प्रार्थनास्थळ तसेच सर्व शाळामधील 

स्पिकरवरुन राष्ट्रगीत लावण्यात आले नागरीकांना अवाहन केल्याप्रमाणे सर्व नागरीक घरातून रस्त्यावर येवुन राष्ट्रगीताकरीता उभे राहीले बेलापूरातील आझाद मैदान येथे सर्व नागरीक जमा झाले त्या ठिकाणी सूचना दिल्याप्रमाणे बरोबर नऊ वाजता सर्वत्र राष्ट्रगीत सुरु झाले प्रत्येक  नागरीक राष्ट्रगीताचा मान ठेवुन जागेवरच उभे राहीले राष्ट्र गीतानंतर वंदे मातरम़् भारत माता की जय च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला बेलापुर जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेतील मुलींच्या लेझीम पथकाने अनेकांना आचंबित केले त्यानंतर मुलींनी देशभक्तीपर गीत सादर केले. बचत गटाच्या महिलांनी गावातून तिरंगा फेरी काढली. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य,सोसायटी पदाधिकारी व संचालक,विविध राजकीय पक्षांचे नेते व सदस्य,विविध संस्था व पतसंस्था यांचे पदाधिकारी, तरुण मंडळांचे प्रतिनिधी,विविध मान्यवर, नागरिक आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार देविदास देसाई यांनी केले.प्रास्ताविक सरपंच महेंद्र साळवी यांनी केले तर उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी आभार मानले.

बेलापूर(वार्ताहर)बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या वतीने 'हर घर तिरंगा अभियान" अंतर्गत गावातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांची गावातून सवाद्य तिरंगा रॅली काढण्यात काढण्यात आली. त्यास हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असुन बेलापूर व परिसरात एकाच वेळेस ध्वजारोहण व सामूदायीक राष्ट्रगीत घेण्यात येणार आहे देशभरात स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबविले जात आहेत.यात प्रामुख्याने हर घर तिरंगा अभियानाचा समावेश करण्यात आलेला आहे.या आभियान अंतर्गत बेलापुर  ग्रामपंचायतीच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांची सवाद्य तिरंगा फेरीचे आयोजन करण्यात आले होते.                                                          जे.टी.एस.हायस्कूलच्या प्रांगणात या फेरीचा शुभारंभ झाला.त्यानंतर  गावातून  तिरंगा फेरी काढण्यात आली.यात जे.टी.एस.कनिष्ठ महाविद्यालय,जे.टी,एस.हायस्कूल,जि. प. मराठी मुले तसेच मुलींची शाळा,उर्दू शाळा,अहिल्यादेवी होळकर उर्दू शाळा आदिं शाळांचे विद्यार्थी हातात तिरंगा ध्वज हाती  घेत सहभागी  झाले होते.यावेळी भारत माता की जय,वंदे मातरम,हर घर तिरंगा आदि घोषणांनी वातावरण चैतन्यमय बनले होते.                          सदर प्रसंगी मा.जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे कै ,मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन व विद्यमान सदस्य रविंद्र खटोड जेष्ठ पत्रकार देविदास देसाई ज्ञानेश गवले नवनाथ कुताळ  सुहास शेलार दिलीप दायमा किशोर कदम भाजपाचे प्रफुल्ल डावरे तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे प्रकाश कुऱ्हे महेश कुऱ्हे प्रभात कुऱ्हे  आदिसह गावातील विविध मान्यवर,शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक आदिंसह शाळांचे मुख्यध्यापक तसेच अध्यापक उपस्थित होते.  शनिवार  दि.१३ रोजी सकाळी साडे आठ वाजता गावातील ग्रामस्थांनी आपआपल्या घरी तिरंगा ध्वजारोहण करावे ,तसेच सकाळी नऊ वाजता सामुदायिक राष्ट्रगीत होईल.यावेळी प्रत्येक नागरिकाने आहे तिथे उभे राहून राष्ट्रगीताचा सन्मान करावा असे अवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

बेलापूरः(प्रतिनिधी  )-येथील जे.टी.एस हायस्कूलच्या सन १९९६-९७ च्या बॕचच्या माजी विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा अभियानासाठी दोनशे तिरंगा ध्वज बेलापुर  ग्रामपंयतीस सूपूर्त केले. बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या वतीने हर घर तिरंगा अभियान राबविले जाणार आहे.सदर अभियनासाठी ग्रमपंचायत मार्फत तिरंगा ध्वज वितरण केले जाणार आहे.या अभियानासाठी सदर माजी विद्यार्थ्यांनी दोनशे तिरंगा ध्वज सरपंच महेन्द्रर साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांचेकडे सुपूर्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले,सुधाकर खंडागळे ,पञकार देविदास देसाई,दिलिप दायमा,सुहास शेलार तसेच ग्रुपचे सदस्य राधेश्याम अंबिलवादे,कैलास दळे,विजय पोपळघट,योगेश कोठारी,अजीम सय्यद ,अनिल मुंडलिक,मंगेश गवते,शैलेश अमोलिक उपस्थित होते.

श्रीरामपूर प्रतिनिधी - गेल्या अनेक वर्षांपासून हजरत सैलानी बाबा दरबार श्रीरामपूर या ठिकाणी सवाऱ्याचे विसर्जन होत आहे गेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षानंतर मोहरम ची मिरवणूक काढण्यात आली श्रीरामपूर शहरातील सर्वधर्मीयांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती श्रीरामपूर शहरात कित्येक वर्षांपासून ची परंपरा असलेले हजरत सैलानी बाबा दरबार मौलाअली यांची सवारी आठ मोहरम रोजी श्रीरामपूर शहरातील मेन रोड भागातून हजरत सय्यद शाह कादरी बाबा तसेच काजी बाबा व बारा इमान दर्गा या ठिकाणी भेट देऊन पुन्हा छत्रपती शिवाजी रोड

मार्गे हजरत सैलानी बाबा दरबार या ठिकाणी मिरवणूक काढली जाते. श्रीरामपूर शहरातील अनेक भागांमध्ये सावरींची  स्थापना केली जाते श्रीरामपूर शहरात वर्षानुवर्षांपासून सवारी मिरवणूक व इराणीं धर्मीयांचा मातम हे लोकांचं आकर्षण ठरत आहे शहरातील हजरत सय्यद शाह कादरी बाबा यांच्या दर्गेजवळ भावीक मोठ्या भक्ती भावाने दर्शनासाठी व पाहण्यासाठी मोठी गर्दी करतात यावेळी पोलिसांचे बंदोबस्त लावण्यात आले होते 

श्रीरामपूर शहरात अनेक ठिकाणी सावरींची स्थापना केली जाते त्यामध्ये हुसेन नगर हेही प्रसिद्ध आहे तसेच डावखर रोड येथील तृतीयपंथी इमामे कासीम यांची सवारी ही आकर्षण ठरली जाते यामध्ये मिलत नगर,ईदगाह परिसर, सूतगिरणी फाटा, गोंदवणी रोड,बेलापूर रोड वार्ड क्रमांक ७, बेलापूर, अशोक नगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सवारी चे स्थापना केली जाते हे सर्व सवारी मोहरम १०ला शहरातून मुख्य मार्गावरून  विसर्जन मिरवणूक होतात परंपरेप्रमाणे याही वर्षी सावरींची मिरवणूक शहरातून व परिसरातून करण्यात आली,


बेलापूर याठिकाणी मुख्य बाजार पेठेतून सवारी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली यामध्ये भक्ती भावाने सर्व धर्मीयांनी दर्शनासाठी गर्दी केली होती व काही ठिकाणी प्रसाद शरबत याचंही वाटप करण्यात आलं या सर्व सवाऱ्या हजरत सैलानी बाबा दरबार या ठिकाणी येऊन विसर्जन होतात तर काही आपापल्या ठिकाणी विसर्जन केले जाते गेल्या दोन वर्षानंतर आज श्रीरामपूरकरांना याचा लाभ मिळाला यावेळी हजरत सैलानी बाबा दरबार या ठिकाणची सवारी शहरवासीयांना आकर्षण ठरले हजरत सैलानी बाबा दरबार बहुउद्देशीय संस्था श्रीरामपूर यांच्यावतीने दिनांक ११ ऑगस्ट रोजी खिचडा महाप्रसादाचा आयोजनही करण्यात आलेला आहे याकरता सर्व शहरवासीयांना  हजरत सैलानी बाबा दरबार बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने आमंत्रण देण्यात आलेले आहे. या सर्व मोहरम मिरवणुका शहर भर आंनदात आणि जल्लोषात पार पाडण्यासाठी शान-ए-करबला कमेटीचे पदाधिकारी असलम बिनसाद,तमन्ना सुरय्या नायक,कलीम बिनसाद,ऍडव्हकेट अजित डोखे,अजीज अहेमद शेख(बेलापूर )तसेच पोलीस प्रशासन यांनी अधिक परिश्रम घेतले सर्व कार्यक्रम शहर वासियांच्या सहकार्याने वेवस्थित पार पडल्याणे सर्वांना यश मिळाले. 

नाशिक प्रतिनिधी-महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन आणि नाशिक जिल्हा ज्यूदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथे वरिष्ठ गटाच्या 49 व्या महाराष्ट्र राज्य ज्यूदो अजिंक्यपद स्पर्धेला  मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.या स्पर्धेचे उद्घाटन यशवंत व्यायामशाळेचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या 26 जिल्ह्यांतून 252 खेळाडू सहभागी झाले आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत पदकप्राप्त खेळाडूंचा समावेश आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांची कमाई करणारे खेळाडू अजिंक्य वैद्य, श्रद्धा चोपडे, अपूर्वा पाटील, समीक्षा शेलार, आदित्य धोपवकर, प्रदीप गायकवाड, शुभांगी राऊत यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उद्घाटनानंतर विविध वजनी गटाच्या पुरुष आणि महिलांच्या स्पर्धांना सुरुवात झाली.यामध्ये महिलांच्या 63 किलो वजनी गटात पुण्याच्या गौतमी कांचनने अंतिम लढतीत कोल्हापूरच्या रुध्वी श्रुंगारपुरेचा पराभव करून विजेतेपद मिळवले, तर भूमी कोरडे (मुंबई) आणि तन्वी पवार (सिंधुदुर्ग) यांनी संयुक्त तिसरा क्रमांक मिळवला. पुरुषांच्या 73 किलो वजनी गटात नागपूरच्या साईप्रसाद काळेने सुंदर खेळाचे प्रदर्शन करून अंतिम सामन्यात यवतमाळच्या अभिषेक दुधेचा पराभव करून या गटाचे विजेतेपद आपल्या नावे केले. तर मुंबईच्या राहुल बोभडी आणि ठाण्याच्या आदर्श शेट्टीला संयुक्त तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करणार्‍या खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड केली जाणार असून 16 ते 20 ऑगस्ट, 2022 दरम्यान लखनौ येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील, अशी माहिती आयोजकांनी दिली. या स्पर्धेचे संचालक म्हणून ठाण्याचे आंतरराष्ट्रीय पंच शैलेश देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जिल्ह्यांतील 20 पंच कार्यरत आहेत. तर आंतरराष्ट्रीय पंच स्मिता शेट्टी, शिल्पा शेरिगर या मॅटप्रमुख म्हणून काम बघत आहेत. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्पर्धा आयोजन समितीचे योगेश शिंदे, स्वप्नील शिंदे, स्वाती कणसे, सुहास मैंद, माधव भट आदी प्रयत्नशील आहेत.

बेलापुर  (प्रतिनिधी )-नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच बेलापुरात फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले                                                    नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच बेलापूरातील मुख्य चौकात शरदराव मित्र मंडळाच्या वतीने फटाक्याची अतिषबाजी करुन मिठाईचे विटप करण्यात आले बेलापूरातील शरदराव नवले मित्रमंडळाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला या वेळी मा जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे भाजपाचे युवा नेते प्रफुल्ल डावरे पुरुषोत्तम भराटे हाजी ईस्माईल शेख ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख रमेश अमोलीक स्वाती अमोलीक रावसाहेब अमोलीक सागर ढवळे राकेश कुंभकर्ण मोहसीन सय्यद रत्नेश गुलदगड जाकीर हासन शेख प्रभात कुऱ्हे अरुण शिंदे जिना शेख अनवर शेख ज्ञानेश्वर वाबळे अजिज शेख प्रविण बाठीया शफीक आतार रमेश लगे राजेंद्र काळे शफीक बागवान कुमार नावंदर रमेश कुमावत आली शेख अमोल तेलोरे अफजल शेख मयुर खरात कृष्णाजी गाढे सिराज कुरेशीआदिसह ग्रामस्थ उपस्थित होते

करबला युद्ध " जगातील गावा- गावात शहरात युद्धाच्या आठवणी आपोआपच मोहर्रम च्या दहा तारखेला " यौम- ए - आशुरा " च्या दिवशी कितीही कठोरमनाच्या माणसात जाग्या होतात.प्रेषित मुहम्मद स्व. यांनी अल्लाह च्या सत्यधर्म ईस्लामचा प्रसार- प्रचार करण्यासाठी अत्यंत हाल- अपेष्टा - छळछावणीत- उपाशीपोटी- कष्ट सहनशीलतेचे अंत बघून त्याला अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आशिया- युरोप- अफ्रीका खंडातील बहुतेक देशात सुव्यवस्थितपणे परिवर्तन घडवून आणले,जगातील प्रत्येक मानवाच्या कल्याणासाठी,जीव जंतू च्याही रक्षणासाठी, जगात ठिकठिकाणच्या राजेशाही, हुकूमशही, बादशाही,परीवार वाद, जुलमी राजव्यवस्था संपूर्ण लोकशाही पद्धतीने, (तलवारी च्या जोरावर नव्हेतर) आपल्या आचरणाने संपुष्टात आणुन " लोकशाही " व्यवस्था समस्त जगाला दाखवून देवून, अल्लाहच्या पवित्र कुरआन व हादीस नुसार स्वतः पवित्र मदीना शहरात याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जगप्रसिध्द मदीना करार करून जगाला दाखवून दिली. आपल्या अनुयायांना मित्रगण - सहाबा यांना आपल्या हयातीतच माझ्या नंतर समस्त जगात शासन व्यवस्था कशा पद्धतीने  निर्माण करावयास हवेत याचे प्रशिक्षण दिले.यासाठी आपल्या खास विश्वासू मित्र, सहाबा यांना "खलिफा " अल्लाहच्या नायब (डेप्युटी) ला म्हणतात, खलिफा ईस्लामी व्यवस्थेचा प्रशासकीय प्रमुख असतो.त्याला पवित्र कुराण,हादीस व " मजलिस - ए - शुरा" च्या अनुसरून निर्णय घेण्याचा अधिकार असतो. "मजलिस - ए - शुरा" अर्थात" तज्ञ,जाणकार सल्लागार मंडळ स्थापून " शुराई - निजाम"च्या माध्यमातून  लोकप्रशासन करणे यालाच " निजाम - ए -खिलाफत " म्हटले जाते ,याचे वारंवार उदाहरण प्रेषित मुहम्मद पैगंबर स्वतः प्रमुख असून सुध्दा आपले कोणतेही निर्णय आपल्या साथीदार मित्रांशी सल्ला मसलत करुनच घेत होते, प्रमुख गोष्ट म्हणजे त्या मध्ये किती ही छोट्या मित्राला ही सल्ला देण्याचा आधिकार होता. हे सल्ले अल्लाहा प्रत्येकाच्या मस्तिष्कात बुद्धित घालून त्या मार्फतच येत असतात. यालाच लोकशाही म्हणतात.असो.

प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी आपल्या मजलिस -ए - शुरांच्या सल्लागार नुसार असे पुण्यवान (राशिदीन) , अनुभवी (१) ह. अबु-बकर सिद्दीक रजि. (२) ह.उमर फारुख रजि. (३) ह. उस्मान गनी रजि. (४) ह. आली बिन आबु तालीब रजि. या वेगवेगळ्या घराण्यातील  कर्तव्यदक्ष साथीदारांची  क्रमाक्रमाने पुढील चार खलीफांची निवड करून त्याच्यावर सर्व जगभरातील लोकांना" एकनिष्ठता" ची शपथ (बैत) दिली गेली. प्रेषित मुहम्मद स्व. यांच्या महापरिनिर्वाणानंतर वरील चार खलिफांनी खूप चांगल्याप्रकारे ईस्लामी राज व्यवस्था आशिया, युरोप, अफ्रीका खंडातील खूप देशात आपल्या प्रतिनिधी मार्फत चालवली.. त्या चार ही खलिफांच्या राज व्यवस्थापनास " खुलफा - ए - राशिदीन " चे युग " म्हणतात, अर्थात या पुण्यंवान लोकांनी अल्लाह च्या पवित्र कुराण-हादिस च्या शिकवणुकीनुसार राज्य व्यवस्था चालवली. जगात आज ही आजरामर आहे  . 

महात्मा गांधी जी व विविध तज्ञांनी वेळोवेळी त्यांच्या कार्याची दखल घेऊन आपल्या देशात तशी राजकीय व्यवस्था करण्याची गरजही व्यक्त केली आहे ,असो.

चौथ्या खलिफा  हज. अली  रजि. यांच्या महानिर्वाणानंतर त्यावेळच्या 'सल्लागार (मजलिस ए शुरा) मंडळांने काही काळ ह. अलि. रजि.चे ज्येष्ठ पुत्र ह. हसन रजि. यांना खलिफा म्हणून घोषित करण्यात आले. मात्र तीव्र स्वरूपाच्या विरोध, मतभेदांमुळे व निष्पाप जीव धोक्यात घालून, निष्पाप नागरिकांना त्रास व रक्त सांडले जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने ह. हसन बिन अली रजि. यांनी स्वतः हुन पदत्याग केला.

या प्रसंगानंतर प्रेषित मुहम्मद पैगंबरांच्या शिकवलेल्या तत्त्वाला हारताळ फासून त्या काळातील मसजिस ए शुराला ( कायदे मंडळा) डावलून मनमानी करून प्रेषित मुहम्मद स्व यांचेच एक सहकारी ह. आमीर मुआविया रजि. यांनी स्वत:ला स्वयंघोषित खलिफा म्हणून  घोषित केले ,परंतु त्यांनी ईस्लामच्या तत्त्वज्ञान, तत्त्वप्रणाली नुसार न करता " राजेशाही बादशहा पध्दतीनुसार राजेशाही राहणे, वागणूक व एक मोठा राजप्रासाद ची बांधणी करुन राज्य कारभार करण्यात आला. हे इस्लामी संस्कृतीच्या राज्य व्यवस्थानेपला कदापीही मान्य नव्हते. त्यानंतर ह.आमीर मुआविया येथे न थांबता त्यांनी आपल्या हयातीत स्वतःचा अपात्र मुलगा यजिद यांस आपला उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती करून वीस वर्षे राजेशाही सारखा राज्य कारभार करुन राजधानी मदीनावरुन कुफा (इराक) वरुन सिरिया येथे हलविण्यात आल्यानंर आपल्या मृत्यू पश्चयात आपला अपात्र मुलगा यजिद यांस राजा करण्यात आले.यजिदच्या राजेपदास व क्रुर शासनपध्दतीस  जनतेचा जागोजागी तीव्र विरोध होत होता. नागरिकांना प्रेषित मुहम्मद स्व. याचे अवडते नातू हजरत इमाम हुसैन रजि. यांची खलिफा म्हणून निवड व्हावी म्हणून संपूर्ण जनमत होते व नागरिक वारंवार पत्रव्यवहार करुन मागणी याचना करून बारा हजारांपेक्षाही जास्त पत्रे लिहीली जावून सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याची ग्वाही देत होते, सर्वांच्याच मागणीची दखल घेऊन ह. इमाम हुसैन रजि. आपल्या खानदानातील मुलांबाळांसह, वडील बंधू ह. हसन यांच्या व लहान सर्व बंधूं च्या सर्व परीवारासह मदीनावरुन कुफा येथे जाण्यासाठी निघाले. ही बातमी ऐकून राजा यजिद घाबरून सर्व कुफा वासीयांना धमकावत,जो ह. इमाम हुसैन यांना साथ,थारा देईल त्या सर्व साथ देणाऱ्यास मृत्यूदंड दिले जाईल अशी धमकी दिली. राजा यजिद कडून कुफा शहरातील त्याच्या मुख्य गव्हर्नर ईबने जियाद यांस आदेश देण्यात आले की, कोणत्याही परिस्थितीत ह. इमाम हुसैन यांना यजिदला राजा करण्यास राजी करावेत. नाहीतर सरळसरळ कैद करून दरबारात हजर करण्यात यावे. 

प्रवासा दरम्यान फुरात नदीच्या काठावर करबला येथील मैदानावर गव्हर्नर ईबने यजिद ने चार हजार सैनिकांसह ह. इमाम हुसैन यांचा घेराव करून यजिदला राजा करण्याच्या सर्व अटी व शर्ती जुलूमशाहीने मान्य करण्यास सांगितले, परंतु जालीम,अत्याचारी,कपटी यजिदला समर्थन देण्यास ह. इमाम हुसैन यांनी स्पष्ट नकार दिला. या नकारानंतर ईबने जियाद ने युद्धाचे स्पष्ट आव्हान केल्यानंतर ह. ईमान हुसैन नी रक्त,जीवितहानी टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत तीन प्रस्ताव मांडले, परंतु क्रुर गव्हर्नर जियाद याने मागेपुढे न पाहता सरळसरळ ह. हुसैन यांच्यावर क्रुरपणे अत्याचार करण्यास सुरुवात करून कुरात नदीचे पाणी ह. हुसैन यांच्या परीवारांस पाणी बंदी केली गेली, तीन दिवस म्हणजे ७२ तास रखरखत्या अरबस्थातील उन्हाळ्यात विना पाण्याची कुंटूंबावर वेळ आली, हालहाल करून, सहा महिन्याचे बाळ अली असगर यांच्यावर त्रिकोणी बान मारुन त्यांची हत्या केली, सात वर्षांच्या कासिम या ह. हसन यांच्या मुलाला घोडयाच्या टाचेखाली चिरडून ठार मारण्यात आले, त्यांच्याबरोबर जे होते त्यांचे देखील हालहाल करून बहात्तर ७२  लहान मोठ्यांना गळे चिरुन ठार करण्यात आले. युध्दात सर्व पुरुष शहीद, हौतात्म्य झाले. हा दिवस १० मुहर्रम हिजरी ६१ प्रमाणे इंग्रजी दिनांक १० ऑक्टोबर ६८० या दिवशी  ७२ हुतात्म्यांनी फक्त ईस्लामच्या पवित्र कुराण - हादीसच्या लोक कल्याणकारी राज्य व्यवस्थेसाठी  शहीद झाले, हौतात्म्य पत्कारले.

करबलाच्या या युद्धातुन जगाला संदेश मिळाला की कोणत्याही अत्याचारी व्यवस्थेपुढे गुडघे टाकायचे नसतात तर बलीदान देण्यास तयार राहिले पाहिजे... 

हजरत इमाम हुसैन यांनी जुलमी यजिदच्या क्रुर, जुलमी, अत्याचारी ,दमनकारी सत्तेपुढे गुडघे टेकले असते तर स्वतः व संपूर्ण परिवार वाचला असता, परंतु प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीनुसार अल्लाहच्या सत्यधर्म रक्षणासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबांचे बलीदान दिले,

म्हणुनच शायर म्हणतो की.. " करबला के बाद ईस्लाम जिंदा होता है.... "


लेखक - डॉ. सलीम सिकंदर शेख

बैतुशशिफा हॉस्पिटल,श्रीरामपूर

 मोबा.नं. 9271640014

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget