Latest Post

अहमदनगर प्रतिनिधी-पुण्यात  रिक्षा चोरून नगर शहरात  विक्रीसाठी आणलेल्या दोन रिक्षा कोतवाली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सोन्या ऊर्फ सुरज शिवाजी शिंदे (वय 28, रा. बुरूडगाव रस्ता, नगर) याला अटक करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांना खबर्‍याकडून माहिती मिळाली की, नालेगावातील  अमरधाम मागील बाजूस एकजण दोन चोरीच्या रिक्षा विक्री करण्याकरिता घेऊन आलेला आहे. कोतवाली पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे शुक्रवारी (ता. 23) सकाळी 8 वाजता छापा  टाकला. या ठिकाणी सोन्या ऊर्फ सुरज शिवाजी शिंदे हा दोन रिक्षासह मिळून आल्या. त्याच्याकडे रिक्षाचे कागदत्रविषयी विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने रिक्षावर असलेले क्रमांक खोटे असल्याबाबत खात्री झाली. रिक्षाचे चेसी नंबर व इंजिन नंबर यावरुन माहिती घेतली असता, पुणे जिल्ह्यातील  एमआयडीसी भोसरी पोलिस ठाणे  (पिंपरी चिंचवड) व चिखली पोलिस ठाणे हद्दीतून रिक्षा चोरीला गेल्या होत्या. साडे चार लाख रूपये किंमतीच्या दोन्ही रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी सुरज शिंदे यास पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हे शोध पथकातील शरद गायकवाड, योगेश भिंगारदिवे, दीपक रोहकले, अमोल गाडे, सुजय हिवाळे, सोमनाथ राउत, तान्हाजी पवार, हेमंत थोरात, अभय कदम, अतुल काजळे, सतीश भांड, प्रशांत बोरुडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

श्रीरामपूर प्रतिनिधी-भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा झेंडा’ उपक्रमाअंतर्गत शहरात सुमारे 20 हजार तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात येणार आहेत. या उपक्रमाचे नियोजन करण्यासाठी सोमवार दि.25 जुलै 2022 रोजी सायंकाळी 5 वा. नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात तसेच देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी, या उद्देशाने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार दि.11 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये हर घर झेंडा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियानात श्रीरामपूर शहरातील नागरिक, दुकानदार यांनी आपल्या घरावर, इमारतीवर, खाजगी आस्थापनेवर किंवा आपल्या संस्थेवर स्वखर्चाने भारतीय राष्ट्रध्वज उभारणे अपेक्षित आहे. या अभियानात श्रीरामपूर नगरपालिका क्षेत्रात नागरिक, दुकानदार, शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था आदींच्या सहभागातून अंदाजे 20 हजार तिरंगा ध्वज लावण्यात येणार आहेत. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर झेंडा’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सोमवार दि.25 जुलै 2022 रोजी सायंकाळी 5 वा. नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आयोजित बैठकीस नागरिक, व्यापारी, सामाजिक व सेवाभावी संस्था पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशासक तथा प्रांताधिकारी अनिल पवार, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-दोन मोटारसायकल व एक टँकरच्या विचित्र अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असुन पोलीसांनी टँकर ताब्यात घेतला आहे मयत हे नायगाव नाऊर येथील असुन नायगाव येथे शोकाकुल वातावरणात त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले   या बाबत मिळालेली माहीती अशी की नायगाव येथील बाळासाहेब जगन्नाथ गायकवाड  वय ४५वर्ष त्यांचा मुलगा अजीत बाळासाहेब गायकवाड वय २० वर्ष त्यांची मुलगी वय वर्ष १८ हे तिघे एम एच १७ ७१३१या बजाज सीटी १०० या मोटार सायकलवर बेलापुरकडे चालले होते .ते गायकवाड वस्ती नजीक असताना श्रीरामपुर कडे जाणाऱ्या एका मोटारसायकलचा डँश त्यांना लागला तसे ते तीघेही रस्त्यावर पडले अन दुर्दैवाने श्रीरामपुर हुन बेलापुरकडे मळीचा टँकर एमएच ४३यू ३३३६ हा भरधाव वेगाने चालला होता मोटारसायकलचा डँश लागल्यामुळे हे तिघेही रस्त्यावर फेकले गेले अन एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे भरधाव टँकरने तिघांनाही चिरडले दिपाली बाळासाहेब गायकवाड हीचा जागेवरच मृत्यू झाला तर बाळासाहेब गायकवाड यांच्या पोटावरुन टँकरचे चाक गेले होते त्यांना साखर कामगार दवाखान्यात हलविण्यात आले होते परंतु उपचारा पूर्वीच त्यांचा  मृत्यू झाला अजित  गायकवाड अत्यवस्थ असताना पुढील उपचारासाठी नगरला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला घटना घडली त्याच वेळेस बेलापुरचे पोलीस हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे हे तेथुन चालले होते त्यांनी तातडीने जखमींना दवाखान्यात हलविले या वेळी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती ती गर्दी हटविताना पोलीसांना मोठी कसरत करावी लागली अनेकानी अपघातात मदत करण्याऐवजी मोबाईल मध्ये फोटो काढण्यात धन्यता मानली  घटनेची माहीती नायगाव नाऊर परिसरात समजताच नायगाव परिसरावर शोककळा पसरली शोकाकुल वातावरणात तिघावरही अंत्यसंस्कार करण्यात आले या बाबत पोलीसांनी टँकर ताब्यात घेतला असुन एका मोटारसायकलचा पोलीस शोध घेत आहे

येवला {प्रतिनिधी} येवला येथील मिल्लत नगर भागातील रहिवाशी राजनीति समाचार वृत्तपत्र व न्यूज पोर्टल चे प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते अबुजर उस्मान शेख यांची महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या येवला शहर संघटक पदी निवड करण्यात आली असून याबाबतचे नियुक्तीपत्र व ओळखपत्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी प्रदान केल्याची माहिती नाशिक जिल्हा अध्यक्ष उस्मान के. शेख यांनी दिली

या निवडीबद्दल अबुजर शेख यांचे पत्रकार संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, महासचिव शेख फकीर महंमद, प्रदेश उपाध्यक्ष  बी. के. सौदागर, युवा प्रदेश कार्याध्यक्ष संदीप पवार, प्रदेश उपाध्यक्ष नासिर खान( नाशिक), प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण (चांदवड), नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मान भाई शेख, नाशिक जिल्हा सचिव वहाब खान, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव केदारे, येवला तालुका अध्यक्ष श्रीकांत गोसावी, चांदवड तालुका सचिव रवींद्र केदारे, चांदवड तालुका उपाध्यक्ष राहुल गायकवाड, पाटोदा सचिव दादा भाऊ मोरे, पाटोदा उपाध्यक्ष मुजम्मिल शेख, येवला शहराध्यक्ष हाजी शकील भाई शेख, येवला शहर सचिव कालिदास अनावडे, पत्रकार प्रकाश मालवकर, पत्रकार माधव सोळशे, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष विजय खरात, इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष अस्लम बिनसाद, अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष राज मोहम्मद शेख, उत्तर जिल्हा कार्याध्यक्ष कासम भाई शेख, उत्तर जिल्हा उपाध्यक्ष एजाज भाई सय्यद, अहमदनगर जिल्हा महिला अध्यक्ष सौ. समीना रफिक शेख, महिला जिल्हा सदस्य सौ. कल्पना काळे, आदींनी त्यांचे अभिनंदन केले

श्रीरामपूर : शहरातील वार्ड नंबर २ परिसरात राहत असलेल्या. एका अल्पवयीन दलित मुलीचे ३ वर्षांपूर्वी शाळेत जातांना अपहरण करून. तिला धर्मांतरासाठी अल्पवयीन मुलीच्या इच्छे विरोधात शारिरीक मानसिक छळ करून, बळजबरीने तिच्याशी निकाह केला. यासंदर्भात १९ जुलै रोजी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या, इरफान कुरेशी उर्फ मुल्ला याच्या विरुद्ध. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शहरातील अहिल्यादेवी नगर परिसरात मुल्ला व त्याच्या गुन्हेगारी टोळीची प्रचंड दहशत असून. सदरचा गुन्हा दाखल झाल्या नंतर, पीडित अल्पवयीन मुलगी त्याच परिसरात राहत असल्याने. दाखल गुन्ह्यातील तडजोडसाठी, पीडित कुटुंबावर दाबाव आणण्याचा प्रयत्न मुल्ला टोळीकडून केला जात असल्याने. त्या मुलीला त्वरीत,अहिल्यादेवीनगर परिसरातून काढून बालसुधार गृहात पाठविण्यात यावे,पीडीत मुलीचे बळजबरीने धर्मांतरण करून. तिचे मुल्लापाजीशी लग्न लावणा-या मोलानाला दाखल गुन्ह्यात आरोपी करण्यात यावे. पीडीत अल्पवयीन  मुलगी गरोदर असून, तीची डिलेव्हरी पुर्व डि.एन.ए. चाचणी करण्यात यावी. या गुन्ह्यात मुल्लाला मदत करणा-या त्याच्या टोळीतील गुन्हेगार सदस्यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात यावे. या गुन्हेगारांचा कायम स्वरूपी बंदोबस्त होण्यासाठी, मुल्ला व त्याच्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी. या करिता हिंदू रक्षा कृती समितीच्या वतीने, शहर पोलीस ठाण्यात शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून निवेदन दिले. सदरचे आंदोलन भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते,मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे,माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,,विश्व हिंदू परिषदेचे डॉक्टर दिलीप शिरसाठ, शशिकांत कडूसकर, शिवप्रतिष्ठानचे किसन ताकटे,श्रीराम सेवा संघाचे कुणाल करंडे ,अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीचे प्रवीण फरगडे,देविदास चव्हाण,संजय यादव सोमनाथ कदम , विजय लांडे, सिद्धार्थ साळवे,महेश विश्वकर्मा आदींसह हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

बेलापुर  (प्रतिनिधी) - लाभार्थी रेशनकार्ड धारकांना लाभाबरोबरच कामाची गुणवत्ता देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण प्रणाली आयएसओ मानांकनासाठी सर्वांनी सहकार्य करावे. यातून आपल्या कामाच्या गुणवत्तेत सुधार होवून लाभार्थींना ही याचा लाभ होणार आहे. शासनाच्या प्राधान्य सुची कार्यक्रमवरील हा एक प्रमुख कार्यक्रम असल्याने लवकरच सर्व स्वस्त धान्य दुकानरांकडून होत असलेल्या सहकार्यातून जिल्ह्याची सार्वजनीक वितरण व्यावस्था आयएसओ मानांकनास पात्र ठरणार असल्याचा विश्वास जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी व्यक्त केला.

अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडीत जवाहरलाल नेहरू सभागृह येथे जिल्ह्यातील नायब तहसीलदार पुरवठा निरीक्षक गोदामपाल धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी तालुकाध्यक्ष यांची आयएसओ मानांकन बाबतच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम, जिल्हा पुरवठा निरीक्षण अधिकारी अभिजीत वांढेकर, राजेंद्र राऊत, दत्तात्रय भावले, दिपाली तांबे  व कार्यालयीन सहकारी मनिषा सचदेव आदि व्यासपिठावर उपस्थीत होते. 

सार्वजनिक वितरण प्रणालीस आयएसओ मानांकनाचे काम तीन स्तरावर होत आहे, तालुकास्तरीय पुरवठा विभाग, तालुकास्तरीय गोदाम व स्वस्त धान्य दुकान अशा तीन स्तरावर काम सुरू आहे. दुकानाची इमारत पक्के बांधकाम असणे आवश्यक आहे. या माध्यमातून जिल्ह्यात सारखेपणा व आकर्षकपणा यावा या करीता जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांना एकच रंग असणार आहे, सर्वत्र एक सारख्या रंगाचे व आकाराचे फलक,तसेच  सर्व धान्य दुकानदारांना ड्रेस कोड, तसेच ओळखपत्र असणार आहे, अद्यावत नोंद वह्या व विविध प्रकारचे रजीष्टर, पारदर्शक नमुना बरणी, परीसर व दुुकानातील स्वच्छता, वृक्षलागवड किंवा कुंड्यातील झाडे लावून परीसर सुशोभिकरण, लाभार्थींसाठी बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी, उंदीर व घुशींसाठी पिंजरा किंवा इतर साधन व पेस्ट कंट्रोल करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर आग प्रतिबंधक यंत्र, स्मोक प्रतिबंधक यंत्र आदि सुविधा उपलब्ध करायच्या आहेत.

या आयएसओ मानांकरनाकरीता तालुकास्तरावर महसुल नायब तहसिलदार यांचे मार्गदर्शनाखाली अव्वल कारकुन काम करणार आहे त्यासाठी तालुकास्तरावर धान्य दुकानदारांतून मंडल निहाय समन्वयक नेमुन कामाच्या प्रगतीचा अहवाल जिल्हा पुरवठा कार्यालयास सादर करण्याबरोबरच कामाची पुर्तता करून घ्यायची आहेे. यासाठी दुकानदारांनी अज आपल्या दुकानच्या अवस्थेचा फोटो काढून ठेवायचा आहे व सुचनेनुसार केलेल्या बदलाचा फोटो काढायचा आहे.  

या बरोबरच लाभार्थींना डीजीटल सेवा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. त्यासाठी रोखीच्या व्यावहाराऐवजी स्कॅनर व स्वायप मशीनची सुविधा उपलब्ध करायची आहे. विविध प्रकारचे फलक लावताना त्यावर शिल्लकसाठी, प्रमाण, दर, पात्रलाभार्थींची संख्या, दक्षता कमीटीसदस्यांच्या नावाचा फलक, लाचलुुचपत कार्यालयाचा संपर्क क्रमांक, तपासणी अधिकारी यांचे नाव संपर्क क्रमांक, आरोग्य तपासणी प्रमाणपत्र, अन्न व औषध परवाना वजनमापांचे प्रमाणपत्र, शॉपअ‍ॅक्ट प्रमाणपत्र आदिं अद्यावत करावयाचे आहेत.शेवटच्या टप्प्यात सि सि टी व्ही स्मोक डिटेक्टर अग्निशामक यंत्रणा ही कामे करावयाची आहेत

जिल्ह्यातील 1884 दुकानात एक सारखे पण येण्यासाठी जिल्ह्यातील सर्व दुकांनाना एकच रंग असावा, एक सारखे फलक, एकाच साईजचे व एकाच रंगाचे फलक व एक सारखा ड्रेसकोड यात एक सारखेपणा असल्यास राज्यात आपल्या जिल्ह्याची स्वतंत्र ओळख निर्माण होईल अशी सुचना जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी केली. त्यास जिल्ह्यातील सर्व दुकानदार प्रतिनिधींनी दुजोरा दिला. 

या बैठकीस स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, जिल्हा सचीव रज्जाक पठाण, जिल्हा उपाध्यक्ष बजरंग दरंदले, चंद्रकांत झुरंगे, सुरेश उभेदळ, शिवाजीराव मोहीते, कैलास बोरावके, बाबा कराड, सुखदेव खताळ, प्रकाश भोसले, बाळासाहेब दिघे, विश्वासराव जाधव, सतिष हिरडे, गोवर्धन वाघस्कर, आत्माराम कुंडकर, श्रीकांत म्हस्के, गुलाबराव पवार, राजेंद्र शेळके, श्री.आरगडे आदिंसह जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनांचे पदाधिकारी, सदस्य व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थीत होते. 

या बैठकीदरम्यान जिल्ह्यातील बहुतांशी दुकानांना जुन महिण्यात उशीरानेे मोफतचे धान्य उपलब्ध झाले परंतू दि.2जुलैपासून ते धान्य पॉझ मशीनवर दिसत नसल्याने सर्वच दुकानात धान्यसाठा दुकानात पडून आहे, कार्डधारक दुकानात चकरा मारत आहेत, जिल्ह्यातील वितरण बंद आहे. काही दुकानात काही टक्केवारीत वितरण झाले परंतू उर्वरीत वितरण थांबल्याने त्यास मुदतवाढ मिळण्याची आवश्यकता असल्याची मागणी जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी केली.

आपली मागणी रास्त आहे परंतू पहील्या व दुसर्‍या टप्प्यातील धान्य वाहतुकीत विस्कळीतपणा आल्यामुळे या अडचणी येत आहेत. आम्ही मुदत वाढीची मागणी केली आहे परंतू या वितरणास मुदतवाढ येण्याची शक्यता कमी असल्याने दुकानदारांनी आपल्या दुकानात जो धान्यसाठा शिल्लक आहे त्यातून  वितरण सुरु करावे, मागील वितरणास मुदत वाढ आल्यानंतर ते ही वितरण करता येईल परंतू सध्या आहे ते वितरण सुरू करा, दुकाने बंद ठेवू नका अशी सुचना यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिल्या.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- मा .जि प सदस्य शरद नवले यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा परिषद निधीतुन  खडीकरण केलेल्या दिघी रोड रस्त्याचा लोकार्पण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला .                                   बेलापुर बुा येथील दिघी रस्स्त्याच्या कामाबाबत परिसरातील नागरीकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारीची दखल घेवुन मा.जि प सदस्य शरद नवले यांनी या रस्त्याच्या खडीकरणासाठी तीन लाख रुपयांचा निधी मंजुर करुन त्या रस्त्याच्या खडीकरणाचे काम पुर्ण केले आज त्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला त्या वेळी माजी जि प सदस्य माजी  जिल्हा नियोजन समीती सदस्य  शरद नवले,सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक पा. खंडागळे, अशोक कारखान्याचे माजी व्हा चेअरमन जालींदर कुऱ्हे,  ग्रा.प सदस्य मुश्ताक शेख,रमेश आमोलिक,वैभव कुर्‍हे,एम पी सोसा संचालक प्रभाकर कुर्‍हे,प्रकाश मेहेत्रे ,दत्तात्रय सोनवणे ,वृध्देश्वर कुर्‍हे ,अर्जुन कुर्‍हे,   मच्छिंद्र कुर्‍हे,शांतवन आमोलिक ,नामदेव मेहेत्रे ,सोहम लगे ,बाळासाहेब कुर्‍हे ,  विशाल पवार, अन्तोन आमोलिक, शाम सोनवणे ,अनिल कुर्‍हे ,

आहेर पाव्हणे ,मनोज मेहेत्रे  ,मल्हारी कुर्‍हे,  गणेश कुर्‍हे ,शुभम कुर्‍हे ,साहिल कुर्‍हे ,आदिसह  परिसरातील नागरीक उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget