Latest Post

श्रीरामपूर प्रतिनिधी-गाडीचा कट मारल्याच्या कारणावरून चौघा तरूणांवर धारदार चॉपरने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. शहरातील म्हाडा कॉलनी येथे रात्री 9.40 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.या घटनेत जखमी झालेल्या अली जाकीर पठाण (वय 17, धंदा कार डेंटींग-पेन्टींग, रा. संजयनगर, वार्ड. नं. 2, श्रीरामपूर) या तरुणाने शहर पोलिसात फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे की, मी व मित्र अदनान शेख व जावेद शाह असे एका गाडीवरून कामावरून घराकडे जात असताना म्हाडा कॉलनी येथे सुरज यादव याने गाडीला कट मारला तेव्हा मी म्हणालो की, गाडी दिसत नाही का? याचा राग आल्याने त्याने मला व मित्रांना शिवीगाळ करत आरोपींनी धारदार चॉपरने वार केले.डोक्यावरचा वार हुकवला तेव्हा डाव्या खांद्याला वार लागला. जावेद शाह, अदनान शेख यांनाही चॉपरने वार करून जखमी केले. यावेळी इतरांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून लोखंडी रॉड, बेल्टने मारहाण केली. यावेळी लोक जमले असता आरोपींनी चॉपरने पाठीवर वार करत तन्वीर शेख यालाही मारहाण केली व दुचाकी गाड्यांची तोडफोड करून नुकसान केले.या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांत सुरज यादव, गणेश गिते, सुजीत काळे, सनी काळे, शुभम यादव व इतर 8 जणांविरूद्ध भादंवि कलम 307, 143, 147, 148, 149, 324, 504, 506, 427, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम 7 प्रमाणे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील एका आरोपीस पोलिसांनी अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक़ विठ्ठल पाटील हे इतर आरोपींचा शोध घेत आहेत. पोलीस उपअधीक्षक़ संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी भेट दिली.

नगर प्रतिनिधी-अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा दि.०४/०७/२०२२ रोजी यशस्वी झाला आहे.भूसंपादन कार्यालयातील मंगेश ढुमणे (लोकसेवक) या कर्मचाऱ्याला चार हजारांची  लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.तक्रारदाराने आईच्या नावे घेतलेल्या जमिनीच्या अकृषिक परवानगी करता ना हरकत प्रमाणपत्रासाठी भुसंपादन विभागात प्रकरण दाखल केले होते.सदरचे ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर आरोपी लोकसेवक मंगेश ढुमणे याने तीन हजारांची मागणी केली होती याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.दि.१/०७/२०२२ रोजी केलेल्या लाच मागणीच्या पडताळणी दरम्यान आरोपी  ढुमणे याने पंचासमक्ष दोन्ही कामांचे एकत्रित चार हजार मागितले होते.सोमवार दि.०४/०७/२०२२ रोजी चार हजार रुपये घेताना आरोपी ढुमणेला रंगेहात पकडण्यात आले.सदरची कारवाई लाचलुुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर,पोलिस निरीक्षक श्री.शरद गोर्डे,गहिनीनाथ गमे,पोना/रमेश चौधरी,विजय गंगुल,पोलिस अंमलदार/ रविंद्र निमसे,मपोना/राधा खेमनर,संध्या म्हस्के,चालक पोलिस हवालदार/हरून शेख,राहुल डोळसे यांनी केली

श्रीरामपूर प्रतिनिधी-शहरातील सरस्वती कॉलनी परिसरात एका मालवाहू टेम्पोत 42 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सचिन विश्वास सराफ (वय 42) असे या तरुणाचे नाव आहे. शहरातील वार्ड नं. 7 मधील दळवीवस्ती परिसरात मालवाहू टेम्पोच्या केबीनमध्ये सचिन मृतावस्थेत आढळून आला.नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी साखर कामगार रूग्णालयात नेले असता उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांनी शहर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यावरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक़ संजय सानप, पोलीस नाईक अडांगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. सचिन सराफ यानचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत पोलीस नाईक अडांगळे अधिक तपास करीत आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, तीन मुली असा परिवार आहे.

अहमदनगर प्रतिनिधी - प्रस्तुत बातमीची हकीकत अशि की दि.०१/०७/२०२२ रोजी स्थानीक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार हे चैन स्नैकिंग गुन्हयातील आरोपीकडे तपास करत असताना पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की नगर औरंगाबाद रोडवरील जेऊर टोल नाका येथे दोन इसम हस्तीदंत विक्री करणेसाठी येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके यांनी सदर माहिती श्री.मनोज पाटील पोलीस अधीक्षक आमदनगर यांना कळवली.मा.श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक यांनी पोलीस निरीक्षक श्री. अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले. नमूद आदेशान्वये पोनि/अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/गणेश इंगळे,पोसई/सोपान गोरे,सफौ/राजेंद्र वाघ,पोहेकाॅ/बापूसाहेब फोलाणे,देवेंद्र शेलार,पोना/ भीमराज खर्से,सुरेश माळी,पोना/शंकर चौधरी,रवि सोनटक्के,पोकॉ/सागर ससाणे व मच्छिंद्र बर्डे लागलीच असे पथक तयार करून कारवाई करणे बाबत सूचना व मार्गदर्शन करून रवाना केले.सदर सूचनाप्रमाणे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे खाजगी वाहनाने नगर औरंगाबाद रोडवरील जेऊर टोल नाका येथे वेशांतर करून सापळा लावून थांबले असताना थोड्याच वेळात दोन इसम टोल नाका परिसरात संशयितरित्या फिरताना दिसून आले त्यापैकी एकाच्या पाठीवर मिल्ट्री रंगाची सॅक होती.सॅक मधून काहीतरी भाग वर आलेला व त्यास रुमाल बांधलेला होता थोडा वेळ थांबल्यानंतर संशयित इसमा जवळ एक ग्रे रंगाची आय-२० कार येऊन थांबली व कार मधून चार इसम खाली उतरले संशयित दोन्ही इसम कार मधून आलेल्या इसमांना सॅक मधून एक मोठा हस्तिदंत सारखी वस्तू दाखवून बोलत असताना हस्तिदंत विक्री करण्यासाठी आलेले इसम हेच आहेत अशी पोलीस पथकाची खात्री झाल्याने त्यांनी संशयित इसमांवर झडप घालून शिताफीने ताब्यात घेतले.त्यांची अंग झडती घेतली असता त्यांचे ताब्यात हस्थिदंत सारखी वस्तू मिळून आली.संशयित इसमांना त्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी हस्तिदंत खरे असून ते विक्री करण्यासाठी आलो अशी कबुली दिल्याने त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव १) व्यंकटेश दुराईस्वामी वय ४० वर्ष रा.हल्ली, वाकडी फाटा दरेवाडी तालुका जिल्हा अहमदनगर २) महेश बाळासाहेब काटे वय ३० रा. आखेगाव तालुका शेवगाव असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे हस्तिदंत बाबत विचारपूस करता त्यांनी शेवगाव येथील महेश मरकड व त्याचे इतर साथीदारांना काळया बाजारात हस्थिदंत विक्री करण्यासाठी आलो असे सांगितले.हस्थिदंत कुठून आणले आहेत याबाबत तपास चालू आहे.सदर आय-२० कार मधून आलेल्या व ताब्यात घेतलेले इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) महेश भगवान मरकड वय २६ वर्ष रा. गहिलेवस्ती शेवगाव २) सचिन रमेश पन्हाळे वय ३३ वर्ष राहणार आखेगाव तालुका शेवगाव ३) निशांत उमेश पन्हाळे वय २५ वर्ष रा. भगतसिंग चौक शेवगाव ४) संकेत परशुराम नजन वय २३ वर्ष रा.पवार वस्ती शेवगाव असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी व्यंकटेश दुराईस्वामी व महेश काटे यांच्याकडून हस्तिदंत खरेदी करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले, उपवन संरक्षण अधिकारी अहमदनगर यांनी हस्तीदंत हे प्राथमिक तपासणीमध्ये अस्सल खरे असल्याचे स्पष्ट झाले आहे.बहुमूल्य शोभेच्या वस्तू व औषधी आदि करिता हस्तिदंतांचा वापर होत असल्याने हत्तीचे दातांना आंतरराष्ट्रीय बाजारात विशेष महत्त्व आहे मात्र दातांची किंमत जाहीर केल्यास हस्तीचे दातांच्या तस्करीसाठी हत्तीची हत्या करण्याचे प्रमाण वाढू शकते त्यामुळे वनविभागाने या दातांची किंमत जाहीर करण्यात बंदी घातलेली आहे.सदरील घटनेबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे सदर इसमाविरुद्ध भादविक ४२९ सह वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २(१६),९,३९,४४,(ब),५० व ५१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई श्री.मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर

श्री.सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक,श्री. अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.पुढील कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.

कोपरगाव प्रतिनिधी-दारू विक्री चालू ठेवण्यासाठी 55 हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोड अंती 35 हजारांची लाच स्विकारताना, नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक नंदू चिंधू परते व सहा दुय्यम निरिक्षक राजेंद्र भास्कर कदम या दोन अधिकार्‍यांना रंगेहाथ पकडले आहे.मंगळवारी रात्री कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईने लाचखोर अधिकार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.तक्रारदार यांचा दारू विक्री व्यवसाय असून दारू वाहतूक व विक्री चालू ठेवण्यासाठी दिनाक 27 जून रोजी आरोपी राजेंद्र भास्कर कदम यानी मागील 11 महिन्यांचे बाकी हप्त्याचे 55 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 30 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले तसेच आरोपी नंदू चिंधु परते यांनी त्यांच्यासाठी दरमहा 5 हजार रुपये लाचेची मागणी करून दिनांक 29 जुन रोजी आरोपी राजेंद्र भास्कर कदम याने 35 हजार रुपये लाचेची रक्कम पंच साक्षीदार यांच्यासमक्ष स्विकारतांना पकडण्यात आले.ही कारवाई पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक, नारायण न्याहळदे, पोलिस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार, पोलिस निरिक्षक संदीप साळुंखे, पो.ना. डोंगरे, पो.ना. इंगळे, पो. ना नितीन कराड, चालक विनोद पवार यांच्या पथकाने केली.

श्रीरामपूर प्रतिनिधी-येथील आरटीओ कार्यालयात काल सायंकाळच्या दरम्यान एका एजंटने काही लोकांना जमवून अधिकारी व कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत त्यांच्या बरोबर झटापट केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.येथील आरटीओ कार्यालयात काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एक एजंट व कर्मचारी त्यांच्यामध्ये काही कागदपत्र घेण्यावरून बाचाबाची होऊन शिवीगाळ झाली. त्या एजंटने बाहेरून काही लोकांना जमवून आणले. त्या ठिकाणी दोघांमध्ये वाद होत असल्याचे पाहून काही अधिकारी, कर्मचारी व एजंटसह गर्दी जमली. त्या एजंट्स व त्याने जमवलेल्या लोकांनी कर्मचारी अधिकार्‍यांना शिवीगाळ करत त्यांच्या बरोबर झटापट केली. हा प्रकार पाहण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.या घटनेची माहिती कळताच पोलीस त्या ठिकाणी आले. या प्रकरणाची पोलिसांनी सर्व माहिती घेतली. त्या एजंटला शोधण्यासाठी पोलिसांनी त्याचे घर गाठले मात्र तो मिळून आला नाही. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची नोंद करण्यात आली नव्हती .

बेलापुर  (प्रतिनिधी  )-विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना ज्या शाळा महाविद्यालय अडवणूक करेल अशा  शाळा/ महाविद्यालयीन विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे विद्यार्थी सेना च्या वतीने करण्यात आली आहे ,

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या , वतीने गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या शाळा व कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया चालू आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना विविध स्वरुपांचे कागदपत्रे काढण्यासाठी सेतू कार्यालय, तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय या ठिकाणी काही वेळा अडवणूक होण्याची शक्यता  आहे. वेळेत कागदपत्र मिळत नाही उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर दाखला, जात पडताळणीचा दाखला, बोनाफाईड अशा विविध कागदपत्रांसाठी या कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांची पिळवणूक होत असल्याच्या अनेक  तक्रारी येत  आहे. तसेच शाळा व कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतेवेळेस डोनेशनची मागणी केली जात आहे. अनेकांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे जास्त फी भरु शकत नाही. नियम बाह्य फी मिळत असल्याने शाळा व कॉलेजमध्ये , गर्भश्रीमंत मुलांना ऍडमिशनला, प्रथम प्राधान्य देत आहेत. यामुळे अनेक गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे. अशा शासकीय नियमांचे उल्लंघन करणार्या शाळा व कॉलेज व्यवस्थापकांवर कारवाई करण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. आत्ताच कुठे कारोनाची तिव्रता कमी असून शाळा व कॉलेजेस सुरु होताच मनमानी फी व डोनेशची आकारणी  सुरु केल्याच्या तक्रारी येत आहे. त्यामुळे पालक वर्ग हवालदिल झालेला आहे. काही सेतु चालकही दाखले देण्यिकरीता  अव्वाच्या सव्वा पैसे उकळत आहेत .तरी अशा सर्वावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे काहींना नोकरी नाही, व्यवसाय नाही त्यातच फी व डोनेशनची मागणी वाढत आहे. तसेच जे सेतु कार्यालय, शासकीय फी पेक्षा जास्त अतिरिक्त पैसे घेणार्या सेतू कार्यालयावर देखील कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर मनसे जिल्हाध्क्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली  तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल.आसा ईशारा मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने देण्यात आलेला आहे या निवेदनावर मनसे विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष  गणेश दिवसे,तालुकाध्यक्ष  गणेश रोकडे, शहराध्यक्ष विशाल लोंढे, जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवथर जिल्हा सरचिटणीस सुरेश जगताप, उपजिल्हाध्यक्ष संतोष डहाळे, तालुकाध्यक्ष प्रविण(आबा) रोकडे, शहराध्यक्ष निलेश लांबोळे, कामगार सेना तालुका अध्यक्ष सचिन पाळंदे, निलेश सोनवणे, संदीप विश्वंबर, अमोल साबणे, अक्षय सूर्यवंशी, विकी परदेशी, मंगेश जाधव, संकेत शेलार, रोहन गायकवाड, श्रीराम थोरात, जगन सुपेकर, अमोल ढाकणे, सागर भोंडगे, अक्षय अभंग, राहुल शिंदे, श्याम लांडे, प्रमोद शिंदे, किशोर बनसोडे, आधी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget